Posts

Showing posts from October, 2014

लक्ष्मणायण : :

Image
लक्ष्मणायण : : रामायण मुख्यत: रामांचा वनवास, पितृप्रेम, एकपत्नीव्रत सितेची पतीनिष्ठा, त्याग, कौसल्येचं पुत्रप्रेम आणि भरताचं बंधूप्रेम याभोवती गुंफलं गेलंय...!! पण केँद्रस्थानी राम असता लक्ष्मण आणि त्यांचं कुटूंब दुर्देवाने झाकोळलं गेलंय... किँबहूना त्यागाच्या दृष्टीनं त्यांचं कार्य रामांपेक्षाही मोठं आहे. १. लक्ष्मणांनी रामांबरोबर वनवास भोगला. त्यांची सेवा केली. तितकाच त्रास, दु:ख सहन केलं. (यादरम्यान लक्ष्मण तत्वत: एकटेच होते. रामांबरोबर सीता आणि लक्ष्मण होते.) २. कौसल्येप्रमाणे सुमित्रेनेही आपला पुत्र १४ वर्ष दूर ठेवला. परंतू त्या माऊलीचा त्याग कौसल्यांपुढे कां झाकोळला जावा ? ३. लक्ष्मणपत्नी उर्मिला ! एकमेकांपासून १४ वर्ष दूर राहणाऱ्‍या या दांपत्याच्या प्रेमाने विश्वासाचे एक उदाहरण निर्माण केले. एकपत्नीव्रत राम तसंच एकपत्नीव्रत लक्ष्मण का म्हणू नये ? उर्मिलेचा त्याग सीतांपुढे झाकोळला गेला. त्यांच्या वाट्याला न्याय आलाच नाही. ४. भरतांच्या बंधूप्रेमाचं उदाहरण दिलं जातं. पण त्याचवेळी शत्रुघ्नपण आपल्या सख्ख्या भावाच्या प्रेमापासून वंचित होते याचा साधा उल्लेखही नाही. (लक

Why Lost RAJ Thakrey ?

Image
राज ठाकरे कां हरले ? १० मुद्दे १. वायफळ बडबड : मी असं करेन, मी तसं करेन यासह भ आणि उ चा यथेच्छ वापर, सभांमधील भाषणात ट्रॅक सुटणारे मुद्दे, उर्मट भाषा यांमुळे सुशिक्षित मतदारांनी नाकारलं. २. पळकुटेपणा : "हा राज ठाकरे स्वत: निवडणूकीला उभा राहणार" अशी गर्जना करुन हवा भरली, पण घोडा मैदानात पोहचतात मैदान सोडून पळाले. त्याबद्दल पत्रकारांनी विचारलं तरी चिडायचे. ३. पत्रकारांशी उर्मट वर्तन : जे पत्रकार प्रसिद्धी देतात त्यांना उद्धटसारखं फटकारणं राज ठाकरेँच्या अंगाशी आलं. आपण खूपच ग्रेट आहोत त्यामुळे कोणालाही फटकारु शकतो या भ्रमात त्यांनी पत्रकारांशी पंगा घेतला आणि त्यामुळे त्यांचा निगेटीव्ह अॅँगल लोकांसमोर आला. ४. उमेदवारांबद्दल गोँधळ : मतदारसंघात योग्य उमेदवार न देता माहीत नसलेले चेहरे उतरवले. त्यामुळे ८० टक्के लोकांचं डिपॉजिट जप्त व्हायची दुर्देवी वेळ आली. शिवाय उमेदवारांशी भर सभेत उर्मट वर्तन लोकांनी पाहिलंच. ५. नाशिक महापालिका : नाशिकबद्दल विचारल्यानंतर कधीच योग्य उत्तर देवू शकले नाहीत. पत्रकारांवर खेचकून वेळ मारुन नेण्याची धडपड पकडली गेली. नाशिक मधल्या विकासकाम

Maharashtra Election 2014

निकालाबाबत माझं वैयक्तिक विश्लेषण १. भाजपा : मोदीँच्या २७ सभांनंतर, इतक्या मोठ्या प्रमाणातल्या प्रचारानंतरही पूर्ण बहुमत न मिळणं हा मोदी आणि शहांचा माझ्या दृष्टीने पराभवच आहे. २. उद्धवसेना : सपाटून आपटले. फुगा फुटला. ५९ जागा फक्त बाळासाहेबांची पुण्याई आणि स्थानिक राजकारणावर निवडून आल्या. उद्धव ठाकरे सपशेल फोल ठरले. त्यांच्यात नेतृत्वक्षमता नाही हे सिद्ध झालं. ३. राजसेना : नापास. पूर्णपणे नापास. बोलबच्चनगिरी, उद्धटपणा लोकं नाकारतात, घरी पाठवतात याचं उदाहरण दिलं. राज ठाकरेचा अॅटिट्यूड नडला. ४. दोन्ही कॉँग्रेस : दोघांना इतक्या घोटाळ्यांनंतरही एकत्रितपणे ९५ जागा मिळाल्या. निवडूंगाची मूळं पकडून आहेत. आणि ठराविक जनाधार आहेच आहे. दोघांचा बेस पक्का आहे. दोन्ही कॉँग्रेसचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. हार होवूनपण दुर्देवीरित्या जिँकले. ५. MIM ची एंट्री अति धोकेदायक. भाजपा, सेनेने गांभिर्याने योग्य धडा घ्यावा. ओवेसी भयानक हिँदूद्वेष्टा आहे. Thats all !!

Dasara 2014

Image
दर दसऱ्‍याला प्रधान आजोबांकडे जाणं - चहा विद मारिगोल्ड कुकीज यांचं सेवन आणि लाखमोलाचे आशिर्वाद घेणं हा माझ्यासाठी अनेक वर्षाँचा ठरलेला पायंडा... आजची गोष्ट - चहा विद कुकीज व्हाया महागुरुंच्या नवीन चित्रपटाचं मौखीक समिक्षक असा दसऱ्‍याला साजेशा कार्यक्रम सुरु असतांनाच - आजोबा -- "तेजस, आज मी तुला खरोखरचं "सोनं" देणारे... खरं सोनं... (हातातला कप हातात, कुकीच चहात, मी  :-O   :-O   :-O  हा अस्सा... खरं सोनं ??  :-O   :-O  ) आजोबा आजीँना -"अगंsssss... ते घेवून ये..." आणि हातात भलामोठा बॉक्स घेऊन आज्जी अवतरल्या... मी Shockkk... इतकं ? इतकं ?? आजोबा माझ्यावर इतके का प्रसन्न वगैरे झाले ?? आजोबांनी तो बॉक्स उघडला आणि माझ्याकडे सोपवला. OMG... wow... yesss... yes !! त्यात खरंच सोनं होतं... अस्सल... शंभर नंबरी पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे, व.पु., विँदा, कुसुमाग्रज, खांडेकरांची मिळून तब्बल ३२ दुर्मिळ पुस्तकं... आणि पी. सावळाराम, लतादिदी, आशाताई, बाबूजींच्या अप्रतिम गाण्याचं कलेक्शन असलेल्या ७ डिव्हीडी.... :-):-):-):-):-) हा तर अरबोका खजाना...  :-D   :-D  

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved