Posts

Showing posts with the label Fun

Biopic

कुठलाही मराठी सिनेमा स्पेशली बायोपीक फार फार एक किंवा दोन आठवडे सत्तर एम एम वर असतो, तिथे लाज काढून झाली कि झी टॉकीज प्रीमिअरच्या नावाखाली आठवड्यात दोन वेळा स्वतःला कानफाडून घेत असतो - त्यामुळे अकाउंटमधले पाचशे रुपये वळवळ करत नसतील तर दोन आठवडे थांबा आणि फुकटात घरबसल्या बघा... कारण - पाचशे रुपये खर्च करुन काहीतरी पदरात पडेल अश्या दर्जाचे कलाकार, विषय आणि सिनेमे येत नाही. सुबोध भावेनी बालगंधर्व केला, लोकमान्य केला - आता घसरून राहुल गांधी करणार बोललंय. प्रसाद ओक दिघे कमी, स्वस्तातला पुष्पा वाटतोय... झुकेगा नाही साला टाईप गद्दाराला माफी नाही वाटतंय... थोडक्यात - कास्टिंग गंडलय. .. कुठलाही बायोपीक बघून आपल्या आयुष्यात फार मोठी क्रांती होणार आहे असं नाही. कितीही सिरीयस विषय असला तरी काहीतरी किडा दिसतो आणि तो बघतांना हसू येतं... एमएसडी फक्त सिरियसली पाहिलेला, तिकीट विकत घेऊन. बाकी जवळपास सगळे सिनेमे टीव्हीवर आल्यावर किंवा वि च्या रिचार्जबरोबर हॉटस्टार फ्री मिळतं त्यावर बघितले. .. संजय राऊतांवर एखादा कॉमेडी बायोपीक निघावा. तो जबरदस्त चालेल. अमिषा पटेल समोर वाकलेले राऊत धडपडले, एनजीओप्लास्टिच्

Lockdown Advice

लॉक डाऊनचा पहिला दिवस आहे... त्यात रविवार ! पुढे किमान १० ते १५ दिवस असेच काढायचे हे डोक्यात ठेवा - घरातल्या हिटलर समोर एखादा इकडचा तिकडचा शब्द सुटणार नाही याची काळजी घ्या, चुकूनही - अगदी चु-कू-न-ही कुठलाही पंगा घेवू नका... घाबरून घाबरून रहा...! सतर्क रहा !... ... त्यावर पुढचा लॉकडावून काळ सुसह्य राहणार की असह्य होणार हे ठरणार आहे...! ... एखादं प्रकरण अंगाशी आलं तर ते सोडवायला सरकार येणार नाही...! ... अजून सुसह्य करण्याची ट्रिक सांगू ? घरातलं एखादं काम हाताशी घ्या, आणि आपली कीव येईपर्यंत तेच तेच काम करा... उदा. जाळं काढा, भांडी घासा... थोडंच करायचं - पण स्लो मोशन मध्ये करायचं, दाखवून दाखवून करायचं...! खुप केलं असं वाटायला हवं ...! दोन-अडीच तास त्यात इन्व्हेस्ट करायचे... कीव येईपर्यंत...! या दोन तासांच्या इन्वेस्टमेंटवर पुढचे पंधरा दिवस राजा सारखं राहता येईल ! .. (काय केलं याचे फोटो टाकू नका, आपलं सुसह्य करण्याच्या नादात दुसऱ्याचं असह्य करू नका ! .... आणि... . . थँक यू वगैरे म्हणायची गरज नाही... खुश रहो !...) ... - तेजस कुळकर्णी

Shivsena Chale

निष्पाप उधोजीराजेंनी शपथ न घेता कपटी यवन फडणवीसने शपथ घेतलेली पाहून  हा दगाफटका सहन न झाल्यामुळे यवतमाळच्या एका शिवसैनिकाने आत्महत्या वैग्रे करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काही पटलं नाही तर tweet करावं, post करावी, शिव्या द्याव्या, अनफॉलो करावं, ब्लॉक करावं..थोडक्यात फुकट ते सगळं करावं पण थेट स्वतःच्या जीवाशी खेळ करू नयेत, आयुष्य खूप सुंदर आहे वगैरे असला काही प्रकार नाही पण आपण जे व्याप वाढवून ठेवलेले असतात ते आपल्यापाठी बघणार कोण? आणि  उधोजी राजे सैनिकांसाठी स्वतःला चिमटा तरी काढुन घेणार आहेत का? जलसिंचन फेम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली पाहून जो थयथयाट सुरू आहे, तो बघून एक जेणिविण प्रश्न हा पडलाय की प्रपोज्ड शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस सरकारात अजित पवार काय स्वच्छता मंत्री वगैरे होणार होते का ??? बाकी आपण राजकारण्यांचा आदर्श घेऊन एकमेकांना दातओठ खात भक्त, गुलाम, चाटे वगैरे न म्हणता नाव घेऊन शेवटी जी लावायला कधी शिकणार आहोत? काँग्रेसची पुढची बैठक कधी आहे ? आमच्याही वाडीत दर बुधवारी आणि रविवारी दासबोधाची बैठक असते त्याला या लोकांनी यायला हरकत नाही कारण तसंही आउटप

ती आणि मी

आमच्यातलं सगळं आलबेल असण्याची खूण म्हणजे "ए आहो" बोलणं... बायको माहेरी गेल्यावर फोनवर तो एकच शब्द हजार शब्दांचा धीर देतो... एकाच शब्दात एकुण सिच्यूएशनचा अंदाज येतो...! .. पूर्वी पत्र लिहीतांना वर श्री लिहायचे, त्यातच सगळं सुखरुप असल्याचं समजायचं... श्री नसेल तर घरातल्या बाया शेजारच्या चार बाया गोळा करुन कुणाची काय खबर हे न बघताच गळे काढणं सुरु करायच्या,  ... तसंच, फोन वर "ऐ आहो" ऐकलं नाही की पुढे नक्की काय वाढून ठेवलंय या विचाराने हार्डची धडधड एक्स्प्रेसच्या स्पीडनं डबल होते, आणि अंधारात तीर मारत, सावधपणे आपल्या कर्माची एक एक गोष्ट आठवून अंदाज घेणं सुरु होतं... कारण सापडलं तर ठीक, नसेल तर पॅराशूट मध्येच अडकून गेल्याची फिलीँग येते, आणि ती आपल्याला भलत्याच पद्धतीने टोलवत राहते...! ... टिप : कधी अश्या परिस्थितीत अडकलात तर चुकूनही आपल्या चुकांची गिणती बायकोसमोर करु नका... अंदाज घ्या... कारण काहीवेळा भलतंच असतं, देणं ना घेणं आपलं स्वत:च्या हाताने ओढवलं जातं.

"बाप्पाला निरोप"

"बाप्पाला निरोप" हि कंन्सेप्ट मूळातच वाह्यात आहे. त्यात ते रडणं बिडणं तर अति होतं... सूतक पडल्यासारखं तोँड पाडून बसायचं काय, रडायचं काय... अति भक्ती दाखवण्याचे प्रकार आहेत हे ! . आज फक्त दहा दिवसांचा गणेशोत्सव संपतो ! गणपती बाप्पा पृथ्वीतलावरुन पुन्हा वर्षभरासाठी निघून जातात वगैरे असं काहीही नसतं. मूळात उत्पत्ती-स्थिती-लय या तिन्ही अवस्थांचं मूळ जिथे आहे त्यांना पृथ्वीवरुन घालवणारे आपण कोण ? मूलाधार चक्रात, चराचरात, ध्यान्यात, देव्हाऱ्‍यातही ते आहेत ! . गणेशोत्सवाच्या आधी ते पार्वती लहान गणपतीला खाऊ वगैरे भरुन देते, गणपती भावूक होतात वगैरे व्हॉटस्अॅपच्या शोधानंतरचे चाळे आहेत. कामधंदा नसलेल्या कवीँचे. आता उद्यापासून पार्वती विचारणार की काय केलं बाळा पृथ्वीवर दहा दिवस ? चे मेसेजेस सुरु होतात. . ते एखाद्या लग्नात बिदाईच्या वेळी ज्याचं देणं न घेणं तो रडायला लागतो, कारण तसंच वातावरण तयार होतं. सेम तेच लोकांनी आजच्या दिवसाचं केलंय.... गणपती चालले, आता वर्षभरानेच भेटणार... काहीँना कसलंच नसतं - उद्यापासून पार्टी-शार्टी सुरु करण्यासाठी ते मनात पक्क हेच ठरवतात. उद्यापासून वर्षभर ऐ न च

= संडे ज्ञान =

Image
आपल्या आजुबाजुचे लोक - नातेवाईक, ओळखीपाळखीचे आणि तत्सम टाईप लोक्स... . यात दर ३ मागे १ व्यक्ती नग टाईप असतो... तोँडावर इतकं गोड बोलतात, वाटतं - आता आपले पाय धुवून पाणी पितात की काय... तेच आपल्या मागे आपल्याबद्दल गॉसीपीँग, त्रागा, याने अस्संच केलं, तस्संच केलं बडबड... आणि आपलं वाईट कसं होतं हे पाहत किँवा ते करुन आनंद मिळवण्यात त्यांची जय असते... अशी उपद्रवी टाळकी मॅक्स आपल्या विरुद्ध गृप्स करुन राहतात... . बऱ्‍याचदा अश्या टोळक्यांचा उपद्रव आपल्याला कळत असतो... पण आपल्याला कळतंय हे त्यांना कळलेलं नसतं... त्यामूळे त्यांच्याशी वागण्यात आपण जरासं टाईट केलं तरी त्यांचं गडबडतं... . बायकोनं विचारलं... ए आहो, हाऊ टू डिल विथ धिस काईँड ऑफ पिपल्स ? टेँशन नाट - याद रखीयो - १. गॉसीपीँग करणारे जळतात, कारण त्यांचं स्टॅँडर्ड (वैचारिक, शैक्षणिक) आपल्या लेव्हलचं नसतं... २. आपल्या बद्दल गॉसीप्स, म्हणजेच आपल्याला महत्व आहे. ३. टोळके जमवून आपल्याबद्दल बोलतात, म्हणजे आपण एकटेच त्या टोळक्याला भारी पडलोय. ४. महत्वाचं - ते लोक्स आपल्याला जेवायला देत नाहीत. सो यूनिवर्सल मूलमंत्र- लेट देम गो टू द हेल ! बी हॅप्पी

व्यवसायात भेटणारे नग

. ओळखीचं कुटूंब एका कौटूंबिक सोहळ्यात भेटलं... त्यातल्या काकांशी ओळख तशी जुनी. काकू पहिल्यांदाच भेटल्या. त्यांचा एक मुलगा आहे, माझ्यापेक्षा वयाने १० वर्ष मोठा. ज्याने काहीतरी प्रोजेक्ट केलाय...! असा एकूण बॅकग्राऊंड - आता काकू आणि त्यांचा मुलगा "नग" कसे झाले याची ही कहाणी. . कौटूंबिक सोहळ्यात भेटल्यावर कसं काय याची विचारपूस झाली आणि काकूंनी त्यांच्या मुलाची ओळख सांगितली. त्याने कुठलातरी ग्राफीक्स मध्ये प्रोजेक्ट केलाय... तो मुलगा त्यावेळी तिथे नव्हता. त्याला स्टार्टअप करायचंय, आणि अॅज अ इस्टॅब्लीश्ड् सेटअप तू त्याला मदत कर - इति काकू. व्यवसाय, शिक्षण किँवा नोकरी यासाठी ज्याला मदत हवी त्याला माझ्याकडून शक्य ती (आर्थिक : क्षमस्व) मदत करायचा मी प्रयत्न करतो. त्यात कधी कधी चांगले प्रोजेक्टस मलाही मिळतात - अर्थातच व्यवसायिक फायदा होतो. प्रामाणिक मदत करतो, बाकी ज्याचं त्याचं तो जाणे. . तर, काकूंनी त्यांच्या मुलाला मदत करण्याबद्दल सांगितलं... मी त्या धावपळीत माझं कार्ड दिलं. आणि त्याला फोन करायला सांगा, किँवा मुंबईला ऑफीसला पाठवा म्हणून बोललो. . दोन दिवस गेले, काकूंचा फोन आला. - मी

उंगली टेढी

Image
= उंगली टेढी = . धुळे टू मुंबई असं स्लीपर गाडीचं तिकीट कालच्या प्रवासासाठी मी परवा सकाळीच पोर्टल वरुन बुक केलं... कन्फर्मेशन मेसेज आला. रिटर्न तिकीटाच्या भरवश्यावर मी ट्रिप प्लान केली... धुळ्यात आलो...! काम झालं की रात्री परत मुंबईला जाता येईल अशी तयारी केली... आणि काल सकाळी आठ वाजताच त्या पोर्टलचा गाडी कॅन्सल झाल्याचा आणि १००% रिफंड झाल्याचा मेसेज आला... व्यवहार संपला ! दुसरी गाडी थोड्यावेळात बघू म्हणून ते बाजूला ठेवलं. . नऊ-साडेनऊला ट्रॅवल्सच्या ऑफीसमधून फोन आला. - "सर, ती गाडी कॅन्सल झालीय, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्‍या गाडीत शिफ्ट करु कां ?" - चालेल. पण गाडी कोणती आहे ? - सिटीँग आहे... - आणि चार्जेस ? - आधीच्या गाडीइतकेच... ७०० ! - पण ही सिटीँग आहे ना ? - हो. पण चार्जेस सेम आहेत. - मग नको. माझं बुकीँग कॅन्सल करा. मी दुसऱ्‍या स्लीपर गाडीनं जाईल... सिटीँगला नको. - ठिक आहे. विषय संपला. पावसाच्या बातम्या आणि गाड्यांना गर्दी असल्याने मी पण कालचं जाणं कॅन्सल केलं. . सकाळीच प्रकरणाचा निकाल लावल्यानंतरही काल संध्याकाळ पर्यँत त्यांच्या बुकीँग कन्फर्म - बुकीँग कॅन्सलच्या मेसेजेसचे आप

औपचारिकता

घरातल्या घरात औपचारिकता ठेवणाऱ्‍यांची मला अति किळस येते... . टेबलवर जेवायला बसले कि भाषण ठोकून चियर्स न बियर्स, चुलत आते मामे मावस भावंड एकत्र आले की डान्स बसवणार, ड्रामा प्ले करणार - घरी वर्षभरातनं भेटल्यावर गेट टू गेदरला गेम्स, गाणी प्लान करणार... लग्नातल्या स्टेजवर गाणी, कविता, डान्स वगैरे करणार... ... किँवा घरातल्या घरात योजना राबवणार, नवरा बायकोला मॅडम बायको नवऱ्‍याला सर म्हणणार, पोरांना घरातल्या घरातल्या नियम-बियम देणार - . मी अश्या कार्यक्रमांना आणि अश्या लोकांकडे जाणं टाळतो. घुसमट होते. . घरात घरासारखंच रहावं. घरी सुद्धा औपचारिकता ठेवावी लागली तर ते घर कसलं - ते तर डोँबल ! गेट टू गेदरला मस्त गप्पा कराव्या, खावं, मस्ती करावी... . अशी एखादी जागा तर ठेवा गड्याहो जिथे हातपाय पसरुन मनासारखं बसता येईल.

CCTV

घरी बायको असतांना सीसीटीव्हीची गरज पडत नाही - जागरुक रहावंच लागतं ... ती दोन कप चहा पितांना, ओला टॉवेल चुकून बेडवर ठेवला तर, थोडाफार पसारा झाला तर, कप फुटल्यावर, सोफ्यावरच कव्हर विस्कटलं तर - फुस्स्स करुन नारद मुनी प्रकट होतात तसं कुठूनही प्रकट होते... आणि, ..... .... ... .. . पुढचा अर्धा पाऊण तास फैलावर घेते - ... त्यामुळे मी हल्ली घाबरून घाबरून राहतो... ! ..

बारावीचा निकाल आणि सिट नंबर ...

एखाद्याला किती टक्के मिळाले, पास कि नापास याची गरजेपेक्षा जास्त उत्सुकता दूरच्या / जवळच्या नातेवाईकांना असते... यात काळजी, कौतूक कमी तर फुकट सल्ले वजा प्रवचन देण्याची मळमळ किंवा त्या माणसासाठीची असुया आसूरी आनंदात व्यक्त होते... .. नातेवाईक किरकिर ही भिक नको पण कुत्र आवर सारखी असते... त्यातही सिट नंबर विचारुन उगाच सलगी साधण्याचा प्रयत्न होतो... अगदी जवळचे जवळचे नातेवाईक अश्यावेळी अंगावर आलेले वाटतात... उपजत स्वभावानूसार अश्यांवर मी जालीम लोशन शिंपडलेलं... .. माझा निकाल आला २५ मे २०१० ला, दुपारी १ः०० वाजता... पेपर्स चांगले गेलेले, त्यामूळे धाकधूक प्रमाणात होती... पण दोन दिवस आधीपासूनच "तुझा सिट नंबर देऊन ठेव, मी इकडे चेक करेन / मोबाईलवर बीएसएनएलचा मेसेज आलाय / ऑफीसमध्ये नेटवर बघेन " चे कॉल्स सुरू झाले ... कमी मार्क मिळाले तर, मार्क नको पण यांची प्रवचनं आवर गत होईल हे जाणून "माझ्याकडे घरी बीएसएनएलचं हायस्पिड ब्रॉडबँड आहे. मी बघेन आणि त्याच दिवशी कळवेन"... ही टेप वाजवणं सुरु केलं ... जो सिट नंबर मागेल त्याला हे १२ शब्द म्हणून दाखवायचो ... .. निकाल लागला... ! बऱ्

Caller Tune

जियो फोनवर फुकट कॉलर ट्यून असते म्हणून लहान असल्यापासूनचं मोस्ट फेवरेट सॉंग "ससा तो ससा की कापूस जसा" सेट केलं... !! ... बायकोच्या भावाने नेमका त्याच नंबरवर फोन केला, बालगीताचा भलताच अर्थ घेवून अभिनंदनाची आवई उठवली... तसलं नाही काहीच सांगून तोंडाला फेस आलाय. ... ऑफीसच्या स्टाफनं मला ससा खूप आवडतो समजून टेबलवर ठेवण्यासाठी सश्याचं टेडी दिलं... ते ठेवलं आणि एका प्रोजेक्टचा क्लायंट आला - "आर यू स्टिल प्लेयिंग विद धिस ?"... उचलून कपाटात ठेवावं लागलं... ... दुरच्या मावशीच्या लहान मुलीनं ऐकलं आणि आवडलं म्हणून सारखं सारखं फोन लावून ते ऐकवणं सुरुय, आणि तिला डाऊनलोड केलेलं आवडत नाही - कॉलवरच ऐकायला आवडतं... त्या पोरीला मध्यरात्री हुक्की आली तर ? ... सेफ्टीकरता नंबर ब्लॉक केला... ... आता कॉलरट्यून बदलावी लागणार नाही ! फुकट असली तरीही !!

लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं...

लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं... १. तुम्ही शक्य तितकं "ध्यान" किंवा बावळट दिसावं याची ती काळजी घेते... गेल्या १५ दिवसापर्यंत मी ज्या ड्रेसमध्ये हॅन्डसम दिसत होतो, तो ड्रेस अचानक घालू न देणं, काळाच चष्मा लाव, चिपकू तेल लावून भांग पाड,  सॅन्डल्सच घाल ... अश्या गोष्टींची गोड बोलून / रागावून सक्ती करणं ही बायकोगिरी आहे... ही बायकोगिरी बाहेर जातांना तिव्र होते... तिच्या मैत्रिणींकडे जातांना तर प्रकर्षाने ! .. २. बाजारात जावंच लागतं... इडली-सांबार खायचाय की पराठा ? इडली सांबार... मग बाजारात जावं लागेल... - तू आणि मम्मा जा ना गाडी घेवून... मला कंटाळा येतो तिथे... - मग मला पण कंटाळा येतोय... खिचडी करते... चल बाई चल... खिचडी करते ही धमकी असते, तिला घाबरून आपण बाजारात जायला तयार होतो... .. ३. गाडीवर - तिथे गेल्यावर गाडी पार्कींगमध्ये लावून तू जाऊन खरेदी करून ये - मी हॉटेलवर चहा घेतोय... हे मी ऐकणार नाही... भाव ठरवतांना एक दोन रुपयाने काय होतं हे  बोलायचं नाही... मला घाई करायची नाही, भाजीतलं तुला कळत नाही... .. .... सुचना ऐकाव्या लागतात... ... ४. कुणी ओळखीचं भेट

Angry Cab Driver and Salmaan Khan

वर्षभरापूर्वी दिवाळी/ईद/सलमानची केस हिअरींग असं काहीतरी होतं, काय ते नेमकं आठवत नाही, पण मुंबईत सलमान खानच्या गॅलक्सी समोर गर्दी होती... इतकी मरणाची गर्दी की तिथून गाड्या वगैरे निघणंही शक्य होत नव्हतं... बाऊन्सर्स, पोलीस तैनात होते...  मी कॅबमध्ये होतो... गर्दीला वैतागल्याने कॅब ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला... बोंबलतच तो गर्दीत गाडी घुसवत होता... कामधंदा छोडके ये xx चले आते है बुढ्ढेको देखने... येडेकी पूँछ वगैरे शाब्दिक पाऊस पाडत होता, तेवढ्यात गॅलक्सीचं गेट उघडून (मे बी) सलमानखानची गाडी बाहेर आली, गर्दी एकदम एक्टीव्ह झाली आणि त्या धुंदीत पळणारे दोन पोरं एकदम आमच्या गाडीसमोर आले.. ड्रायवरने अर्जंट ब्रेक लावून गाडी थांबवली... आणि, xके, मरना है क्या नीचे आके ? मै शर्ट निकालता हूँ मुझे देख मुँह फाडके, उस बुढेको देखता है तो - म्हणत घाण शिव्या घालतच गाडी काढली... ..तिथून ड्रॉपपॉइंट येईपर्यंत पाऊणतास त्या ड्रायव्हरने सलमान, शाहरुक, तैमूरपिता, नुकताच सुटून आलेला संजय दत्त यांना तोंडाला येतील त्या शिव्या घातल्या... त्या संतापाचा गाभा होता.. "कमीने देश को खुद के बापका माल स

मला भेटलेले नग : १

तीन महीने काम केल्यानंतर काय डोकं फिरलं माहित नाही, एक मुलगा काम सोडून गेला... जातांना राजीनामा व्हॉटस् अॅप वर पाठवला... तो पण सेंटी ... पे रोल वर असलेला माणूस.. अचानक काय झालं ? तर तोंड दाखवायलाही तयार नाही ... "सर या महिन्याची सॅलरी पाठवा ना..." म्हणुन त्याने दहा - बारा फोन मेसेज केले... ! "चार्ज हॅन्डओव्हर कर, नीट राजीनामा दे...'' तर इग्नोर... ! मग ब्रह्मास्त्र काढलं... एचआरला बोललो - त्याने चार्ज हॅन्डओव्हर केल्याशिवाय एनओसी द्यायची नाही, एनओसी शिवाय चेक निघणार नाही... बस ! मग मी दिवसभर फोन उचलला नाही... झकत ऑफीसला आला - प्रोसेस केली... त्यात साहेबांचं रेकॉर्ड आणि परफॉरमन्स एकदम पूअर दिसलं ... टार्गेट ३७ टक्के, सुट्टया, ऑफीसमध्ये दोनवेळा वादही घातलेले... कामात अक्ष्यम्य कुचराई ... आणि यासाठी एचआरनं त्याला फटकावलं होतं.. "थोबाड न दाखवण्यामागचं हे एक कारण कां ?"... फाईन लाऊन उरलेल्या रकमेचा चेक दिला ...! ... काल फोन आला : सर ६ महिन्यांचं exp लेटर हवंय .... - मी सरळ नाही सांगितलं... तीन महिने काम केलंस ते दिलं... आता नाही ! दोन तासांनी परत फो

सना-त-न

करमत नव्हतं... उदास, एकटं वाटत होतं सकाळपासून ... ! मग मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या परमपूज्य संत अपर्णाताई रामतिर्थकरांच्या अद्भूत भाषणाचे व्हिडीयो यूट्यूबवर लावले आणि समाधी लावून बसलो ... आध्यात्मिक शांतीची अनुभूती घेत असतांना नकारात्मक काळ्या शक्तींनी व्हॉटस्अॅपवर टिंग टिंग वाजवून त्यात भंग आणण्याचा प्रयत्न केला... त्यावर मात करण्यासाठी साधना म्हणून "उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेली दैवी बालके" ह्या क्लिप बघून त्या दैत्यांना साऊथच्या अॅक्शन फिल्मसारखं सपसप मारलं ! ... आता आध्यात्मिक किरणांची अनुभूती होतेय... जर यातूनही उदास वाटणं वगैरे कमी नाही झालं तर आज सुक्ष्मातून सनातन प्रभात वाचेन आणि आध्यात्मिक पातळी दोन-तीन टक्के वाढवून घेईल.. ! ... रविवारी इतकंच ! :-P :-D .. #सनातन_नव्हे_टनाटन

डोलची : धुळ्यातली होळी

Image
धुळ्यात होळी म्हणजे प्रेमानं ऑ ऑ करुन चेष्टेनं रंग लावणं नसतं ... इथल्या लोकांत सुप्त / उपजत आडदांडपणा असतो. जो होळीला उफाळून येतो... ! .. धुळ्यात पिचकारीनं नाही - डोलचीने होळी खेळतात. डोलची : पत्र्याला शंकूसारखा आकार देउन हातात घट्ट बसेल अशी मूठ बसवतात... आणि त्यात पाणी भरलं की सुरु ... !  इथल्या पोरासोरांत त्याने फटके मारायची कला उपजत असते... पाण्याचाही फटका दिवसा तारे दाखवू शकतो हे दिव्यज्ञान प्राप्त होतं... एकच फटका - "तुम्ही धुळ्यात आहात" ही जाणीव करून देण्यासाठी पुरेसा असतो...! .. तुमची ओळख असो नसो, इच्छा असो नसो - दिसलात की दोन जण तुमचे हात पाय पकडतील, दोन जण डोलचीत पाणी घेऊन कानफडात मारल्यासारखे दहा-बारा फटके मारतील... मग मोठ्ठ्या हौदात चार वेळा तुमची बुड बुड घागरी करतील... पक्क्या रंगानं भरवतील... आणि है है करुन आहिराणी गाण्यांवर बारापावली नाचवतील... ! पुढच्या चौकात/गल्लीत/खुंटावर/कॉलनीत सेम प्रकार... इतकं असतांनापण भांडण नसतं, मारामाऱ्या नसतात... एरव्ही तगडे दुश्मन पण गळ्यात गळा घालून "भईssss" म्हणत एकमेकांना रंगवतात ! .. ते फुलांची होळी, साध्या रं

Diamond Set and Saree

प्रसंग १ : स्थळ : घरी पात्र : मी आणि आई... मी मुंबईहून सकाळीच आलो, चहा घेता घेता - मातोश्रींनी स्वतःच्याच दुकानातून चार - पाच साड्या आणलेल्या. त्यापैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठली नेसायची याचा सल्ला घेणं तिचं सुरु होतं... साड्या वगैरे बाबतीत मला अक्कल नाहीय हे माहीत असुनही माझा सल्ला मागितला याचं विशेष कौतूक वाटत होतं... आलेल्या संधीचा फायदा घेत, उगाच भाव खाण्यासाठी अनुकमे तीन साड्यांवर विस्तृत चर्चा केल्यावर - आणि त्या का नको याचं विशेष वर्णन ऐकून कंटाळलो... मी - तुझी यापैकी कुठली ठरलीय ? मातोश्री : ही ग्रीन कलरची. मी - (मूळ मुद्दा लक्षात आला) "छान आहे ! " कर फायनल ! सेम सिन पप्पा आणि तुषारबरोबरही झाला... . प्रसंग २ : स्थळ : फोन + व्हॉटस्अॅपवर पात्र : मी आणि ती.. (फोनवर) ती : तेजा, मी तुला काही डायमंड सेटस् चे फोटो पाठवतेय. त्यातला छान असेल तो सजेस्ट कर... मी : मला काय कळतंय त्यातलं. जो आवडेल तो घे... ती : सजेस्ट कर म्हणतेय ना तर कर... व्हॉटस्अॅपला तीन फोटो आले. त्यातल्या एकावर कॅप्शन "हा बघ किती छान आहे...." (फोनवर) ती : कुठला छान वाटतोय ? मी

बारावीचा निकाल and Me

Image
२५ मे २०१० चा भयंकर दिवस जसा जाहीर झाला, डोळ्यासमोर दिवसा तारे चमकत होते... आधीच्या तीन रात्री झोपही नव्हती... २४ नंतर २५ला दुपारी १ पर्यंत धssडधssड...धssडधssड... थाऱ्यावरच नव्हतं... आपण लाख चांगलं लिहीलंय, पण भणकेल एक्झामिनरनं त्याच्या बायकोशी भांडून तो राग आपल्याच एखाद्या पेपरवर काढला असेल तर ? ... ते ... मला जर सूपरपॉवर असती तर मी त्या रिजल्टमध्ये घुसून  तो ९९.९९ टक्के केला असता वगैरे मारामारी मनात सुरु होती ... त्या वर्षी आमच्या अख्ख्या घराण्यात हेच एकमेव शिंगरू बारावीला... त्यात लार्जर दॅन लाईफ इमेज... चुकून माकून एखाद्या विषयात गचकलो तर... ?  सगळे नातेवाईक मिळून पूजा घालतील... छातीत धस्स्स... नको नको... calm down tejaaa.... be positive...  रिजल्टसे डर नही लगता साब... नातेवाईकसे लगता है...  टाईप गोंधळ सुरू होता... ... कारणही होतं... क्लास लावला नाही म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत इंटरनलनं फाईल्स साईन करायला नाटकं केली... प्रॅक्टीकल एक्झामला कुरापती काढून वाद घातला... रागात मी अटेंडन्स साईन करुन निघून गेलो... आणि सगळ्यांसमोर धुंदीत - प्रॅक्टीकलचे मार्क नाही तर नाही, नो नीड..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved