Gandi Godase

(साभार : मी नथुराम गोडसे बोलतोय.)
केवळ जीनांच्या वेड्या हट्टाला मान्यता देऊन, केवळ कोणाचं मन मोडायचं नाही म्हणून गांधीनी विभाजनाला मान्यता दिली.... व्यक्ती देशापेक्षा कधीच मोठी नसते नाना... आणि गांधी हि व्यक्ती स्वतः ला देशापेक्षा मोठी समजू लागली तर.... तर मग देशसेवा, त्याग या शब्दाला काय अर्थ राहतो....???
गांधी जीनांना भेटायला निघाले तेव्हा आपण त्यांची गाडी अडवली.... त्यांना सांगितलं, नका जीनांशी तडजोड करू... नका देशाचा तुकडा मोडू....
पण आपला हा राष्ट्रपिता, आपल्या छातीवर पाय देऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी सुईणीसारखा त्यांच्या मदतीला धावला....!!
गांधीनी स्वतःच्या अस्तित्वाला जेव्हा जेव्हा आव्हान दिलं तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळ झुकलं...देशाच्या अहिताचेच निर्णय घेतले गेले.... पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा निर्णय पण...!
आपली निदर्शनं सुरु होती... गांधींचं आमरण उपोषण सुरु होतं....! शेवटी हिंदूंनी शस्त्र खाली ठेवली....
मला अजूनही आठवतं, एक गरीब हिंदू पुढे आला आणि गांधीना म्हणाला, "बापू, तुमच्या हत्येच पातक माझ्या कपाळी नको म्हणून हे शस्त्र तुमच्या पायाशी ठेवतोय. पण मुसलमान मोहल्ल्यात माझं एकच हिंदूच घर आहे". त्या रात्री हैदराबाद सोडण्यापूर्वी मी त्या हिंदुकडे गेलो. त्याच्या घरी एकच हलकल्लोळ मजला होता... त्याच्या आठ वर्षांच्या मुलाची कत्तल झाली होती... त्याच्याकडे फक्त आक्रोश होता...आपल्या मुलाचं कत्तल केलेलं कलेवर माझ्यासमोर फेकून तो मला म्हणाला, " जा हे तुमच्या गांधींकडे घेऊन जा, याचं रक्त घेऊन जा... आणि त्यांना सांगा, पुन्हा उपोषणाला बसलात तर मोसंबीचा रस पिऊ नका.... याचं रक्त प्या...." !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved