Posts

Showing posts with the label Troll

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड

#भाकरीबाई

Image
रामतिर्थकर बाईचं स्टेटमेंट बीबीसी मराठीने जरी तोडून मोडून दाखवलं असलं तरीही ती बाई कुठल्या लेव्हलची चंपक आहे हे एव्हाना महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलंय... लोकं ऐकतात तर या काहीही पुड्या सोडतात... फुल्ल कॉन्फीडन्सनं...! परवा असं झालं... परवा तसं झालं... परवा सोलापूरला गेले होते - तिथे दारूच्या दुकानाबाहेर बायांची रांग होती, त्यात २१ बाया विशिष्ठ समाजाच्या होत्या - .... काहीही फेकतात...! ... २०१० मध्ये या बाईचं नव्याने प्रस्थ फुललं होतं... त्यांना ब्राह्मण वधू-वर मेळाव्याला बोलावलं - बाई आल्या... "मी तुमची आई" म्हणून एका वाक्यात आई झाल्या... समोर बसलेल्या मुलींवर सुरु झाल्या...! करीयर चुलीत घाला, फिरणं बंद करा, हे करा - ते करा... बाई मोठ्या मोठ्या द्यायच्या - माणसांना मज्जा वाटायची... एका लेव्हल नंतर तिथे आलेल्या पोरींनी धिंगाणा सुरू केला... कार्यक्रम ठिकाणावर, नसतं प्रकरण उद्भवलं होतं... झक मारली आणि ही बाई बोलावली असं झालेलं... ... सासू सून, नवरा बायको यांच्यात भांडणं लावायची, त्यात सुनेला - बायकोला घरात बसवून पायाशी ठेवायची अक्कल शिकवायची, आणि एका घरात ठिणगी

शिवसेना चाळे २०१९ : १

२०१४ लोकसभेला यूतीत सगळं आलबेल होतं, विधानसभेला वाजलं - वेगवेगळे लढले, तरीही जनमताचा कौल फाट्यावर मारुन भाजपाने शेणाबरोबर सत्तेत भागीदारी केली... सत्तेत येऊनही उठा, रौत वगैरे अखिल-ब्रांदा-उपद्रव-मंडळ आपलं उपद्रवमूल्य दाखवत राहीले... सामनातून रौत, टिव्हीच्या दांडूक्यासमोर उठा नॉनस्टॉप चाळे करत होते, तरीही भाजपा गप्प बसलं - जनतेने ते सुद्धा सहन केलं... संसार ढकलला गेला... . २०१९ ला तेच रिपीट झालं... लोकसभेला गळ्यात गळे घातले, विधानसभेला टिकलं, जनतेने फडणवीस मुख्यमंत्री म्हणून महायूतीला कौल दिला, आणि आता परत शेणेने आपलं मूळ स्वरुप, मूळ उपद्रवमूल्य समोर आणलंच ! . आता जे झालं ते शेवटचं ! यापुढे जर भाजपाने अभद्र उपद्रवी शेणेसोबत यूती टिकवली, आता तुटली आणि परत केली तर त्यांची अशी खोड मोडली जावी की परत अश्या बिनडोकांशी यूती करण्याचा विचारही येणार नाही...! सगळ्या जागांवर त्यांचं डिपॉजीट जप्त व्हावं, त्यांच्या सभा फ्लॉप व्हाव्या... त्याशिवाय भाजपाच्या यूतीखोर लोकांना अक्कल येणार नाही... . शेणा आणि रौतांबद्दल काय मत ? - त्यांना आम्ही गणतीतही धरत नाही.

उंगली टेढी

Image
= उंगली टेढी = . धुळे टू मुंबई असं स्लीपर गाडीचं तिकीट कालच्या प्रवासासाठी मी परवा सकाळीच पोर्टल वरुन बुक केलं... कन्फर्मेशन मेसेज आला. रिटर्न तिकीटाच्या भरवश्यावर मी ट्रिप प्लान केली... धुळ्यात आलो...! काम झालं की रात्री परत मुंबईला जाता येईल अशी तयारी केली... आणि काल सकाळी आठ वाजताच त्या पोर्टलचा गाडी कॅन्सल झाल्याचा आणि १००% रिफंड झाल्याचा मेसेज आला... व्यवहार संपला ! दुसरी गाडी थोड्यावेळात बघू म्हणून ते बाजूला ठेवलं. . नऊ-साडेनऊला ट्रॅवल्सच्या ऑफीसमधून फोन आला. - "सर, ती गाडी कॅन्सल झालीय, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्‍या गाडीत शिफ्ट करु कां ?" - चालेल. पण गाडी कोणती आहे ? - सिटीँग आहे... - आणि चार्जेस ? - आधीच्या गाडीइतकेच... ७०० ! - पण ही सिटीँग आहे ना ? - हो. पण चार्जेस सेम आहेत. - मग नको. माझं बुकीँग कॅन्सल करा. मी दुसऱ्‍या स्लीपर गाडीनं जाईल... सिटीँगला नको. - ठिक आहे. विषय संपला. पावसाच्या बातम्या आणि गाड्यांना गर्दी असल्याने मी पण कालचं जाणं कॅन्सल केलं. . सकाळीच प्रकरणाचा निकाल लावल्यानंतरही काल संध्याकाळ पर्यँत त्यांच्या बुकीँग कन्फर्म - बुकीँग कॅन्सलच्या मेसेजेसचे आप

प्रिय एबीपी माझा,

प्रिय एबीपी माझा, व्यवसाय चालवतांना जर चुकूनही आपल्याकडून माती खाल्ली गेली, आणि एंड यूजर दुखावला गेला तर त्याच्यापुढे नाक घासून, प्रसंगी डोकं फोडून माफी मागावी... पण एकुण मामला शक्य तेवढा लवकर थंड करावा... तेच फायद्याचं ठरतं... . कारण जर प्रकरण एका लिमिटबाहेर गेलं तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायाचा प्राणवायू - म्हणजे पैसा तुटण्यावर होतो. आणि याचा शेवट व्यवसायासाठी खुप वाईट असतो... . एबीपी माझा इथेच चुकतंय. टायटल चुकलं किँवा कार्यक्रम चुकला - मान्य...! बोस्टन हाऊसमध्ये हाडामासाची माणसंच काम करतात. चुक होते ! . पण ट्विटर, फेसबूक आणि त्यांच्या ऑफीसला येणाऱ्‍या मेल्स, पत्र यांतून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी (जे एंड यूजर्स आहेत) बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली... जी प्रेक्षकांच्या दृष्टीने योग्य आहे - ती एबीपीने सातत्याने फाट्यावर मारली, ही घोडचूक ठरतेय... एबीपी माझा जरी स्वतंत्र चॅनेल असलं तरीही कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत, त्यांच्या संख्येनूसार जाहिराती देणारे जाहिरातदार आहेत... आणि एका चुकीमूळे प्रेक्षकांचा एक पुर्ण वर्ग जर दुरावत असेल तर व्यवसायासाठी ती धोक्याची घंटा आहे. . या प

सना-त-न

करमत नव्हतं... उदास, एकटं वाटत होतं सकाळपासून ... ! मग मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या परमपूज्य संत अपर्णाताई रामतिर्थकरांच्या अद्भूत भाषणाचे व्हिडीयो यूट्यूबवर लावले आणि समाधी लावून बसलो ... आध्यात्मिक शांतीची अनुभूती घेत असतांना नकारात्मक काळ्या शक्तींनी व्हॉटस्अॅपवर टिंग टिंग वाजवून त्यात भंग आणण्याचा प्रयत्न केला... त्यावर मात करण्यासाठी साधना म्हणून "उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेली दैवी बालके" ह्या क्लिप बघून त्या दैत्यांना साऊथच्या अॅक्शन फिल्मसारखं सपसप मारलं ! ... आता आध्यात्मिक किरणांची अनुभूती होतेय... जर यातूनही उदास वाटणं वगैरे कमी नाही झालं तर आज सुक्ष्मातून सनातन प्रभात वाचेन आणि आध्यात्मिक पातळी दोन-तीन टक्के वाढवून घेईल.. ! ... रविवारी इतकंच ! :-P :-D .. #सनातन_नव्हे_टनाटन

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved