Posts

Showing posts with the label Information

कोरोना : जागतिक संकट (साभार)

कोरोना विषाणू : मानवजातीवर सुटलेले ब्रम्हास्त्र.              सूर्यापासून फेकल्या गेलेल्या वायूच्या धगधगत्या गोळ्यातुन पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ४८० कोटी वर्षांपूर्वी झाली.  सुमारे ३८५ कोटी वर्षांपूर्वी पहिले सजीव, म्हणजे अतिसूक्ष्मजीव  अवतरले. नंतर तीन साडेतीनशे कोटी वर्षे पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचे राज्य होते. आपल्या कल्पनेतही न बसणारे, पृथ्वीवरील तापमान व वातावरणाचे टोकाचे बदल व  प्रतिकूलता त्यांनी पचवली. पृथ्वीवरील सजीव जैविक वस्तुमानाचा विचार केला तर त्यापैकी साधारण ८०% भाग हा सूक्ष्मजीवांचा आहे. दिसणाऱ्या सजीवांच्या २० कोटी व सूक्ष्मजीवांच्या सुमारे ४० कोटी प्रजाती, शंभर वर्षांपूर्वी होत्या.  'विषाणू' हा माणसासाठी हानिकारक अतिसूक्ष्मजीव, अनुकूल स्थिती व पोषण उपलब्ध असल्यास, एका दिवसात २८०००० अब्ज जीव वाढवतो. आपण लोकसंख्या वाढली वाढली म्हणून ओरडा करतो. पण पृथ्वीवर  माणसांची संख्या वाढून वाढून किती झाली, तर सुमारे ७५० कोटी. आता समजुन जा, सूक्ष्मजीवांच्या संख्येचा व क्षमतेचा विचार केला तर आपण त्यांच्या खिजगणतीतही नाही. भले आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ व शक्तीवान मानत असू! ७

Corona Go... Go Corona...

माझ्या काही सवयी आत्ता कोरोनाला माझ्यापासून दुर ठेवण्यात कामी येतील असं दिसतंय... काही गोष्टी वजन कमी करणं, सुटलेलं पोट कमी करणं, गाण्याच्या परिक्षांच्या भितीने आवाज ठिकाणावर ठेवणं यासाठी केल्या. आणि काही गोष्टी ऑरा, जोतिष्य वगैरे सल्ले घेवून सुरु केल्या ज्या करणं आता सवयींचा भाग आहे... त्याचे रिजल्टस मी चेक केले नाहीत, पण फायदा नक्कीच झालाय...  (कुठलंही नुकसान झालं नाही...) एकप्रकारे स्वतःसाठी प्रोटेक्शन तयार झालंय... तुम्ही वापरुन बघा... झाला तर फायदाच होईल. नुकसान होणार नाही. ... कोरोनाची भिती ५० टक्के तरी टळेल... ... १. भिमसेनी कापूरचा वापर : कुणीतरी सल्ला दिला, भिमसेनी कापूर रोज घरी आणि ऑफिसमध्ये जाळला की नकारात्मकता निघून जाते... वातावरण शुद्ध होतं... बायकोने लगेच अंमजबजावणी केली... एक किलो भिमसेनी कापूर आणला, प्लास्टिकच्या डब्यात भरला, आणि रोज संध्याकाळी एक तुकडा जाळणं सुरु केलं...! याचा आकार कापरासारखा स्क्वेअर किंवा गोल वगैरे नसतो... शेपलेस असतो. साधा कापूर बहूतेक सातशे-आठशे किलो मिळतो, तर हा दोन हजार रुपये किलो... ! एकदम स्ट्राँग... डब्बा उघडला की त्याचा वास पुर्ण घ

India Stands With NRC

Image
मी, तेजस विनोद कुळकर्णी, गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की - NRC कायदा लागू झाल्यानंतर माझं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी भारत सरकारने "जर" काही कागदपत्र मागितले तर मी आनंदाने देईल... ! रांगेत उभं रहावं लागलं तरीही चालेल. .. आणि घरी आल्यानंतर सेल्फी सुद्धा टाकेल...! .. माझ्याकडे पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबूक, कंपनीचं डिन सर्टीफिकेट, बर्थ सर्टिफीकेट, नॅशनॅलिटी, डोमेसाईल, वोटर आयडी कार्ड, ड्राइविंग लायसन्स, मॅरेज सर्टिफीकेट, सहा वर्षांपासूनचे आयटीआर रिटर्नस् कॉपीज् - १ ली ते मास्टर्स पर्यंतचे एकूण एक मार्कशीट्स, डिग्री, एलसी, टिसी वगैरे सगळं आहे... :-D :-D ... त्यात अजून एखाद्या कार्डची, कागदाची भर पडेल ! .. #indiastandwithnrc होवू द्या ट्रेंड !

CAB - NRC

CAB आणि NRC Amendment काल एक लोकसभेत पास झाले... एक होईल काही दिवसांत. .. हिंदू, पारसी, बौद्ध, जैन, शीख आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांसाठी भारत आजपासून मातृतूल्य देश आहे. शेजारच्या देशांत कुठेही केवळ धार्मिक अल्पसंखंक्य या एका कंडीशनखाली जर अत्याचार होत असतील तर त्यांच्यासाठी "भारत" हे सन्मानाने जगण्याचं स्थान असेल. .. २०२० - २०२१ ला जनगणनेतून धार्मिक आधारावर जनगणनेचा खरा आकडा समोर येईल, आणि आपल्या डोळ्यावरची झापडं खाड्कन उघडतील. कोण अल्पसंख्यांक आहे, एकुण किती आहेत, आणि अधिकृत - अनधिकृत कोण राहतंय हे समोर येईल. यातून घुसखोरी, देशांतर्गत आतंकवाद, नक्षलवाद आणि बनावट मतदानातून होणारे प्रकार याला ब्रेक बसेल. घुसखोर समोर येतील. आणि त्यांचं मूळ शक्तीस्थान यातून तोडलं जाईल... ही अतिशयोक्ती वाटेल, पण खरे परिणाम पुढच्या ४-५ वर्षांत दिसायला लागतील ! .. ही दोन्ही बिल्स वेगवेगळी असली तरीही त्यांचं डेस्टीनेशन "समान नागरी कायदा" हेच असणार. त्याचीच तयारी मोदी सरकारने सुरु केलेली दिसतेय...! भारताच्या अंतर्गत बांधणीला मजबूत करणारा पुढच्या किमान २०० वर्षांसाठीचा पाया मोदी सर

Ramji... Original Idol

Image
These are the original idols of Shri Rama, Lakshmana and Sita which were removed & sent to a safe place before the Ram Mandir was desecrated by Babur. When Babur marched into Ayodhya, the caretaker of the temple Pandit Shyamanand Maharaj fled Ayodhya along with the idols & handed them over to Swami Eknath Maharaj of Paithan. Later these idols were handed over to the Guru of Chhatrapati Shivaji Maharaj, Swami Samarth Ramdas. When Swami Samarth was on a tour of South India, he placed those idols on the banks of the holy sangam of rivers Tunga & Bhadra forming Tungabhadra in a small town called Harihar, Karnataka. The idols have been worshipped since then by the Gurus of Narayan Ashram in Harihar. There was a huge celebration in Harihar after the Ayodhya verdict. The people of Harihar and the Narayan Ashram are now preparing to return back the idols to Shri Rama's Birth place, Ayodhya.

राष्ट्रपती राजवट

Image
महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रपती राजवटीच्या मन:पूर्वक शुभेच्छा... हि राष्ट्रपती राजवट आपल्याला भरपूर मनोरंजन देणारी, नवीन अनुभव देणारी, टीव्हीच्या रिचार्जच्या दुप्पट रिटर्न्स देणारी ठरो - हि महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल आणि मोटाभायला प्रार्थना...! ... राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींनी दिला किंवा राष्ट्रपतींना सुमोटो पद्धतीने तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपती राजवट समाप्त होण्याची घोषणाही राष्ट्रपतीच करतात. संसदेने अशा घोषणेला मान्यता दिल्यानंतरच ती अंमलात आणली जाते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते. मात्र मंजूरी मिळाल्यानंतर केवळ सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतु संसदेने या घोषणेला पुन्हा पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. अशाप्रकारे वाढ करून जास्तीत जास्त एखाद्या प्

राम मंदिर

Image
जय श्रीराम ! . सर्वसमावेशक निकाल. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायप्रतिष्ठा जपलीय. . अयोध्या यापुढे केवळ रामजन्मभूमी म्हणूनच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या अप्रतिम निकालासाठी सुद्धा ओळखलं जाणार... ! . भारतीय लोकशाहीचा, ऐक्याचा विजय झालाय. . जय जय श्रीराम ! . ऐतिहासिक निर्णयाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झालेल्या तुम्हा आम्हा प्रत्येकाचं अभिनंदन. ... ५०० वर्ष जुन्या प्रकरणाची आणि १५० वर्ष जुन्या खटल्याची सुरेख सांगता करत,  मा. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे.  रामजन्मभूमीची २.७७ एकर्स जागा राम मंदिरासाठी देऊन,  अयोध्येतच ५ एकर जागा मशिदीसाठी देत लोकशाहीला साजेसा न्याय केला आहे. ..  आता अयोध्येत राम जन्म भूमी वर करोडो भारतीयांचं स्वप्न असलेलं भव्य राम मंदिर उभे राहणार.  कारसेवकांच्या बलिदानाला आज न्याय मिळाला.   

आरेचं जंगल

Image
आरे मिल्कमध्ये घर घेतांना तिथलं निसर्ग हे एकमेव कारण समोर ठेवलेलं... मुंबईच्या गर्दीत राहूनही शहरापासून बाहेर, जंगलाच्या मध्यात राहण्याचा अनूभव देणारं ते ठिकाण आहे. चार लाखाच्या आसपास असणाऱ्‍या डेरेदार वृक्षांमूळेच मुंबईच्या धोकेदायक प्रदुषणातही किमान उपनगरांत तरी वातावरण संतुलीत राहतंय. . सरकारच्या बाजूचा गट सांगतोय... - मेट्रो कारशेड अत्यावश्यक आहे. आरेतल्या चार लाख झाडांपैकी सत्तावीसशे तोडली तरी फार फरक पडणार नाही. समोरच्या गटातील मंडळी राजकारण करताय वगैरे ... . तूर्तास मान्य ! वृक्षतोडीस विरोध करणारा गट राजकीय हेतू मनात ठेवून स्पॉन्सर्ड असेल. त्यांचं बॅकीँग कुणीतरी भलतंच असेल... पक्या वगैरे मंडळी फोटोसाठी थोबाड घेवून आलीत... मान्य ! . पण आरे परीसरात राहण्याचा अनुभव, आणि झाडांची वाढ, फायदे, प्रदुषण, झाडांची गरज यां मुद्यांवर किमान प्रिप्रायमरी पर्यँत झालेलं शिक्षण यांचा विचार केला तरीही झाडांची कत्तल चुकीचीच आहे हेच कळतंय... . ज्या अवस्थेत झाडं कापली ती वाढायला सरासरी किमान तीन वर्ष लागतील. जास्तही ! त्यापेक्षा कमी नक्कीच नाही... झाडं कापायला दोन

पीएमसीच्या निमित्ताने -

Image
पीएमसीच्या निमित्ताने - . सहकारी बॅँका ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था आहेत. आणि या क्षेत्राला शतकोत्तर इतिहास आहे... असं असलं तरीही, सहकारी बॅँका आणि राष्ट्रीयकृत बॅँका यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे... रात्री शांत झोप हवी असेल तर पैसा राष्ट्रीयकृत बॅँकेत ठेवा. . सहकारी बॅँकेचं व्याजदर आत्ता १०-१२ टक्के आहे, राष्ट्रीयकृत बॅँकांचं ६-७ टक्के... पण सहकारी बॅँकांना सरकारी कव्हर हे असून नसल्यासारखं असतं. तिथे राष्ट्रीयकृत बॅँकेतला पै न पै सरकारची जबाबदारी असते. पूर्वी राष्ट्रीयकृत बॅँक ांची संख्या आणि शाखांचा विस्तार मर्यादित होता. मोठ्या शहरांमध्येच फक्त शाखा असायच्या. त्यामूळे ग्रामीण भागात सहकारी बॅँक, पतपेढ्यांचं पेव फुटलं होतं... ज्याचं सार्वभौमत्व संचालक मंडळाकडे आहे. कारखान्यांवर काम करणारी माणसं, शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय यांनी पै न पै साठवून या संस्था वाढवल्या... बॅँकाच्या तुलनेने दुप्पट व्याजदर, सहज कर्ज देणं या बळावर ठेवीदार वाढवले आणि संस्था फुगल्या. यातूनच बऱ्‍याच पुढाऱ्‍यांचा जन्म झाला. . सारस्वत सारख्या संस्था अजूनही जिवंत आहेत. परंतू बऱ्‍याच सहकारी संस्था या त्यातील संचालका

370 - 35 A

Image
लोकसभेत कॉँग्रेसच्या सदस्यांनी आत्ता परत फारुख अब्दुल्ला बद्दल बाउंन्सर टाकला... अमित शहांनी चौथ्यांदा अधिकृत स्टेटमेँट दिलं... की फारुख अब्दुल्ला जेल, नजरकैदेत नाही. त्यांची तब्येत पुर्ण ठणठणीत आहे - ते बाहेर येत नाही तर कनवटीवर बंदूक लावून तर बाहेर आणू शकत नाही... जर आजारी आहेत तर हॉस्पीटल मध्ये जावं..."... . स्पिकर ओम बिर्ला सुद्धा भारी माणूस आहे. ओठांवर आलेलं मिश्कील हसू दाबत त्यांनी अमित शहांना चेअर कडूनच निर्देश केलं... "डॉक्टर्सकी टिम बनाकर आप फारुख अब्दुल्लाजी के घर  भेज दो, और जानकारी लो..." . झालं ! ये लगा सिक्सर... कॉँग्रेसचा नो बॉल ठरला.  :-D फारुख अब्दुल्लाचं देणं न घेणं झालं बेणं...! आता बाहेर यावं लागणार, स्टेटमेँट द्यावं लागणार ! नाही दिलं तर सभागृहातल्या त्यांच्याच सदस्यांच्या तोँडावर मारलं जाणार... तब्येत खराब बोल्ले तर डॉक्टर तयार, आता कॉँग्रेसच्या सदस्यांना फारुख अब्दुल्लाच्या नावाचा वापर करता येणार नाही... :-D . नाक दाबून तोँड उघडणं काय असणं ते असं असतं ! 

कॅप्टन कूल

Image
आज एका माणसाची महत्वाच्या क्षणी निर्णायक संयम भूमिका राहिली. सभापती, उपराष्ट्रपती वैकय्या नायडूजी ! . आज दुपारच्या सत्रात सभागृहात आल्यानंतरही त्यांनी आपण या महत्वाच्या विषयावर असलेल्या चर्चेत समोर नसण्याबद्दल खेद व्यक्त केला... जबाबदारी याला म्हणतात... केवळ संचालन करणं एवढंच नसून प्रत्येक सदस्याच्या आधिकाराचा मान ठेवत, शब्द न शब्द ऐकून त्यावर नियंत्रण ठेवणंही महत्वाचं असतं... कुठे महत्व द्यायचं कुठे नाही - यावर ते पक्षपात न करता निर्णय देतात. सिब्बलने काहीतरी पुड्या सोडल्यान ंतर उजवीकडच्या सदस्यांनी गोँधळ घालायला सुरुवात केली. त्याला महत्व न देता - "दो मिनट मे संविधात बदल नही जायेगा, मै यहॉँपे बैठा हूँ... क्या रिकॉर्ड मे जायेगा ये मै देख रहा" म्हणत प्रकरण शांत तर केलं, पण एकाच वाक्यात सिब्बलची हवा सोडली... ! . खमका मॉनीटर असला तर वर्ग ठिकाणावर राहतो. सकाळी गोँधळ सुरु झाला, त्यात मुर्दाबादच्या घोषणा, रडणं यांतही खमकेपणे सभापतीँनी एक बाजू लावून धरली. पीपीडीच्या दोघांनी कपडे फाडल्यानंतर त्यांना उचलून बाहेर फेकलं... ! . रेणूका चौधरी हसल्यानंतर याच माणसानं कडक शब्दा खडसावलं हो

370 and 35A

Image
अमित शाह - नरेँद्र मोदी भारतीय संघराज्याला मिळालेले खऱ्‍या अर्थाचे रत्न आहेत ! भारत आज एकसंघ होतोय. आर्टिकल १ आज खऱ्‍या अर्थाने प्रबळ झालं...! काश्मीर भारताला मिळालं. . ३७० (काही जाचक कलमं) रद्द झालं... त्यामूळे ३५ए आपोआप निष्क्रीय ठरलं. त्यात काश्मीरचं विभाजन होवून लद्दाख-जम्मू, वेगळं राज्य झालं. काश्मीर वेगळं राज्य झालं. तिथे केँद्रशासन लागू झालंय... ! सगळाच मामला निकाली निघाला. काश्मीरमध्येही आता भारतीय राज्यघटना लागू झाली. केँद्रशासित असल्याने सगळ्या नाड्या आपोआप मोदी सरकारच्या हाती आल्यात...! . तिथे आता पाकीस्तानच्या घोषणा देणाऱ्‍यांची तोँड बंद करण्याचं षडयंत्र मोदी सरकाने रचलंय  :-D   :-P  णिशेद  :-D . आज नेहरुंच्या अतिअतिअति परम परम परम पवित्र आत्म्याला खऱ्‍या अर्थाने शांती मिळेल. हे यश नेहरुंचं आहे...  :-P   :-D  अब्ब्दुल्ला आणि मुफ्ती खानदानाच्या कारकिर्दीची सुदैवी अखेर झाली... हे यश नेहरुंचं आहे  :-D   :-D   :-P . धन्य ते काश्मीर, धन्य ते नेहरु, धन्य त्या सोनीयाजी...  :-D  

House in Metro

मोठ्या शहरात (उदा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे) भाड्याचं घर चांगलं की स्वत:चं ? हा एक प्रश्न समोर आला. आणि दुसरं म्हणजे गोरेगांवची एक बिल्डीँग पडल्यावर जमीनीचं खरेदीखत न केल्याने बिल्डरनं पुन्हा बांधून न देत हात वर केल्याची, आणि त्यामूळे अनेक कुटूंब उघड्यावर आल्याची एक बातमी वाचली... तसंच कॅम्पाकोला बद्दलही झालं होतं... . करायचं काय ? यासाठी मी स्वत:चा एक ट्रॅक तयार केलाय. पटतोय कां बघा. . आधी प्रश्नाच्या पहिल्या भागाचा विचार करु... भाड्याचं घर हवं की स्वत:चं ? तर याबद्दल माझं मत आहे... प्रॅक्टीकली भाड्याचं, इमोशनली स्वत:चं...! . स्वत:चं घर घेतांना शक्यतोवर संपुर्ण रक्कम (किमान ८० टक्के तरी) तयार असली तरंच स्वत:चं घर घेण्याचा विचार करा... किँवा फार फार तर ईएमआय आपल्याला खरंच झेपेल असा असेल तरंच... ! ते सुद्धा वेळ आल्यानंतर. योग्य पद्धतीने. (याच लेखात दिलंय ते) . भाड्याच्या घराचे काही टेँशन्स नसतात... आणि महत्वाचं म्हणजे ते हवं तेव्हा बदलता येतं. आपल्या सोयीने त्यात आधीक ऐमिनिटीज् अॅड करता येतात. शहरात आल्यानंतर किमान काही वर्ष सेट होईपर्यँत तरी शहाण्याने स्वत:चा फ्लॅट घेण्याचा विचार करु

एक महत्वाचं कौतूक

एक महत्वाचं कौतूक . गेले अडीच ते तीन महीने निवडणूकीची धांदल आपण पाहिली. एक्क्याण्णव कोटी मतदार, पाचशे बेचाळीस जागा, वीस हजाराच्या जवळपास उमेदवार, सात फेऱ्‍या आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही... . भारतात लोकशाही टिकवणं सोप्पं नाही. इथे दर तीन लोकांमागे एक जण द्वाड आहे, एक जण उपद्व्यापी आहे. एक जण दिडशहाणा आहे. भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. राज्याराज्यात लोकल गावगुंड आहेत. भाषा, प्रथा, परंपरा वेगवेगळ्या आहेत. आणि त्यातही मे चं कडक ऊन. भरीस भर म्हणजे कंट्रोल न ठेवता येणारं सोशल मिडीया. . तरीही भारतीय लोकशाहीचा प्रचंड विजय झाला... पक्षाचा विचार बाजूला ठेवा. लोकशाहीने सतरावी लोकसभा देशाला दिलीय.... आचारसंहीता पाळून. पवित्रपणे, प्रामाणिकपणे...! . तीन महिन्याच्या प्रचारात प्रचंड धुराळा उडाला. इव्हीएमवर आरोप झाले. एकमेकांवर चिखलफेक झाली, हाणामाऱ्‍या झाल्या, पण शेवटी सगळ्या गोष्टी नियंत्रणाखाली होत्या... मोदीँपासून राहुलपर्यँत सगळ्यांवर या यंत्रणेची घट्ट पकड होती... ती यंत्रणा म्हणजे "भारतीय निवडणूक आयोग"... आज मोदी किँवा राहूल जिँकले नाही, तर भक्कमपणे हा लोकन्नाथाचा रथ ओढून संसदे

Vote India Vote

मतदान करा "च" !  लोकसभेची निवडणूक रोज रोज येत नाही. १०० वर्ष जगलो तर आपल्या उभ्या आयुष्यात जास्तीत जास्त १६ - १७ लोकसभा येतात. त्यात मतदानाला जाणं - मतदानाची प्रक्रीया करणं - परत येणं, यात अर्धा ते पाऊण तास, खुप झालं तर १ तास जातो. दर ५ वर्षातला हा १ तास आपण देशाचा पंतप्रधान असतो, राजा असतो. पुढच्या पाच वर्षासाठी देशाचं धोरण आपण ठरवत असतो. अनेक योजना, महत्वाचे कायदे पास करत असतो. देशाचा विकास करत असतो. म्हणजे पुर्ण आयुष्यात जास्तित जास्त फक्त १७ तास आपल्याला ही संधी मिळते. उद्याचा दिवस तसाच... राजा असण्याचा. पंतप्रधान असण्याचा. मतदान करा !  हक्क आहे आपला, तो मिळवा. पुढच्या पाच वर्षात देश जी काही प्रगती करेल तिचे आपण बरोबरीचे शिल्पकार असू, जबाबदार असू...! त्यामूळे मतदान करा.... कराच !  उद्याचा दिवस पंतप्रधान व्हा !  राजा व्हा ! - तेजस कुळकर्णी  ... मतदानाची आजची पूर्वतयारी : .. १. आपलं मतदान कुठल्या केंद्रावर आहे याची खात्री करा. यासाठी https:://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App वर मार्गदर्शन मिळेल. त्यावरून आपला यादी भाग

BJP

Image
भाजपाचा आज ३८ वा वर्धापनदिन. .. ६ एप्रिल १९८० रोजी हिंदुराष्ट्र, राष्ट्रवाद, आर्थिक उदात्तीकरण आणि मानवता या विचारधारेवर भाजपाची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त, हिंदुत्वाचा पाया आणि राष्ट्रभक्त उजव्या विचारसरणीचे ऋषीतूल्य नेते हे भाजपाचे आधारस्तंभ आहेत. केवळ ३ जागांपासून सुरुवात झालेला भाजपा आज देशातला सर्वसत्ताधीश पक्ष आहे. भाजपा जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन आहे. .. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधानजवाहरलाल नेहरू ह्यांच्या कडून पाकिस्तानचे होणारे लांगुलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनस्ंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरूण नेत्यांनी जनसंघाची सुत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या ल

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved