Posts

Showing posts from April, 2017

अक्षय_तृतिया

Image
#अक्षय_तृतिया खान्देशात आखाजीला मुलींना गौराई म्हणुन माहेरी आणले जाते. गल्लीच्या मधोमध मोठे झोके बांधुन मुली हे गाणं म्हणतात. माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते. चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय वैशाखाचं उन्हं खडक तापुन लाल झाले वं माय तापुन झाले लाल आईच्या पायी आले फोड वं माय पायी आले फोड आईची बेगडी वाव्हन वं माय बेगडी वाव्हन तठे काय कन्हेरानं झाड वं माय कन्हेरानं झाड माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्‍या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात. आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं

RIP Vinod Khanna

Image
अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन ! द बर्निंग ट्रेन, अमर अकबर ऍंथोनी यातल्या त्यांच्या भूमिका अप्रतिम होत्या. चांगला माणूस गेला. कॅन्सरने घात केला... ... अश्या सुपरस्टार रांगड्या माणसाला आजारात खितपत पडलेलं बघवत नव्हतं... सुटका झाली बिचाऱ्याची.. भावपूर्ण श्रद्धांजली ! ... हम तुम्हे चाहते है ऎसे मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसे #विनोद_खन्ना .... प्रिय विनोदजी अनेक दिवसांपासून तूम्ही आजारी होतात. आज जातो, उद्या जातो अशी मृत्युला सतत हुलकावणी देत देत शेवटी 'हलचल' माजवून आज 'अचानक' तूम्ही आमच्यातून निघून गेलात... आज तुमच्या अशा निघून जाण्याने 'अमर, अकबर, अँथोनी' 'इना मीना डिका' आणि 'रेश्मा और शेरा' देखील नक्कीच हळहळले असतील! जन्माला आलेला प्रत्येकजण शेवटी जाणार हा जरी 'कुदरत' चा 'फैसला' असला, तरी 'एक्का, राजा, रानी' चा प्युअर सिक्वेंस दाखवून खेळ अर्धवट सोडून तूम्ही असं निघून जायला नको होतं! शेवटी आपल्या आयुष्याचा 'लगाम' वरच्याच्या हातात आहे हेच सत्य आहे! चित्रपटसृष्टितले आमचे जेवढे म

BooksDay पुस्तकदिन

Image
#पुस्तकदिन शनिवार-रविवारची निवांत दुपार, गॅलरीमध्ये खूर्चीवर बसून दोन्ही पाय कठड्यांवर ठेवून बाजूच्या टेबलवर "माझा" चा भरलेला ग्लास, आणि हातात पुस्तक... एक एक घोट गळा तृप्त करतं... एक एक अक्षर मन समृद्ध करतं... ! त्याला ना भाषेचं बंधन ना विषयाचं... कधीतरी ती मराठीतली कादंबरी असते, कधी गुजराथीतलं एखादं मासिक, हिंदीतली चित्रकथा किंवा कुठल्यातरी विषयावर इंग्लंडमधल्या कुणीतरी लिहीलेला प्रबंध... ते साहित्य असतं - काव्य असतं - गुढ असतं - विज्ञान असतं किंवा गणित असतं... हातात पुस्तक आहे ते वाचायचंय... ! तो लेखक समोर बसून त्याचा विषय मांडतो - त्यात जिवंतपणा आणतो, आणि तो विषय आपल्या मेंदूतल्या कुठलातरी कप्प्याची जळमटं काढून तिथे रहायला येतो... आणि आपण त्या नव्या बिऱ्हाडाचं आनंदाने स्वागत करतो.. !! ... रोज रात्री भगवद्गीता नव्याने काहीतरी सांगते, मनाच्या एका श्लोकातून समर्थ काहीतरी देऊन जातात.. ! कधीतरी आपली जुनी डायरी (जे स्वतःपूरतं पुस्तक असतं) भूतकाळातलं पीस अलगद फिरवून जातात... ... "पुस्तक"... खरं तर खजिना... मी चार मोठी कपाटं हा खजिना जपून ठेवलाय... सॉर्ट

भांडणपुराण - भाग १

बऱ्याचदा, समोरचा माणूस नेमकं काय सांगतोय, त्याच्या ठिकाणी तो बरोबर आहे कि नाही हे न विचारता, न बोलता, रॅदर न बोलू देता एकतर्फी मताने निर्णय घेऊन झटक्यात काहीतरी स्टेप घेतली जाते... आणि तितक्याच वेगात संपर्काची साधनं खंडीत केली जातात... माझं झालं - तू तूझं तूझ्याजवळ ठेव सारखं...!! वर वर दिसायला हे सोप्पं वाटलं तरी अशी लोकं सोबत ठेवणं नेहमी धोक्याचं असतं... कारण कधी काय पाऊल उचलतील हे सांगता येत नाही... एका मर्यादे नंतर त्या व्यक्तीविषयी आदर, ओलावा, काळजी संपून भिती, नकारात्मकता याच गोष्टी बळावतात आणि त्या नात्याचा प्रवास अंताकडे सुरु होतो... ... वाद घालायचेत... नक्की घाला. पण बरोबरीची संधी द्यायला हवी... म्हणजे तुझं संपलं की माझी बाजू ऐकून घ्यावी लागेल... वाद अर्धवट सोडून निघून जाणं आणि नंतर दुसरी बाजू न ऐकता निर्णय घेणं म्हणजे आत्मघातकी ठरतं ... अशी माणसं विघ्नसंतोषी असतात... प्रामाणिक तर बिलकूल नसतात.. .. वाद घालून ते निर्णायक अंतापर्यंत नेले तर त्याचं महत्व राहतं... ते पण निर्णय पक्का... धर तर धर - तोड तर तोड... विषय संपतो... निकाल लागतो ! अर्धवट, मोघम राहीलं तर आधी खदखद न

प्रिये

#प्रिये प्रियेच्या येङ्या ट्रेंडात कुछ रंग मेरे भी.. ... १. मी तुझा कंपायलर तू माझी इरर २. मी तुझा फोर जी तू माझी जियो ३. मी तुझा सिंहगड तू माझी सारसबाग ४. मी तुझा रशोगुल्ला तू माझी बर्फी ५. मी तुझा फाफडा तू माझी जिलबी ६. मी तुझा टॉम तू माझी जेरी ७. मी तुझा पेन तू माझी वही ८. मी तुझा समुद्र तू माझी नदी ९. मी तुझा चेक तू माझी सिग्नेचर १o. मी तुझा ससा तू माझी मांजर.. ११. मी तुझा तेजा... तू माझी तेजू.... प्रिये....

Hanumaan

Image
हनुमान अष्टचिरंजीवांपैकी एक असल्याची मान्यता आहे. आणि रामेश्वरमजवळ त्यांचे अस्तित्व असल्याचं सांगितलं जातं. आणि त्याबद्दलच्या खुणाही मिळाल्याचे दावे आहेत. विविध कालखंडात हनुमानानी संतांना दर्शन दिलेलं - जसं समर्थ रामदास, रघुवेंद्र स्वामी, सत्यसाई इ. तुलसीदासांकडून हनुमानानीच गीतरामायण लिहून घेतलं ! ... हा फोटो हनुमानाचा खरा फोटो असल्याचं बोललं जातं. १९८८ मध्ये कुणीतरी भटक्याला हनुमानाची गुहा सापडली आणि त्यांचं दिव्य तेज सहन न झाल्याने त्या माणसाला मृत्यू आला. पण त्यांचा सहकारी कॅमेरा घेऊन पळाला असंही ऐकलंय. . खरं खोटं हा भाग वेगळा - पण हनुमान प्रत्यक्ष्यात असतील तर, त्यांचं मन काय विचार करत असेल ? .. - त्यांनी राम, सीता, लक्ष्मण, रावण, भीम, सुग्रीव, बिभीषण इ. यूगपुरुषांना प्रत्यक्ष्य बघितलंय. त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलाय... त्यात जे अमर नव्हते उदा. रावण, भरत, सुग्रीव, नलनील, लव कुश, वानरसेनेतील सहकारी, अंजनी-पवनदेव अश्यांची त्यांना आठवण येत असेल ? - सत्ययूग, द्वापारयूग - त्या काळची सृष्टी, माणसं त्यांना लख्खं आठवत असेल - त्या आठवणींत ते भावूक होत असतील ? - सोन्याची लंका, र

Mahaveer Jayanti

Image
महावीर, तथा वर्धमान हे जैन समुदायाचं आद्य दैवत. जैनांमधले २४ वे तिर्थांकर. इश्वाकू कुळात सिद्धार्थ आणि त्रिशला यांच्या पोटी  कुण्डवपूरला त्यांचा जन्म झाला... तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वी... ! इ. स. पू ५९९  मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी दिगंबर संन्यास घेतला आणि साडेबारा वर्ष तपसाधना करून ज्ञान प्राप्त केले... त्यांनी सत्य, अहिंसा, अपरीग्रह, अयौर्य, अस्तेय चा पाठ दिला ... ... जैनांमध्ये असलेली साधु - साध्वी - श्रावक - श्राविका ही रचना महाविरांचीच आहे... जगातले सगळे प्राणीमात्र समान आहेत, त्यामुळे सर्वांप्रति समभाव असावा यासाठी त्यांनी उपदेश केला... जगा आणि जगू द्या... या साध्या सोप्या तत्वावर जैन समाज उभा आहे... ... जैनांविषयी आदर कां ? धुळ्यात, एकदा आमच्या घरासमोरच्या जुनाट पडक्या वाङ्यात एक कुत्रं अडकून पडलं होतं. ज्याने तब्बल तीन दिवसांनी दर्शन दिलं. त्याआधी त्याच्या रडायचा आवाज येत होता. पण नेमकं कुठे ते कळत नव्हतं. तीन दिवसांनी त्या वाड्यात ते कुत्र असल्याचं समजलं... खंगलेलं - उपासमार झालेलं... अर्धमेलं...! ते त्या बंद वाङ्यात गेलं कसं यापेक्षा

Divya Bharti

Image
काही रुपं ही स्वर्गीय असतात, काही व्यक्ती गुढ असतात आणि चिरंतन असतात... दिव्या भारती, मधुबाला या शापित अप्सरांचा सौंदर्य, आयुष्य आणि जगणं तसंच.. ज्यांच्या मृत्यूने त्यांना चिरतरुण ठेवलं ... दिव्या भारती... ! अवघं १८ वर्षांचं आयुष्य, पण त्या लहान आयुष्याचंही तिने सोनं केलं... ... २४ वर्षांपूर्वी याच काळ्या दिवशी दिव्या भारती नामक दंतकथा, अप्सरा, सौंदर्य गुढरित्या संपलं.... तिच्या अस्मानी सौंदर्याची आणि  तिच्या अल्पावधीतल्या यशाची आठवण काढून श्रध्दांजली वाहिल्याशिवाय तिला ओलांडून पुढे जाता येणार नाही.... . ५ एप्रिल १९९३ च्या रात्री पावणेबाराच्या सुमारास प्रचंड सौंदर्य, गोड गळा, लोभस निरागसता लाभलेल्या या अप्सरेनं वर्सोवातल्या घरी पाचव्या मजल्यावरुन झोकून देत जीवन संपवलं. . दिव्या ओमप्रकाश भारती... १९८८ ते १९९३ या पाच वर्षात तिनं यशाचं शिखर गाठलं. शाहरुख खान सोबतच्या "ऐसी दिवानगी" गाण्याने तिला त्यावेळी तरुणांच्या दिल की धडकन बनवलं. ती गेल्यावर "रंग" आणि ''शतरंज" हे तिचे दोन सिनेमे रिलीज झाले. अवघ्या पाच वर्षात तिनं पंचवीस हिट सिनेमे दिले. तिच्या

RIP Kishori Amonkar

Image
आमच्या घराच्या अगदी जवळच रामाचं जुनं मंदिर आहे... रामनवमीच्या काळात तिथे रोज सकाळ - संध्याकाळ भजनं, शास्त्रीय संगीत होतं, जे माझ्या घरापर्यंत सहज ऐकू येतं... आज पहाटे पाचपासूनच तिथे रामायणातली गाणी, अभंग वगैरे सुरु होतं... ... साडेपाचच्या सुमारास मला जाग आली, तेव्हा "अवघा रंग एक झाला" चा आलाप घेणं सुरु होतं, तानपूऱ्याचे सूर, आलाप आणि त्यामागचा नितांतसुंदर आवाज.. अगदी उठल्या उठल्या सरप्राईज मिळावं असं काहीसं घडलं... तो आलाप ऐकून बेडवरच थांबलो, डोळे बंद करुन कान - मन त्या आवाजाकडे केंद्रीत केलं, आणि त्या "अवघा रंग एक झाला" च्या अद्भूत संगीतात पहाट समृद्ध झाली... किशोरीजींना मनातून थॅंक्स बोललो आणि खाली गेलो... प्रसन्न मन, सुंदर सकाळ... छान मूड.. ! .. आणि त्या मूडमध्ये असतांनाच रेडियोवर सातच्या बातम्यांत पहिलीच बातमी " जेष्ठ गायिका पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांचं निधन" एक धक्का बसावा, कुठल्यातरी दुर्देवी योगायोगाचा आपण भाग असावं अशी ती वेळ होती... अर्रर्रर्रर्रर्र... हे काय झालं ? एवढंच निघालं... ! .. देव आपल्या भक्तांना दर्शन देतो, किशोरीजींनी जाता

#BJPमाझा

एबीपी माझानं संघर्ष यात्रेमागची पिकनिक चव्हाट्यावर आणली म्हणून त्यांना शेतकरी विरोधी ठरवलं आणि #bjpमाझा टॅगखाली टिका सुरु झाली... भरीस भर एकाने चक्क महिला पत्रकाराचं वस्त्र फेडायची भाषा वापरलीय... ! तर खांडेकरांचा उघड धमक्या दिल्यात... लायकीवर उतरलेत... .. अर्थात यामूळे एबीपी माझा किंवा त्या टिमला ट्न काहीच फरक पडणार नाही, रॅदर फायद्यातच असतील. यामूळे चॅनेलचा टिआरपी वाढतोय.. .. एबीपी माझा आज यांच्या विरोधात तथ्यं समोर आणतंय म्हणून चवताळले, पण गेली अनेक वर्ष - अनेक पत्रकार दावणीला बांधून दोन न्यूज चॅनेल्स, दोन मोठे वृत्तपत्र समुह एकाच पक्षाची चाटत होते, तेव्हा कुठे गेलेली ही माकडं... ? आणि ज्यांना तो बगळा, सुके वेग्रे नि:पक्ष वाटतात तीच मंडळी एबीपी माझाला बीजेपी माझा म्हणण्यात पुढे आहेत.. .. ज्यांना राज्यशास्त्रातला श, भाषेतला ष आणि पत्रकारीतेला प, कळत नाही असे लोकं कुठली बातमी लावा, कुठली नको हे त्या लोकांना शिकवताय... भैताडांनो - चार चाळण्या लावून, पत्रकारीतेच्या भट्टीत तवून सुलाखून आलेली मंडळी त्या बोस्टन हाऊसमध्ये बसतात... येड्यागबाळ्याचं काम नव्हे.. .. बाकी, एबी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved