Posts

Showing posts with the label God

दत्त

Image
दत्त या एका नावाने आयुष्याला वळण दिलंय. दत्त महाराजांना शरण गेलेल्या भक्तांच्या आयुष्याचं स्टिअरिंग महाराज आपल्या हातात घेतात, आणि त्या माणसाचा आध्यात्माकडून अनुभूतीकडचा प्रवास सुरू होतो. दत्त महाराज म्हणावं तर सगुण स्वरूप - कारण दत्त तेजाने समृद्ध गुरू परंपरा आणि सदेह दर्शन देणारे सद्गुरु आहेत, आणि म्हणावं तर निर्गुण स्वरूप - कारण गाणगापूर, नृसिंहवाडी, कारंजा ते गुरुशिखर गिरनार मध्ये महाराजांच्या निर्गुण पादुका भक्तांना अनुभूती देत आहेत. दत्त महाराज म्हणजे सगुण - निर्गुण या स्वरूपाच्या पलीकडे, साक्षात चैतन्य आहेत. . दत्त महाराज आपल्या शिष्याला कधीही एकटं सोडत नाहीत. मूळ श्री दत्त महाराज (ग्रंथ : दत्तमहात्म्य), श्रीपाद श्रीवल्लभ (स्थान : पिठापुर, ग्रंथ : श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र) , नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (स्थान : गाणगापूर, ग्रंथ : श्री गुरुचरित्र) या अवतारांमधून समृद्ध झालेली गुरू परंपरा आणि साक्षात दत्त स्वरूप असलेले संत यांपैकी कुठल्याही माध्यमातून दत्त महाराज आपल्या भक्ताला पंखाखाली घेतात. सद्गुरू कुणीही असू देत, मूळ दत्त महाराज आहेत. त्या माणसाचे कर्म, नशिब, प्रारब्ध हा खेळ थ

गुरुपोर्णीमा २०२०

Image
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!  ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ

गुरुचरीत्र

Image
गुरुचरीत्र ! ... नृसिंह सरस्वतींचे समकालीन शिष्य सिद्धमूनी, आणि  त्यांचे शिष्य नामधारक (जे नृसिंह सरस्वतींच्या दुसऱ्या समकालीन शिष्यांपैकी एक आहे, सायंदेव - यांचे वंशज) यांतील अद्भूत संवाद म्हणजे गुरुचरीत्र ! ... नामधारक शिष्य सिद्धांना गुरुंबद्दल विचारतात, आणि सिद्ध नृसिंह सरस्वतींचा अवतार, कार्य, त्यावेळी घडलेल्या घटना - ज्या सिद्धांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलेल्या असतात - त्या, एक एक करत सांगतात...! पुढे नामधारकांना गुरुचरीत्र लिहीण्याची आज्ञा करतात...! ... सिद्ध - नामधारक संवाद नामधारकांनी गुरुचरीत्राच्या ग्रंथरुपाने बावन्न अध्यायांत, आणि प्राकृत मराठी भाषेत सुरेख बांधलाय !... त्यात काही ठिकाणी संस्कृत, कानडी श्लोकही आहेत. मूळ गुरुचरीत्र ग्रंथ १७००० ते १९००० ओव्यांचा असल्याचं म्हणतात, आणि कालांतराने त्याचा सारांश येत सात हजार तिनशे पंच्याऐंशी ओव्यांचं गुरुचरीत्र आज प्रचलित आहे.  ... गुरुचरीत्रात पहील्या अध्यांयांत गुरुवंदना, अनुसया-अत्री ऋषींकडे दत्तजन्म, मग प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे महिमान आहे. पण ते पहिल्या १० अध्यांयांतच. सिद्ध द्वितीय अवतार नृसिंह स

भगवद्गीता !

Image
आज गीता जयंती ...! .. भगवद्गीता... या अद्भूत ग्रंथाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे... माझ्या हॅन्ड बॅगमध्येच भगवद्गीतेचं मराठी - इंग्रजी अर्थासहीत असलेलं पुस्तक कायम असतं. रोज क्रमाने किमान ५ श्लोक आणि त्याचा अर्थ मराठी, इंग्रजीतून वाचण्याची, समजून घेण्याची सवय लागलीय, आणि आता सहा - सात वर्षांनी भगवद्गीतेने माझ्या मनावर आणि विचारांवर जबरदस्त पकड घेतल्याचंही जाणवतंय... प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेच्या अधीन राहूनच सापडणार हे मनावर पक्कं ठसलंय !  .. गीता म्हणजे कर्मकांड नाही, तर शास्त्रशुद्ध शास्त्र (Science) आहे... तुम्ही त्याचं पारायण करुन चमत्काराची अपेक्षा कराल तर हाती काहीच लागणार नाही, गीता समजण्याची - अभ्यासण्याची आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आणि अंतिम सत्य शांतपणे समजावून देण्याची ताकद गीतेत आहे... गीतेतला प्रत्येक श्लोक दरवेळी नव्या अर्थासह समोर येतो... .. कृष्णाचं देवत्व कुठाय ? ते आहे भगवद्गीतेतल्या अठरा अध्यायात - सातशे श्लोकांत... ! कुरुक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरुपदर्शन घडलं तिथेच "देव कृष्ण" जन्माला आला, भगवद्गीतेच्या रुपानं विश्वगुरु झाला आणि

Ramji... Original Idol

Image
These are the original idols of Shri Rama, Lakshmana and Sita which were removed & sent to a safe place before the Ram Mandir was desecrated by Babur. When Babur marched into Ayodhya, the caretaker of the temple Pandit Shyamanand Maharaj fled Ayodhya along with the idols & handed them over to Swami Eknath Maharaj of Paithan. Later these idols were handed over to the Guru of Chhatrapati Shivaji Maharaj, Swami Samarth Ramdas. When Swami Samarth was on a tour of South India, he placed those idols on the banks of the holy sangam of rivers Tunga & Bhadra forming Tungabhadra in a small town called Harihar, Karnataka. The idols have been worshipped since then by the Gurus of Narayan Ashram in Harihar. There was a huge celebration in Harihar after the Ayodhya verdict. The people of Harihar and the Narayan Ashram are now preparing to return back the idols to Shri Rama's Birth place, Ayodhya.

"बाप्पाला निरोप"

"बाप्पाला निरोप" हि कंन्सेप्ट मूळातच वाह्यात आहे. त्यात ते रडणं बिडणं तर अति होतं... सूतक पडल्यासारखं तोँड पाडून बसायचं काय, रडायचं काय... अति भक्ती दाखवण्याचे प्रकार आहेत हे ! . आज फक्त दहा दिवसांचा गणेशोत्सव संपतो ! गणपती बाप्पा पृथ्वीतलावरुन पुन्हा वर्षभरासाठी निघून जातात वगैरे असं काहीही नसतं. मूळात उत्पत्ती-स्थिती-लय या तिन्ही अवस्थांचं मूळ जिथे आहे त्यांना पृथ्वीवरुन घालवणारे आपण कोण ? मूलाधार चक्रात, चराचरात, ध्यान्यात, देव्हाऱ्‍यातही ते आहेत ! . गणेशोत्सवाच्या आधी ते पार्वती लहान गणपतीला खाऊ वगैरे भरुन देते, गणपती भावूक होतात वगैरे व्हॉटस्अॅपच्या शोधानंतरचे चाळे आहेत. कामधंदा नसलेल्या कवीँचे. आता उद्यापासून पार्वती विचारणार की काय केलं बाळा पृथ्वीवर दहा दिवस ? चे मेसेजेस सुरु होतात. . ते एखाद्या लग्नात बिदाईच्या वेळी ज्याचं देणं न घेणं तो रडायला लागतो, कारण तसंच वातावरण तयार होतं. सेम तेच लोकांनी आजच्या दिवसाचं केलंय.... गणपती चालले, आता वर्षभरानेच भेटणार... काहीँना कसलंच नसतं - उद्यापासून पार्टी-शार्टी सुरु करण्यासाठी ते मनात पक्क हेच ठरवतात. उद्यापासून वर्षभर ऐ न च

गुरुचरीत्र पारायण

Image
अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि

खुनी गणपती Khuni Ganapati

Image
"खुनी गणपती" ... नांव वाचून आश्चर्य वाटलं नं ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे... ! फोटोत दिसतंय ते खुनी गणपतीची - खुनी मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा...!  . १८९५ मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक १००० वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी विरोध झाला... त्याचं रुपांतर हाणामारीत झालं आणि ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, जखमी झाले... आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वकतले तथा खून पडनात"... या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नांव प्रचलीत झालं...! त्यावेळी ५ दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता... .. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून २२८ रुपये दोन्ही गटांना दिले जातात. आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली. .. दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन

राम आणि गाणी...

Image
राम आणि गाणी... कृष्ण, राम, गणपती, शंकर, विठ्ठल, देवी यां देवतांवरची गाणी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे... एकेका देवतेवर शंभर शंभर गाणी, एकापेक्षा एक आरत्या आणि ते संगीत ऐकतांना दोन भुवयांच्या मध्ये मन स्थिर व्हावं अशी नितांत शांतता... ! त्यांना फक्त माहौल हवा, राग - त्याचे समयचाक्राचे नियम त्या गाण्यांपाशी गप्प उभे राहतात, आणि केवळ ती गाणी - शब्द, संगीत, भाव निखळ आनंद देऊन जातात... ! .. राम ! गोंदवलेकर महाराजांचं मंदीर, गजानन महाराजांचं मंदिर... कुठेही जा - "श्रीराम" हा त्रयाक्षरी जप एक लयीत दिर्घ आवाजात सुरु असतो... ना चाल, ना वाद्य... तरीही आपण त्या शांततेशी क्षणात एकरूप होतो... श्रीराम जयराम जय जय राम ... किती शक्ती देतं ... .. गीत रामायण तर रत्न म्हणावं... रामाचं जीवन गदिमांनी गीतात बांधलं, बाबुजींनी तितकंच ताकदीचं संगीत दिलं... आजही दुपारी १२ वाजता प्रत्येक मंदिरात "राम जन्मला गं सखे" सुरु असेल... लग्नात स्वयंवर झाले सितेचे... किंवा दिवाळी पहाट मध्ये राम अयोध्येचा राजा ... ही गाणी आजही मानबिंदू आहेत... .. रामावरची मराठी भावगीतंही साखरेसारखी गोड

रामदास समर्थ : दासनवमी

Image
छत्रपती शिवाजी राजेंच्या मृत्यू नंतर समर्थ हेलावून गेले सर्व धातू पात्रांचा वापर बंद केला मृत्तिका पात्र  आणि फक्त दूध घेऊ लागले चाफळला होते. गडावर जाण्याचा संकल्प केला कारण चाफळला काही झाले तर स्वामींच्या नादात भक्तगण रामाचे वैभव विसरतील राघुपती पेक्षा लोक माझे महत्व वाढवतील म्हणून गडच ठीक रामाचा निरोप घेतला मागणे मागितले या देहा कडून सेवा घेतलीस मीही ती केली आता एक मागणे आहे आहे एकचि मागणे। कृपा करोनि देणे ।ज्यासी दर्शनाची इच्छा ।त्याची पुरवावी ।आस्था  ।  बरोबर उद्धव स्वामी होते स्वतःसाठी काही नाही राघवाने मागणे मान्य केले पण अट घातली तेरा अक्षरीया मंत्राचा। जप करील जो साचा ।त्याची संख्या तेरा कोटी । होता भेटेन मी जगजेठी । समर्थ चफळकरांचा निरोप घेऊन गडावर आले. कल्याण डोम गावाला परत गेले जवळची माणसे जवळ असली कि जाण्यात अडचण येते चाफळ मठाची व्यवस्था लावून दिली उद्भवला वाटले नंतर भांडणे नको पण ही निर्वा निरव लक्षात आली नाही अक्का अस्वस्थ होत्या काही विचारले तरी राघुरायची इच्छा म्हणत माघ पौर्णिमा नवान्न पौर्णिमा पण पुरण वरण गव्हाची खीर सुधा नाकारली. मार्गशीर्षात कल्याणा

दिपःज्योती नमोस्तूते

मुंबईत या फ्लॅट आधी मी ज्या फ्लॅटमध्ये रहायचो तिथली ही गोष्ट... आता मी हल्ली एक महिन्यापूर्वीच इथे शिफ्ट केलंय. हा फ्लॅट मोठा आणि बऱ्यापैकी वरच्या मजल्यावर आहे... पण इथे सेफ वाटतं... ! आधी ज्या फ्लॅटमध्ये होतो तिथे गडबड होती... ! . मी सात वर्षांपासून धुळ्याबाहेर एकटा राहतोय, आधी पुण्यात - मग मुंबईत आधीच्या फ्लॅट मध्ये... आणि आता या ! भिती वाटणं, दडपण येणं या गोष्टी कधीच जाणवल्या नाहीत... घरात रोज देवपूजा करतो, गणपती अथर्वशीर्ष - व्यंकटेश स्त्रोत्र - गायत्री मंत्र - महालक्ष्मी अष्टक - रामरक्षा आणि हनुमान वडवानल स्त्रोस्त्र हे नित्यनियमाने करुन मगच ऑफीस करता घराबाहेर पडतो ... देवघरात देवांसह गुरूचरीत्र ग्रंथ, गजानन महाराजांची मुर्ती आहे... ! अंगावर यज्ञोपवित आहे... भिती तशी नसतेच... एकटा असलो तरी मस्त रिलॅक्स राहतो... ! .. पण साधारण ऑगस्ट पासून त्या घरात रात्री झोपतांना काहीतरी स्ट्रेस जाणवायचा.... दडपण... उगाच काहीतरी टेंशन असल्यासारखं ! ... आधी वाटलं बिजनेस टेंशन मुळे असेल, दिवसभराच्या कामाचा ताण वगैरे, पण सगळं आलबेल असतांनाही झोप उडालेली असायची... भलते सलते भास व्हायचे, अभद्र विचा

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग ३

Image
#अनुभूती #मी_अनुभवलेले_गजानन_महाराज - भाग ३ हाजीअली मागच्या चार वर्षांत शेगांवला जाण्यासाठी खूप मोठ्ठा गॅप पडला. अनेक अडचणी येत गेल्या. अपघात, आत्याच्या संपुर्ण कुटूंबाचं निधन, घराचं बांधकाम... जावू जावू होत होतं, पण जाता येत नव्हतं... मनात विचार आला की "महाराज बोलावतील तेव्हाच आपल्याला जायला मिळेल" हेच असायचं... त्यांनी ऐकलं - आणि एक दिवस मुंबईत महाराजांची अनुभूती मिळाली... ते सर्वत्र आहेत, सोबत आहेत, आणि वेळोवेळी ते सिद्ध करतात. .. पुणे सोडून काही स्वप्न घेवून मुंबईत येण्याची ती वेळ. स्टार्टअप वर उभा, मनात नाही म्हणलं तरी धडकं असतंच... सुरुवात होण्याआधी शेगांवला जायची इच्छा होती, पण काही ना काही कारणाने शक्य होत नव्हतं... टाईमलाईन फास्ट पळत होती, शेगांवला जाणं शक्य झालं नाही... मुंबईत आलो. .. ऑफीसच्या पहिल्या दिवशी महाराजांच्या फोटोसमोर उभा राहून प्रार्थना केली, "तुम्ही बोलवाल तेव्हाच दर्शन होईल, पण हा व्यवसाय तुमच्यावर सोपवलाय... लक्ष असु द्या..."... !  त्याच दिवशी दुपारी हाजीअली दर्ग्यावरून जातांना दर्शन घेतलं... आणि एक चादर चढवली... दिवस मावळला, रात्र झा

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved