Posts

Showing posts with the label Person

Dr. Shriram Lagoo

Image
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानं मराठी अभिनयसृष्टीच्या नटसम्राटाची अखेर झाली. वरच्या फळीतले कदाचित  लागू एकमेव शेवटचे उरले होते, ते ही आज गेले. .. डॉ. श्रीराम लागू पर्व संपलं. आणि त्यांच्यासोबत कदाचित एक पिढीही संपली...! ... मन संकल्पना, भूतभविष्य, देव-दानव, श्रद्धा-अंधश्रद्धा यांना त्यांच्या जडवादाने नेहमीच विरोध केला. मृत्यूनंतर काहीही राहत नाही या त्यांच्याच सिद्धांताने त्यांना "श्रद्धांजली" म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांचं राजकीय-वैचारीक मत गोंधळलेलं होत, पण अभिनयातील त्यांच्या भव्य कारकिर्दीसाठी आदर...!

Dada

Image
Happy Birthday Dada... आजोबा... काही माणसांचं आपल्या आयुष्यात असणं हेच खूप महत्वाचं असतं. ... ज्यांच्या फक्त असण्याने सुद्धा आपण निर्धास्त असतो... बाहेर कितीही मोठं वादळ आलेलं असू देत, घरी आल्यानंतर कसं वाटतं ? तोच सेफ फील देणारं माणूस माझ्या आयुष्यात आहे... माझे आजोबा ! दादा !! ... माझ्यासाठी माझं छत ! कुठल्याही प्रश्नाचं शेवटचं उत्तर...! एखादी प्रश्न आपण कितीही उड्या मारून सुटत नसेल तर बाकीचे मंदिरात जात असतील, मी आजोबांसमोर जातो. मंदिरातला देव आरामात लक्ष देईल - मग काहीतरी मार्ग दाखवेल - मग त्यावर चाला....... इथे तसं नाहीय - समोर जायचं, प्रोब्लेम काय आहे तो सांगायचा - पुढच्या मिनिटाला आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं असतं... मग ते उत्तर म्हणजे पैसा असू देत, व्यक्ती असू देत किंवा वेळ असू देत... रिकाम्या हाताने परत फिरत नाही...! ... मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यावर माझ्या मागे पहिली शक्ती उभी राहिली ती म्हणजे माझे आजोबा... त्या निर्णयाचा मनापासून आनंद होणारे कदाचित ते एकमेव आहेत... ते फक्त उभे राहिले नाहीत तर जिथे सांभाळण्याची गरज होती तिथे सांभाळलंही... त्यांचा स्

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... Vs Others

Image
एकीकडे - देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... . दुसरीकडे - उद्धव ठाकरे, संज्या रौत, राजाभाऊ ठाकरे, शरद पवार, चव्हाण मंडळी, कॉंग्रेस मंडळी, मलीक वगैरे टिव्हीवरच्या चर्चेत ज्ञानबिड्या पिणारे व्हेरी थोर लोक्स, मूकमोर्चा मंडळी, प्रकाशभौ आंबेडकर, जितूबुद्दीन आवहाड फ्रॉम गाझा, शेट्टीचा राजू, आयबीएन-टिव्ही९-सामचं चपराश्यापासूनचं अख्खं रिकामचोट मंडळ, काणे-सबनीस वगैरे मंडळी, हे ही कमी म्हणून पक्षांतर्गत तारे तोडणारे जेष्ठ - लोकांच्या मनातील माजी मुख्यमंत्री वगैरे मंडळी... आणि फडणवीसांनी ब्राह्मणांसाठी काय केलं म्हणत विरोध करणारा एक गट...! .. याचं कारण एकच : योग्य - स्वच्छ आणि अभ्यासू राज्यकारभार...! .. महाराष्ट्राला घाणेरड्या डावपेचांचा, वाह्यात हातवाऱ्यांचा उबग आलेला... त्यात या माणसाला नशीबानं सत्ता मिळाली, आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. राजकारणात जे स्वच्छ डावपेच आहेत ते वापरुन वरच्या लिस्टेड मंडळींनी वेळोवेळी निर्माण केलेलं उपद्रव त्यांनी एकहाती थोपवलं, या माणसाविरुद्ध राजकारणाने अगदी खालची पातळी गाठली, त्यांच्या पत्नीबद्दलही बरळलं गेलं, तरीही संयम

RIP विजू खोटे

Image
मराठी वा हिँदी चित्रपटसृष्टीत बरीच मंडळी सहकलाकार म्हणून जन्माला आली, सहकलाकार म्हणूनच संपली... अभिनयाच्या बाबतीत अमिताभ बच्चनना तोडीस तोड असूनही आणि अख्खी हयात इंडस्ट्रीला देवूनही चित्रपटाचे मुख्य नायक होणं त्यांच्या नशीबात नव्हतं... तरीही, भारतीय चित्रपटसृष्टीतलं मानाचं पान ते ठरले - अध्याय ठरले ! त्यांच्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होणार नाही. . "विजू खोटे" हा अध्याय आज संपला ! चित्रपटसृष्टीतलं विजू खोटे पर्व संपलं. . भारदस्त आवाज, करारी चेहरा, आणि जबरदस्त अभिनय क्षमता असलेल्या या माणसाने पदरी पडलेल्या खलनायकी भूमिकांचं सोनं केलंय. "कितने आदमी थे ?" या ऐतिहासिक प्रश्नाचं ऐतिहासिक उत्तर देणारा आवाज शांत झाला. . विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - तेजस कुळकर्णी

RIP जेटली

Image
सुषमा स्वराज, पर्रीकर, मुंडे, अनंथ कुमार, प्रमोद महाजन आणि आज जेटली ! भाजपाचे हे चेहरे कमी वयात गेले... सगळे एकापेक्षा एक विद्वान, प्रकांड पंडीत असलेले... ! त्यांच्या निधनाचं दु:ख झालं कारण त्यांचे पाय जमीनीवर होते. ते तत्वाने जगले... ! भाजपाच्या जडणघडणीत या मंडळीँनी आयुष्य वेचलंय... संघाची बळकट माणसं होती ही. . अर्थमंत्री आणि मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स म्हणून जेटलींचे काही निर्णय वैयक्तीक न पटणारे होते. पण तो एक भाग सोडला तर त्यांची विद्वत्ता, वत्कृत्व, भाजपाच्या वरच्या फळीतलं नेतृत्व आणि कायद्याचं ज्ञान याला तोड नाही... संसदेत बोलायला उभे राहीले की विरोधकही बेँच वाजवायचे... ! कॉँग्रेसच्या बऱ्‍याच नेत्यांची मुलं जेटलीँकडे इंटर्नशीप केलेली...! ते कायद्याचं विद्यापीठ होते. मोदीँनी नोटबंदी, जीएसटी, बॅँक मर्जीँग असे भव्य निर्णय जेटलींच्या भरवश्यावर घेतलेय. जेटली भले मास लिडर नव्हते, पण भाजपाचं पान त्यांच्याशिवाय हलणारं नव्हतं. . अरुण जेटली भाजपासाठी थिँक टॅँक होते. भाजपाची इंटलअॅक्च्यूअल प्रॉपर्टी होते... भाजपाच्या मूळ तत्वाचा चेहरा अरुण जेटली होते... ! भाजपासाठी ते संकटमोचक ह

कॅप्टन कूल

Image
आज एका माणसाची महत्वाच्या क्षणी निर्णायक संयम भूमिका राहिली. सभापती, उपराष्ट्रपती वैकय्या नायडूजी ! . आज दुपारच्या सत्रात सभागृहात आल्यानंतरही त्यांनी आपण या महत्वाच्या विषयावर असलेल्या चर्चेत समोर नसण्याबद्दल खेद व्यक्त केला... जबाबदारी याला म्हणतात... केवळ संचालन करणं एवढंच नसून प्रत्येक सदस्याच्या आधिकाराचा मान ठेवत, शब्द न शब्द ऐकून त्यावर नियंत्रण ठेवणंही महत्वाचं असतं... कुठे महत्व द्यायचं कुठे नाही - यावर ते पक्षपात न करता निर्णय देतात. सिब्बलने काहीतरी पुड्या सोडल्यान ंतर उजवीकडच्या सदस्यांनी गोँधळ घालायला सुरुवात केली. त्याला महत्व न देता - "दो मिनट मे संविधात बदल नही जायेगा, मै यहॉँपे बैठा हूँ... क्या रिकॉर्ड मे जायेगा ये मै देख रहा" म्हणत प्रकरण शांत तर केलं, पण एकाच वाक्यात सिब्बलची हवा सोडली... ! . खमका मॉनीटर असला तर वर्ग ठिकाणावर राहतो. सकाळी गोँधळ सुरु झाला, त्यात मुर्दाबादच्या घोषणा, रडणं यांतही खमकेपणे सभापतीँनी एक बाजू लावून धरली. पीपीडीच्या दोघांनी कपडे फाडल्यानंतर त्यांना उचलून बाहेर फेकलं... ! . रेणूका चौधरी हसल्यानंतर याच माणसानं कडक शब्दा खडसावलं हो

पु. ल.

१२ जून २००० पु. ल. या देवाचं अवतारकार्य संपला तो दिवस...! . शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी... त्याला पु. ल. तरी अपवाद कसे ठरतील...? पुलं तुम्हाला पुण्यात रुपालीच्या पहील्या मजल्यावर तर शोधूनही सापडणार नाहीत... पु.ल. त्यांच्या पुस्तकांची पारायणं करुनही भेटणार नाही... हा देव तुम्हाला अवतीभवती मात्र चराचरात दिसेल... . दातांच्या जागी छापखान्यातले खिळे बसवलेला आणि जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचे क्लासेस उघडलेय अश्या सखाराम गटणेच्या रुपात... उघड्या तोँडाच्या पण तितक्याच प्रेमळ माणसांच्या अंतू बर्व्याच्या रुपात... सोसायटीच्या मिटीँग्समध्ये... मराठी शाळाशाळांत तर असंख्य चितळे मास्तर भेटतील... रावसाहेब तर गल्लीगल्लीत - घराघरात, घर म्हणून अख्खं गाव दाखवणाऱ्‍यांत पुलंची अनेक पात्र भेटतात... पोष्टातल्या काऊंटरमागच्या माणसाच्या टक्कलावर केस आले की आज सुद्धा मराठी माणूस त्याची बदली झाल्याचं लगेच ओळखतो... पहीली परदेशवारी आठवून बघा... पुलंना मिळाले तेच सल्ले आपल्यालाही मिळतात... लग्नकार्यात येणारा नारायण हल्ली कुणाच्या मयतालाही दिसतो... . तुम्ही मुंबईत विरारला राहतांना अ

अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpeyi

Image
दि. २८ मे १९९६, संसदेत एक ऐतिहासिक क्षण साजरा होणार होता... संसदेच्या आजपर्यंतच्या इतिहासातली एक महत्वपूर्व घटना घडणार होती... सभापती होते पी. ए. संगम्मा. अनेक पक्षांचा टेकू घेऊन निर्माण झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला बहूमत सिद्ध करायचं होतं, ऐनवेळी धोका झाला - आणि बहूमत नसल्याचे जाणून वाजपेयींनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला... पण तत्पूर्वी त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केलेल्या काँग्रेस सरकारची संसदेतच पुराव्यासकट न भूतो न भविष्यती अशी पिसं काढून "मै यहाँसे सिधा राष्ट्रपती महोदयके पास अपना इस्तिफा सौंपने जा रहा हूँ".... म्हणत निघाले देखील ! कॉंग्रेस सरकारला तेव्हा बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, पुढची आठ वर्ष ते त्यातून सावरले नाहीत ... केवळ तेरा दिवसांचं वाजपेयी सरकार पडलं - सुर्यास्त वाटला - पण प्रत्यक्ष्यात ते ढग होते, ते हटले आणि भाजपाचा लख्खं प्रकाश पडला... या रथाचे सारथी होते अटल बिहारी वाजपेयीजी... ! .. १९९८-१९९९ तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा होतो... थोडीफार समज आली, तेव्हा हा देश आहे, यासाठी कुणी एक पंतप्रधान असतात, ज्यांचे फोटो

श्यामच्या आईचं आज काय करायचं...

Image
*श्यामच्या आईचं आज काय  करायचं.......?*                         _यशोदा सदाशिव साने_  _मृत्यू २ नोव्हेंबर १९१७_  *श्यामची आई* नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.    कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.              गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बापट यांनी गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की *कशी होती हो गुरुजीची आई?* तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाल

दिलीप प्रभावळकर : 75th Birthday

Image
ज्या माणसांशिवाय मराठी चित्रपटसृष्टी अपूर्ण आहे, ज्यांना पडद्यावर बघितलं तरी घरातलं माणूस भेटल्याची जाणीव होते ते दिलीप प्रभावळकर... जन्माला येतांनाच ते आपल्याभोवती प्रभावळ घेऊन आले... मराठी चित्रपटसृष्टीतले बिग बॉस... बघताक्षणी आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर बायडिफॉल्ट व्हावा अश्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा, प्रभावळकरांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस... ! .. साडेपाच - सहा फुट उंची, गौरवर्ण आणि चेहऱ्यावर असलेला अभिजात आत्मविश्वास... या रुपासह प्रभावळकर चित्रपटसृष्टीत अवतरले... एखाद्याच्या बाबतीत निसर्ग भरभरुन देतो - प्रभावळकरांच्या डोक्यावरचं टक्कलही त्यांच्या व्यक्तीमत्वाला चार चाँद लावणारं, साजेसं आहे... ! शुद्ध मराठी, कणखर आवाज, न आणि ण, श आणि ष, ट आणि ञ यांतील फरकासह असणारी आणि विरामचिन्हांचा आदर करणारी सुस्पष्ट शब्दफेक, भारदस्त देखणं रुप या बळावर प्रभावळकर मराठी अभिनयातले सुपरस्टार झाले.. .. चि. वि. जोशी लिखीत चिमणराव गुंड्याभाऊ मध्ये प्रभावळकरांनी बाळ कर्वे यांच्यासह कोकणस्थ भट चिमणराव साकारले... सत्तरच्या दशकातील मराठी मध्यमवर्गीय माणूस आणि मित्रासमवेत असणारी त्यांची जुग

सुमित्रा महाजन : लोकसभा अध्यक्ष... संयममूर्ती

Image
सुमित्रा महाजन : लोकसभा अध्यक्ष... संयममूर्ती...! .. कुठलंही अधिवेशन हे लोकसभा - राज्यसभा सभापतींच्या समोर घडतं... राज्यसभेचे पिठासीन सभापती हे मा. उपराष्ट्रपती असतात, तर लोकसभेचे सभापती हे निवडून आलेल्या सदस्यांतून निवडतात... ! .. १६ व्या लोकसभेच्या सर्वोच्च पदावर एक महनीय व्यक्ती आहेत... सुमित्रा महाजन... माहेरच्या सुमित्रा साठ्ये... वय वर्ष ७५  ... ! सद्यस्थितीत भारतातील एकमेव महिला ज्यांनी सर्वात जास्त काळ लोकसभेत पद भूषवलं... १९८९ पासून आजपर्यंत त्या लोकसभेत आहेत... .. ही म्हणावं तर सगळ्यांत संवेदनशील, धगधगती लोकसभा.. सरकार ते विपक्ष सगळेच अतंरगी... पण या सदस्यांना फक्त नजरेच्याच धाकात ठेवण्याचं कसब त्या अनूभवातूनच असावं... वर्गात शिकवणाऱ्या बाई समोर आल्यानंतर सगळी पोरं जशी गप्प बसतात तसाच धाक सगळ्या सदस्यांना महाजनांचा वाटतो... .. आज तर खरा कस लागण्याचा दिवस, त्यातही सदस्यांना ओरडून शांत करणं - रा.गा.ला कडक शब्दांत समज देणं - अनावश्यक मुद्दे खोडून काढणं - निःपक्षपणे, तटस्थपणे सगळं सांभाळणं - हसत खेळत, मर्यादा सांभाळून सभागृह चालवणं - आणि न थकता, न कंटाळता बस

RIP Dr. Hathi

Image
तारक मेहता मधल्या डॉ. हाथीचा रोल करणाऱ्या कवी कुमार आझाद या कलाकाराचं ऋदय विकारानं वोक्हार्ट मध्ये निधन झालं. रोजच्या बघण्यातला माणूस असा अचानक निघून जाणं खूप चटका देणारं असतं...  . प्रचंड अवजड शरीर सांभाळत अभिनय, नृत्यात असणारी त्यांची चपळता, संवादफेक, टायमिंग या गोष्टीला तोड नव्हती... कुमार आझाद यांच्या आधी निर्मल सोनी हे डॉ. हाथी या पात्राचा रोल करायचे, पण निर्मल सोनी यांचा करार संपल्यावर आझाद आले आणि त्यांनी डॉ. हाथी म्हणून आपली जागा प्रेक्षकांच्या मनात, घरात पक्की केली. वेळेवर येणं, नियमितता आणि सहकारी कलाकारांना हसत खेळत सांभाळून घेण्याची हातोटी यामुळे कुमार आझाद यांनी प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण केली होती...  . एखादा माणूस दररोजच्या बघण्यातला असेल आणि त्याचं अचानक जाणं हे जरी खूप चटका देणारं असलं तरीही, जाण्याचं कारण हे देखील धडा देणारं असतं... कवी कुमार यांचं अवाढव्य शरीर हे त्यांची ओळख होती, त्यावरच त्यांना अनेक भूमिका मिळाल्या - आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या फुलवल्या, तरीही - त्याच अवाढव्य शरीराने त्यांचा घात केला... त्यात सिगरेटची सवयही जीवघेणी ठरली ! .

शुक्रतारा अस्तला...

Image
सकाळी अरुण दाते गेल्याची बातमी आली आणि जवळचं माणूस गेल्यावर येतं ते पाणी आलं डोळ्यात... ज्या माणसाची गाणी ऐकत लहानाचं मोठं झालो, प्रेमातल्या गुजगोष्टी ज्यांच्या गाण्याने बहरल्या, ज्यांच्या आवाजाने कितीही मोठ्या संकटात जन्मावर जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, ज्यांच्या आवाजाच्या सानिध्यात शेकडो किमीचा प्रवासही जवळचा वाटायचा त्या आवाजाचं असं शांत होणं चटका लावणारं आहे... हि बातमी खोटी ठरो म्हणून मनातल्या मनात देवाचा धावाही झाला. पण अवतार सुद्धा संपतात, आणि अरुण दाते आपल्या दुर्दैवाने अमर नाहीत.  . मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळे काकांचे संगीत आणि शब्दांना-संगीताला लाभलेला अरुण दातेंचा मखमली आवाज... त्रिमूर्तीने केवळ गाण्यासाठी अवतार घेतलेला असावा असा सुरेल संगम... किती भरभरून द्यावं एखाद्याने ? आपली झोळी भरली, पण त्या त्रिमूर्तीचा हात आखडला नाही. आज फक्त दाते गेले नाहीत, तर मराठीचं पितृत्व हरवलंय, मराठी गाण्याचा आवाज शांत झालाय... खळे-दाते-पाडगावकर त्रिमूर्तीमधला शेवटचा देवही आज निजधामाला गेला... या तिघांचे एकमेकांशी खरंच स्वर्गातले संबंध असावेत... एकमेकाच्या मनातलं गाणं ओळखून

Rahul Dravid

Image
अंडर१९ च्या विजयाचा शिल्पकार राहूल द्रविड.. दरवेळी ठरवतो, या माणसाबद्दल लिहूयात कधीतरी, पण कौतूक आणि श्रेय एखाद्याच्या नशीबात असावं लागतं - राहूल द्रविडचं नशीब याबाबतीत दोन नव्हे तर तब्बल चार पावलं पुढे असावं... ! द वॉल राहूल द्रविड... कितीही चांगलं केलं तरी श्रेय, कौतूक या माणसापासून दूरच राहील्या.. समोरच्या टिममध्ये बॉलर्स याच्या चिकटपणाला मनात शिव्या घालू देत, पण माणूस म्हणून हा देवमाणूस आहे... शांत... संयमी. योग्य निर्णय घेणारा. ! .. २००७ ला वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशनी हरवल्यावर हा कोण ठोंब्या आणून बसवलाय कॅप्टन म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रीया देशाची उमटली होती... सगळीकडून शिव्याशाप खातांनाही तो शांत होता... अबकी बार... म्हणत हारला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा त्याने मोट बांधली... जायला सांगितलं, उमगलं तेव्हा धोनीच्या हाती धुरा देऊन शांतपणे निघाला.. त्याने कधी स्वतःला क्रिकेटचा देव म्हणलं नाही, ना अवार्डस् करता याचक झालेला दिसला... निवृत्तीनंतर तो एक दोनदा दिसला, पण चर्चेत आला नाही... एकदा डॉक्टरेट नाकारतांना, एकदा रांगेत उभा असलेला... ! त्याच्यात टॅलेंट आहे, स्कील्स आहेत..

Rafi

Image
१९६२ - १९६३ मध्ये लता मंगेशकरांनी गायकाला मिळणाऱ्या मानधनाचा वाद काढला. चित्रपटातून निर्मात्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून गायकालाही रॉयल्टी मिळावी यासाठी ती धडपड होती... त्याकाळचे आघाडीचे अनेक गायक - गायिका या वादात मंगेशकरांबरोबर होते... पण या सगळ्या गराड्यात एक आवाज मात्र वेगळा होता. "गायकाला गाण्यासाठी ठरवलेल्या कराराप्रमाणे मानधनाइतकी रक्कम मिळाली, की त्याचा संबंध संपतो..., मग तो चित्रपट हिट होवो किंवा न होवो..." ... मोहम्मद रफी ... ! ... या माणसाची कला पैशांपुढे झुकली नाही ... . "माया" चित्रपटातल्या "तस्वीर तेरी दिल मे" च्या रेकॉर्डींगवेळी हा वाद झाला. पण रफींच्या स्टँडमूळे केवळ श्रेयनामावलीत गायकाचं नांव द्यावं या मुद्यावर नाईलाजाने एकमत झालं ... या विरोधाचा परीणाम म्हणजे रफींबरोबर एकही गाणं गाणार नाही हे लता मंगेशकरांनी जाहीर केलं... दोन दिग्दजांच्या या वादात जयकिशन यांनी मध्यस्थी केली... पण आयुष्यभर मनोमनी राहीलंच... ! २०१२ मध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद रफींनी आपल्याला माफीपत्र दिल्याचा दावा लता मंगेशकरांनी केला, पण रफींच्या मुल

जगजितसिंह

Image
दुःख, विरह हे सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे हे त्यांनी पटवून दिलं... त्यांनी प्रेमात पडलेल्या काळजाची तार छेडली तसंच प्रेमभंगातल्या दुःखातून पाझरणाऱ्या अश्रूंचं गीत केलं... एकीकडे प्रेमाची थंडगार वाऱ्याची झुळूक दाखवली, दुसरीकडे विरहातली हूरहूर ... "सॉंसे देकर अपनी संगीत अमर कर दो"... म्हणत या माणसानं गझल अमर केली... .. संध्याकाळ पासून चढत जाणारी रात्र, थंडगार वारा, मंद प्रकाश - आणि जगजितसिंगांची गझल... हि अनुभवण्याची गोष्ट आहे... "प्यार का पहला खत" पासून सुरुवात करायची, तुम को देखा तो ये खयाल आया, झुकी झुकी सी नजर, सरफरोश मधलं होशवालोको खबर है क्या, तेरी खुशबू मे बसे खत, तुम इतना जो मुस्कूरा रहे हो" ही गाणी करत करत संध्याकाळ संपता संपता - "कही दूर जब दिन ढल जाऐ" वर यायचं... गझल ही नशा आहे... रात्र चढते तशी गझल चढणार... जगजितसिंगांचा गंभीर आवाज - आणि रात्र... हा एकांत हवाहवासा वाटणारा, अनुभवण्यासारखा असतो... चढत्या रात्रीसोबत "होठो से छू लो तूम...." ऐकायचं. कुठलीही गझल एकदाच ऐकून मन भरणार नाही - पून्हा पून्हा ऐकायचं... "होठो से" तर

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved