Posts

Showing posts with the label Technology

पीएमसीच्या निमित्ताने -

Image
पीएमसीच्या निमित्ताने - . सहकारी बॅँका ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था आहेत. आणि या क्षेत्राला शतकोत्तर इतिहास आहे... असं असलं तरीही, सहकारी बॅँका आणि राष्ट्रीयकृत बॅँका यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे... रात्री शांत झोप हवी असेल तर पैसा राष्ट्रीयकृत बॅँकेत ठेवा. . सहकारी बॅँकेचं व्याजदर आत्ता १०-१२ टक्के आहे, राष्ट्रीयकृत बॅँकांचं ६-७ टक्के... पण सहकारी बॅँकांना सरकारी कव्हर हे असून नसल्यासारखं असतं. तिथे राष्ट्रीयकृत बॅँकेतला पै न पै सरकारची जबाबदारी असते. पूर्वी राष्ट्रीयकृत बॅँक ांची संख्या आणि शाखांचा विस्तार मर्यादित होता. मोठ्या शहरांमध्येच फक्त शाखा असायच्या. त्यामूळे ग्रामीण भागात सहकारी बॅँक, पतपेढ्यांचं पेव फुटलं होतं... ज्याचं सार्वभौमत्व संचालक मंडळाकडे आहे. कारखान्यांवर काम करणारी माणसं, शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय यांनी पै न पै साठवून या संस्था वाढवल्या... बॅँकाच्या तुलनेने दुप्पट व्याजदर, सहज कर्ज देणं या बळावर ठेवीदार वाढवले आणि संस्था फुगल्या. यातूनच बऱ्‍याच पुढाऱ्‍यांचा जन्म झाला. . सारस्वत सारख्या संस्था अजूनही जिवंत आहेत. परंतू बऱ्‍याच सहकारी संस्था या त्यातील संचालका

सांगेन गोष्टी युक्तीच्या दोन...

झालं असं,  माझं क्ष नावाच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या मुंबईतल्या शाखेतलं करंट खातं आहे... १७ ऑगस्टला पुण्यातल्या य नावाच्या बँकेच्या एटीएममधून मी सात हजार रुपये काढायला गेलो... प्रोसेस केली पण कळालं की एटीएम टेक्नीकली मेलेलं  होतं... त्यामूळे पैसे निघाले नाहीत, पण बाहेर आल्यावर सात हजार बँकेतून वजा झाल्याचा मेसेज आला. प्रथेप्रमाणे तासाभरात कस्टमर केअरला फोन करुन तक्रार दिली... प्रकरण मार्गी लावलं... एक आठवड्यात पैसे परत मिळतील हे सांगितलं गेलं... तक्रार क्रमांक मिळाला.. आठवडा उलटला... पैसे मिळाले नाहीत.  परत फोन केला...  - बँकेच्या होम ब्रांचमध्ये तक्रार द्या... तिथे व्हेरीफीकेशन वगैरे करुन पैसे परत मिळतील... - ठिक !  .. सविस्तर अर्ज लिहीला... त्यावर तक्रार क्रमांक लिहीला,  बँकेचा फॉर्म जोडला आणि दिला...  त्याची ओसी हातात घेतली.... दि. २७ ऑगस्ट २०१८... नियमाप्रमाणे १२ दिवसाच्या आत ! .. नंतर दोन तीनदा चकरा मारल्या. "प्रोसेस सुरु आहे"...! रिमाईंडर पाठवलंय वगैरे वगैरे.. एक महिना उलटला... .. परवा मी सपत्नीक तिथे गेलो... सोबत रिमांइडर अर्ज घेतला

data theft

सावधान... वादळ घोंघावतंय! डोळे खाडकन उघडणारा लेख... फॉरवर्ड होत होत आलाय, वाचा आणि "वाचा"... ! ... कॅलिफोर्नियातील 'आय.टी.संपन्न' बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी. बाई स्वत: डॉक्टर आणि हा तिथल्या एका मोठया आय.टी. कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट. घरी ही दोघं आणि यांची सोळा वर्षांची मुलगी. बस, इतकंच त्रिकोणी कुटुंब. साधारण वर्षभरापूर्वी हा रागारागाने शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये भांडायला गेला. तिथल्या मॅनेजरला भेटला आणि तावातावाने सांगू लागला, ''हा काय चावटपणा लावलाय..? माझ्या घरी रोज तुमचे फ्लायर्स (पत्रकं) येतात. कशाचे? तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांचे. अरे, आमचा काय संबंध..? कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची फ्लायर्स पाठवून त्रास देताहात?'' मॅनेजर अनुभवी होता. त्याने याची समजूत घातली. चुकून झालं असेल असं म्हणाला आणि ''परत असे फ्लायर्स तुमच्या घरी येणार नाहीत'' असंही म्हणाला. विषय इथेच संपायला पाहिजे होता. पण ह्या घटनेच्या साधारण पाच-सहा महिन्यांनी हा त्याच शेजारच्या डिपार्टमेंटल

Sarahah - Be Careful Be Alert

#Sarahah बद्दल उत्सुकता म्हणून ठीक, पण ते अॅप खूप सिरीयसली न घेतलेलं चांगलंय... रॅदर, स्त्रियांनी, मुलींनी तर आधीक सतर्कतेने त्यापासून दूर राहणं योग्य आहे.. Precaution is always better than cure ! फॉर ऑल -  नंतर थोबाड बडवण्यापेक्षा आधीच ती वाट बंद केलेली चांगली... ! .. त्यात Sender कोण ते कळत नाही, रिप्लाय देऊ शकत नाही. त्यामूळे गंमत म्हणून थोडक्यात ठिक, पण एका मर्यादेपलीकडे या अॅपचा धोका निर्माण होईल... कुणीतरी भिंतीपलीकडून अश्लील कमेंटस् पास करू शकतो... (स्त्रियांसाठी विशेषतः ! एकतर्फी मरणारे, प्रेमभंगे वगैरे) कुणीतरी व्यंगावर टिका करू शकतो... धमकी देवू शकतो... नात्यात गैरसमज पसरवू शकतो... ऑफीसमध्ये भांडणं लावू शकतो... वैयक्तीक टिका, दुखरी / हळवी बाजू टोचू शकतो... आपल्यावर जळणारे हजारो असतात, ती माणसं मानसिक खच्चीकरण करू शकतात... ! खूप धोके आहेत. सध्यातरी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर Sarahah ची सिक्यूरीटी ब्रेक होत नाही. .. समजा, - दोन मित्रांत वाद झाले - बदला घेण्यासाठी किंवा टाईमपास करायला एकाने दुसऱ्याच्या बायकोला मेसेज पाठवला - "तुझ्या नवऱ्याचं ऑफीसमधल्या x सोबत लफडं

SEO and Google Policy

गुगल आजच्या घडीतले सर्वोत्तम सर्च इंजिन आहे. गुगल शिवाय काही सर्च करणे हा पर्यायच आता सहन होत नाही.  तुम्ही एखादे प्रॉडक्ट लॉन्च केले असेल तर ते इतरांना दिसण्यासाठी तुम्हाला paid services वापराव्या लागतात. त्याला SEO म्हणजेच Search Engine Optimization म्हणतात. झोल हा आहे की तुमचे प्रॉडक्ट कितीही दमदार असले तरीही तुम्ही SEO techniques वापरत नसाल तर google search results च्या पहिल्या काही पानात तुमचे प्रॉडक्ट दिसतच नाही. धोका हा आहे की याच्यात सर्वांना समान संधी मिळत नाही. जे google paid services वापरतात त्यांनाच मान मिळतो, भले प्रॉडक्ट भिकार असेल तरी चालेल. याचा अर्थ तुम्हाला काय शोधायचे आहे ते महत्वाचे नसून googleला जे दाखवायचे आहे तेच दाखवणार. Europe Union मध्ये Antitrust नियमानुसार सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, google ने monopoly करत बरेच सर्च रिझल्ट्स बदलले ते कायद्याविरोधात होते. म्हणून EU ने तब्बल 2.7 बिलियन्स पाउंडचा गुगलला दंड ठोठावला आहे आणि गुगलला झक मारत तो भरावा लागणारच. Google India पण हेच करत असते पण भारताच्या कायद्यांना काहीही पडलेली नाहीये, किंबहुना असा कुठला कायद

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved