Posts

Showing posts from September, 2015

Hindi and Parties

एकीकडे :  देशातील आरक्षणाच्या पुर्नविचाराची गरज आहे... असं अभ्यासपूर्ण मत परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नोँदवले... तसेच इतिहासातील अनेक व्यक्तीँच्या, घटनांच्या पून:अभ्यासाची गरज असल्याचे सांगितले. हिँदूत्वावादी संघटनेचे शिरोमणी भारताच्या वर्तमानाची घडी निट बसवण्यासाठी धडपड करताय. . विश्व हिँदू परीषदेचे प्रविणजी तोगडीया हिँदूंचा प्रपंच, रोजगार सुलभ आणि अद्ययावत करुन, हिँदूशक्तीचे एकत्रीकरण करत हिँदूंना शिक्षित, समृद्ध आणि राजकीय-सामाजिक दृष्ट्या सक्षम करताय. हिँदूचे भव िष्य संरक्षीत करताय. . तर दुसरीकडे सनातनचे प.पू. ज.बा.आठवले... सदरा कुर्ता घ्या, समष्टी करा, साधना करा, लहरी दिसल्या, वयाआधीच प्रौढ व्हा वगैरे सात्विक बफाऱ्‍या देऊन स्वत:ला कृष्णावतारी म्हणत हिँदूंना बाबा आझमच्या जमान्यात नेताय... . संघ आणि विहिँप जीव तोडून जी धडपड करतात ; ती सनातनच्या येड्याचाळ्यांमूळे अर्धी पाण्यात जाते. संघ आणि विहिँपच्या "राजकीय परीपूर्ण सत्ता" या केँद्रबिँदूचा विचार आत्ता काळानुरुप आहे. तिथे हे बिनडोक सनातनवाले हिँदूंच्या तरुण बळाला मुर्खासारखं निळ्या लहरी-काळ्या लहरीँच्या मागे

Mahalakshmi

Image
आज आम्हा देशस्थांकडे महालक्ष्मी असतात, तर कोकणस्थांकडे गौरी. "थोडक्यात गोडी" या उक्तीप्रमाणे कोकणस्थांकडे खड्यांच्या गौरीँची पूजा करतात. नारळाच्या पदार्थांचा नैवेद्य आणि १२ वाजेपर्यँत जेवण... साधेपणात सुंदरता.  . आम्हा देशस्थांच्या महालक्ष्म्यांचा थाट मात्र राजेशाही. "लक्ष्मीला शोभावा असाच..." ! उंची साड्या, मुखवटे, दागिने, अत्तरं आणि समोर फळं, मिठाई... आज भलेही जेवायला दुपारचे तीन वाजतील पण, पंचपक्वान्नाचा थाट असतो... पुरणपोळी, सोळा भाज्या, कोशिँबीरी, पुरणाचे दिवे... उद्या व िसर्जनाच्या दिवशी खीर-कान्होले. तीन दिवस सजावट, खाण्यापिण्याचा थाट. . कोकणस्थ असो वा देशस्थ... गौरी आणि महालक्ष्मी यांच्या पाहुणचारात कुणीच कमी पडत नाही. अतिथी देवो भवः ही उक्ती दोघांकडून पूरेपूर पाळली जाते... आणि गौरी/महालक्ष्मी देशस्थ+कोकणस्थ असा तृप्तीचा माहेरवास भोगून आनंदातच विष्णूलोकात परत जातात... . Bdw... येताय ना जेवायला ??  :D  देशस्थांचा पाहूणचार करु आज...!

Gannapati 2015

Image
तुम्ही काही म्हणा, पण गणपतीच्या दिवसांचा बेस ज्याला म्हणता येईल अशी (पार्वतीच्या बाळा आधीची) चीक मोत्याची माळ होती तीस तोळ्याची, प्रथम तुला वंदीतो, गणराज रंगी नाचतो, गजानना श्री गणराया... ही चार गाणी ऐकल्याशिवाय गणपती आल्यासारखेच वाटत नाहीत. हि चारही गाणी शांत प्रकृतीची, भक्तीरसप्रधान आणि नितांतसुंदर... अवीट गोडीची... बनानेवालेने सबसे खुबसूरत यही आखिरी चीज बनाई... वगैरे. . त्यापैकी चीक मोत्याची माळ माझं ऑल टाईम फेवरेट... चार पाच वर्षाँपूर्वी आम्ही चौघांनी कॉलेजच्या गणेशोत्सव  कार्यक्रमात समुहगीत गायलेलं. वन्समोअर आणि अनेक बक्षिसं मिळालेली. त्याचा रियाज करतांना आणि गातांना या गाण्यानं झिँग चढवली होती. आणि बऱ्‍याsssssच बाकीच्या भारी भारी गोष्टीसुद्धा या गाण्यादरम्यान झालेल्या... अगदी आजपण माझ्या कुठल्याही सांगीतिक मैफीलीत प्रथम तुला वंदीतो नंतर हे गाणं नं २ वर असतंच... . आत्ता डिजे विद थर्डक्लास धांगडधीँगा... गणेशोत्सवाचं सांगितीक पावित्र्य संपल्यात जमा आहे... . बाप्पा... तुझ्या आठवणीच्या कप्प्यातली ती जुनी गाणी आणि जुना गणेशोत्सव तेवढा येतांना आठवणीने घेऊन ये...! . bdw आमचा बाप्पा आल

Ashatai Bhosale

Image
आशाताई आणि लतादीदी या दोन नक्षत्रांनी साठ ते नव्वदच्या दशकातील अनेक गाणी अजरामर केलीयेत... लतादीदीँनी शांत प्रकृतीच्या गाण्यांना साज दिला, तर आशाताईँनी आपल्या सहज वळणाऱ्‍या, गोड आवाजाने शांत प्रकृतीच्या गाण्यांपासून डिस्कोच्या मेलोडीज् पर्यँत गाण्यांमध्ये प्राण ओतला... आशाताईँनी स्वरबद्ध केलेलं प्रत्येक गाणं कालातित झालं... तेव्हापासून आत्तापर्यँत प्रत्येकाच्या ओठांवर रुळलंय. अर्थात त्यांना गाण्यात आणि आयुष्यातही पंचमदांच्या संगीताची तेवढीच भक्कम साथ मिळाली. . गाण्यासाठी आशा  भोसले नसून आशा भोसलेँसाठी गाणं झालं. चूरा लिया है, आगे भी जाने ना तू, झूमका गिरा रे, आओ हूजूर तुमको, दम मारो दम, दिल ने जिसे अपना कहा सारखी शेकडो हिँदी गाणी... एकाच या जन्मी जणू, मी मज हरपूर, अरे खोप्यामंदी खोपा, उठी श्रीरामा, उष:काल होता होता, किती सांगू मी सांगू कुणाला सारखी अनेक मराठी गाणी आशाताईँच्या स्वरस्पर्शाने एव्हरग्रीन झालीय. . पुण्यात एका कार्यक्रमावेळी आशाताई आलेल्या. त्यावेळी धडपडत-गर्दीतून वाट काढत काही क्षणांसाठीच त्यांच्या पायावर डोकं ठेवलं... आणि त्यांच्या हातांचा स्पर्श पाठीवर होताच माझ्या अंग

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved