रामदास समर्थ : दासनवमी

छत्रपती शिवाजी राजेंच्या मृत्यू नंतर समर्थ हेलावून गेले
सर्व धातू पात्रांचा वापर बंद केला मृत्तिका पात्र  आणि फक्त दूध घेऊ लागले
चाफळला होते.
गडावर जाण्याचा संकल्प केला कारण चाफळला काही झाले तर स्वामींच्या नादात भक्तगण रामाचे वैभव विसरतील
राघुपती पेक्षा लोक माझे महत्व वाढवतील म्हणून गडच ठीक
रामाचा निरोप घेतला मागणे मागितले
या देहा कडून सेवा घेतलीस मीही ती केली आता एक मागणे आहे
आहे एकचि मागणे। कृपा करोनि देणे ।ज्यासी दर्शनाची इच्छा ।त्याची पुरवावी ।आस्था  ।  बरोबर उद्धव स्वामी होते स्वतःसाठी काही नाही
राघवाने मागणे मान्य केले
पण अट घातली
तेरा अक्षरीया मंत्राचा। जप करील जो साचा ।त्याची संख्या तेरा कोटी । होता भेटेन मी जगजेठी ।
समर्थ चफळकरांचा निरोप घेऊन गडावर आले.

कल्याण डोम गावाला परत गेले
जवळची माणसे जवळ असली कि जाण्यात अडचण येते
चाफळ मठाची व्यवस्था लावून दिली उद्भवला वाटले नंतर भांडणे नको पण ही निर्वा निरव लक्षात आली नाही अक्का अस्वस्थ होत्या
काही विचारले तरी राघुरायची इच्छा म्हणत
माघ पौर्णिमा नवान्न पौर्णिमा
पण पुरण वरण गव्हाची खीर सुधा नाकारली.

मार्गशीर्षात कल्याणाची भेट झाली होती.
7 दशक 70 समास झाले होते
जे जे लोकांना सांगावेसे वाटते ते लिहून काढले पुन्हा वाचन झाले आणि ते मूळ ग्रंथाला जोडले
अर्धवट कामे पूर्ण करण्याची गडबड केली   20 वा दशक सुरु झाला
भक्ताचेनी सभिमाने कृपा केली दाश रथीने। समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध
जालें साधनाचे फळ।संसार झाला सफल। निर्गुण ब्रह्म ते निश्चळ । अंतरी बिंबले ।

माघ वद्य प्रतिपदेपासून दूध आणि पाणी सुद्धा बंद केले गडावर गर्दी वाढू लागली
समर्थ पलंगावर बसलेले असत नाम स्मरण चालू असे
आक्कानी गलबलून विचारावे हे प्रयोपवेशन कश्यासाठी?

वद्य पंचमी।  उजाडली   समर्थ विशेष प्रसन्न दिसले
आक्काना म्हणाले आज रामराया  आपल्या पायांनी गडावर येत आहे त्याचे स्वागतात काही उणीव नको  सर्वाना वाटले स्वामींना भ्रम झाला
पण तंजावरहून खरोकर व्यंकोजी राजांनी पाठवलेल्या मूर्ती गड चढून येत होत्या.
लगबगीने तयारी होऊन उत्तम स्वागत झाले  दुध पाणी ढोल ताशे सनई चौघडा पायघड्या झान्झ चिपळ्या सर्व वाद्य होती आनंदी आनंद होता.
षष्टीचा दिवस गेला
मधेच समर्थ म्हणत सिहासन पर बैठे राम । कपी आये है तमाम । पिछे ठाडे है हनुमान। करे या नौकरी ।
दम लागायचा आक्का उद्धव पुढचे पूर्ण करायचे पुन्हा समर्थ म्हणयचे  रविकूल टिळका रे वेध सन्निध आला
त्यांची प्रसन्नता पाहून उद्धव म्हणतो
अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी । बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी।।त्याच क्षणी आक्का चारकल्या रामराया ने नावमीची सूचना दिली नसेल ?

एवढा सहवास होऊनही बोध झाला नाही का
हा देह सोडणे म्हणजे मृत्यू नव्हे    ते देह परिवर्तन आहे
उद्धव म्हणतात आम्ही सामान्य    आपलं सांगून रूप समोर असावी हि इच्छा वावंगी आहे का
पूजा करावी वाटली ,सल्ला विचारावा वाटला दर्शन ह्या साठी कुठे जाणार
समर्थ सांगतात माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंतःकर्णी। पण मी आहे जगज्जीवनी। निरंतर
माझ्याशी हितगुज करावे वाटले
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतः सिद्ध। असता न धरावा खेद। भक्त जनीं.

शेल्याने झाकलेल्या मूर्ती समर्थानी शेला बाजूला केला
उच्चसनावर मूर्ती ठेवल्या त्यांच्या डोळ्यावरचे मेण समर्थनी काढले
जणू त्याच क्षणीप्रन प्रतिष्ठा झाली.

गुरु शिष्याची नजर भेट झाली ये ह्रुदयीचे ते हृदयी विराजमान झाले
दगदग होऊन समर्थ पलंगावर बसले
रामराया एवढ्या लांबून येण्याचे श्रम केले मला नेण्यासाठी स्वतः आलात.

माघ वद्य नवमी उजाडली
समर्थ उठले    राम मूर्तींना नमस्कार केला
स्नान केले
लंगोटीवर खाली पद्मासनात बसले  ध्यान लावले आक्काना हुंदका आला
त्यांनी डोळे उघडले
भीमस्वामी त्यांना पलंगावर बसवू पहातात
10 जणांना ते भारी ठरले
महा रुद्र हनुमान कि जय
मनुका आणि पाणी घेतले
बाहेर पटांगणात श्रीराम जयराम जयजय राम चा गजर अखंड चालू होता
शनिवारचा दिवस होता 2 प्रहाराची वेळ होती
माझी काया आणि वाणी
यांची आठवण करून दिली
सर्वाना बाहेर बसायला सांगितले फक्त आक्का आत होत्या
कपाळाला गोपी चंदन लावले गळ्यात तुळशी माळ
तेजपुंज  मूर्ती आक्का न्याहाळत होत्या समर्थ उत्तराभिमुख बसले होते
हर हर हर जप चालू होता हि त्यांची समाधी अवस्था होती
खण खाणीत आवाजात समर्थ 3 वेळा
श्रीराम
श्रीराम 
श्रीराम
म्हणतात
त्यांच्या त्या  घनघंभीर आवाजाने जणू आकाश हेलावले
तो कोदंड धारी सितापती लगबगीने तिथे आला त्याने आपल्या परम प्रिय लाडक्या भक्ताला आपल्या बाहुत कवटाळले  त्याच्या मांडीवर त्याच्या मायेचा पदरा आड हा लाडका बाळ जन्मभराचा शीण घालवू लागला

जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏
...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved