Posts

Showing posts from December, 2015

RIP Mangesh Padgaonkarji

Image
कविवर्य मंगेश पाडगांवकर गेले... तृणातल्या फुलापासून वादळी वाऱ्‍यापर्यँत, सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी हळूवार मनाची, हसतमुख धग शांत झाली... जिप्सी कायम कसा राहील ?  . मंगेश पाडगांवकर... तुम्ही खूप दिलं हो, सगळे खिसे भरुन भरुन दोन्ही मुठांमध्ये गच्च भरलेलं असतांनाही आम्ही तुमच्या कवितांसाठी हापापलेले आहोत... इतक्यात तर कुठे दिवस उजाडलाय. कसं सांगू ?? . शुक्रताराचे सुर पुढे गेले... आज शब्द गेले... चटका लावून गेले...

Gurucharitra Parayan

Image
कालपासून गुरुचरीत्राचं पारायण सुरु केलंय. दरवर्षी हे सात दिवस मला खूप शिकवणारे असतात. स्वत:च्या अनेक गोष्टीँवर ताबा ठेवला जातो.  आणि या सात दिवसात कुठल्याना कुठल्या रुपात दिव्य दृष्टांत मिळतोच. . कालच रात्री स्वप्नात मी गाणगापूरात असल्याचं दिसलं. आणि आज सकाळीच आमचे एक नातेवाईक गाणगापूरला गेल्याचा फोन आला. महाराजांनी स्वत:हून सेवा करुन घेतली... कुठल्या ना कुठल्या रुपानं मी तिथे पोहचलोच. आणि आज दुपारी पहिल्यांदाच मनीध्यानी नसतांना अचानकच "देऊळ बंद" चित्रपट बघायला मिळाला. देऊळ ब ंद चित्रपटात दत्तसंप्रदाय आणि दत्तस्थानांचं अप्रतिम दर्शन दिलंय. आणि महाराजांचं आपल्याकडे कसं लक्ष आहे याचा उत्तम साक्षात्कार दाखवलाय. शहारे येतात अंगावर. . अनुभूती कशाला म्हणतात याची "याची देही, याची डोळा" प्रचिती आली... या सात दिवसांत खूप शांत वाटतं, कितीही टेँशन असू देत - सात दिवस महाराज आपल्याबरोबर असल्याचं पदोपदी जाणवतं.

अखेरचा क्षण मृत्यूचा थंडगार स्पर्श

. काल रात्री माझ्या एका मित्राची नव्वदीतली आजी देवाघरी गेली. नव्वद वर्षांची होती, शरीर पूर्ण गेलेलं तरीही शेवटच्या क्षणापर्यंत मेंदू आणि वाचा तल्लख होती. तिचा शेवटचा अगदी जीव जायच्या वेळेचा क्षण मला प्रत्यक्ष बघता आला. शेवटचा क्षण कसा असतो, इतक्या वर्षाचं आयुष्य संपत असतं, जे जे माझं माझं म्हणून जमवलं ते इथेच सोडून जायचं असतं, पुढे काय असेल याची एक उत्सुकता अश्या असंख्य भावनांचे काहूर त्यावेळी मनात उठत असावं. त्या आजींच्या शेवटच्या  क्षणाचं पूर्ण निरीक्षण केलं. त्यांची वाचा आणि मेंदू शेवटपर्यंत शाबूत होता त्यामुळे नेमक काय होतंय हे जाणून घेण सोप्प झालं.  . शेवट जसा जसा जवळ येत होता तसा आजूबाजूंच्या मंडळींची हुरहूर वाढत होती. संपूर्ण शांत आणि भयाण वातावरण. नकळत कुणाच्यातरी मुखातून हुंदका बाहेर पडायचा. आजीं घरभर नजर फिरवत होत्या. त्यांच्या मुलांकडे, मुलींकडे वैगेरे बघत होत्या. खुणेनेच त्यांना शांत व्हा असा इशारा केला. त्यांच्या मोठ्या मुलाने शांतपणे विचारलं, "काही हवंय का आई??" आजी सगळी शक्ती एकवटून "मी खूप थकलीय आणि मला झोप येतेय" इतकंच बोलल्या, आणि समोरच लावलेल्या

कालनिर्णय

Image
"भिँतीवSरी... कालनिर्णय असावे." किँवा "वामनराव, तुमच्या ठणठणीत तब्येतीचं रहस्य काय ?  - नियमीत व्यायाम, बदामाचा शिरा,  पुरेशी झोप,  व्यसन नाही आणि कालनिर्णय आरोग्य... - आता ही कुठली गोळी ? - गोळी नै ओ, कालनिर्णयची खास आरोग्य आवृत्ती... भिँतीवर लावा आणि शड्डू ठोका...!! हा शिवाजी पार्कातला दोन आजोबांमधला सकाळचा संवाद... कडाक्याच्या थंडीचे दिवस असतांना, डिसेँबरच्या सुरुवातीला पहाटे पहाटे पहील्या चहाबरोबर रेडीओवर ऐकू येणाऱ्‍या या दोन जाहिराती सकाळी लवकर उठणाऱ्‍या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतात... मला तर माझी स्कूलटाईम मॉर्निँग आठवते... डिसेँबरच्या थंडीत सकाळी स्कूलबस पकडण्यासाठी उठल्यावर डोळ्यावर अलगद झोप, थोडासा संताप आणि ग्लासभर दूध यामागे बॅकग्राऊंड म्यूजिक भिँतीवssरी कालनिर्णय असावे... हेच असायचं... आणि वामनराव... संपायच्या आत दूध संपवायचं...! . साधेपणा आणि सुटसुटीतपणा या बळावर गेली बेचाळीस वर्ष कालनिर्णय मराठी घरातल्या आणि मनांतल्या भिँतीवर राज्य करतंय. मराठी माणसाची एकादशी-चतुर्थी सारखी नाजूक नस पकडून कालनिर्णयच्या माध्यमातून जयंत साळगांवकरांनी ८.५ मिली. ड

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved