Chitale

शून्य ते शंभर कोटी असा मोठ्ठा प्रवास करणारे भाऊसाहेब रघुनाथराव चितळे यांचं काल निधन झालं.
.
चितळ्याचं दुध, दही, तूप, श्रीखंड आणि बाकरवडी यांना रघुनाथरावांच्या हातची चव होती. काळ बदलला, पुणं बदललं तरी चितळ्यांची चव मात्र तश्शीच आहे.
.
जिथं आपल्यासारख्या सामान्य माणसांची जीभ चितळ्यांच्या चवीची गुलाम आहे, तिथं देवाला हा मोह आवरणं अशक्यच ! म्हणूनच "चितळे मिठाईवाले" ची शाखा स्वर्गात उघडण्यासाठी दस्तुरखूद्द रघुनाथरावांना निमंत्रण आलं, आणि त्यांनी ते स्विकारलं.
.
द्रष्टा उद्योजक आपल्यातून गेला हीच खरी खंत... भाऊसाहेब चितळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved