Posts

Showing posts from November, 2019

फसलेला डाव सुटलेला पेच

११ नोव्हेंबरला संध्याकाळी साडे सात वाजता शिवसेनेचा दावा काँग्रेसने मोडीत काढला त्याच्या नंतर काही मिनिटांतच मी पोस्ट टाकली होती.. "फार मोठा गेम होणार आहे." मला सारखे वाटत होते की युतीचे सरकार स्थापन होऊ शकत नाही हे नक्की झाल्यावर महाआघाडीचे किंवा भाजप राष्ट्रवादी अशी दोनच कॉम्बिनेशन्स पॉसीबील आहेत. महाआघाडीचे प्रचंड घोळ सुरू होते. पण २२ नोव्हेंबरला रात्री बहुतेक सर्व मुद्दे निकालात निघाले असे चित्र निर्माण झाले होते. त्याच रात्री उशीरा भाजपने खेळी केली. हा डाव डेंजरस होता कारण तो अजित पवार यांच्या भरवशावर होता.त्यांची मलिन प्रतिमा आहे तरीसुद्धा भाजपने हा डाव रचला.पण याहून अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो संख्येवर अवलंबूनच नव्हता तर कायद्याच्या कक्षेत पण पळवाट शोधून खेळलेला होता. याबद्दल मी अंदाज व्यक्त केला होता तो खरा ठरला. भाजपने हे का केले असावे ? राजकारण आपल्याला वाटते तसेच केले जावे ही अपेक्षा धरणे मुळातच चूक आहे. तिथे वेळ पडली तर अशक्य वाटणारे निर्णय घेतले जातात. कट्टर समर्थक नाराज होतील हे माहिती असूनही घेतले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे राजकारण सत्तेसाठी केले जाते.

Shivsena Chale

निष्पाप उधोजीराजेंनी शपथ न घेता कपटी यवन फडणवीसने शपथ घेतलेली पाहून  हा दगाफटका सहन न झाल्यामुळे यवतमाळच्या एका शिवसैनिकाने आत्महत्या वैग्रे करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काही पटलं नाही तर tweet करावं, post करावी, शिव्या द्याव्या, अनफॉलो करावं, ब्लॉक करावं..थोडक्यात फुकट ते सगळं करावं पण थेट स्वतःच्या जीवाशी खेळ करू नयेत, आयुष्य खूप सुंदर आहे वगैरे असला काही प्रकार नाही पण आपण जे व्याप वाढवून ठेवलेले असतात ते आपल्यापाठी बघणार कोण? आणि  उधोजी राजे सैनिकांसाठी स्वतःला चिमटा तरी काढुन घेणार आहेत का? जलसिंचन फेम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली पाहून जो थयथयाट सुरू आहे, तो बघून एक जेणिविण प्रश्न हा पडलाय की प्रपोज्ड शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस सरकारात अजित पवार काय स्वच्छता मंत्री वगैरे होणार होते का ??? बाकी आपण राजकारण्यांचा आदर्श घेऊन एकमेकांना दातओठ खात भक्त, गुलाम, चाटे वगैरे न म्हणता नाव घेऊन शेवटी जी लावायला कधी शिकणार आहोत? काँग्रेसची पुढची बैठक कधी आहे ? आमच्याही वाडीत दर बुधवारी आणि रविवारी दासबोधाची बैठक असते त्याला या लोकांनी यायला हरकत नाही कारण तसंही आउटप

हायव्होल्टेज ड्रामा आणि तथ्य

Image
मुख्यमंत्री निवड घटनात्मक तरतुदी 1. बहुमत असलेला नेता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतो. राज्यपालाची खात्री झाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री पदाची  शपथ देतात. नंतर ठराविक कालावधीत बहूमत सिध्द करण्यास सांगितले जाते. 2. भारतात बहु पक्ष पध्दती असल्यामुळे निवडणूकी नंतर  प्रत्येक पक्ष आपला विधी मंडळ नेता निवडतो. 3. विश्वास दर्शक ठरावा दिवशी प्रत्येक आमदाराने सरकार स्थापनेच्या ठरावावर मत द्यायचे. परंतु  पक्षाचा विधी मंडळ नेता व्हिप बजावून ठराविक पक्षालाच मत देण्याचे आदेश देऊ शकतो. हा आदेश प्रत्येक आमदारांवर बंधनकारक असतो. 4. सध्या राष्टवादीचे गट नेते अजित पवार आहेत. त्यांच्या कडे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र आहे. जे त्यांनी राज्यपालांना सादर केले. त्या नुसार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणविस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. 5. विश्वासदर्शक ठरावा दिवशी अजित पवार व्हिप बजावून भाजपा ला मतदान करण्याचे आदेश देऊ शकतात. जो आदेश राष्ट्रवादीचे आमदार डावलू शकत नाहीत. जर विरोधात मतदान केले तर मत बाद होईल. 6. शरद पवारांनी जरी पक्षाची बैठक बोलवून अज

ती आणि मी

आमच्यातलं सगळं आलबेल असण्याची खूण म्हणजे "ए आहो" बोलणं... बायको माहेरी गेल्यावर फोनवर तो एकच शब्द हजार शब्दांचा धीर देतो... एकाच शब्दात एकुण सिच्यूएशनचा अंदाज येतो...! .. पूर्वी पत्र लिहीतांना वर श्री लिहायचे, त्यातच सगळं सुखरुप असल्याचं समजायचं... श्री नसेल तर घरातल्या बाया शेजारच्या चार बाया गोळा करुन कुणाची काय खबर हे न बघताच गळे काढणं सुरु करायच्या,  ... तसंच, फोन वर "ऐ आहो" ऐकलं नाही की पुढे नक्की काय वाढून ठेवलंय या विचाराने हार्डची धडधड एक्स्प्रेसच्या स्पीडनं डबल होते, आणि अंधारात तीर मारत, सावधपणे आपल्या कर्माची एक एक गोष्ट आठवून अंदाज घेणं सुरु होतं... कारण सापडलं तर ठीक, नसेल तर पॅराशूट मध्येच अडकून गेल्याची फिलीँग येते, आणि ती आपल्याला भलत्याच पद्धतीने टोलवत राहते...! ... टिप : कधी अश्या परिस्थितीत अडकलात तर चुकूनही आपल्या चुकांची गिणती बायकोसमोर करु नका... अंदाज घ्या... कारण काहीवेळा भलतंच असतं, देणं ना घेणं आपलं स्वत:च्या हाताने ओढवलं जातं.

Ramji... Original Idol

Image
These are the original idols of Shri Rama, Lakshmana and Sita which were removed & sent to a safe place before the Ram Mandir was desecrated by Babur. When Babur marched into Ayodhya, the caretaker of the temple Pandit Shyamanand Maharaj fled Ayodhya along with the idols & handed them over to Swami Eknath Maharaj of Paithan. Later these idols were handed over to the Guru of Chhatrapati Shivaji Maharaj, Swami Samarth Ramdas. When Swami Samarth was on a tour of South India, he placed those idols on the banks of the holy sangam of rivers Tunga & Bhadra forming Tungabhadra in a small town called Harihar, Karnataka. The idols have been worshipped since then by the Gurus of Narayan Ashram in Harihar. There was a huge celebration in Harihar after the Ayodhya verdict. The people of Harihar and the Narayan Ashram are now preparing to return back the idols to Shri Rama's Birth place, Ayodhya.

Be Safe...!

(लेख थोडा मोठा आहे - पण तुमच्या नक्की कामी येईल.... वाचतांना शांत डोक्याने वाचा. एक एक गोष्ट समजून घेत वाचा.) सायबर गुन्ह्यांबद्दल गेल्या तीन ते चार दिवसात बरंच काही घडलंय. आणि बँकेकडून तसेच सायबर तज्ञांकडून याबाबतीत युद्धपातळीवर जनजागृती सुरुय. महाराष्ट्र बँकेने तर काल दुपारी प्रत्येकाला याबद्दल मेसेज सुद्धा केले. आपणच आपल्या माहितीची आणि पैश्यांची सुरक्षा करू शकतो. आयटी क्षेत्रात काम करतांना यातील खाचा किंवा पळवाटा ओळखून मी स्वतःसाठी सुरक्षा तयार केलीय. पुढील काही दिवस याबद्दल डीटेल्स बोलू, वाटल्यास लाइव चर्चा करू. जितकी माहिती मला आहे ती मी शेअर करतो, जितकी तुम्हाला आहे तितकी तुम्ही करा... बँक खाते, आपले सोशल मिडिया खाते, आपली ओळख, वैयक्तिक आयुष्य या सगळ्यांवर कुठेतरी प्रभाव पडतोय. त्यामुळे एक एक गोष्ट आपण सुरक्षित करत जाऊ... मी सगळ्यात आधी बँकेतल्या पैशांची सुरक्षा कशी केलीय ते सांगतो. ते इथे सांगण्यात धोका नाही, कारण त्यापर्यंत पोहचण्याचा मार्गच नाहीय. तत्पूर्वी - मी स्वतः स्पॅम मेल्स न उघडणं, अवांतर लिंक्स न उघडणं, एटीएमचा वापर सावधपणे करणे हि काळजी घेतो...

राष्ट्रपती राजवट

Image
महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रपती राजवटीच्या मन:पूर्वक शुभेच्छा... हि राष्ट्रपती राजवट आपल्याला भरपूर मनोरंजन देणारी, नवीन अनुभव देणारी, टीव्हीच्या रिचार्जच्या दुप्पट रिटर्न्स देणारी ठरो - हि महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल आणि मोटाभायला प्रार्थना...! ... राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींनी दिला किंवा राष्ट्रपतींना सुमोटो पद्धतीने तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपती राजवट समाप्त होण्याची घोषणाही राष्ट्रपतीच करतात. संसदेने अशा घोषणेला मान्यता दिल्यानंतरच ती अंमलात आणली जाते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते. मात्र मंजूरी मिळाल्यानंतर केवळ सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतु संसदेने या घोषणेला पुन्हा पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. अशाप्रकारे वाढ करून जास्तीत जास्त एखाद्या प्

Dada

Image
Happy Birthday Dada... आजोबा... काही माणसांचं आपल्या आयुष्यात असणं हेच खूप महत्वाचं असतं. ... ज्यांच्या फक्त असण्याने सुद्धा आपण निर्धास्त असतो... बाहेर कितीही मोठं वादळ आलेलं असू देत, घरी आल्यानंतर कसं वाटतं ? तोच सेफ फील देणारं माणूस माझ्या आयुष्यात आहे... माझे आजोबा ! दादा !! ... माझ्यासाठी माझं छत ! कुठल्याही प्रश्नाचं शेवटचं उत्तर...! एखादी प्रश्न आपण कितीही उड्या मारून सुटत नसेल तर बाकीचे मंदिरात जात असतील, मी आजोबांसमोर जातो. मंदिरातला देव आरामात लक्ष देईल - मग काहीतरी मार्ग दाखवेल - मग त्यावर चाला....... इथे तसं नाहीय - समोर जायचं, प्रोब्लेम काय आहे तो सांगायचा - पुढच्या मिनिटाला आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं असतं... मग ते उत्तर म्हणजे पैसा असू देत, व्यक्ती असू देत किंवा वेळ असू देत... रिकाम्या हाताने परत फिरत नाही...! ... मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यावर माझ्या मागे पहिली शक्ती उभी राहिली ती म्हणजे माझे आजोबा... त्या निर्णयाचा मनापासून आनंद होणारे कदाचित ते एकमेव आहेत... ते फक्त उभे राहिले नाहीत तर जिथे सांभाळण्याची गरज होती तिथे सांभाळलंही... त्यांचा स्

राम मंदिर

Image
जय श्रीराम ! . सर्वसमावेशक निकाल. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायप्रतिष्ठा जपलीय. . अयोध्या यापुढे केवळ रामजन्मभूमी म्हणूनच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या अप्रतिम निकालासाठी सुद्धा ओळखलं जाणार... ! . भारतीय लोकशाहीचा, ऐक्याचा विजय झालाय. . जय जय श्रीराम ! . ऐतिहासिक निर्णयाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झालेल्या तुम्हा आम्हा प्रत्येकाचं अभिनंदन. ... ५०० वर्ष जुन्या प्रकरणाची आणि १५० वर्ष जुन्या खटल्याची सुरेख सांगता करत,  मा. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे.  रामजन्मभूमीची २.७७ एकर्स जागा राम मंदिरासाठी देऊन,  अयोध्येतच ५ एकर जागा मशिदीसाठी देत लोकशाहीला साजेसा न्याय केला आहे. ..  आता अयोध्येत राम जन्म भूमी वर करोडो भारतीयांचं स्वप्न असलेलं भव्य राम मंदिर उभे राहणार.  कारसेवकांच्या बलिदानाला आज न्याय मिळाला.   

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... Vs Others

Image
एकीकडे - देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... . दुसरीकडे - उद्धव ठाकरे, संज्या रौत, राजाभाऊ ठाकरे, शरद पवार, चव्हाण मंडळी, कॉंग्रेस मंडळी, मलीक वगैरे टिव्हीवरच्या चर्चेत ज्ञानबिड्या पिणारे व्हेरी थोर लोक्स, मूकमोर्चा मंडळी, प्रकाशभौ आंबेडकर, जितूबुद्दीन आवहाड फ्रॉम गाझा, शेट्टीचा राजू, आयबीएन-टिव्ही९-सामचं चपराश्यापासूनचं अख्खं रिकामचोट मंडळ, काणे-सबनीस वगैरे मंडळी, हे ही कमी म्हणून पक्षांतर्गत तारे तोडणारे जेष्ठ - लोकांच्या मनातील माजी मुख्यमंत्री वगैरे मंडळी... आणि फडणवीसांनी ब्राह्मणांसाठी काय केलं म्हणत विरोध करणारा एक गट...! .. याचं कारण एकच : योग्य - स्वच्छ आणि अभ्यासू राज्यकारभार...! .. महाराष्ट्राला घाणेरड्या डावपेचांचा, वाह्यात हातवाऱ्यांचा उबग आलेला... त्यात या माणसाला नशीबानं सत्ता मिळाली, आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. राजकारणात जे स्वच्छ डावपेच आहेत ते वापरुन वरच्या लिस्टेड मंडळींनी वेळोवेळी निर्माण केलेलं उपद्रव त्यांनी एकहाती थोपवलं, या माणसाविरुद्ध राजकारणाने अगदी खालची पातळी गाठली, त्यांच्या पत्नीबद्दलही बरळलं गेलं, तरीही संयम

शिवसेना चाळे २०१९ : १

२०१४ लोकसभेला यूतीत सगळं आलबेल होतं, विधानसभेला वाजलं - वेगवेगळे लढले, तरीही जनमताचा कौल फाट्यावर मारुन भाजपाने शेणाबरोबर सत्तेत भागीदारी केली... सत्तेत येऊनही उठा, रौत वगैरे अखिल-ब्रांदा-उपद्रव-मंडळ आपलं उपद्रवमूल्य दाखवत राहीले... सामनातून रौत, टिव्हीच्या दांडूक्यासमोर उठा नॉनस्टॉप चाळे करत होते, तरीही भाजपा गप्प बसलं - जनतेने ते सुद्धा सहन केलं... संसार ढकलला गेला... . २०१९ ला तेच रिपीट झालं... लोकसभेला गळ्यात गळे घातले, विधानसभेला टिकलं, जनतेने फडणवीस मुख्यमंत्री म्हणून महायूतीला कौल दिला, आणि आता परत शेणेने आपलं मूळ स्वरुप, मूळ उपद्रवमूल्य समोर आणलंच ! . आता जे झालं ते शेवटचं ! यापुढे जर भाजपाने अभद्र उपद्रवी शेणेसोबत यूती टिकवली, आता तुटली आणि परत केली तर त्यांची अशी खोड मोडली जावी की परत अश्या बिनडोकांशी यूती करण्याचा विचारही येणार नाही...! सगळ्या जागांवर त्यांचं डिपॉजीट जप्त व्हावं, त्यांच्या सभा फ्लॉप व्हाव्या... त्याशिवाय भाजपाच्या यूतीखोर लोकांना अक्कल येणार नाही... . शेणा आणि रौतांबद्दल काय मत ? - त्यांना आम्ही गणतीतही धरत नाही.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved