Posts

Showing posts with the label Anubhuti

गुरुपोर्णीमा २०२०

Image
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!  ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ

भगवद्गीता !

Image
आज गीता जयंती ...! .. भगवद्गीता... या अद्भूत ग्रंथाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे... माझ्या हॅन्ड बॅगमध्येच भगवद्गीतेचं मराठी - इंग्रजी अर्थासहीत असलेलं पुस्तक कायम असतं. रोज क्रमाने किमान ५ श्लोक आणि त्याचा अर्थ मराठी, इंग्रजीतून वाचण्याची, समजून घेण्याची सवय लागलीय, आणि आता सहा - सात वर्षांनी भगवद्गीतेने माझ्या मनावर आणि विचारांवर जबरदस्त पकड घेतल्याचंही जाणवतंय... प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेच्या अधीन राहूनच सापडणार हे मनावर पक्कं ठसलंय !  .. गीता म्हणजे कर्मकांड नाही, तर शास्त्रशुद्ध शास्त्र (Science) आहे... तुम्ही त्याचं पारायण करुन चमत्काराची अपेक्षा कराल तर हाती काहीच लागणार नाही, गीता समजण्याची - अभ्यासण्याची आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आणि अंतिम सत्य शांतपणे समजावून देण्याची ताकद गीतेत आहे... गीतेतला प्रत्येक श्लोक दरवेळी नव्या अर्थासह समोर येतो... .. कृष्णाचं देवत्व कुठाय ? ते आहे भगवद्गीतेतल्या अठरा अध्यायात - सातशे श्लोकांत... ! कुरुक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरुपदर्शन घडलं तिथेच "देव कृष्ण" जन्माला आला, भगवद्गीतेच्या रुपानं विश्वगुरु झाला आणि

जे होतं ते चांगल्यासाठीच होतं !

''जे होतं ते चांगल्यासाठीच होतं -" गेल्या सात महिन्यांपूर्वी माझ्या कंपनीसाठी यूएसएचा एक मोठा चेन प्रोजेक्ट आम्ही मिळवला. ज्याचं एकुण कॉस्ट माझ्या कंपनीच्या अॅन्यूअल टर्नओव्हरच्या दहापट आहे... त्यात आम्ही पाच कंपनीज् आहोत, आणि माझ्याकडे तिसऱ्या स्टेपचं काम होणार. म्हणजे दुसऱ्या स्टेपचं काम झालं की ती कंपनी माझ्याकडे देणार, मी त्यात माझं काम करुन चौथ्या स्टेपच्या कंपनीकडे पाठवणार... जे काम मी करणार ते त्या प्रोजेक्टचा ४० टक्के भाग आहे...! .. माझ्या कंपनीला प्रोजेक्ट मिळाला, अॅग्रीमेंट झालं, एडवान्स मिळालं आणि आम्ही प्लानिंग केलं... त्या प्रोजेक्टसाठी एक मोठी सिस्टिम उभारणं, मशीन्स घेणं, तितकाच मोठा स्टाफ घेणं, आणि माझं आत्ताचं वर्कप्लेस त्यासाठी कमी पडणार म्हणून मोठं वर्कप्लेस घेणं आवश्यक होतं. त्यामूळे ऑफीसच्या जवळच मी नवं वर्कप्लेस बघितलं... मोठी सिस्टीम उभारण्यासाठी पुरेसा पैसा उभा करणंही गरजेचं होतं... म्हणून मी काही शेअर्स, इतर प्रोजेक्टचं च्या पेमेंटमधून आणि बिजनेस लोन करता अप्लाय केलं. .. १५ नोव्हेंबर २०१८ ला पहिलं असाईनमेंट येणार असं अपेक्षित होतं. त्य

गुरुचरीत्र पारायण

Image
अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि

दिपःज्योती नमोस्तूते

मुंबईत या फ्लॅट आधी मी ज्या फ्लॅटमध्ये रहायचो तिथली ही गोष्ट... आता मी हल्ली एक महिन्यापूर्वीच इथे शिफ्ट केलंय. हा फ्लॅट मोठा आणि बऱ्यापैकी वरच्या मजल्यावर आहे... पण इथे सेफ वाटतं... ! आधी ज्या फ्लॅटमध्ये होतो तिथे गडबड होती... ! . मी सात वर्षांपासून धुळ्याबाहेर एकटा राहतोय, आधी पुण्यात - मग मुंबईत आधीच्या फ्लॅट मध्ये... आणि आता या ! भिती वाटणं, दडपण येणं या गोष्टी कधीच जाणवल्या नाहीत... घरात रोज देवपूजा करतो, गणपती अथर्वशीर्ष - व्यंकटेश स्त्रोत्र - गायत्री मंत्र - महालक्ष्मी अष्टक - रामरक्षा आणि हनुमान वडवानल स्त्रोस्त्र हे नित्यनियमाने करुन मगच ऑफीस करता घराबाहेर पडतो ... देवघरात देवांसह गुरूचरीत्र ग्रंथ, गजानन महाराजांची मुर्ती आहे... ! अंगावर यज्ञोपवित आहे... भिती तशी नसतेच... एकटा असलो तरी मस्त रिलॅक्स राहतो... ! .. पण साधारण ऑगस्ट पासून त्या घरात रात्री झोपतांना काहीतरी स्ट्रेस जाणवायचा.... दडपण... उगाच काहीतरी टेंशन असल्यासारखं ! ... आधी वाटलं बिजनेस टेंशन मुळे असेल, दिवसभराच्या कामाचा ताण वगैरे, पण सगळं आलबेल असतांनाही झोप उडालेली असायची... भलते सलते भास व्हायचे, अभद्र विचा

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग ३

Image
#अनुभूती #मी_अनुभवलेले_गजानन_महाराज - भाग ३ हाजीअली मागच्या चार वर्षांत शेगांवला जाण्यासाठी खूप मोठ्ठा गॅप पडला. अनेक अडचणी येत गेल्या. अपघात, आत्याच्या संपुर्ण कुटूंबाचं निधन, घराचं बांधकाम... जावू जावू होत होतं, पण जाता येत नव्हतं... मनात विचार आला की "महाराज बोलावतील तेव्हाच आपल्याला जायला मिळेल" हेच असायचं... त्यांनी ऐकलं - आणि एक दिवस मुंबईत महाराजांची अनुभूती मिळाली... ते सर्वत्र आहेत, सोबत आहेत, आणि वेळोवेळी ते सिद्ध करतात. .. पुणे सोडून काही स्वप्न घेवून मुंबईत येण्याची ती वेळ. स्टार्टअप वर उभा, मनात नाही म्हणलं तरी धडकं असतंच... सुरुवात होण्याआधी शेगांवला जायची इच्छा होती, पण काही ना काही कारणाने शक्य होत नव्हतं... टाईमलाईन फास्ट पळत होती, शेगांवला जाणं शक्य झालं नाही... मुंबईत आलो. .. ऑफीसच्या पहिल्या दिवशी महाराजांच्या फोटोसमोर उभा राहून प्रार्थना केली, "तुम्ही बोलवाल तेव्हाच दर्शन होईल, पण हा व्यवसाय तुमच्यावर सोपवलाय... लक्ष असु द्या..."... !  त्याच दिवशी दुपारी हाजीअली दर्ग्यावरून जातांना दर्शन घेतलं... आणि एक चादर चढवली... दिवस मावळला, रात्र झा

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग २

Image
गेल्यावर्षापर्यंत आयुष्यात सगळ्यांच लेव्हलवर परीक्षा सुरु होती. साडेसातीचा अति जास्त प्रभाव पडला. कंपनी सुरु केली, पण प्रोजेक्ट नव्हते. पगार देणं दूर माझा स्वतःचा खर्च काढणं कठीण झालं होतं. रडकुंडीला येणं काय असतं ते या दे या डो अनुभवत होतो. अश्या अवस्थेत सगळ्यांत वाईट काय होत असेल तर ते म्हणजे देवधर्म गुंडाळून नास्तिकता वरचढते... त्याच सर्वोच्च बिंदूवर पोहचलेलो... . घरी सगळे महाराजांवर विश्वास ठेवून कामं करतात. आणि दर दोन - तीन महिन्यांत शेगांवला जातोच जातो. पण तो एक फेज होता जेव्हा तीन वर्ष आम्ही या ना त्या कारणाने तिथे जावू शकलो नाही... जायचं ठरलं की काहीतरी अडकायचं... एक दिवस ठरवलं आणि गेलोच... महाराजांनी बोलावलंय म्हणजे काहीतरी चांगलं होणार हा विश्वास होता. तिथे गेलो, दोन दिवस त्यांच्या सानिध्यात राहीलो. "बाबा थोडी दया येवू द्या..." मनापासून सारखी प्रार्थना केली... खरं सांगायचं तर त्या वेळी एक रुपयाही हातात नव्हता, चेहऱ्यावर बारा वाजलेले... महाराजांजवळ समाधी मंदिर परीसरात बसलेलो, डोळे डबडबलेले... मन शांत झालं, पुढच्या वेळी येतांना काहीतरी चांगलं होईल मनात वाटत होतं. आण

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग १

Image
दैवी म्हणाल तर माझी गजानन महाराजांवर प्रचंड - infinite - आभाळाएवढी श्रद्धा आहे... कितीही मोठे प्रश्न असू देत ज्यांच्यापुढे गेल्यावर माझं अंतर्मन खऱ्या अर्थानं शांत होतं, शक्ती मिळते... त्यांचं मंदिर माझं घर असल्यासारखं वाटतं, ते प्रश्न मनात घेऊन त्यांच्यासमोर जातांना कधीच रिकाम्या हातानं परत येणार नाही हा विश्वास असतो. माझं सगळं काम त्यांच्यावर विश्वास ठेवूनच करतो, गजानन महाराज जळी स्थळी काष्टी पाषाणी सदैव माझ्या सोबत असतात... त्यांचं माझ्यावर पूर्ण लक्ष असतं याची जाणीव असते. कधी जर माझ्या मनातली नकारात्मकता वरचढ होत असेल तर महाराज त्यांचं अस्तित्व तिथे दाखवतात... दर्शन देतात - ते माझ्या सोबत असल्याची जाणीव करुन देतात... कधी प्रेमाने, चुकलं तर तडाखा देऊन, कधी कुठल्या ना कुठल्या रुपानं दर्शन देऊन... त्यांनी बोलावलं तर क्षणाचीही विसंब न घेता शेगांवला जायची ओढ लागते, कधी ती ओढ समजून घेत ते स्वतः बोलावणं पाठवतात... "अशक्य ही शक्य करतील स्वामी" या उक्तीचा ते प्रत्यय देतात... अशीच एक अनुभूती काल मिळाली, "मी आहे ना" त्यांनी ही जाणीव करुन दिली... एकदा नव्हे - अनेकदा... ! कध

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved