Posts

Showing posts with the label Art

RIP विजू खोटे

Image
मराठी वा हिँदी चित्रपटसृष्टीत बरीच मंडळी सहकलाकार म्हणून जन्माला आली, सहकलाकार म्हणूनच संपली... अभिनयाच्या बाबतीत अमिताभ बच्चनना तोडीस तोड असूनही आणि अख्खी हयात इंडस्ट्रीला देवूनही चित्रपटाचे मुख्य नायक होणं त्यांच्या नशीबात नव्हतं... तरीही, भारतीय चित्रपटसृष्टीतलं मानाचं पान ते ठरले - अध्याय ठरले ! त्यांच्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होणार नाही. . "विजू खोटे" हा अध्याय आज संपला ! चित्रपटसृष्टीतलं विजू खोटे पर्व संपलं. . भारदस्त आवाज, करारी चेहरा, आणि जबरदस्त अभिनय क्षमता असलेल्या या माणसाने पदरी पडलेल्या खलनायकी भूमिकांचं सोनं केलंय. "कितने आदमी थे ?" या ऐतिहासिक प्रश्नाचं ऐतिहासिक उत्तर देणारा आवाज शांत झाला. . विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - तेजस कुळकर्णी

पु. ल.

१२ जून २००० पु. ल. या देवाचं अवतारकार्य संपला तो दिवस...! . शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी... त्याला पु. ल. तरी अपवाद कसे ठरतील...? पुलं तुम्हाला पुण्यात रुपालीच्या पहील्या मजल्यावर तर शोधूनही सापडणार नाहीत... पु.ल. त्यांच्या पुस्तकांची पारायणं करुनही भेटणार नाही... हा देव तुम्हाला अवतीभवती मात्र चराचरात दिसेल... . दातांच्या जागी छापखान्यातले खिळे बसवलेला आणि जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचे क्लासेस उघडलेय अश्या सखाराम गटणेच्या रुपात... उघड्या तोँडाच्या पण तितक्याच प्रेमळ माणसांच्या अंतू बर्व्याच्या रुपात... सोसायटीच्या मिटीँग्समध्ये... मराठी शाळाशाळांत तर असंख्य चितळे मास्तर भेटतील... रावसाहेब तर गल्लीगल्लीत - घराघरात, घर म्हणून अख्खं गाव दाखवणाऱ्‍यांत पुलंची अनेक पात्र भेटतात... पोष्टातल्या काऊंटरमागच्या माणसाच्या टक्कलावर केस आले की आज सुद्धा मराठी माणूस त्याची बदली झाल्याचं लगेच ओळखतो... पहीली परदेशवारी आठवून बघा... पुलंना मिळाले तेच सल्ले आपल्यालाही मिळतात... लग्नकार्यात येणारा नारायण हल्ली कुणाच्या मयतालाही दिसतो... . तुम्ही मुंबईत विरारला राहतांना अ

दिवाळीची प्रार्थना... देवा...

Image
देवा, माझ्या गरजा भागतील इतका पैसा मला दे, पण तो देतांना मी ऐतखाऊ होणार नाही हे नक्की बघ... मला मिळालेला पै न पै हा फक्त माझ्या प्रामाणिक कष्टाचाच असू दे... मला ते कष्ट करण्याची शक्ती आणि संधी दे... देवा, खूप पैसा मिळाला तरी, मी उतणार नाही, मातणार नाही ही सुबुद्धी दे, गरजवंतावर हुकूमत चालवण्याची आणि कमी पैसा असणाऱ्यांना तुच्छ लेखण्याची दुर्बुद्धी मला होवू देऊ नको... देवा, पैसा मिळवणं हे परमकर्तव्य असूनही, केवळ तो मिळवण्यासाठी मी कुटूंबापासून दूर जाईल, माझी कर्तव्य विसरेन - केवळ पैश्यांमागेच पळेन अशी धारणा माझी होवू देऊ नको - लक्ष्मी चंचल असते ही भावना माझ्यात सदैव जागृत ठेव... देवा, पैशांअभावी माझं कुठे अडणार नाही, आणि पैशांमूळे मी कुणाला नडणार नाही - इतकंच तू दे, पण पैशांमूळे माझ्यातला माणूस संपणार नाही - मी माणसाचा मशिन होणार नाही याची पदोपदी जाणीव करुन देत जा... देवा, गरजेपूरता पैसा तू देशीलच, पण मी येतांनाही रिकाम्या हाती आलो, जातांनाही रिकाम्या हातानेच जाईन - हे मला कधीही विसरू देऊ नको... देवा, मला श्रीमंत कर, पण, माझ्या हातून चार लोकांची पोटं

श्यामच्या आईचं आज काय करायचं...

Image
*श्यामच्या आईचं आज काय  करायचं.......?*                         _यशोदा सदाशिव साने_  _मृत्यू २ नोव्हेंबर १९१७_  *श्यामची आई* नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.    कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.              गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बापट यांनी गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की *कशी होती हो गुरुजीची आई?* तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाल

दिलीप प्रभावळकर : 75th Birthday

Image
ज्या माणसांशिवाय मराठी चित्रपटसृष्टी अपूर्ण आहे, ज्यांना पडद्यावर बघितलं तरी घरातलं माणूस भेटल्याची जाणीव होते ते दिलीप प्रभावळकर... जन्माला येतांनाच ते आपल्याभोवती प्रभावळ घेऊन आले... मराठी चित्रपटसृष्टीतले बिग बॉस... बघताक्षणी आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर बायडिफॉल्ट व्हावा अश्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा, प्रभावळकरांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस... ! .. साडेपाच - सहा फुट उंची, गौरवर्ण आणि चेहऱ्यावर असलेला अभिजात आत्मविश्वास... या रुपासह प्रभावळकर चित्रपटसृष्टीत अवतरले... एखाद्याच्या बाबतीत निसर्ग भरभरुन देतो - प्रभावळकरांच्या डोक्यावरचं टक्कलही त्यांच्या व्यक्तीमत्वाला चार चाँद लावणारं, साजेसं आहे... ! शुद्ध मराठी, कणखर आवाज, न आणि ण, श आणि ष, ट आणि ञ यांतील फरकासह असणारी आणि विरामचिन्हांचा आदर करणारी सुस्पष्ट शब्दफेक, भारदस्त देखणं रुप या बळावर प्रभावळकर मराठी अभिनयातले सुपरस्टार झाले.. .. चि. वि. जोशी लिखीत चिमणराव गुंड्याभाऊ मध्ये प्रभावळकरांनी बाळ कर्वे यांच्यासह कोकणस्थ भट चिमणराव साकारले... सत्तरच्या दशकातील मराठी मध्यमवर्गीय माणूस आणि मित्रासमवेत असणारी त्यांची जुग

शुक्रतारा अस्तला...

Image
सकाळी अरुण दाते गेल्याची बातमी आली आणि जवळचं माणूस गेल्यावर येतं ते पाणी आलं डोळ्यात... ज्या माणसाची गाणी ऐकत लहानाचं मोठं झालो, प्रेमातल्या गुजगोष्टी ज्यांच्या गाण्याने बहरल्या, ज्यांच्या आवाजाने कितीही मोठ्या संकटात जन्मावर जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, ज्यांच्या आवाजाच्या सानिध्यात शेकडो किमीचा प्रवासही जवळचा वाटायचा त्या आवाजाचं असं शांत होणं चटका लावणारं आहे... हि बातमी खोटी ठरो म्हणून मनातल्या मनात देवाचा धावाही झाला. पण अवतार सुद्धा संपतात, आणि अरुण दाते आपल्या दुर्दैवाने अमर नाहीत.  . मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळे काकांचे संगीत आणि शब्दांना-संगीताला लाभलेला अरुण दातेंचा मखमली आवाज... त्रिमूर्तीने केवळ गाण्यासाठी अवतार घेतलेला असावा असा सुरेल संगम... किती भरभरून द्यावं एखाद्याने ? आपली झोळी भरली, पण त्या त्रिमूर्तीचा हात आखडला नाही. आज फक्त दाते गेले नाहीत, तर मराठीचं पितृत्व हरवलंय, मराठी गाण्याचा आवाज शांत झालाय... खळे-दाते-पाडगावकर त्रिमूर्तीमधला शेवटचा देवही आज निजधामाला गेला... या तिघांचे एकमेकांशी खरंच स्वर्गातले संबंध असावेत... एकमेकाच्या मनातलं गाणं ओळखून

राम आणि गाणी...

Image
राम आणि गाणी... कृष्ण, राम, गणपती, शंकर, विठ्ठल, देवी यां देवतांवरची गाणी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे... एकेका देवतेवर शंभर शंभर गाणी, एकापेक्षा एक आरत्या आणि ते संगीत ऐकतांना दोन भुवयांच्या मध्ये मन स्थिर व्हावं अशी नितांत शांतता... ! त्यांना फक्त माहौल हवा, राग - त्याचे समयचाक्राचे नियम त्या गाण्यांपाशी गप्प उभे राहतात, आणि केवळ ती गाणी - शब्द, संगीत, भाव निखळ आनंद देऊन जातात... ! .. राम ! गोंदवलेकर महाराजांचं मंदीर, गजानन महाराजांचं मंदिर... कुठेही जा - "श्रीराम" हा त्रयाक्षरी जप एक लयीत दिर्घ आवाजात सुरु असतो... ना चाल, ना वाद्य... तरीही आपण त्या शांततेशी क्षणात एकरूप होतो... श्रीराम जयराम जय जय राम ... किती शक्ती देतं ... .. गीत रामायण तर रत्न म्हणावं... रामाचं जीवन गदिमांनी गीतात बांधलं, बाबुजींनी तितकंच ताकदीचं संगीत दिलं... आजही दुपारी १२ वाजता प्रत्येक मंदिरात "राम जन्मला गं सखे" सुरु असेल... लग्नात स्वयंवर झाले सितेचे... किंवा दिवाळी पहाट मध्ये राम अयोध्येचा राजा ... ही गाणी आजही मानबिंदू आहेत... .. रामावरची मराठी भावगीतंही साखरेसारखी गोड

मराठी भाषा दिन २०१८

जोपर्यंत ठेच लागल्यावर "आई गं" आणि ट्रक समोर आल्यावर "बाप रे" च मनात येईल तोपर्यंत मराठीची काळजी नाही...! .. इंग्रजी पुस्तकं वाचतो, इंग्रजी सिनेमे बघतो, उर्दु शायरी - हिंदी गाणी ऐकतो... बोलतांना माझे बरेच शब्द गुजराथीत येतात, तरीही त्या इंग्रजी-हिंदी-उर्दू-संस्कृत-आहिराणी-गुजराथीचं आकलन मराठीतच होतं, मनात प्रतिक्रीया मराठीतच येते ... . मराठी लिहीता - बोलता येणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा ... न आणि ण, ळ आणि ल, ट/त्र आणि ञ, श आणि ष, जगातला ज - जनावरातला ज, बषणार आणि बसणार, नाही आणि नाय यांतला फरक कळणाऱ्यांना विशेष शुभेच्छा... .. हिंदी - उर्दू - मोडी - संस्कृत - इंग्रजी आणि इतर प्रांतिक भाषांत प्रचंड साहित्य आहे, ते मराठीत भाषांतरीत करण्यासारखं बरंच मोठं कामही आहे ... इतर लफड्यांत वेळ घालवण्यापेक्षा ते काम केलं तर दर्जा सुधारेल... आपलाच... भरपूर वाव आहे... .. मराठीची सुरुवात स्वतःपासूनच व्हावी... जानू - बाबू - डार्लींग - स्विटहार्ट - मायलव्ह पेक्षा प्रिये, प्राणप्रिये, माझी ऋदयसम्राज्ञी वगैरे शब्द रुळायला हवेत... .. आलू पराठा आणि बटाट्याचा पराठा, नऊवारी आणि नऊ

मुंबई रिवर एन्थम समीक्षण Mumbai River Anthem

Image
सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं, आणि मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांची भूमिका असलेलं "मुंबई रिवर थिमसॉंग / एंथम"... .. गाण्याची सुरुवात जराss बोअर होते... वर्षा बंगल्यात पेपर वाचत बसलेल्या सौ. सीएम आणि त्यांची मुलगी ... इथे त्यांचं पेपर धरून शून्य नजरेत बघत बसण्यात आणि त्या लहान मुलींच्या चेहऱ्यावर कुठेतरी कृत्रीमपणा वाटतो.. River rejuvenation awareness campaign वाचून त्या एकदम नदीकाठी पोहचतात...  .. अमृता फडणवीसांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताचा बेस आहे -  मूळ आवाजात वजन, जडपणा जाणवतो... गंभीर प्रकृतीच्या गाण्यांना साजेसा आवाज आहे त्यांचा... सहज सांगायचं तर "परदेसी परदेसी जाना नही...", "सब कुछ भूला दिया", "जिंदगी मे कोई कभी आये ना रब्बा..." सारख्या बेसचे गाणे गाण्यासाठी त्या परफेक्ट आहेत... सबब : या गाण्यात त्यांचा आवाज पहिला मिनिट मिसमॅच वाटतो... पण पुढच्या तीस सेकंदात त्यांचा आवाज कानात बसला, म्हणजेच कानाला सवय झाली, त्या आवाजाला म्यूजिक मॅच झालं आणि कोरस मिळाली... सुसह्य वैगेरे झाला की गाणं आणि व्हिडीयो मस्त पकड घेते...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved