Posts

Showing posts with the label Music

शुक्रतारा अस्तला...

Image
सकाळी अरुण दाते गेल्याची बातमी आली आणि जवळचं माणूस गेल्यावर येतं ते पाणी आलं डोळ्यात... ज्या माणसाची गाणी ऐकत लहानाचं मोठं झालो, प्रेमातल्या गुजगोष्टी ज्यांच्या गाण्याने बहरल्या, ज्यांच्या आवाजाने कितीही मोठ्या संकटात जन्मावर जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, ज्यांच्या आवाजाच्या सानिध्यात शेकडो किमीचा प्रवासही जवळचा वाटायचा त्या आवाजाचं असं शांत होणं चटका लावणारं आहे... हि बातमी खोटी ठरो म्हणून मनातल्या मनात देवाचा धावाही झाला. पण अवतार सुद्धा संपतात, आणि अरुण दाते आपल्या दुर्दैवाने अमर नाहीत.  . मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळे काकांचे संगीत आणि शब्दांना-संगीताला लाभलेला अरुण दातेंचा मखमली आवाज... त्रिमूर्तीने केवळ गाण्यासाठी अवतार घेतलेला असावा असा सुरेल संगम... किती भरभरून द्यावं एखाद्याने ? आपली झोळी भरली, पण त्या त्रिमूर्तीचा हात आखडला नाही. आज फक्त दाते गेले नाहीत, तर मराठीचं पितृत्व हरवलंय, मराठी गाण्याचा आवाज शांत झालाय... खळे-दाते-पाडगावकर त्रिमूर्तीमधला शेवटचा देवही आज निजधामाला गेला... या तिघांचे एकमेकांशी खरंच स्वर्गातले संबंध असावेत... एकमेकाच्या मनातलं गाणं ओळखून

राम आणि गाणी...

Image
राम आणि गाणी... कृष्ण, राम, गणपती, शंकर, विठ्ठल, देवी यां देवतांवरची गाणी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे... एकेका देवतेवर शंभर शंभर गाणी, एकापेक्षा एक आरत्या आणि ते संगीत ऐकतांना दोन भुवयांच्या मध्ये मन स्थिर व्हावं अशी नितांत शांतता... ! त्यांना फक्त माहौल हवा, राग - त्याचे समयचाक्राचे नियम त्या गाण्यांपाशी गप्प उभे राहतात, आणि केवळ ती गाणी - शब्द, संगीत, भाव निखळ आनंद देऊन जातात... ! .. राम ! गोंदवलेकर महाराजांचं मंदीर, गजानन महाराजांचं मंदिर... कुठेही जा - "श्रीराम" हा त्रयाक्षरी जप एक लयीत दिर्घ आवाजात सुरु असतो... ना चाल, ना वाद्य... तरीही आपण त्या शांततेशी क्षणात एकरूप होतो... श्रीराम जयराम जय जय राम ... किती शक्ती देतं ... .. गीत रामायण तर रत्न म्हणावं... रामाचं जीवन गदिमांनी गीतात बांधलं, बाबुजींनी तितकंच ताकदीचं संगीत दिलं... आजही दुपारी १२ वाजता प्रत्येक मंदिरात "राम जन्मला गं सखे" सुरु असेल... लग्नात स्वयंवर झाले सितेचे... किंवा दिवाळी पहाट मध्ये राम अयोध्येचा राजा ... ही गाणी आजही मानबिंदू आहेत... .. रामावरची मराठी भावगीतंही साखरेसारखी गोड

मुंबई रिवर एन्थम समीक्षण Mumbai River Anthem

Image
सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं, आणि मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांची भूमिका असलेलं "मुंबई रिवर थिमसॉंग / एंथम"... .. गाण्याची सुरुवात जराss बोअर होते... वर्षा बंगल्यात पेपर वाचत बसलेल्या सौ. सीएम आणि त्यांची मुलगी ... इथे त्यांचं पेपर धरून शून्य नजरेत बघत बसण्यात आणि त्या लहान मुलींच्या चेहऱ्यावर कुठेतरी कृत्रीमपणा वाटतो.. River rejuvenation awareness campaign वाचून त्या एकदम नदीकाठी पोहचतात...  .. अमृता फडणवीसांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताचा बेस आहे -  मूळ आवाजात वजन, जडपणा जाणवतो... गंभीर प्रकृतीच्या गाण्यांना साजेसा आवाज आहे त्यांचा... सहज सांगायचं तर "परदेसी परदेसी जाना नही...", "सब कुछ भूला दिया", "जिंदगी मे कोई कभी आये ना रब्बा..." सारख्या बेसचे गाणे गाण्यासाठी त्या परफेक्ट आहेत... सबब : या गाण्यात त्यांचा आवाज पहिला मिनिट मिसमॅच वाटतो... पण पुढच्या तीस सेकंदात त्यांचा आवाज कानात बसला, म्हणजेच कानाला सवय झाली, त्या आवाजाला म्यूजिक मॅच झालं आणि कोरस मिळाली... सुसह्य वैगेरे झाला की गाणं आणि व्हिडीयो मस्त पकड घेते...

Rafi

Image
१९६२ - १९६३ मध्ये लता मंगेशकरांनी गायकाला मिळणाऱ्या मानधनाचा वाद काढला. चित्रपटातून निर्मात्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून गायकालाही रॉयल्टी मिळावी यासाठी ती धडपड होती... त्याकाळचे आघाडीचे अनेक गायक - गायिका या वादात मंगेशकरांबरोबर होते... पण या सगळ्या गराड्यात एक आवाज मात्र वेगळा होता. "गायकाला गाण्यासाठी ठरवलेल्या कराराप्रमाणे मानधनाइतकी रक्कम मिळाली, की त्याचा संबंध संपतो..., मग तो चित्रपट हिट होवो किंवा न होवो..." ... मोहम्मद रफी ... ! ... या माणसाची कला पैशांपुढे झुकली नाही ... . "माया" चित्रपटातल्या "तस्वीर तेरी दिल मे" च्या रेकॉर्डींगवेळी हा वाद झाला. पण रफींच्या स्टँडमूळे केवळ श्रेयनामावलीत गायकाचं नांव द्यावं या मुद्यावर नाईलाजाने एकमत झालं ... या विरोधाचा परीणाम म्हणजे रफींबरोबर एकही गाणं गाणार नाही हे लता मंगेशकरांनी जाहीर केलं... दोन दिग्दजांच्या या वादात जयकिशन यांनी मध्यस्थी केली... पण आयुष्यभर मनोमनी राहीलंच... ! २०१२ मध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद रफींनी आपल्याला माफीपत्र दिल्याचा दावा लता मंगेशकरांनी केला, पण रफींच्या मुल

जगजितसिंह

Image
दुःख, विरह हे सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे हे त्यांनी पटवून दिलं... त्यांनी प्रेमात पडलेल्या काळजाची तार छेडली तसंच प्रेमभंगातल्या दुःखातून पाझरणाऱ्या अश्रूंचं गीत केलं... एकीकडे प्रेमाची थंडगार वाऱ्याची झुळूक दाखवली, दुसरीकडे विरहातली हूरहूर ... "सॉंसे देकर अपनी संगीत अमर कर दो"... म्हणत या माणसानं गझल अमर केली... .. संध्याकाळ पासून चढत जाणारी रात्र, थंडगार वारा, मंद प्रकाश - आणि जगजितसिंगांची गझल... हि अनुभवण्याची गोष्ट आहे... "प्यार का पहला खत" पासून सुरुवात करायची, तुम को देखा तो ये खयाल आया, झुकी झुकी सी नजर, सरफरोश मधलं होशवालोको खबर है क्या, तेरी खुशबू मे बसे खत, तुम इतना जो मुस्कूरा रहे हो" ही गाणी करत करत संध्याकाळ संपता संपता - "कही दूर जब दिन ढल जाऐ" वर यायचं... गझल ही नशा आहे... रात्र चढते तशी गझल चढणार... जगजितसिंगांचा गंभीर आवाज - आणि रात्र... हा एकांत हवाहवासा वाटणारा, अनुभवण्यासारखा असतो... चढत्या रात्रीसोबत "होठो से छू लो तूम...." ऐकायचं. कुठलीही गझल एकदाच ऐकून मन भरणार नाही - पून्हा पून्हा ऐकायचं... "होठो से" तर

Raaga and Taal

संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच गाणं गात असतो. समोर समे वर आल्यावर एक जरी मान डॊलली की तो भरून पावतो. गाणं म्हणण्याचा रियाज तर हवाच पण गाणं ऐकण्याचा ही रियाज हवा, नाही तर शास्त्रीय संगीतात काहीच रस वाटणार नाही. एकदा एका  कार्यक्रमाच्या वेळी आरती अंकलीकर म्हणाल्या होत्या, ”पट्टीच्या गवयाला कुठलाही नाद चालतो, मग तो पंख्याचा लयबद्ध नाद जरी असला, तरीही त्या नादावर गाणं आपोआप गुणगुणले जातं.” हीच गोष्ट पुढे नेत भाऊ मराठे यांनी सूत्र संचालन करतांना पंडित भॊमसेन जोशींचा एक  बडॊद्याचा अनुभव सांगितला... रात्रीची वेळ, भीमसेन जोशी टांग्यात बसून जात होते. टांग्याच्या घोड्यांच्या टापांचा, चाकांचा- लयबद्ध आवाज, आणि निःशब्द शांतता. पंडितजींनी स्वतःच्या नकळत  पूरियाधनाश्री  गुणगुणणे सुरु केले. रात्रीची निवांत वेळ, टांग्याच्या घोड्य़ांच्या टापाचा लयबद्ध आवाज, आणि पंडीतजींचा सूर... तेवढ्यात काहीतरी झालं आणि टांगा थांबला.   लय थांबली, आणि त्या बरोबरच पं

Asha Bhosle

Image
घडण्यासाठी सोसलेले घाव, कोंडी, स्वतःच्या बहिणीकडून होत गेलेली स्पर्धा यातही त्या भक्कमपणे टिकल्या, सहनायिकांची, कुणी फेकलेली गाणी मिळाली त्यांचंही सोनं केलं आणि त्या त्रासाचा लवलेशही न दाखवता, झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत त्या जगल्या... वयाच्या ८५ व्या वर्षातही आशा भोसले ही देवी आपल्याला भरभरून देतेय. कौटूंबिक कलह, करीयरमधले अडथळे, मुलीचं निधन यांसारखे संकटं झेलूनही त्या उभ्या आहेत. गायिका म्हणून त्यांनी जे दिलंय ते अफाट आहे, गेल्याजन्मी मोती दान केला तर आवाज गोड होतो - आशा भोसले या देवानं गेल्याजन्मी मोत्यांनी भरलेला समुद्र दान केलेला असावा... गंधर्वाला जन्म देणारी माता मनुष्य रुपात भूतलावर अवतरली. . हजारो एव्हरग्रीन गाणी त्यांनी दिलीत. तीन पिढ्या त्या गाण्यांनी मोठ्या केल्या. वयाच्या ८५ मध्ये पण पंचवीशीतल्या नायिकेला साजेशा मादक आवाज त्या देऊ शकतात, एखादं उडत्या चालीचं गाणं बहरवू शकतात, शांत - गंभीर प्रकृतीचं गाणं गातात, स्टेज शो करतात, अवांतर टाळून फक्त गाण्याविषयी बोलतात.. कुठल्याही प्रकारचं गाणं त्या गळ्यातून समृद्ध होवूनच बाहेर येतं... स्वर्गातून मधाची नितधार बरसतेय आणि आपलं म

Rafi - The God

Image
रफी साहेब... स्वर्गातले गंधर्व अवतार घेतात, कार्य करतात, देणं देतात... आणि स्वस्थानी परत जातात... त्यांना ना जन्म असतो ना मृत्यू... मानवी मर्यादा त्यांना आड येत नाही, ना ते कधी संपतात... मोहम्मद रफी नावाचा देव होऊन गेला... त्या देवाने आपल्या स्वर्गीय आवाजाने भरभरून दिलं, मागच्या चार आणि पुढच्या शेकडो पिढ्यांवर आजन्माचं ऋण देऊन १९८० मध्ये याच दिवशी स्वर्गात स्वस्थानी प्रस्थान केलं... रफी साहेबांच्या आवाजाने प्रत्येकावर जादू केलीय... प्रत्येकजण त्या आवाजाचा भक्त आहे... खुशनसीब है वो लब्ज़ जिनको तुमने छुआ, जन्नत मिले उस गाने को जिसे रफी ने गाया.. .. वयाच्या सातव्या वर्षी लाहौरमध्ये एका फकीराच्या मागे फिरुन ते त्याच्यासारखं गात असत, त्या फकीराने हा अवलिया जगाला दिला.. त्यांची गानप्रतिभा त्यांच्या भावाने ओळखली आणि उस्ताद वाहीद खान यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवलं... हे सुरु असतांना प्रख्यात गायक कुन्दनलाल सहगल यांचा कार्यक्रम लाहौर रेडीओकरता होत होता, लाईट गेले आणि गोंधळ झाला. त्यावेळी जमाव शांत करण्यासाठी रफींच्या मोठ्या भावाच्या विनंतीने त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्या प्रेक्षकां

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved