Posts

Showing posts with the label RIP

Sushant...

चार पैसे कमी मिळाले चालतील, ग्लॅमर नसलं तरी चालेल, फार यशही मिळालं नाही तरी चालेल... पण आयुष्य समाधानी आणि शांत असावं...! पुर्ण असावं ...! ... आयुष्यात कुठल्याही टप्प्यावरुन परत फिरता येईल असा एक बेसकॅम्प असावा... कुठेही जाणवलं की शक्ती संपलीय, बिनधास्त परत फिरुन नव्याने सुरुवात करावी... जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपलं आयुष्य आपलं असतं...! ... पैसा आणि ग्लॅमर आपली काळी बाजू सोबत घेवून येतो... मुंबईच्या लाईम लाईटमध्ये एक म्हण आहे - "बम्बई जमनी चाहीये...!..." ती जमली तो टिकला - नाही तो हरवला...! प्रसिद्धी - हवा आणि पैसा डोक्यात जायला नको... टिकवता यायला हवं,  जरी गेलं तरी स्विकारण्याची तयारी हवी...! ... सुशांत सिंह राजपूत इथेच हरवला... बम्बई जमलीच नाही...  बेसकॅम्प नसेल कदाचित...! म्हणून आत्महत्या हा शेवटचा पर्याय स्विकारला... कारण हजार मिळतील, पण रिजल्ट एकच : चांगला अभिनेता गेला ... एमएसडीची स्टोरी याच्यामूळे जबरा झालेली... अजरामर म्हणा ...! पुढेही तगडे हिटस् दिले असते, पण तो कोसळण्याचा काळा क्षण सांभाळू शकला नाही ! ... प

Dr. Shriram Lagoo

Image
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानं मराठी अभिनयसृष्टीच्या नटसम्राटाची अखेर झाली. वरच्या फळीतले कदाचित  लागू एकमेव शेवटचे उरले होते, ते ही आज गेले. .. डॉ. श्रीराम लागू पर्व संपलं. आणि त्यांच्यासोबत कदाचित एक पिढीही संपली...! ... मन संकल्पना, भूतभविष्य, देव-दानव, श्रद्धा-अंधश्रद्धा यांना त्यांच्या जडवादाने नेहमीच विरोध केला. मृत्यूनंतर काहीही राहत नाही या त्यांच्याच सिद्धांताने त्यांना "श्रद्धांजली" म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांचं राजकीय-वैचारीक मत गोंधळलेलं होत, पण अभिनयातील त्यांच्या भव्य कारकिर्दीसाठी आदर...!

RIP विजू खोटे

Image
मराठी वा हिँदी चित्रपटसृष्टीत बरीच मंडळी सहकलाकार म्हणून जन्माला आली, सहकलाकार म्हणूनच संपली... अभिनयाच्या बाबतीत अमिताभ बच्चनना तोडीस तोड असूनही आणि अख्खी हयात इंडस्ट्रीला देवूनही चित्रपटाचे मुख्य नायक होणं त्यांच्या नशीबात नव्हतं... तरीही, भारतीय चित्रपटसृष्टीतलं मानाचं पान ते ठरले - अध्याय ठरले ! त्यांच्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होणार नाही. . "विजू खोटे" हा अध्याय आज संपला ! चित्रपटसृष्टीतलं विजू खोटे पर्व संपलं. . भारदस्त आवाज, करारी चेहरा, आणि जबरदस्त अभिनय क्षमता असलेल्या या माणसाने पदरी पडलेल्या खलनायकी भूमिकांचं सोनं केलंय. "कितने आदमी थे ?" या ऐतिहासिक प्रश्नाचं ऐतिहासिक उत्तर देणारा आवाज शांत झाला. . विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - तेजस कुळकर्णी

RIP जेटली

Image
सुषमा स्वराज, पर्रीकर, मुंडे, अनंथ कुमार, प्रमोद महाजन आणि आज जेटली ! भाजपाचे हे चेहरे कमी वयात गेले... सगळे एकापेक्षा एक विद्वान, प्रकांड पंडीत असलेले... ! त्यांच्या निधनाचं दु:ख झालं कारण त्यांचे पाय जमीनीवर होते. ते तत्वाने जगले... ! भाजपाच्या जडणघडणीत या मंडळीँनी आयुष्य वेचलंय... संघाची बळकट माणसं होती ही. . अर्थमंत्री आणि मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स म्हणून जेटलींचे काही निर्णय वैयक्तीक न पटणारे होते. पण तो एक भाग सोडला तर त्यांची विद्वत्ता, वत्कृत्व, भाजपाच्या वरच्या फळीतलं नेतृत्व आणि कायद्याचं ज्ञान याला तोड नाही... संसदेत बोलायला उभे राहीले की विरोधकही बेँच वाजवायचे... ! कॉँग्रेसच्या बऱ्‍याच नेत्यांची मुलं जेटलीँकडे इंटर्नशीप केलेली...! ते कायद्याचं विद्यापीठ होते. मोदीँनी नोटबंदी, जीएसटी, बॅँक मर्जीँग असे भव्य निर्णय जेटलींच्या भरवश्यावर घेतलेय. जेटली भले मास लिडर नव्हते, पण भाजपाचं पान त्यांच्याशिवाय हलणारं नव्हतं. . अरुण जेटली भाजपासाठी थिँक टॅँक होते. भाजपाची इंटलअॅक्च्यूअल प्रॉपर्टी होते... भाजपाच्या मूळ तत्वाचा चेहरा अरुण जेटली होते... ! भाजपासाठी ते संकटमोचक ह

सुषमा स्वराज

Image
जाणारं माणूस जातं, नंतर उरते ती भयाण शांतता. अनेक प्रश्नांचं काहूर मनात साचत जातं - ज्यांची उत्तरं कधीही मिळत नाहीत ! सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं देश हळहळला. पण आज एका माणसावर नियतीने जो घाला घातलाय त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही. . ते म्हणजे सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल ! . निवडणूकांपूर्वी जेव्हा सुषमाजीँची मुलाखत झाली तेव्हा त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देतांना "आता माझा पुर्ण वेळ पती, कुटूंबिय यांना देणार" असं जाहीर केलं. ट्विट पण होतं. त्यावेळी त्यांचे पती तिथे होते. प्रचंड आनंद होता त्यांच्या चेहऱ्‍यावर... त्यांनी सुद्धा ट्विट, टिव्ही यांना मुलाखत देऊन आपला आनंद व्यक्त केलेला. . केँद्रात मंत्री असणारी पत्नी - त्यामूळे समाजकारणाभोवती केँद्रीत झालेला संसार, प्रोटोकॉल्स, शेड्यूल यांत कौटूंबिक गोष्टीँचा त्यागच करावा लागतो. सुषमा स्वराज यांच्या राजकीय निवृत्तीने त्या माणसाला मनापासून आनंद झालेला. राजकारणामूळे हरवलेल्या क्षणांना परत मिळण्याचं सुख त्यांच्या चेहऱ्‍यावर दिसत होतं. . नियतीला ते बघवलं नाही. आत्ता तर संसार सुरु झालेला, इतक्यात संपला ! कालचा दिवस

अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpeyi

Image
दि. २८ मे १९९६, संसदेत एक ऐतिहासिक क्षण साजरा होणार होता... संसदेच्या आजपर्यंतच्या इतिहासातली एक महत्वपूर्व घटना घडणार होती... सभापती होते पी. ए. संगम्मा. अनेक पक्षांचा टेकू घेऊन निर्माण झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला बहूमत सिद्ध करायचं होतं, ऐनवेळी धोका झाला - आणि बहूमत नसल्याचे जाणून वाजपेयींनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला... पण तत्पूर्वी त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केलेल्या काँग्रेस सरकारची संसदेतच पुराव्यासकट न भूतो न भविष्यती अशी पिसं काढून "मै यहाँसे सिधा राष्ट्रपती महोदयके पास अपना इस्तिफा सौंपने जा रहा हूँ".... म्हणत निघाले देखील ! कॉंग्रेस सरकारला तेव्हा बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, पुढची आठ वर्ष ते त्यातून सावरले नाहीत ... केवळ तेरा दिवसांचं वाजपेयी सरकार पडलं - सुर्यास्त वाटला - पण प्रत्यक्ष्यात ते ढग होते, ते हटले आणि भाजपाचा लख्खं प्रकाश पडला... या रथाचे सारथी होते अटल बिहारी वाजपेयीजी... ! .. १९९८-१९९९ तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा होतो... थोडीफार समज आली, तेव्हा हा देश आहे, यासाठी कुणी एक पंतप्रधान असतात, ज्यांचे फोटो

श्यामच्या आईचं आज काय करायचं...

Image
*श्यामच्या आईचं आज काय  करायचं.......?*                         _यशोदा सदाशिव साने_  _मृत्यू २ नोव्हेंबर १९१७_  *श्यामची आई* नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.    कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.              गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बापट यांनी गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की *कशी होती हो गुरुजीची आई?* तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाल

RIP Dr. Hathi

Image
तारक मेहता मधल्या डॉ. हाथीचा रोल करणाऱ्या कवी कुमार आझाद या कलाकाराचं ऋदय विकारानं वोक्हार्ट मध्ये निधन झालं. रोजच्या बघण्यातला माणूस असा अचानक निघून जाणं खूप चटका देणारं असतं...  . प्रचंड अवजड शरीर सांभाळत अभिनय, नृत्यात असणारी त्यांची चपळता, संवादफेक, टायमिंग या गोष्टीला तोड नव्हती... कुमार आझाद यांच्या आधी निर्मल सोनी हे डॉ. हाथी या पात्राचा रोल करायचे, पण निर्मल सोनी यांचा करार संपल्यावर आझाद आले आणि त्यांनी डॉ. हाथी म्हणून आपली जागा प्रेक्षकांच्या मनात, घरात पक्की केली. वेळेवर येणं, नियमितता आणि सहकारी कलाकारांना हसत खेळत सांभाळून घेण्याची हातोटी यामुळे कुमार आझाद यांनी प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण केली होती...  . एखादा माणूस दररोजच्या बघण्यातला असेल आणि त्याचं अचानक जाणं हे जरी खूप चटका देणारं असलं तरीही, जाण्याचं कारण हे देखील धडा देणारं असतं... कवी कुमार यांचं अवाढव्य शरीर हे त्यांची ओळख होती, त्यावरच त्यांना अनेक भूमिका मिळाल्या - आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या फुलवल्या, तरीही - त्याच अवाढव्य शरीराने त्यांचा घात केला... त्यात सिगरेटची सवयही जीवघेणी ठरली ! .

शुक्रतारा अस्तला...

Image
सकाळी अरुण दाते गेल्याची बातमी आली आणि जवळचं माणूस गेल्यावर येतं ते पाणी आलं डोळ्यात... ज्या माणसाची गाणी ऐकत लहानाचं मोठं झालो, प्रेमातल्या गुजगोष्टी ज्यांच्या गाण्याने बहरल्या, ज्यांच्या आवाजाने कितीही मोठ्या संकटात जन्मावर जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, ज्यांच्या आवाजाच्या सानिध्यात शेकडो किमीचा प्रवासही जवळचा वाटायचा त्या आवाजाचं असं शांत होणं चटका लावणारं आहे... हि बातमी खोटी ठरो म्हणून मनातल्या मनात देवाचा धावाही झाला. पण अवतार सुद्धा संपतात, आणि अरुण दाते आपल्या दुर्दैवाने अमर नाहीत.  . मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळे काकांचे संगीत आणि शब्दांना-संगीताला लाभलेला अरुण दातेंचा मखमली आवाज... त्रिमूर्तीने केवळ गाण्यासाठी अवतार घेतलेला असावा असा सुरेल संगम... किती भरभरून द्यावं एखाद्याने ? आपली झोळी भरली, पण त्या त्रिमूर्तीचा हात आखडला नाही. आज फक्त दाते गेले नाहीत, तर मराठीचं पितृत्व हरवलंय, मराठी गाण्याचा आवाज शांत झालाय... खळे-दाते-पाडगावकर त्रिमूर्तीमधला शेवटचा देवही आज निजधामाला गेला... या तिघांचे एकमेकांशी खरंच स्वर्गातले संबंध असावेत... एकमेकाच्या मनातलं गाणं ओळखून

जगजितसिंह

Image
दुःख, विरह हे सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे हे त्यांनी पटवून दिलं... त्यांनी प्रेमात पडलेल्या काळजाची तार छेडली तसंच प्रेमभंगातल्या दुःखातून पाझरणाऱ्या अश्रूंचं गीत केलं... एकीकडे प्रेमाची थंडगार वाऱ्याची झुळूक दाखवली, दुसरीकडे विरहातली हूरहूर ... "सॉंसे देकर अपनी संगीत अमर कर दो"... म्हणत या माणसानं गझल अमर केली... .. संध्याकाळ पासून चढत जाणारी रात्र, थंडगार वारा, मंद प्रकाश - आणि जगजितसिंगांची गझल... हि अनुभवण्याची गोष्ट आहे... "प्यार का पहला खत" पासून सुरुवात करायची, तुम को देखा तो ये खयाल आया, झुकी झुकी सी नजर, सरफरोश मधलं होशवालोको खबर है क्या, तेरी खुशबू मे बसे खत, तुम इतना जो मुस्कूरा रहे हो" ही गाणी करत करत संध्याकाळ संपता संपता - "कही दूर जब दिन ढल जाऐ" वर यायचं... गझल ही नशा आहे... रात्र चढते तशी गझल चढणार... जगजितसिंगांचा गंभीर आवाज - आणि रात्र... हा एकांत हवाहवासा वाटणारा, अनुभवण्यासारखा असतो... चढत्या रात्रीसोबत "होठो से छू लो तूम...." ऐकायचं. कुठलीही गझल एकदाच ऐकून मन भरणार नाही - पून्हा पून्हा ऐकायचं... "होठो से" तर

Mumbai Elfisten Station Accident

मुंबईत आल्यानंतर वर्षभरात मी महत्वाचं शिकलोय ते म्हणजे भावनाशून्य राहणं... इथे भावनांना काडीचीही किंमत नाही, तुमच्याभोवती लोकं मरताय, महापूर आलेय, कुणीही येऊन शहराची वाजवून जातंय ... "स्साला रोज का यह्हीच लफडा है यहाँका"... म्हणून  सोयीस्करपणे डोळे झाकून जगणं म्हणजे मुंबई स्पिरीट... यात जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत रोजची जी झक मारायची ती मारावी लागणार आहे... कुणी हात धरणारं नाही - आपलं ओझं आपणंच वाहणार... . मुंबई म्हणजे कुठलं शहर नाही, रस्ता नाही, इमारत नाही - संवेदना मेलेला इथला एक एक माणूस म्हणजे मुंबई. त्याचं स्पिरीट त्याचं जगणं आहे. ना कुठल्या कौतूकाचं मोहताज - ना टिकेचं मिंधं... !... ... एल्फिस्टन परेल रेल्वे पुलावरील दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !

Rima Lagoo

Image
मराठी असूनही हिंदीत भक्कम पाय रोवलेल्या थोड्या लोकांपैकी एक रिमा लागू होत्या... त्यांच्या जाण्यानं ते स्थान रितं झालंय... ! .. देखण्या, चेहऱ्यावरचा प्रचंड आत्मविश्वास यामूळे गर्भश्रीमंत स्त्रीची भूमिका केवळ त्यांच्यासाठीच आहेत की काय असं वाटायचं... हम आपके है कौन, हम साथ साथ है, मैने प्यार किया या तीन चित्रपटात त्यांच्या अॅपिअरन्सनी चार चाँद लावले... ! कयामतसे कयामत तक, दिलवाले, प्रेमग्रंथ, जुडवा, आंटी नं १, कुछ कुछ होता है, वास्तव, जिस देस मे गंगा रहता है अश्या शेकडो हिट चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या - जगवल्या ...  . पडद्यावरचा त्यांचा वावर कधी मिश्कील, समजूतदार तर कधी गंभीर, हळवा असायचा... जितका दमदार अभिनय तितकाच गोड आवाज... त्या सहज बोलायच्या... त्या पात्राशी एकरूप व्हायच्या... गर्भश्रीमंत स्त्रीच्या वागण्यातला आत्मविश्वास, अभिमान जितका सहज साकारायच्या - कनवाळू आई मध्ये पण तितकाच जीव ओतायच्या... मिश्किल, कॉमेडी भूमिकांनाही त्यांनी पुरेपूर न्याय दिला... ... हिंदीत जम बसला तरी मराठीतही त्यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या... सिंहासन मधल्या राजकारणी, बिनधास्त मधल्या उद्योजक, आई

RIP Vinod Khanna

Image
अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन ! द बर्निंग ट्रेन, अमर अकबर ऍंथोनी यातल्या त्यांच्या भूमिका अप्रतिम होत्या. चांगला माणूस गेला. कॅन्सरने घात केला... ... अश्या सुपरस्टार रांगड्या माणसाला आजारात खितपत पडलेलं बघवत नव्हतं... सुटका झाली बिचाऱ्याची.. भावपूर्ण श्रद्धांजली ! ... हम तुम्हे चाहते है ऎसे मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसे #विनोद_खन्ना .... प्रिय विनोदजी अनेक दिवसांपासून तूम्ही आजारी होतात. आज जातो, उद्या जातो अशी मृत्युला सतत हुलकावणी देत देत शेवटी 'हलचल' माजवून आज 'अचानक' तूम्ही आमच्यातून निघून गेलात... आज तुमच्या अशा निघून जाण्याने 'अमर, अकबर, अँथोनी' 'इना मीना डिका' आणि 'रेश्मा और शेरा' देखील नक्कीच हळहळले असतील! जन्माला आलेला प्रत्येकजण शेवटी जाणार हा जरी 'कुदरत' चा 'फैसला' असला, तरी 'एक्का, राजा, रानी' चा प्युअर सिक्वेंस दाखवून खेळ अर्धवट सोडून तूम्ही असं निघून जायला नको होतं! शेवटी आपल्या आयुष्याचा 'लगाम' वरच्याच्या हातात आहे हेच सत्य आहे! चित्रपटसृष्टितले आमचे जेवढे म

Divya Bharti

Image
काही रुपं ही स्वर्गीय असतात, काही व्यक्ती गुढ असतात आणि चिरंतन असतात... दिव्या भारती, मधुबाला या शापित अप्सरांचा सौंदर्य, आयुष्य आणि जगणं तसंच.. ज्यांच्या मृत्यूने त्यांना चिरतरुण ठेवलं ... दिव्या भारती... ! अवघं १८ वर्षांचं आयुष्य, पण त्या लहान आयुष्याचंही तिने सोनं केलं... ... २४ वर्षांपूर्वी याच काळ्या दिवशी दिव्या भारती नामक दंतकथा, अप्सरा, सौंदर्य गुढरित्या संपलं.... तिच्या अस्मानी सौंदर्याची आणि  तिच्या अल्पावधीतल्या यशाची आठवण काढून श्रध्दांजली वाहिल्याशिवाय तिला ओलांडून पुढे जाता येणार नाही.... . ५ एप्रिल १९९३ च्या रात्री पावणेबाराच्या सुमारास प्रचंड सौंदर्य, गोड गळा, लोभस निरागसता लाभलेल्या या अप्सरेनं वर्सोवातल्या घरी पाचव्या मजल्यावरुन झोकून देत जीवन संपवलं. . दिव्या ओमप्रकाश भारती... १९८८ ते १९९३ या पाच वर्षात तिनं यशाचं शिखर गाठलं. शाहरुख खान सोबतच्या "ऐसी दिवानगी" गाण्याने तिला त्यावेळी तरुणांच्या दिल की धडकन बनवलं. ती गेल्यावर "रंग" आणि ''शतरंज" हे तिचे दोन सिनेमे रिलीज झाले. अवघ्या पाच वर्षात तिनं पंचवीस हिट सिनेमे दिले. तिच्या

RIP Kishori Amonkar

Image
आमच्या घराच्या अगदी जवळच रामाचं जुनं मंदिर आहे... रामनवमीच्या काळात तिथे रोज सकाळ - संध्याकाळ भजनं, शास्त्रीय संगीत होतं, जे माझ्या घरापर्यंत सहज ऐकू येतं... आज पहाटे पाचपासूनच तिथे रामायणातली गाणी, अभंग वगैरे सुरु होतं... ... साडेपाचच्या सुमारास मला जाग आली, तेव्हा "अवघा रंग एक झाला" चा आलाप घेणं सुरु होतं, तानपूऱ्याचे सूर, आलाप आणि त्यामागचा नितांतसुंदर आवाज.. अगदी उठल्या उठल्या सरप्राईज मिळावं असं काहीसं घडलं... तो आलाप ऐकून बेडवरच थांबलो, डोळे बंद करुन कान - मन त्या आवाजाकडे केंद्रीत केलं, आणि त्या "अवघा रंग एक झाला" च्या अद्भूत संगीतात पहाट समृद्ध झाली... किशोरीजींना मनातून थॅंक्स बोललो आणि खाली गेलो... प्रसन्न मन, सुंदर सकाळ... छान मूड.. ! .. आणि त्या मूडमध्ये असतांनाच रेडियोवर सातच्या बातम्यांत पहिलीच बातमी " जेष्ठ गायिका पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांचं निधन" एक धक्का बसावा, कुठल्यातरी दुर्देवी योगायोगाचा आपण भाग असावं अशी ती वेळ होती... अर्रर्रर्रर्रर्र... हे काय झालं ? एवढंच निघालं... ! .. देव आपल्या भक्तांना दर्शन देतो, किशोरीजींनी जाता

तारक मेहता यांचं निधन..

Image
गुजराती भाषेतले सिद्धहस्त विनोदी लेखक पद्मश्री तारक मेहता यांचं आज अहमदाबादेत ८८ व्या वर्षी निधन झालं. . सामाजिक विषयांवर विनोदी टचने भाष्य करत दिव्य भास्कर मधील दुनिया ने ओंधा चष्मा या कॉलमने गुजराती मानदंड प्रस्थापित केला होता. त्यांच्या त्या कॉलम वर आधारीत "तारक मेहता का उल्टा चष्मा" सिरीयल आज यशाच्या शिखरावर आहे...  गुजराती नाट्यविश्वातले विश्वामित्र म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी ऐंशीच्या वर पुस्तकं लिहीली. .. दुनियाने औंधा चष्मा, अॅक्शन रिप्ले, चंपकलाल टपूनी जुगलबंदी, बेताज बाटलीबाज पोपटलाल इ. त्यांच्या अजरामर कलाकृती. . तारक मेहता यांनी इच्छेनुसार देहदान केले... ! तारक मेहता का उल्टा चष्मा या सिरीयलसह अनेक अजरामर कलाकृती देवून एक अवलीया जगाला टाटा करून निघून गेला.

Om Puri RIP

Image
ओम पुरी यांचं निधन ! . सलग दोन दिवस दोन सिनेमे एकाच अभिनेत्याचे पाहिले की पूर्णपणे वेगवेगळ्या भूमिका बघून आदर दुणावतो. सलग दोन दिवस परेश रावलचे 'सरदार' आणि 'हेराफेरी' बघितले की हे होतं. सलग दोन दिवस ओम पुरीनाही असाच बघितला. एके दिवशी 'चायना गेट' मधून नुसत्या नजरेच्या धाकातून साक्षात अमरीश पुरीला जरबेत ठेवणारा ब्रिगेडियर पुरी आणि दुसऱ्याच दिवशी टीव्हीवर 'चाची ४२० ' मधला त्याच व्यक्तिमत्वाच्या अमरीश पुरीचा लोचट आणि लाचार असिस्टंट. अर्धसत्य, तमस, घायल, नरसिम्हा, किंवा अगदी 'ओह माय गॉड' अथवा 'दुल्हन हम ले जायेंगे' सारखे टुकार सिनेमे. अगदी शाहरुख खानचा डॉन. अफाट अफाट अफाट. 'भारत एक खोज' मध्ये औरंगजेब (आणि 'शिवाजी' नासिरुद्दीन शाह, अफलातून) . ... धूप, चायना गेट, अर्ध सत्य, आक्रोश सारख्या अनेक असामान्य चित्रपटात त्यांनी नितांतसुंदर गंभीर भूमिका साकारली होती... तर चाची ४२०, मालामाल विकली, हेरा फेरी मध्ये हलका फुलका रंग भरला... त्यांच्या निधनाने अभिनयाची जाण असलेला माणूस गमावला... ... ओम पूरी श्रेष्ठ निवेदक, अभिनेता

RIP Veena Sahastrabudhhe

Image
भारतीय शास्त्रीय संगीतात गान विदूषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांचं आज निधन झालं. त्या सर्वोत्कृष्ठ शास्त्रीय संगीताच्या गायिकांपैकी एक होत्या, त्यांच्या स्वतःच्या रागांची देखील निर्मिती त्यांनी केली होती. . डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांची गायकी ग्वालीयार घराण्यातली होती, तरीही जयपूर आणि किराना घराण्याचीही छाप त्यांच्यावर होती. त्या ख्याल आणि भजनांसाठी प्रसिद्ध होत्या. . भावपूर्ण श्रद्धांजली !

Sulbha Deshpande

Image
सुलभाआजी देशपांडे आज गेली... मराठीची आज्जी गेली... सुलभाआजी, कलाकार म्हणून तू ग्रेट होतीच, पण प्रेमळ आज्जी होतीस गं... किती मस्त सांभाळून घ्यायची... नारळाचे लाडू आता जास्त आठवतील... . सुलभाआजी देशपांडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली... . जनन मरण टळले कुणाला, फक्त संदर्भाला आयुष्य हे !

Chitale

Image
शून्य ते शंभर कोटी असा मोठ्ठा प्रवास करणारे भाऊसाहेब रघुनाथराव चितळे यांचं काल निधन झालं. . चितळ्याचं दुध, दही, तूप, श्रीखंड आणि बाकरवडी यांना रघुनाथरावांच्या हातची चव होती. काळ बदलला, पुणं बदललं तरी चितळ्यांची चव मात्र तश्शीच आहे. . जिथं आपल्यासारख्या सामान्य माणसांची जीभ चितळ्यांच्या चवीची गुलाम आहे, तिथं देवाला हा मोह आवरणं अशक्यच ! म्हणूनच "चितळे मिठाईवाले" ची शाखा स्वर्गात उघडण्यासाठी दस्तुरखूद्द रघुनाथरावांना निमंत्रण आलं, आणि त्यांनी ते स्विकारलं. . द्रष्टा उद्योजक आपल्यातून गेला हीच खरी खंत... भाऊसाहेब चितळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved