Posts

Showing posts with the label Horror

पितृपक्ष.

"आपण", आपलं असणं हे एक चैतन्य आहे, उर्जा, शक्ती... शरीर नश्वर असलं तरीही आत्मा चिरंतन आहे. शरीर फक्त एक माध्यम. आपलं मन, आत्मा, जीव म्हणजे चिरंतन उर्जा. त्या आत्म्याला भावना आहेत, गरजा आहेत. भावना, इच्छा, विचार, अस्तित्व यांचा संगम म्हणजे आत्मा... आत्मा शक्ती आहे. उर्जा आहे. तिला स्वभाव आहे. According to the first law of thermodynamics, also known as Law of Conservation of Energy, states that energy can neither be created nor destroyed; energy can only be transferred or changed from one form to another. शक्तीला जन्म मृत्यू नाही, ती एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाते. शरीर मरतं, नष्ट होतं पण आत्मा कधीही नष्ट होत नाही. शरीर सोडल्यानंतरही तो अदृष्य रुपाने आपल्या भोवती जीवन जगत असतो. मृत्यूपश्चातही त्याच्या भूक, तहान, इच्छा या सवयी सुटत नाही. त्या पूर्ण करण्यासाठी तो धडपडत राहतो. पाणी, वीज, प्रकाश, हवा जसं पुढे जाण्यासाठी द्वार शोधतात तसंच आत्मा देखील पूर्नजन्माचं द्वार दिसलं की नव्या शरीरात जन्म घेऊन तो त्या गरजा पूर्ण करून घेतो. युगांनूयुगे ही क्रिया सुरू आहे... मोक्ष वगैरे गोष

छोट्या गोष्टी..... भुताच्या

Image
नवरा बायकोचा खून करतो. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गाढ झोपेत असतो. चार दिवस उलटल्यानंतरही मूल आई कुठे आहे विचारत नाही. बापाच्या हृदयात चर्र होतं. बाप- तुला काही विचारायचं का? मुलगा- आई सतत तुमच्यामागे का उभी असते? =========== मध्यरात्री जाग आली. १२ वाजून ७ मिनिटं झाली होती. तिने तिची लांब नखं माझ्या छातीत घुसवली होती. दुसर्य़ा हाताने ती माझं तोंड दाबत होती. मी खाडकन् जागा झालो. स्वप्न होतं ते. जीव भांड्यात पडला. घड्याळात पाह्यलं. १२ वाजून ६ मिनिटं झाली होती. बाथरूमचा दरवाजा मधोमध फाटला होता. ============= मुलगा: बाबा आपल्या घरात भुत आहे. वडिल: भुत वगैरे काही नसते, कोणी सांगितले तुला हे सगळे. मुलगा: आपल्या घरातील मोलकरीण सांगत होती. वडिल: चल सामान बांधायला घे आपल्या घरात भुत आहे. मुलगा: पण तुम्हीच म्हणाले भुत नसते. वडिल: हो बेटा पण आपल्या घरात मोलकरीण पण नाही. ============= बायकोने रात्री उठवलं. कोणीतरी घरात शिरलंय हे सांगताना ती पांढरीफटक पडली होती. दोन वर्षांपूर्वी रात्री एका दरोडेखोराने तिचा खून केला होता. ============= काचेवर टकटक झाली आणि मी जागा झालो. मला

महालया

Image
. एकवेळ दैवी अस्तित्व नाकारेन, पण मृतात्मे, पितृ, मृत्यूपश्चात असलेलं जग यांवर माझा ठाम विश्वास आहे. माणसाचा मृत्यू हा फक्त शरीराने होतो, तिथे त्याचं केवळ भौतीक अस्तित्व संपतं, पण ती व्यक्ती आत्मरूपाने (पितृरुपाने) सदैव आपल्या आसपासच असते. मी या गोष्टीवर १०० टक्के विश्वास ठेवतो. आपला आत्मा ही एक शक्ती आहे. आणि  The Law of Energy, states that energy can neither be created nor destroyed; energy can only be transferred or changed from one form to another. शक्ती निर्माण होत नाही, नष्ट होत नाही. ती फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जाते. माणसाच्या मृत्यूनंतर शरीर संपतं, आत्मा जिवंत असतो. त्यामुळे मृत्यूपश्चात पितृविश्व आहे. भूत, आत्मा वगैरे गोष्टी सत्यात आहेत ! त्या आत्म्यांनाही तहान- भूक, इच्छा आहेत... आणि त्या इच्छा पूर्ण करण्याची अपेक्षा ते त्यांच्या वंशजांकडून ठेवतात. आपण खूप भूक लागल्यावर खायला मिळत नाही तोपर्यंत चवताळतो तसं या आत्म्यांच्याही या इच्छा तिव्र होतात आणि ते याची जाणीव वंशजांना करुन देतात. "पितृदोष" म्हणतात तो हाच ! एकवेळ देवाच्या पूजेला टाळाटाळ चालेल, पण श

Rasta रस्ता

=रस्ता= तीन वर्षांपूर्वीची सत्य घटना आहे. अशीच जून-जुलै मधली. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो. तेव्हा आलेला हा भयाण अनुभव. . आम्ही चौघं इनोव्हा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहचलो. कारंजा म्हणजे दत्तसंप्रदायातील महत्वाचं स्थान. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे ११० किमीवर असलेल्या माहूरला निघायचं, असं ठरलं होतं. पण पावसामूळे आणि गाडीने नाटकं केल्याने कारंजात पोहचायला रात्रीचे ८ः३० वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत १०:०० झाले...  पाऊस सुरूच होता... गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम... त्यामुळे पुढे जावं की नाही, हा प्रश्न होता. हो हो नाही नाही करत १०ः३० वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं... ड्रायव्हिंगचं तसं टेंशन नव्हतं... पण तो भाग आम्हाला नवा होता, शिवाय पाऊस... ! सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप करायची होती... म्हणून हळू हळू पोहचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच... त्या आधी मंदीराजवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या दोन गुरुजींनी आम्हाला शेगांवला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. त्यांनाही बरोबर घ

मरण कसं असाव

Image
मरण कसं असावं, एसी हॉलमध्ये झोपून नाकातोंडात नळ्या घेवून, किंवा फाटक्या डोळ्यांनी कडू आसवं गाळत वाट बघत येणारं मरण काय मरण असतं कां ? चालता बोलता हार्ट फेल होवून मरण्यात कसली आलीय मजा ? किडे मोजत वर्षानूवर्ष मरण्यासाठी झटणारे जगतातच काय ? हसत हसत जीव सोडला तर मरणाला काय अर्थ आहे ? गाडी ठोकली आणि मेला, काय कमावलं ? . हायवेवर मरुन पडलेला, शरीराच्या चिंधड्या चिंधड्या झालेल्या कुत्र्याचा मला नेहमीच हेवा वाटतो... तो खरा मरतो... तो मरणही जगतो... वेदना, तडफड, त्रास पुरेपूर अनुभवतो... तडफडून जीव सोडतो... जगण्याचं अख्खं थ्रिल त्याच्या मरण्यात असतं... उलट्या लटकलेल्या गिधाडांचं काय ? . मरण कसं असावं ? तडफड, यातना, कठीण, त्रास... सगळे भोग पूरेपूर भरलेलं... फडफड व्हावी मरण यावं तर असं जबरदस्त यावं... शरीराच्या चिंधड्या चिंधड्या व्हाव्यात... तडफडून तडफडून जीव जावा, मरणाच्या वेदना पुरेपूर भोगाव्यात... विव्हळ, यातना अनुभवत संपावं... मरणाचाही क्षण पूर्ण जगून निघावं... . आपलं मरण बघून इतरांच्या अंगावर काटा आला तर ते खरं मरणं... मरण असावं तर असं असावं... भयंकर, भयाण आणि भ

गुढ - २

मेलेली माणसं स्वप्नात येण्याचा विषय या ठीकाणी सुरूय... त्यावर मी माझे सत्य अनुभव सांगतोय. या अनुभवांना मी दैवी देणगी समजतो. . (१) माझी आजी गेली त्या रात्रीचा हा अनुभव : १९९९ मी सहा वर्षांचा होतो. त्यामुळे इतकं स्पष्ट आठवत नाही. पण एकुण घटना, ते वाक्य माझ्या मनावर कोरली गेलीय. मी तेव्हा सुट्टीत मुंबईत होतो. आजी धुळ्यात. दिवसभरात रुटीननंतर मला रात्री गाढ झोप लागली. आणि माझी आजी अचानक स्वप्नात आली. ती रडत होती. "मी जातेय हा तेजस... मी देवाकडे जातेय... तू खूप मोठा हो... दादांना (माझे आजोबा) आणि माझ्या जयाला (माझे पप्पा) सांभाळ." आणि आजीने मला जवळ घेतलं... खुप रडली... आणि गेली... हे स्वप्न इथे संपलं. मी खडबडून उठलो, आणि आईला जसंच्या तसं सांगितलं... - असं काहीच नसतं रे, झोप शांत. असं म्हणून आईने मला झोपवलं. पण अर्ध्या तासात घरुन खरंच आजी गेल्याचा फोन आला. विशेष म्हणजे ती ज्या साडीत मला स्वप्नात दिसली तीच साडी तिच्या मृत शरीरावर होती. - ती मला भेटून गेली. . (२) अहमदनगरला असलेली माझी समवयस्क आतेबहिण तीन वर्षांपूर्वी २२ नोव्हेंबरला अचानक गेली. नंतर १५ दिवसातच तीचे वडी

गुढ - २

मेलेली माणसं स्वप्नात येण्याचा विषय या ठीकाणी सुरूय... त्यावर मी माझे सत्य अनुभव सांगतोय. या अनुभवांना मी दैवी देणगी समजतो. . (१) माझी आजी गेली त्या रात्रीचा हा अनुभव : १९९९ मी सहा वर्षांचा होतो. त्यामुळे इतकं स्पष्ट आठवत नाही. पण एकुण घटना, ते वाक्य माझ्या मनावर कोरली गेलीय. मी तेव्हा सुट्टीत मुंबईत होतो. आजी धुळ्यात. दिवसभरात रुटीननंतर मला रात्री गाढ झोप लागली. आणि माझी आजी अचानक स्वप्नात आली. ती रडत होती. "मी जातेय हा तेजस... मी देवाकडे जातेय... तू खूप मोठा हो... दादांना (माझे आजोबा) आणि माझ्या जयाला (माझे पप्पा) सांभाळ." आणि आजीने मला जवळ घेतलं... खुप रडली... आणि गेली... हे स्वप्न इथे संपलं. मी खडबडून उठलो, आणि आईला जसंच्या तसं सांगितलं... - असं काहीच नसतं रे, झोप शांत. असं म्हणून आईने मला झोपवलं. पण अर्ध्या तासात घरुन खरंच आजी गेल्याचा फोन आला. विशेष म्हणजे ती ज्या साडीत मला स्वप्नात दिसली तीच साडी तिच्या मृत शरीरावर होती. - ती मला भेटून गेली. . (२) अहमदनगरला असलेली माझी समवयस्क आतेबहिण तीन वर्षांपूर्वी २२ नोव्हेंबरला अचानक गेली. नंतर १५ दिवसातच तीचे वडी

गुढ 1

गुढ अनुभव हा प्रकार माझ्याबाबतीत अनेकदा घडतो, आणि घडून गेल्यानंतर आपण काहीतरी विचित्र प्रकार अनुभवल्याची जाणीव होते. यामुळे जिवावरचे अपघातही सहन केले आहेत तर अनेकदा तापात फणफणलोय. काही गुढ अनुभव, काही कथा याठीकाणी सांगणार आहे. #गुढ या टॅगखाली... . धुळ्यात जुने धुळे भागात साधारण तीन वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. मी त्याच दिवशी पुण्याहून घरी गेलेलो. रात्रभर प्रवास, थोडी कणकण यामुळे दिवसभर झोपलेलोच होतो. ती पावसाळ्यातली संध्याकाळ होती... नुकताच पाऊस पडून गेलेला. लाईट गेलेले, त्यामुळे अंधार होता. पुन्हा पाऊस पडेल आणि बाहेर पडू शकणार नाही, शिवाय दिवसभर झोपून कंटाळा आलेला. म्हणून मी ब्रेड, दुध वगैरे घेण्यासाठी जवळच्या चौकात पायीच गेलो... येतांना परत रिप रिप पाऊस सुरू झाला... अंधार आणि दोन चार डोकी सोडली तर तशी शांतताच होती... पाऊस सुरू व्हायच्या आत घरी पोहचू अश्या वेगात असतांना मागून ओळखीचा आवाज आला... "तेजा... अरे थांब...." अनुजाचा ओळखीचा आवाज होता... अनुजा : माझ्या मित्राची बहीण... तिने हाक मारली तर थांबणं भागच होतं. मी हातातली दुधाची बॅग आणि सामान तसंच सांभाळत रस्त

अखेरचा क्षण मृत्यूचा थंडगार स्पर्श

. काल रात्री माझ्या एका मित्राची नव्वदीतली आजी देवाघरी गेली. नव्वद वर्षांची होती, शरीर पूर्ण गेलेलं तरीही शेवटच्या क्षणापर्यंत मेंदू आणि वाचा तल्लख होती. तिचा शेवटचा अगदी जीव जायच्या वेळेचा क्षण मला प्रत्यक्ष बघता आला. शेवटचा क्षण कसा असतो, इतक्या वर्षाचं आयुष्य संपत असतं, जे जे माझं माझं म्हणून जमवलं ते इथेच सोडून जायचं असतं, पुढे काय असेल याची एक उत्सुकता अश्या असंख्य भावनांचे काहूर त्यावेळी मनात उठत असावं. त्या आजींच्या शेवटच्या  क्षणाचं पूर्ण निरीक्षण केलं. त्यांची वाचा आणि मेंदू शेवटपर्यंत शाबूत होता त्यामुळे नेमक काय होतंय हे जाणून घेण सोप्प झालं.  . शेवट जसा जसा जवळ येत होता तसा आजूबाजूंच्या मंडळींची हुरहूर वाढत होती. संपूर्ण शांत आणि भयाण वातावरण. नकळत कुणाच्यातरी मुखातून हुंदका बाहेर पडायचा. आजीं घरभर नजर फिरवत होत्या. त्यांच्या मुलांकडे, मुलींकडे वैगेरे बघत होत्या. खुणेनेच त्यांना शांत व्हा असा इशारा केला. त्यांच्या मोठ्या मुलाने शांतपणे विचारलं, "काही हवंय का आई??" आजी सगळी शक्ती एकवटून "मी खूप थकलीय आणि मला झोप येतेय" इतकंच बोलल्या, आणि समोरच लावलेल्या

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved