Posts

Showing posts with the label Bhagwatgeeta

गुरुपोर्णीमा २०२०

Image
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!  ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ

भगवद्गीता !

Image
आज गीता जयंती ...! .. भगवद्गीता... या अद्भूत ग्रंथाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे... माझ्या हॅन्ड बॅगमध्येच भगवद्गीतेचं मराठी - इंग्रजी अर्थासहीत असलेलं पुस्तक कायम असतं. रोज क्रमाने किमान ५ श्लोक आणि त्याचा अर्थ मराठी, इंग्रजीतून वाचण्याची, समजून घेण्याची सवय लागलीय, आणि आता सहा - सात वर्षांनी भगवद्गीतेने माझ्या मनावर आणि विचारांवर जबरदस्त पकड घेतल्याचंही जाणवतंय... प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेच्या अधीन राहूनच सापडणार हे मनावर पक्कं ठसलंय !  .. गीता म्हणजे कर्मकांड नाही, तर शास्त्रशुद्ध शास्त्र (Science) आहे... तुम्ही त्याचं पारायण करुन चमत्काराची अपेक्षा कराल तर हाती काहीच लागणार नाही, गीता समजण्याची - अभ्यासण्याची आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आणि अंतिम सत्य शांतपणे समजावून देण्याची ताकद गीतेत आहे... गीतेतला प्रत्येक श्लोक दरवेळी नव्या अर्थासह समोर येतो... .. कृष्णाचं देवत्व कुठाय ? ते आहे भगवद्गीतेतल्या अठरा अध्यायात - सातशे श्लोकांत... ! कुरुक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरुपदर्शन घडलं तिथेच "देव कृष्ण" जन्माला आला, भगवद्गीतेच्या रुपानं विश्वगुरु झाला आणि

गुरुचरीत्र पारायण

Image
अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि

कृष्ण

Image
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय॥ देवातलं नेमकं तितकं घ्यावं, ते समजावं, त्यायोगे आपली उत्तरं शोधावी आणि वेळ आली की रस्ता पकडावा... भक्ती म्हणजे इतकंच. कृष्ण पूजण्यासाठी लग्न, घरदार सोडून आजन्म ब्रह्मचारी होवून इस्कॉनच्या नादी लागू नये, किंवा राम पूजण्यासाठी कारसेवक होवून तावतावानं भांडू नये... .. कृष्ण गोकूळातल्या बाललीलांत भेटत नाही ... ना त्या लीलांत तो बघावा... प्रत्येक लहान मूल अपने आप मे त्या लीला दाखवत असतं... कृष्ण द्वारकेचा राजा म्हणूनही बघायची इच्छा नसते... कारण तेव्हा आपापसातले भांडणं, राज्य, सोळा हजार राण्या यांत अडकलेला तो सामान्य माणूस असतो... कृष्ण महाभारतातल्या राजकारणात कपट करतांनाही पटत नाही... मग त्याचं देवत्व कुठे ? का पूजा करावी ? ... कृष्णाची पूजा दही दुध चढवून होत नाही... कृष्णाची पूजा भजन करून होत नाही, ना कृष्णाची पूजा चार धाम यात्रा करून होते - कृष्णाचं देवत्व गोकूळात नाही, कृष्णाचं देवत्व द्वारकेत नाही... हस्तीनापूरातल्या राजकारणात तर बिलकूल नाही... कृष्णाचं देवत्व कुठाय ?

Bhagawadgeeta भगवद्गीता

Image
=अनुभूती= साधारण दोन महिन्यांपूर्वी घरात श्रीमद्भगवद्गीतेचं मराठी अर्थासहीत असलेलं, गीताप्रेसचं पुस्तक सापडलं... श्रीमद्भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करुन शाळेत असतांना बक्षिस मिळालेलं आठवलं आणि अगदी सहज, पण घाईतच त्यातल्या बाराव्या अध्यायाचं रॅपिड रिडीँग सुरु केलं... संस्कृत उच्चार, लहानपणी पाठ केलेले - त्यामुळे अगदी परफेक्ट उच्चार होत नव्हते, पण बरंच आठवत असल्याने छान वाटत होतं... अर्थ वाचतांना इंट्रेस्टीँग वाटत होतं... यात काहीतरी आहे हे डोक्यात वाजलं - तेव्हा घाई होती, ते तिथेच ठेवलं... पण तेच डोक्यात सुरु झालं... यात काहीतरी नक्की आहे... . दुसऱ्‍या दिवशी रिकाम्या वेळेत पुन्हा ते पुस्तक घेतलं.... आणि बारावा अध्याय उघडला... एक एक श्लोक आणि त्याचा अर्थ मनात वाचणं सुरु केलं... इंट्रेस्टीँग... त्यातपण संस्कृत...! पण मनात उच्चार नीट होत नव्हते - फील येत नव्हता... तेव्हा आमच्या संस्कृतच्या वियन कॉलनी, देवपूर, धुळे स्थित ऐंशी वर्षीय जोशी मॅडम, त्यांचं घर, थंडी, सकाळी साडेपाचची वेळ, मॉर्टिनची कॉईल, आणि त्या अद्भूत वातावरणात त्यांनी दिलेला गुरुमंत्र जसाचं तसा आठवला... "तेजा, संस्क

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved