Year of Fadanavis Gov.

महाराष्ट्र सरकार आज वर्षपूर्ती साजरी करतंय... शिवसेनेच्या येड्याचाळ्यांना, टांगघाल स्वभावाला फूकटाचीही किँमत न देता योग्य रितीने राज्याची धुरा सांभाळणाऱ्‍या फडणवीसांच्या द्रष्टेपणाचं कौतूक वाटतं...
.
चांगल्या बाजू :
(१) फडणवीसांची कार्यपद्धती : चाणक्यनितीचा पूरेपूर वापर करुन फडणवीस कार्य करताय. सर्वसमावेशक धोरण, जनतेचा मुख्यमंत्री आणि अभ्यासपूर्ण आखणी हा फडणवीसांचा पाया आहे. कामाशिवाय वायफळ बडबड नाही हे महत्वाचं. स्वत: लक्ष घालून प्रत्येक काम करताय.
(२) विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार : शिक्षणमंत्री तावडे आणि वनमंत्री मुनगंटीवार फडणवीसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताय. स्वच्छ चारीत्र्याचे मंत्री आणि कार्यक्षम !
(३) बाबासाहेब पुरंदरे :
बाबासाहेब पुरंदरेँच्या महाराष्ट्र भूषणवरुन काही नतद्रष्ट्यांनी रान पेटवलं होतं. पण तावडे-फडणवीस जोडीने न भूतो न भविष्यती असा सोहळा करुन बंटी आणि ब्रिगेड्यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात घातल्या.
(४) जलयुक्त शिवारासाठी फडणवीसांनी महाराष्ट्र पिँजून काढलाय.
(५) डिजीटल वर्षाच्या दृष्टीने योग्य कार्य सुरु झाले आहे.
(६) वर्षभराचा कारभार पारदर्शक आणि स्वच्छ आहे.
(७) इतर देशांतील चांगल्या गोष्टीँचा अभ्यास करुन त्यांना राज्यात राबवण्याचा प्रयत्न होत आहे.
(८) भयंकर दुष्काळाचं नियोजन योग्य रितीने झालं.
(९) एलबीटी रद्द झाली.
(१०) दाभोलकर-पानसरे हत्यकांडातील आरोपी आणि सहभागी संस्थांबद्दल न्यायीक आणि तटस्थ भूमिका घेतली.
(११) याकूब मेमन प्रकरण खंबीरपणे, द्रष्टेपणाने हाताळलं. त्याचा कुठलाच साईड ईफेक्ट झाला नाही.
(१२) सावरकर, टिळक, रानडे, आगरकर, कर्वे यांना योग्य सन्मान मिळतोय.
(१३) सगळ्यांत महत्वाचं : विरोधी पक्षात असूनही ; आर आर पाटलांच्या निधनावेळी सहिष्णूता दाखवून फडणवीस आणि भाजपाचे इतर नेते पक्ष विसरुन खंबीरपणे त्यांच्या कुटूंबियांपाठी उभे राहीले. सत्ताधारी असल्याप्रमाणेच त्यांची बोळवण केली.
खूप गोष्टी चांगल्या आहेत. शिक्षण, विधी, सांस्कृतिक, नगरविकास क्षेत्रात चांगले बदल दिसत आहेत. राज्याची धुरा स्वच्छ, सुशिक्षित आणि योग्य माणसांकडे आहे. मागचे खड्डे भरले जात आहेत.
वर्षभराचं मूल्यांकन : १० पैकी ८ गुण...
.
२ पॉईँटस् कुठे गेले ?
(१) अनावश्यक दुष्काळ कर : पेट्रोल आणि डिझेलवर अनावश्यक दुष्काळ कर लादण्यात आलाय. ज्याची काहीच गरज नाही.
(२) चिक्की प्रकरण : पंकजा मुंडे चिक्की प्रकरणात गोँधललेल्या दिसल्या. आपली बाजू मांडतांना त्यांची दमछाक झालेली स्पष्ट दिसली.
(३) नाथाभाऊंचा काही प्रमाणातला वाचाळपणा, अंतर्गत राजकारण नडलं...
.
मोदीँच्या गुजरात मॉडेलला तोडीस तोड महाराष्ट्र मॉडेल करण्यासाठी आत्ताचं भाजपा सरकार वाटचाल करतंय.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved