Posts

Showing posts with the label Politics

Keataki Chitale Matter

केतकी चितळे बोलली ती वेळ चूक कि बरोबर हे महत्वाचं नाही - आपल्याला तिचं म्हणणं पटतंय, तरीही आपण तिच्या सपोर्टला उभं न राहता तिलाच अक्कल शिकवतोय ही गोम आहे ! ... बेसिक फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात... ते हातात हात धरतात, आपल्याकडचे लोक्स बांगड्या भरतात. (ब्राह्मण म्हणून दूर - राईट विंगच्या हिशोबाने बघा आधी) ... सुरुवात कुठे झाली - केतकी चितळेने शिव्यांसाठी उलट शिव्यांची उजळणी केली, का ? तर तिच्या जेन्यूईन असणाऱ्या गोष्टींना आणि मतांना वाह्यात विकृत लोकांनी डिचवलं, घाणेरड्या कमेंट्स केल्या... तिचं आडनाव आणि जात आडवी आली. तिने का ऐकून घ्यावं? नडली ! व्हिडीओमध्ये एकेकाला नावासहित कोलला, आता ते लोक्स तिला टरकून असतात. नादी लागत नाही.  पण नंतर तिच्या प्रत्येक गोष्टीला - अगदी तिच्या फिट्ससाठी असलेल्या कामावरूनही तिला डिचवलं जात असेल तर कोण ऐकेल ? ती भिडते आणि नडते. ... केतकी चितळे असो वा कंगना राणावत, या पोरी जबरदस्त आहेत, सिस्टीम उलथावण्याची ताकद त्यांच्यात आहे. फक्त त्यांची ती शक्ती आपल्याच बाजूच्या अतिहुशार लोकांपुढे वाया जायला नको. ... केतकी चितळे ट्रोजन हॉर्स नाही, आपल्या बाजूची अतिहुशार

Nupur Sharma and BJP

नुपूर शर्माना निलंबित केल्या बद्दल शेवटची पोस्ट.. लेख मोठा आहे वेळ काढून अवश्य वाचा! आपण Information Age माहिती युगात जगत आहोत... हे युग हे सोशल मीडियाचे आहे, प्रगत तंत्रज्ञानाचे / Advance Technologies च आहे...Hybrid Telecommunications/ उच्चस्तरीय दूरसंचाराचे आहे... Hybrid Warfare/ हायब्रीड वॉरफेअरचे आहे. पुढे जाण्यापूर्वी Hybrid Warfare /हायब्रिड वॉरफेअर समजून घेणे महत्त्वाचे आहे. information Age माहिती युगातील लढाया युद्धभूमी ऐवजी इंटरनेटवर, स्टॉक एक्स्चेंजमध्ये,बायो लॅबमध्ये, तुमच्या बुद्धिजीवी/ intellectual आणि institute/संस्थांद्वारे  लढल्या जाणार. या लढाईत कोणतही हत्यार, शस्त्र नसते.. narratives असतात,पोस्ट, ट्विट द्वारे, Data hacking होते, Phishing असत, असे वेगवेगळे मार्ग वापरले जातात..  सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक Conventional War पारंपरिक युद्ध आहे...ज्यामध्ये बॉम, दारूगोळा, मिसाईल ही पारंपारिक शस्त्रे वापरली जात नाहीत.. कमीत कमी संसाधनांचा वापर करून आपल्या शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे, त्यांना गोंधळात टाकणे आणि त्यांना तोडणे.... एवढेच या युद्धाचे एकमेव उद्दिष्ट आ

Nupur Sharma and India

नुपूर शर्माना निलंबित केल्या बद्दल शेवटची पोस्ट.. लेख मोठा आहे वेळ काढून अवश्य वाचा! आपण Information Age माहिती युगात जगत आहोत... हे युग हे सोशल मीडियाचे आहे, प्रगत तंत्रज्ञानाचे / Advance Technologies च आहे...Hybrid Telecommunications/ उच्चस्तरीय दूरसंचाराचे आहे... Hybrid Warfare/ हायब्रीड वॉरफेअरचे आहे. पुढे जाण्यापूर्वी Hybrid Warfare /हायब्रिड वॉरफेअर समजून घेणे महत्त्वाचे आहे. information Age माहिती युगातील लढाया युद्धभूमी ऐवजी इंटरनेटवर, स्टॉक एक्स्चेंजमध्ये,बायो लॅबमध्ये, तुमच्या बुद्धिजीवी/ intellectual आणि institute/संस्थांद्वारे  लढल्या जाणार. या लढाईत कोणतही हत्यार, शस्त्र नसते.. narratives असतात,पोस्ट, ट्विट द्वारे, Data hacking होते, Phishing असत, असे वेगवेगळे मार्ग वापरले जातात..  सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक Conventional War पारंपरिक युद्ध आहे...ज्यामध्ये बॉम, दारूगोळा, मिसाईल ही पारंपारिक शस्त्रे वापरली जात नाहीत.. कमीत कमी संसाधनांचा वापर करून आपल्या शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे, त्यांना गोंधळात टाकणे आणि त्यांना तोडणे.... एवढेच या युद्धाचे एकमेव उद्दिष्ट आ

गडकरी वि. फडणवीस

Image
 कोरोना काळात आधी स्वत:ची तब्येत सांभाळा, कुटुंबियांना जपा आणि शक्य होईल तसं सगळी कामं ऑनलाईन करा!- नितीनजी गडकरी टू देवेंद्रजी फडणवीस गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला - देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यावरुन गडकरी यांनी फडणवीसांना प्रेमळ सल्ला दिलाय. "देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत", अशा शब्दात गडकरी यांनी फडणवीसांना दौरे टाळण्याची विनंती केली. आता यावरून वेगळे अर्थ (ते कसे काढले? सामना वाचून!) विरोधक मजा घेत आहेत. जरूर घ्या. गडकरी आणि फडणवीस पन दोघे व्हाट्सअप्प वर तुमचे स्क्रिनशॉट एकमेकांना दाखवून मजा घेत आहेत. तुम्ही मोदी vs गडकरी किंवा फडणवीस vs गडकरी करायचा जेंव्हा प्रयत्न करता, तेंव्हा ते तिघेही खुश असतात! कारण देश कि

SayNoToLockdown

(राजकीय मताचा चष्मा उतरवूनच वाचा...) मार्च ते जून लॉकडाऊन केल्यानंतर, उद्योगधंद्याचं श्राद्ध घालून आणि सगळं विस्कळीत होवूनही जर जुलैमध्ये परत लॉकडाऊन लावावं लागत असेल तर तर ते मोदींपासून, उद्धव ठाकरेसकट आपल्या शहराच्या महापौरापर्यंत सगळ्यांचं अपयश आहे...! ... मोदी, ठाकरे येतात - भाषण देतात - जातात, रिकव्हरी प्लान, बाहेर पडण्याचा रोडमॅप कुणाकडेही दिसत नाहीय... पंधरा पंधरा दिवसाची स्किपींग सुरु आहे एवढंच दिसतं. प्रामाणिक विचार केला तर केंद्र असो वा राज्य, पहिला पेशंट सापडल्यापासून अक्षम्य चूका झाल्यात..एअरपोर्ट स्क्रिनींग कमी पडलं, धोका ओळखण्यात चुक झाली, लॉकडाऊन लावतांना मिसमॅनेजमेंट झालं...! राज्यातल्या तिघाडी सरकारचा प्रश्नच नाही... तिथे एक से एक नग भरलेय... स्थानिक प्रशासन हौस म्हणून लॉकडाऊन लावतं, त्यावर कुणाचा कंट्रोल नाही... जिल्हाधिकारी-पोलीस राजे झालेय... गोंधळ गोंधळ गोंधळ घातला जातोय. ... बेशुद्ध पडलेले उद्योगधंदे बघितल्यानंतर इमॅजनरी मधुन जेव्हा फॅक्टवर येतो तेव्हा कळतं...! उद्योग परत सुरु करायचे तर रिस्टार्ट करण्यासाठी किती धडपडा असेल आणि त्यातही किती आधिकारी, मंत

नापास सरकार... हतबल दरबार

जे पाच लाॅकडाऊन मध्ये साध्य झालं नाही ते सहाव्या लाॅकडाऊन मध्ये होईल ही महाराष्ट्र शासनाची अपेक्षा व्यर्थ आहे. काहीतरी रणनितीमधे (strategy), दृष्टीकोनामधे (approach), गृहितकांमध्ये (premise / assumptions) बदल केल्याशिवाय आणि व्यवहारी (practical) परंतु सृजनशील विचार (creative thinking) केल्याशिवाय गत्यंतर नाही.  सरसकट “लाॅकडाऊन” टाळला पाहिजे. शासनकलेमध्ये (statecraft) सूक्ष्मनियोजनाची (micro-planning) एक पध्दत आहे. ती अवलंबवून स्थानिक परिस्थितीचा नेमका अंदाज घेऊन नियोजन केलं पाहिजे. अंमलबजावणीचे अधिकार विकेंद्रीत केले पाहिजेत.   साथीच्या रोगाचा प्रतिकार कसा करायचा ह्यासाठी साथरोग नियंत्रणाची जी नियमपुस्तिका (rule-book) आहे त्यात स्वयंसेवी संस्था, वस्ती पातळीवरील नेते, प्रभाव असलेल्या व्यक्ती आणि स्थानिक भाषेत संदेश (efrective local communication) देणं महत्वाचं असतं.. ते इथे काहीही झालं नाही.  “लाॅकडाऊन” चे दोन प्रमुख उद्देश असतात. १) संसर्ग रोखणे; आणि २) शासनपातळीवर क्षमता (तपासणी, मागोवा, उपचार) वाढवणे. दोन्हीमध्ये महाराष्ट्र शासन पहिल्या पाच “लाॅकडाऊन” मध्ये अपयशी ठरलं आ

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड

Police : Are they devils?

पोलीसांनी स्वयंसेवक म्हणून काही पोरं पांढऱ्‍या टिशर्टमध्ये उभी केलीय... त्या पोरांची पोलीसांच्या वर ताण आहे... आत्ता साठ-पासष्ठीतला एक माणूस स्कूटीवरुन जात होता, गाडीवर किराणा सामान. या टोळभैरवांनी अडवलं...  - कुठे निघालास ? त्यांच्या वडीलांच्या वयाच्या माणसाला अरे-तुरे करत विचारलं... त्यांनी किराणा सामान दाखवलं... तोपर्यँत चौघं घोळका करुन उभे राहीले. टोळक्याने लायसन्स मागितलं, लायसन्स घरी विसरल्याचं ऐकताच एकाने चारचौघात त्याची शिव्यांसह अक्कल काढली, एकाने पाठीत काठी घातली, एकाने काठीने गाडीवरची पिशवी उडवून लावली... साखर, तांदूळ सगळं अस्ताव्यस्त झालं... एक पावती फाडायला उभा... त्या टोळक्याच्या चार क्षणांच्या आनंदासाठी एका क्षणात त्या माणसाच्या आठवड्याच्या बजेटची माती झाली... ! . लॉकडाऊनच्या पहील्या टप्प्यात सामाजिक संवेदनशीलतेच्या जाणीवेतून, उन्हातान्हात उभे राहतात, हायरिस्क फ्रंटला सिक्यूरिटी देतात म्हणून मी पोलीसांना पाण्याच्या बॉटल्स, फूड पॅकेटस्, विटॅमीन सी टॅबलेटस वगैरे दिलेले... पण नंतर त्यांच्या असंवेदनशील वागणूकीचे एक एक किस्से समोर आले तर त्यांच्य

#MaharashtraNeedsDevendra

# MaharashtraNeedsDevendra ... देवेंद्रजी मुख्यमंत्री असतांना कुठल्याही संकटात स्वतःच्या जबाबदारीने, स्वतः वॉर रुम मध्ये बसून परिस्थिती हाताळत... आणि दुसरीकडे आत्ताचे मुख्यमंत्री हुजरेगिरी करणाऱ्या पत्रकार, कार्यकर्त्यांची खुषमस्करी गर्दी घेवून गर्दी करू नका सांगताय... ! ... देवेंद्रजी सीएम असतांनाही अनेक अस्मानी संकटं आली, पण कधी भिती वाटली नाही... कारण त्यांची डिसिजन मेकींग पॉवर... आणि त्याच निर्णयावर ठाम राहण्याची धडाडी... कोरोना सारख्या गंभीर संकटात देवेंद्रजींनी योग्य निर्णय घेतले असते... तिघाडी सरकारमध्ये जिथे मंत्र्यामंत्र्यात ताळमेळ नाही, गोंधळ घालतंय - तिथे देवेंद्रजींनी एकहाती यंत्रणा सांभाळली असती. ... रुग्ण-संशयित पळून जाताय, त्यांना धीर नाहीय, लोकांमध्ये भिती आहे, व्यवहार ठप्प होताय त्या परिस्थितीत देवेंद्रजींनी धीर दिला असता, पण रुग्ण वाढू नये यासाठी जनतेला विश्वासात घेवून लोकल सेवा बंद कठोर पावलं उचलली असती... गावी जाणाऱ्यांसाठी बसेस, मदतीसाठी जागोजागी बूथ आणि योगी सरकारने जशी मदत केली तशी मदतही देवेंद्रजींच्या सरकारने केली असती. ... आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजि

India Stands With NRC

Image
मी, तेजस विनोद कुळकर्णी, गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की - NRC कायदा लागू झाल्यानंतर माझं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी भारत सरकारने "जर" काही कागदपत्र मागितले तर मी आनंदाने देईल... ! रांगेत उभं रहावं लागलं तरीही चालेल. .. आणि घरी आल्यानंतर सेल्फी सुद्धा टाकेल...! .. माझ्याकडे पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबूक, कंपनीचं डिन सर्टीफिकेट, बर्थ सर्टिफीकेट, नॅशनॅलिटी, डोमेसाईल, वोटर आयडी कार्ड, ड्राइविंग लायसन्स, मॅरेज सर्टिफीकेट, सहा वर्षांपासूनचे आयटीआर रिटर्नस् कॉपीज् - १ ली ते मास्टर्स पर्यंतचे एकूण एक मार्कशीट्स, डिग्री, एलसी, टिसी वगैरे सगळं आहे... :-D :-D ... त्यात अजून एखाद्या कार्डची, कागदाची भर पडेल ! .. #indiastandwithnrc होवू द्या ट्रेंड !

CAB - NRC

CAB आणि NRC Amendment काल एक लोकसभेत पास झाले... एक होईल काही दिवसांत. .. हिंदू, पारसी, बौद्ध, जैन, शीख आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांसाठी भारत आजपासून मातृतूल्य देश आहे. शेजारच्या देशांत कुठेही केवळ धार्मिक अल्पसंखंक्य या एका कंडीशनखाली जर अत्याचार होत असतील तर त्यांच्यासाठी "भारत" हे सन्मानाने जगण्याचं स्थान असेल. .. २०२० - २०२१ ला जनगणनेतून धार्मिक आधारावर जनगणनेचा खरा आकडा समोर येईल, आणि आपल्या डोळ्यावरची झापडं खाड्कन उघडतील. कोण अल्पसंख्यांक आहे, एकुण किती आहेत, आणि अधिकृत - अनधिकृत कोण राहतंय हे समोर येईल. यातून घुसखोरी, देशांतर्गत आतंकवाद, नक्षलवाद आणि बनावट मतदानातून होणारे प्रकार याला ब्रेक बसेल. घुसखोर समोर येतील. आणि त्यांचं मूळ शक्तीस्थान यातून तोडलं जाईल... ही अतिशयोक्ती वाटेल, पण खरे परिणाम पुढच्या ४-५ वर्षांत दिसायला लागतील ! .. ही दोन्ही बिल्स वेगवेगळी असली तरीही त्यांचं डेस्टीनेशन "समान नागरी कायदा" हेच असणार. त्याचीच तयारी मोदी सरकारने सुरु केलेली दिसतेय...! भारताच्या अंतर्गत बांधणीला मजबूत करणारा पुढच्या किमान २०० वर्षांसाठीचा पाया मोदी सर

फसलेला डाव सुटलेला पेच

११ नोव्हेंबरला संध्याकाळी साडे सात वाजता शिवसेनेचा दावा काँग्रेसने मोडीत काढला त्याच्या नंतर काही मिनिटांतच मी पोस्ट टाकली होती.. "फार मोठा गेम होणार आहे." मला सारखे वाटत होते की युतीचे सरकार स्थापन होऊ शकत नाही हे नक्की झाल्यावर महाआघाडीचे किंवा भाजप राष्ट्रवादी अशी दोनच कॉम्बिनेशन्स पॉसीबील आहेत. महाआघाडीचे प्रचंड घोळ सुरू होते. पण २२ नोव्हेंबरला रात्री बहुतेक सर्व मुद्दे निकालात निघाले असे चित्र निर्माण झाले होते. त्याच रात्री उशीरा भाजपने खेळी केली. हा डाव डेंजरस होता कारण तो अजित पवार यांच्या भरवशावर होता.त्यांची मलिन प्रतिमा आहे तरीसुद्धा भाजपने हा डाव रचला.पण याहून अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो संख्येवर अवलंबूनच नव्हता तर कायद्याच्या कक्षेत पण पळवाट शोधून खेळलेला होता. याबद्दल मी अंदाज व्यक्त केला होता तो खरा ठरला. भाजपने हे का केले असावे ? राजकारण आपल्याला वाटते तसेच केले जावे ही अपेक्षा धरणे मुळातच चूक आहे. तिथे वेळ पडली तर अशक्य वाटणारे निर्णय घेतले जातात. कट्टर समर्थक नाराज होतील हे माहिती असूनही घेतले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे राजकारण सत्तेसाठी केले जाते.

Shivsena Chale

निष्पाप उधोजीराजेंनी शपथ न घेता कपटी यवन फडणवीसने शपथ घेतलेली पाहून  हा दगाफटका सहन न झाल्यामुळे यवतमाळच्या एका शिवसैनिकाने आत्महत्या वैग्रे करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काही पटलं नाही तर tweet करावं, post करावी, शिव्या द्याव्या, अनफॉलो करावं, ब्लॉक करावं..थोडक्यात फुकट ते सगळं करावं पण थेट स्वतःच्या जीवाशी खेळ करू नयेत, आयुष्य खूप सुंदर आहे वगैरे असला काही प्रकार नाही पण आपण जे व्याप वाढवून ठेवलेले असतात ते आपल्यापाठी बघणार कोण? आणि  उधोजी राजे सैनिकांसाठी स्वतःला चिमटा तरी काढुन घेणार आहेत का? जलसिंचन फेम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली पाहून जो थयथयाट सुरू आहे, तो बघून एक जेणिविण प्रश्न हा पडलाय की प्रपोज्ड शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस सरकारात अजित पवार काय स्वच्छता मंत्री वगैरे होणार होते का ??? बाकी आपण राजकारण्यांचा आदर्श घेऊन एकमेकांना दातओठ खात भक्त, गुलाम, चाटे वगैरे न म्हणता नाव घेऊन शेवटी जी लावायला कधी शिकणार आहोत? काँग्रेसची पुढची बैठक कधी आहे ? आमच्याही वाडीत दर बुधवारी आणि रविवारी दासबोधाची बैठक असते त्याला या लोकांनी यायला हरकत नाही कारण तसंही आउटप

हायव्होल्टेज ड्रामा आणि तथ्य

Image
मुख्यमंत्री निवड घटनात्मक तरतुदी 1. बहुमत असलेला नेता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतो. राज्यपालाची खात्री झाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री पदाची  शपथ देतात. नंतर ठराविक कालावधीत बहूमत सिध्द करण्यास सांगितले जाते. 2. भारतात बहु पक्ष पध्दती असल्यामुळे निवडणूकी नंतर  प्रत्येक पक्ष आपला विधी मंडळ नेता निवडतो. 3. विश्वास दर्शक ठरावा दिवशी प्रत्येक आमदाराने सरकार स्थापनेच्या ठरावावर मत द्यायचे. परंतु  पक्षाचा विधी मंडळ नेता व्हिप बजावून ठराविक पक्षालाच मत देण्याचे आदेश देऊ शकतो. हा आदेश प्रत्येक आमदारांवर बंधनकारक असतो. 4. सध्या राष्टवादीचे गट नेते अजित पवार आहेत. त्यांच्या कडे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र आहे. जे त्यांनी राज्यपालांना सादर केले. त्या नुसार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणविस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. 5. विश्वासदर्शक ठरावा दिवशी अजित पवार व्हिप बजावून भाजपा ला मतदान करण्याचे आदेश देऊ शकतात. जो आदेश राष्ट्रवादीचे आमदार डावलू शकत नाहीत. जर विरोधात मतदान केले तर मत बाद होईल. 6. शरद पवारांनी जरी पक्षाची बैठक बोलवून अज

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... Vs Others

Image
एकीकडे - देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... . दुसरीकडे - उद्धव ठाकरे, संज्या रौत, राजाभाऊ ठाकरे, शरद पवार, चव्हाण मंडळी, कॉंग्रेस मंडळी, मलीक वगैरे टिव्हीवरच्या चर्चेत ज्ञानबिड्या पिणारे व्हेरी थोर लोक्स, मूकमोर्चा मंडळी, प्रकाशभौ आंबेडकर, जितूबुद्दीन आवहाड फ्रॉम गाझा, शेट्टीचा राजू, आयबीएन-टिव्ही९-सामचं चपराश्यापासूनचं अख्खं रिकामचोट मंडळ, काणे-सबनीस वगैरे मंडळी, हे ही कमी म्हणून पक्षांतर्गत तारे तोडणारे जेष्ठ - लोकांच्या मनातील माजी मुख्यमंत्री वगैरे मंडळी... आणि फडणवीसांनी ब्राह्मणांसाठी काय केलं म्हणत विरोध करणारा एक गट...! .. याचं कारण एकच : योग्य - स्वच्छ आणि अभ्यासू राज्यकारभार...! .. महाराष्ट्राला घाणेरड्या डावपेचांचा, वाह्यात हातवाऱ्यांचा उबग आलेला... त्यात या माणसाला नशीबानं सत्ता मिळाली, आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. राजकारणात जे स्वच्छ डावपेच आहेत ते वापरुन वरच्या लिस्टेड मंडळींनी वेळोवेळी निर्माण केलेलं उपद्रव त्यांनी एकहाती थोपवलं, या माणसाविरुद्ध राजकारणाने अगदी खालची पातळी गाठली, त्यांच्या पत्नीबद्दलही बरळलं गेलं, तरीही संयम

शिवसेना चाळे २०१९ : १

२०१४ लोकसभेला यूतीत सगळं आलबेल होतं, विधानसभेला वाजलं - वेगवेगळे लढले, तरीही जनमताचा कौल फाट्यावर मारुन भाजपाने शेणाबरोबर सत्तेत भागीदारी केली... सत्तेत येऊनही उठा, रौत वगैरे अखिल-ब्रांदा-उपद्रव-मंडळ आपलं उपद्रवमूल्य दाखवत राहीले... सामनातून रौत, टिव्हीच्या दांडूक्यासमोर उठा नॉनस्टॉप चाळे करत होते, तरीही भाजपा गप्प बसलं - जनतेने ते सुद्धा सहन केलं... संसार ढकलला गेला... . २०१९ ला तेच रिपीट झालं... लोकसभेला गळ्यात गळे घातले, विधानसभेला टिकलं, जनतेने फडणवीस मुख्यमंत्री म्हणून महायूतीला कौल दिला, आणि आता परत शेणेने आपलं मूळ स्वरुप, मूळ उपद्रवमूल्य समोर आणलंच ! . आता जे झालं ते शेवटचं ! यापुढे जर भाजपाने अभद्र उपद्रवी शेणेसोबत यूती टिकवली, आता तुटली आणि परत केली तर त्यांची अशी खोड मोडली जावी की परत अश्या बिनडोकांशी यूती करण्याचा विचारही येणार नाही...! सगळ्या जागांवर त्यांचं डिपॉजीट जप्त व्हावं, त्यांच्या सभा फ्लॉप व्हाव्या... त्याशिवाय भाजपाच्या यूतीखोर लोकांना अक्कल येणार नाही... . शेणा आणि रौतांबद्दल काय मत ? - त्यांना आम्ही गणतीतही धरत नाही.

Dhule, Gote and Elections

Image
धुळे शहरात तुला ना मला घाल ...ला.... . लोकसंग्रामचे गोटे, अपक्ष कदमबांडे यांच्या लढतीत एमआयएमचा उमेदवार निवडून आलाय...! . माझं मतदान याच मतदारसंघात आहे... . हे धक्कादायक झालंय...! .. काय झालं ? धुळे शहरात मतदान झालं ५० टक्के - त्यालाही कमी. अनिल गोटे यांचा पिंड संघाचा आहे, आणि धुळ्यात त्यांनी केलेली कामे तुफान आहेत. त्यामुळे लोकांनी ३ वेळा केवळ त्यांच्या नावावर निवडून दिलं. अगदी यावेळी देखील तेच येतात असं चित्र होतं. भाजपचे आमदार अनिल गोटेंनी आधी महापालिका, मग लोकसभेवेळी भाजपाची पिसे काढली होती. ज्यामुळे गिरीश महाजन शहरात येऊन अनिल गोटे कसे जिंकतात हे मी बघतोच वैगेरे गोष्टी करून गेले. शहर विधानसभा सुटली सेनेला - आणि सेनेने जो उमेदवार दिला तो मुळात शहरात लढायलाच तयार नव्हता. त्यांचं होमपीच धुळे ग्रामीण (धुळे बाह्य भाग) आहे. त्याला ऐनवेळी उभा केला. त्यामुळे अर्धी लढाई इथेच संपली. दुसरा उमेदवार अपक्ष उभा होता (फुगा)... ज्यांच्याकडून गोटेंना फाईट मिळेल असं वाटलं. ते उमेदवार आधी राष्ट्रवादी मधून बाहेर पडले, आणि अपक्ष लढले. जिथे शहरात विकास हा एकमेव मुद्द

आरेचं जंगल

Image
आरे मिल्कमध्ये घर घेतांना तिथलं निसर्ग हे एकमेव कारण समोर ठेवलेलं... मुंबईच्या गर्दीत राहूनही शहरापासून बाहेर, जंगलाच्या मध्यात राहण्याचा अनूभव देणारं ते ठिकाण आहे. चार लाखाच्या आसपास असणाऱ्‍या डेरेदार वृक्षांमूळेच मुंबईच्या धोकेदायक प्रदुषणातही किमान उपनगरांत तरी वातावरण संतुलीत राहतंय. . सरकारच्या बाजूचा गट सांगतोय... - मेट्रो कारशेड अत्यावश्यक आहे. आरेतल्या चार लाख झाडांपैकी सत्तावीसशे तोडली तरी फार फरक पडणार नाही. समोरच्या गटातील मंडळी राजकारण करताय वगैरे ... . तूर्तास मान्य ! वृक्षतोडीस विरोध करणारा गट राजकीय हेतू मनात ठेवून स्पॉन्सर्ड असेल. त्यांचं बॅकीँग कुणीतरी भलतंच असेल... पक्या वगैरे मंडळी फोटोसाठी थोबाड घेवून आलीत... मान्य ! . पण आरे परीसरात राहण्याचा अनुभव, आणि झाडांची वाढ, फायदे, प्रदुषण, झाडांची गरज यां मुद्यांवर किमान प्रिप्रायमरी पर्यँत झालेलं शिक्षण यांचा विचार केला तरीही झाडांची कत्तल चुकीचीच आहे हेच कळतंय... . ज्या अवस्थेत झाडं कापली ती वाढायला सरासरी किमान तीन वर्ष लागतील. जास्तही ! त्यापेक्षा कमी नक्कीच नाही... झाडं कापायला दोन

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved