Posts

Parshuram Jayanthi 2015

लहान असतांना जेव्हापासून समज आली तेव्हापासूनच "आपण ब्राह्मण आहोत आणि आपल्याला इतरांपेक्षा वेगळी कामं करायची असतात" असा एक समज मनावर बिँबवलेला...! शिव्या देऊ नये, इतर मुलं बोलतात त्यापेक्षा आमची भाषेची चाल वेगळी का ? या पासून ते रोज संध्याकाळी नित्यनियमे शुभंकरोती, गणपतीअथर्वशीर्ष, गायत्री मंत्र आई किँवा आज्जी म्हणायला सांगते, ते माझं तोँडपाठ आहे पण इतर मित्रांना ते कां माहीत नाही असे बाळबोध प्रश्न पडायचे... आठव्या वर्षी मुंज झाल्यानंतर तर ते ब्राह्मणत्व ऑफीशिअली अंगात भिनलं.. . अंगावर जानवं घातल्यानं, ते कानात अडकवतांना किँवा जेवतांना चित्रावती घालतात हे फक्त आपणंच करतो या इतरांपेक्षा वेगळ्या गोष्टी कळल्या... न आणि ण चा फरक, खाद्यसंस्कृती, समाजस्थान, सौम्यपणा, शिस्त कलासंस्कृती यापासून विवाह-मृत्यूविधी पर्यँतचा ब्राह्मण आणि इतरांमधला फरक कळायला लागला. वयापरत्वे ते ब्राह्मणत्व बोलण्यात, वागण्यात, जगण्यात पुरेपूर भिनलं... मी ब्राह्मण या सर्वश्रेष्ठ, शिस्तप्रिय, सुसंस्कृत, विद्वान धर्मात जन्माला आलोय. मला ब्राह्मण असल्याचा गर्व नाही "अभिमान" आहे. जय परशूरा

Unfortunate Fact

माझ्या ओळखीतल्या एका माणसानं त्याच्या वृद्ध आईला छळ छळ छळला... जेवायला देत नव्हता, मारहाण करायचा, राहण्यासाठी घराशेजारीच उघड्यावरच पलंग टाकलेला. बाकी औषधाच्या आणि कपड्यांच्या नावे बोँबच ! एकूण खुप हालच केले... (बऱ्‍याचदा त्या आजी इतरांच्या उष्ट्या ताटातलं खातांना मी स्वत: पाहीलंय... आणि तेव्हा यथाशक्ती मदतही केलीय.) पाच-सहा महीन्यांपूर्वी त्या आज्जी देवाघरी गेल्या. आज इतक्यातच तो माणूस खंगलेला, आजारानं वैतागलेला आणि शरीरानं अर्धा झालेला दिसला. लंगडत चालत होता. मी मुद्दामच गाड ी थांबवून चौकशी केली... मधुमेह, किडनीचे प्रॉब्लेम्स, सांध्याचे विकार अश्या अनेक आजारांनी त्याला धरलं आहे. दर दोन दिवसांनी डायलेसिसिस करावं लागतंय... आणि ना धड जगतंय ना मरतंय अश्या पंथाला लागलाय... त्याला तोँडावर ohhhh... hmm... असा रिप्लाय केला, पण माझ्या मनातल्या मनात "तू त्याच लायकीचा आहेस xxxच्या... स्वत:च्या कर्माची फळं भोगतोय..." असा आसुरी विचार त्या आजीँच्या दुर्देवी चेहऱ्‍यासोबत आला...! मी चूक की बरोबर कळत नाहीय...!!

Real life in Real

मला नेहमीच एक प्रश्न पडतो... म्हणजे पहा ना, मराठी-हिँदी चित्रपट, मालिका एका स्क्रिप्टनंतर संपतात... पण त्यातली पात्र चित्रपट-मालिकेच्या पल्याड खरंच्च आहेत असं मानलं तर चित्रपट-मालिका संपल्यावर त्यांचं पुढे काय होत असेल ? म्हणजे शोले मधला ठाकूर, विरु-बसंतीला रेल्वेत बसवून घरी गेल्यावर राधाशी काय बोलला असेल ? विरु-बसंतीचं पुढचं आयुष्य कसं असेल ? ते रामगढला येऊन ठाकूरला भेटत असतील का ? हम आपके है कौनमध्ये मोहनिश बहल पुढे आयुष्यभर तसाच विधूर असेल की दुसरं लग्न केलं असेल ? अशी ही बनवाबनवीमध्ये घरमालक आज्जी मेल्यानंतर ते घर अशोक सराफ अॅन्ड कंपनीकडेच असेल कां? कि विजू खोटेँनी घेतलं असेल ? अ.स अॅन्ड कंपनी पुढे सेट झाली असेल की नाय ?  चार दिवस सासूचे मधली म्हातारी मेली की अजून तश्शीच धडधाकड आहे ? एका लग्नाची दुसरी गोष्टच्या राधा-घनाला मुलबाळ झालं असेल ना ? श्रीमंत दामोदरपंतच्या दामूचं लग्न झालं की नाही ? लगानच्या भूवननं पुढे क्रिकेटची प्रॅक्टीस चालू ठेवली असेल की बंद केली असेल ? गावानं भूवनचा सत्कार केला असेल का ? कुछ कुछ होता है मधला अमन शाहरुख-काजोलच्या घरी य

Hindu vs

कट्टर हिँदूत्व ईद किँवा नाताळला सुतकी थोबाड करुन बसलं की प्रगट होतं कां ? इतर धर्मीयांच्या सणाला किँवा इंग्लीश न्यू इयरला शुभेच्छा दिल्यानं आमचा धर्म भ्रष्ट होतोय कां ? जे "कट्टर हिँदुत्ववादी" आहेत त्यांचे व्यवहार तिथीप्रमाणे चालतात कां ? वाढदिवस तिथीला साजरा करतात कां ? घरात भिँतीवर कालनिर्णय ऐवजी पंचांग लटकवतात कां ? इंग्लीशऐवजी संस्कृत बोलतात कां ? टेबल मॅनर्स पाळत नाहीत कां ? हात पाय दुखतांना कमोड ऐवजी भारतीय टॉयलेटच वापरतात कां ? जमीनीवर बसूनच जेवण करतात कां ? प्रहर पद्धतीचे कालमापक वापरतात - घड्याळ वापरतच नाही ? रोज न चुकता मंदीरात जातात ? घरी पूजा करतात ? हिँदू आचारसंहीता पाळतात ? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं "हो" असतील तरच तुम्हाला आम्ही "कट्टर हिँदूत्व" पाळतो असं म्हणायचा नैतिक आधिकार आहे... आणि तरंच दुपारच्या फोटोवरुन मला अक्कल शिकवायचा...!! जे ईदच्या वेळी म्हणालो तेच म्हणतो - वर्षानुवर्षे आमच्या आयुष्याचा भाग झालेले इतर धर्मीय असलेले शेजारी, मित्रमैत्रीणी यांना मी त्यांच्यातल्या थोड्या नालायक लोकांसाठी तोडू शकत नाही

असंही "स्वच्छ भारत अभियान'' ::

असंही "स्वच्छ भारत अभियान'' :: इतक्यातच नारायण पेठेत रस्त्याच्या कडेनं तोँडात बूचका भरुन चालणारा एकजण मध्येच थूंकला. रस्त्यावर ! लोकांच्या अंगावर उडेल याचा विचार न करता. ती घाण काहीशी माझ्या गाडीच्या पुढच्या चाकावर, मडगार्डवर उडाली... अस्मादिकांचं टाळकं सटकलं...!! आता याला घ्यायचाच कोपच्यात !! ऐन नारायण पेठेत... ऐ xxx थांब !! धुळ्याच्या भाषेत थांबवला. तोपर्यँत अष्टभूजाचा चौक आलेला. एस.पी.त एम ए मराठी, रानडेत एमसीजे, ललितकला मध्ये ड्रामासायंस करणाऱ्‍या आमच्या गृपचा एकत्र कट्ट ा. सगळी पोरं तिथंच !! बस्स !! त्याला थांबवला. सगळ्यांनी मिळून पेठेच्या पुणेरीत मोदीँचं स्वच्छ भारत अभियान व्यवस्थित समजावलं... गुटखा खाल्ल्यानं वैकूंठधाम बूक करावं लागेल हे पटवलं, पार रडकूंडीला येईपर्यँत अर्धा पाऊण तास लेक्चर दिलं आणि स्वच्छ भारत च्या धर्तीवर "स्वच्छ पल्सर" करण्यासाठी वॉशिँग चार्ज रु. मात्र पन्नास भरपाई वसूल करुन सत्कारमुर्तीँना रवाना केलं. अस्मादिक आता बाईक वॉशिँग सेँटरला बसून गाडीचा वॉशिँगसाठी नंबर येण्याची प्रतिक्षा करताय.

लक्ष्मणायण : :

Image
लक्ष्मणायण : : रामायण मुख्यत: रामांचा वनवास, पितृप्रेम, एकपत्नीव्रत सितेची पतीनिष्ठा, त्याग, कौसल्येचं पुत्रप्रेम आणि भरताचं बंधूप्रेम याभोवती गुंफलं गेलंय...!! पण केँद्रस्थानी राम असता लक्ष्मण आणि त्यांचं कुटूंब दुर्देवाने झाकोळलं गेलंय... किँबहूना त्यागाच्या दृष्टीनं त्यांचं कार्य रामांपेक्षाही मोठं आहे. १. लक्ष्मणांनी रामांबरोबर वनवास भोगला. त्यांची सेवा केली. तितकाच त्रास, दु:ख सहन केलं. (यादरम्यान लक्ष्मण तत्वत: एकटेच होते. रामांबरोबर सीता आणि लक्ष्मण होते.) २. कौसल्येप्रमाणे सुमित्रेनेही आपला पुत्र १४ वर्ष दूर ठेवला. परंतू त्या माऊलीचा त्याग कौसल्यांपुढे कां झाकोळला जावा ? ३. लक्ष्मणपत्नी उर्मिला ! एकमेकांपासून १४ वर्ष दूर राहणाऱ्‍या या दांपत्याच्या प्रेमाने विश्वासाचे एक उदाहरण निर्माण केले. एकपत्नीव्रत राम तसंच एकपत्नीव्रत लक्ष्मण का म्हणू नये ? उर्मिलेचा त्याग सीतांपुढे झाकोळला गेला. त्यांच्या वाट्याला न्याय आलाच नाही. ४. भरतांच्या बंधूप्रेमाचं उदाहरण दिलं जातं. पण त्याचवेळी शत्रुघ्नपण आपल्या सख्ख्या भावाच्या प्रेमापासून वंचित होते याचा साधा उल्लेखही नाही. (लक

Why Lost RAJ Thakrey ?

Image
राज ठाकरे कां हरले ? १० मुद्दे १. वायफळ बडबड : मी असं करेन, मी तसं करेन यासह भ आणि उ चा यथेच्छ वापर, सभांमधील भाषणात ट्रॅक सुटणारे मुद्दे, उर्मट भाषा यांमुळे सुशिक्षित मतदारांनी नाकारलं. २. पळकुटेपणा : "हा राज ठाकरे स्वत: निवडणूकीला उभा राहणार" अशी गर्जना करुन हवा भरली, पण घोडा मैदानात पोहचतात मैदान सोडून पळाले. त्याबद्दल पत्रकारांनी विचारलं तरी चिडायचे. ३. पत्रकारांशी उर्मट वर्तन : जे पत्रकार प्रसिद्धी देतात त्यांना उद्धटसारखं फटकारणं राज ठाकरेँच्या अंगाशी आलं. आपण खूपच ग्रेट आहोत त्यामुळे कोणालाही फटकारु शकतो या भ्रमात त्यांनी पत्रकारांशी पंगा घेतला आणि त्यामुळे त्यांचा निगेटीव्ह अॅँगल लोकांसमोर आला. ४. उमेदवारांबद्दल गोँधळ : मतदारसंघात योग्य उमेदवार न देता माहीत नसलेले चेहरे उतरवले. त्यामुळे ८० टक्के लोकांचं डिपॉजिट जप्त व्हायची दुर्देवी वेळ आली. शिवाय उमेदवारांशी भर सभेत उर्मट वर्तन लोकांनी पाहिलंच. ५. नाशिक महापालिका : नाशिकबद्दल विचारल्यानंतर कधीच योग्य उत्तर देवू शकले नाहीत. पत्रकारांवर खेचकून वेळ मारुन नेण्याची धडपड पकडली गेली. नाशिक मधल्या विकासकाम

Maharashtra Election 2014

निकालाबाबत माझं वैयक्तिक विश्लेषण १. भाजपा : मोदीँच्या २७ सभांनंतर, इतक्या मोठ्या प्रमाणातल्या प्रचारानंतरही पूर्ण बहुमत न मिळणं हा मोदी आणि शहांचा माझ्या दृष्टीने पराभवच आहे. २. उद्धवसेना : सपाटून आपटले. फुगा फुटला. ५९ जागा फक्त बाळासाहेबांची पुण्याई आणि स्थानिक राजकारणावर निवडून आल्या. उद्धव ठाकरे सपशेल फोल ठरले. त्यांच्यात नेतृत्वक्षमता नाही हे सिद्ध झालं. ३. राजसेना : नापास. पूर्णपणे नापास. बोलबच्चनगिरी, उद्धटपणा लोकं नाकारतात, घरी पाठवतात याचं उदाहरण दिलं. राज ठाकरेचा अॅटिट्यूड नडला. ४. दोन्ही कॉँग्रेस : दोघांना इतक्या घोटाळ्यांनंतरही एकत्रितपणे ९५ जागा मिळाल्या. निवडूंगाची मूळं पकडून आहेत. आणि ठराविक जनाधार आहेच आहे. दोघांचा बेस पक्का आहे. दोन्ही कॉँग्रेसचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. हार होवूनपण दुर्देवीरित्या जिँकले. ५. MIM ची एंट्री अति धोकेदायक. भाजपा, सेनेने गांभिर्याने योग्य धडा घ्यावा. ओवेसी भयानक हिँदूद्वेष्टा आहे. Thats all !!

Dasara 2014

Image
दर दसऱ्‍याला प्रधान आजोबांकडे जाणं - चहा विद मारिगोल्ड कुकीज यांचं सेवन आणि लाखमोलाचे आशिर्वाद घेणं हा माझ्यासाठी अनेक वर्षाँचा ठरलेला पायंडा... आजची गोष्ट - चहा विद कुकीज व्हाया महागुरुंच्या नवीन चित्रपटाचं मौखीक समिक्षक असा दसऱ्‍याला साजेशा कार्यक्रम सुरु असतांनाच - आजोबा -- "तेजस, आज मी तुला खरोखरचं "सोनं" देणारे... खरं सोनं... (हातातला कप हातात, कुकीच चहात, मी  :-O   :-O   :-O  हा अस्सा... खरं सोनं ??  :-O   :-O  ) आजोबा आजीँना -"अगंsssss... ते घेवून ये..." आणि हातात भलामोठा बॉक्स घेऊन आज्जी अवतरल्या... मी Shockkk... इतकं ? इतकं ?? आजोबा माझ्यावर इतके का प्रसन्न वगैरे झाले ?? आजोबांनी तो बॉक्स उघडला आणि माझ्याकडे सोपवला. OMG... wow... yesss... yes !! त्यात खरंच सोनं होतं... अस्सल... शंभर नंबरी पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे, व.पु., विँदा, कुसुमाग्रज, खांडेकरांची मिळून तब्बल ३२ दुर्मिळ पुस्तकं... आणि पी. सावळाराम, लतादिदी, आशाताई, बाबूजींच्या अप्रतिम गाण्याचं कलेक्शन असलेल्या ७ डिव्हीडी.... :-):-):-):-):-) हा तर अरबोका खजाना...  :-D   :-D  

Latadidi Birthday

Image
भगवती सरस्वतीच्या लता मंगेशकर या अवताराचा आज ८५ वा प्रगटदिन... दिदीँच्या स्वरांना गणेशाची तबल्यावर साथ आणि त्यातूनच प्रकटला अद्त्भूत नाद... स्वरांची देवता लतादिदीँना उदंड उदंड उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या स्वरमयी सहवासात आमचं आयुष्य संगीतमय हो... Happy Birthday Didi... :-):-):-) (दिदीँच्या पहील्या साक्षात दर्शनाने सुगंधित झालेला माझ्या आयुष्यातला एक सुवर्णक्षण... माझ्या डायरीतून) .....दिवाणखाण्यात सोफ्यावर बसून पुरस्कारांचं शोकेस, भिँतीवरचे फोटो न्याहाळत एक एक क्षण मोजत लतादिदीँची वाट बघणं सुरु होतं... इतक्यात केतकी किँचाळलीच अरे दिदी आल्या... आणि आम्ही सगळे लटपटत उभं राहीलो... साक्षात सरस्वती समोरुन येत होत्या... साक्षात लता मंगेशकर... सगळे भाव चेहऱ्‍यावर गर्दी करत होते... खरंच लतादिदी आहेत... आणि क्षणात डोळ्यातून घळघळ पाणी येणं सुरु झालं... हाच तो क्षण ज्यासाठी जन्माला आलो... "बसा बसा"... इतकंच काय ते मला ऐकू आलं... काही क्षण लागले सावरण्यासाठी आणि नंतर जाणवलं, यस्स्स, हे खरंय, मी खरंच साक्षात लतादिदीँसमोर उभा आहे........ 

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved