Posts

बस - तिलंग

"बस" या अद्तभूत वाहनाचं मला आधीपासून विशेष कौतूक वाटतं. बनानेवालेने अपना पूरा दिमाग लगाके इसको बनाया टाईप... नो नाजूकपणा इज देअर ! सगळं असं भारदस्त ! आपलं अवाढव्य शरीर घेऊन, तीस-पन्नास प्रवाशांसह लांब लांब पल्ले रमत गमत पार करायचे.... याला म्हणतात वट्ट्ट्ट ! पीएमटी असो वा बेस्ट, सर्वकालीन यष्टी ते एसी स्लीपर कोच एअर सस्पेँशन बस... डौल एकसारखाच ! सिग्नलपाशी थांबलेल्या बस बघा, आपल्याच गुर्मित ! नाकासमोर चालणार... इकडे तिकडे बघणारही नाही. एखादा राजा आपला अवाढव्य थाट सांभळत चालतोय असा... . या बस समोरुन जातांना पार नजरेआड होईपर्यँत, "तिलंग" रागातली बंदीश माझ्या मनात वाजत राहते... अगदी सवयीनेच ! त्या बसेसचा मागचा भाग डूलत राहतो... इकडे स्थायी सुरु होते... "चलत चाल गोपी ग्वाल, गजगामिनी डुलत डुलत...." हा रागही खमाज थाटातला, चंचल प्रकृतीचा आणि गंधार-निषाद वादी-संवादी असलेला असल्याने म्हणतांना गोड तितकाच भारदस्त आणि तब्येतीचा ! . बस दिसते, ही बंदिश वाजते, भलमोठं खळखळून हसू येतं... मूड फ्रेश होतो... आणखी काय हवंय... !! ...

निशब्द

माझा व्यवसाय सुरु करुन एक वर्ष होतंय... लहान स्वरुप आहे... पण येणारे अनुभव तगडे ! आजचीच गोष्ट... . पुर्ण झालेल्या प्रोजेक्ट्सची डिलीवरी देण्यासाठी मोस्टली टिमसोबत मी स्वत: जातो... कारण एकतर ओळखी करुन घेणं, दुसरं म्हणजे सगळं स्वत:समोर होतं... धाकधूक राहत नाही. गेल्या महिन्यात मिळालेला एक प्रोजेक्ट हॅँडओवर करण्यासाठी मी क्लायंट कंपनीत गेलो... त्या कंपनीचा संसार जवळपास २०० कोटीँचा. मी ज्यासाठी गेलो त्याची प्रोजेक्ट वॅल्यू काही हजार फक्त... त्यांच्यासाठी म्हणावं तर शुल्लक ! झाड की पत्ती वगैरे... तो प्रोजेक्ट मला मिळणं, मी तो बनवणं, आणि आ करुन सगळं सक्सेसफूली डन करणं हे माझाच विश्वास बसण्यापलीकडे होतं... स्वप्नात असावं असं... . मी आणि माझी टिम तिथे गेलो... पाहूणचार आणि इन्स्टॉलेशनचं काम झालं... ऑल टेस्ट ओके आल्या... धाकधूक खत्म ! पेमेँटका समय आया ! तिथला कोऑर्डीनेटर बोलला, आप उपरके प्लोरपे चलके बॉससे मिलेँगे ? वहापेही चेक मिलेगा, उनको आपसे मिलना है ! . "बॉस ?" इथल्या ब्रॅँचचे हेड वगैरे असतील ! आपल्याला पैशाशी मतलब. (मनातला विचार ! ) - ठिक है ! चलीये. वरच्या मजल्यावर गेल

महालया

Image
. एकवेळ दैवी अस्तित्व नाकारेन, पण मृतात्मे, पितृ, मृत्यूपश्चात असलेलं जग यांवर माझा ठाम विश्वास आहे. माणसाचा मृत्यू हा फक्त शरीराने होतो, तिथे त्याचं केवळ भौतीक अस्तित्व संपतं, पण ती व्यक्ती आत्मरूपाने (पितृरुपाने) सदैव आपल्या आसपासच असते. मी या गोष्टीवर १०० टक्के विश्वास ठेवतो. आपला आत्मा ही एक शक्ती आहे. आणि  The Law of Energy, states that energy can neither be created nor destroyed; energy can only be transferred or changed from one form to another. शक्ती निर्माण होत नाही, नष्ट होत नाही. ती फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जाते. माणसाच्या मृत्यूनंतर शरीर संपतं, आत्मा जिवंत असतो. त्यामुळे मृत्यूपश्चात पितृविश्व आहे. भूत, आत्मा वगैरे गोष्टी सत्यात आहेत ! त्या आत्म्यांनाही तहान- भूक, इच्छा आहेत... आणि त्या इच्छा पूर्ण करण्याची अपेक्षा ते त्यांच्या वंशजांकडून ठेवतात. आपण खूप भूक लागल्यावर खायला मिळत नाही तोपर्यंत चवताळतो तसं या आत्म्यांच्याही या इच्छा तिव्र होतात आणि ते याची जाणीव वंशजांना करुन देतात. "पितृदोष" म्हणतात तो हाच ! एकवेळ देवाच्या पूजेला टाळाटाळ चालेल, पण श

पुढच्या वर्षी लवकर या !

"गणपती अपने गांव चले"... नामक एक व्हिडीओ इतक्यात सरकला डोळ्यासमोरून ! त्यात साधारण साडेअठ्ठावीसीतला एखाद्या प्रायवेट फर्ममध्ये लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मुलासारखा दिसणारा मुलगा, त्याची माssजी टाईप आई, घरोब्याचे संबंध असलेले शेजारचे कुटूंबवत्सल काका, त्यांची लहान मुलं वगैरे जोरजोरात रडत गणपतीची आरती करत होते... . गणपती अपने गांव चले... कैसे न हमको चैन पडेच्या पॅच मध्ये गणपतीकडे बघत हमसून हमसून, जोरजोरात रडणाऱ्या इतरांना काका आपला हुंदका दाबत धीर देतात... पुढे येतात... त्या लेखापालसारख्या दिसणाऱ्या नायकाच्या खांद्यावर हात ठेवतात... "चलो" चा इशारा करतात... तोच माsssजी नही नही करत अजून जोरजोरात रडतात... तो साडेअठ्ठावीस परत हुंदके देत गणपतीच्या अंगावरचे फुल हार वगैरे उतरवतो... त्या माsssजी ते हार जवळ धरुन अजून रडतात... पहिलं कडवं संपलं... . दुसऱ्या कडव्यात - माsssजी आणि साडेअठ्ठावीस एकमेकांना धरून परत  रडतात ! काका परत खांद्यावर हात ठेवतात... साडेअठ्ठावीस गणपतीची मुर्ती उचलतो... माsssजी त्या गणपतीबाप्पाच्या मुर्तीला जवळ घेऊन मुके वगैरे घेतात... काका वगैरे मंडळी प

वाहतूक पोलीस

Image
दोन गोष्टी... दुसरी गोष्ट : वाहतूकीचे नियम पाळणं (उदा. सिग्नल, स्पिड, नो एंट्री, लायसन्स, वन वे वगैरे) हे वाहन चालविणाऱ्या प्रत्येक नागरीकाचं कर्तव्य आहे ! आणि त्याबद्दल नेहमी जागरुक असायलाच हवं ! किंबहूना तेच सुरक्षित ठेवतं ! . पहिली गोष्ट : पोलीसांनी अतिरेक टाळावा. (शंभरातल्या नव्वदांसाठी... उरलेले १० खरंच आदर्शवत असतात ! ) . महामार्गावर कुठल्याही वाहनाला अडवायचं, रस्त्यावर उभं करायचं आणि कितीही इमरजन्सी असली तरीही समजून न घेता शे-पाचशेच्या चिरीमिरी किंवा टार्गेट पूर्ण करण्यासाठी हात धूवून मागे लागायचं... पीयूसी नाही, पेपर्स नाही, हे नाय - ते नाय... - फाड पावती... पैसे नसतील पड पाया... कितीही परफेक्ट रहा - काहीतरी काड्या करून ही लोकं पावती फाडतातच किंवा मनस्ताप तरी देतात... महामार्गावर बघा - एका ट्रकभोवती चार-पाच पोलीस येतात, त्या माणसाला पिडतात... एखाद दुसरा पेपर नसेल तर विचारूच नका, पण जर सगळं परफेक्ट असेल तरीही अपमानीत करुन शे-पाचशे घेतल्याशिवाय सोडत नाही... मंडईत रस्त्यावरच्या विक्रेत्यांचा पाणउतारा करुन ठेवतात... त्या माणसाचं वय, परीस्थिती न बघता... यात कर्तव्य बजावणं

BanMedia

उद्या मी पण पत्रक वाटतो कि नवाकाळ, लोकमतच्या संपादकांची बायको घरी कुंटणखाना चालवते अशी बातमी त्यांच्या घरी काम करणाऱ्या धुणीभांडीवाल्या बाईनी दिली... अशी हि बातमी गावभर करतो... दोनतीन दिवसांनी खुलासा करतो कि सदर बाईनी दिलेली बातमी खोडसाळपणाची असून त्या संपादकांची बायको पतिव्रताच आहे.. चालेल??? मुद्दा हा आहे साहेब,बिग्रेड, स्वाभिमानी चिल्लर आहेत, ते नेहमीच खोटी माहिती पसरवत असतात हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.. तीच खोटी बातमी आपण पहिल्या पानावर कशी काय छापली? त्याबद्दल आपल्याला किती पैसे मिळाले? जर आपणास सदर माहिती खरी असल्यास त्याचे पुरावे का पुढील अंकात छापले नाहीत? चुकीचीच बातमी छापल्याबद्दल खुलासा करताय तर मग माफी का मागत नाही? हा मुद्दा आहे... समस्त हिंदुत्ववादी महाराष्ट्रीयन लोकांना नम्र विनंती आहे कि दिशाभूल करणाऱ्या बातमीबद्दल माफी न मागता केवळ खुलासा छापणाऱ्या दैनिक लोकमत आणि दैनिक नवाकाळ या दैनिकांवर बहिष्कार घालावा, तसेच पैसे घेऊन खोटी बातमी छापून पत्रकरितेला वेश्येचे स्वरूप देणाऱ्या या वृत्तपत्रांवर PTI ने कडक कारवाई करावी यासाठी PTI ला इ मेल करावेत... आपणही करा

श्रावण बाळ

श्रावण बाळ कालची रात्रीचीच घटना.... आमच्या घराजवळ एक रुग्णालय आहे. एक आई आणि मुलगा त्या रुग्णालयातून बाहेर आले. मुलगा मध्यमवयीन, अगदी बारीक, अशक्त वाटावा असाच त्याचा चेहरा होता. आई तशी वयस्कर आणि ती ही बारीकच. नुकताच चांगला पाऊस पडून गेला होता त्यामुळे त्या रुग्णालयाच्या बाहेर पाणी जमलं होतं. ते दोघे बाहेर आले, मुलाच्या हातात कुठलेतरी कागद होते. बाहेर आल्या आल्या ती आई थोडी घाबरली आणि एका जागी एकदम थांबली. तसा मुलगा म्हणाला, थांब आपण हळूहळू जाऊ. माझा हात धर. तिने मुलाचा दंड धरला आणि लहान मूल कशी छोटी छोटी पावलं टाकत दुडूदुडू चालतं, तशी हळूहळू मुलाबरोबर जायला लागली. पाच सहा पावलंच ती दोघं पुढे आली असतील तेवढ्यात खाली रस्त्यावर पाणी साचलेलं त्या आईला दिसलं. ती परत एकदा थबकल्यासारखी थांबली. जोराचा पाऊस येऊन गेल्यावर जसं पाणी साचतं, तसंच आणि तेवढंच पाणी तिथे होतं पण ते पाणी पार करणंही त्या आईसाठी कठीण होतं. मुलगा म्हणाला, काही नाही होणार. माझा दंड असाच घट्ट धर, आपण हळूहळू जाऊयात. आईने मुलाचा दंड तर धरला होताच पण पाय पुढे टाकता येईना. हे पाहिलं आणि मी भराभरा पुढे गेले. व

जावडेकर मिडीया ट्रायलचे बळी ?

छिंदवाड्यात जावडेकर जे बोलले ते जसेच्या तसे : "कितने वीर... नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार पटेल, पंडीत नेहरु... भगतसिंग, राजगुरु... **सभी जो फांसीपर चढे**... क्रांतीवीर सावरकरजी... बाकी महान स्वातंत्र्यसेनानी... ** कितनी लाठीया खायी... कितनी गोलीया खाई...** . भाषण नीट ऐकलं तर लक्षात येईल, नेहरू नंतर त्यांनी काही क्षण पॉज घेतला, ते वाक्य संपलं, नंतर भगतसिंग, राजगुरू यांचं नाव घेऊन " सभी जो फांसीपर चढे... असा सरळ शब्दप्रयोग आहे. यात "सभी..." म्हणजे जे जे फासावर गेले ते ते सगळे यांचा एकत्र उल्लेख आहे.... जर या पाच नावांनंतर "ये सभी" असतं तर होणारे आरोप ठिक होते... पण सरळ वाट असतांना मुद्दाम वाकड्या वाटेने मिडीया का जीव द्यायला जातंय... त्यात "फासी गये".... "कितनी लाठीया खायी... कितनी गोलीया खाई..."... हे "वैयक्तीक" त्या त्या लोकांसाठी आहे जे जे फासावर गेले... "किंवा"... गोळ्या झेलल्या... "किंवा"... काठ्यांनी मार खाल्ला...  आणि उर्वरीत महान स्वातंत्र्य सैनिक ... जे एकत्र एकाच वाक्यात जावडेकरांनी बसवलं नाही

Paluskar

Image
एकदा एका  राजदरबारी मैफलीत यांचे गाणे होते  गाताना  त्यांना  सिगार चा    वास आला त्यांनी धूम्रपान करणाऱ्या माणसाला ते  थांबवण्यास  सांगितले. डोळे अधू असल्यामुळे  ती व्यक्ती कोण हे त्यांनी पाहिले नव्हते. ते  धूम्रपान करणारे स्वतः  महाराजा होता तसे त्याला सांगण्यात आले हा उद्गारला या गान  दरबाराचा  मी महाराजा आहे त्यांना सांगा धूम्रपान  थांबवा नाही तर निघून जा असा बाणेदार पणा दाखवणारे महान गायक आणि संगीत शिक्षण महर्षी म्हणजे विष्णू दिगंबर पलुस्कर होत. भारतीय शास्त्रीय संगीतात  दिग्गज कलाकार आहेत, घराणेबाज  गायक आहेत, पण संगीताला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा  आणि हे संगीत गुरुशिष्य परंपरेच्या काहीश्या जाचक परंपरेतून मुक्त करण्याचा मान हा निः संशय पणे  विष्णू दिगंबर यांच्याकडे जातो  . कुरुंदवाड सारख्या छोट्या गावात जन्मलेला, अधू दृष्टी असलेला कलाकार  लाहोर मध्ये  जातो आणि  संगीत महाविद्यालय सुरु करतो हे विश्वास न बसणारे आहे गांधर्व महाविद्यालय या संगीत शिक्षण देणाऱ्या संस्थेची  निर्मिती करून संगीत ज्ञानाची  गंगोत्री या माणसाने सर्वसामान्य माणसाच्या माजघरात नेली.आणि विशेष म्हणजे कोणत

Casteism

सिंधूची जात हे गुगल सर्चवर पॉप्यूलर झाल्याची कुणीतरी पुडी सोडली, एकदम पुरोगामी झालेले इथे एकसूरात व्ह्यॉक्यू व्ह्यॉक्यू ओरडायला लागले... खरं तर जी गोष्ट तिथेच दाबायची, तिचा बोभाटा झाला... ज्याला काही पडलेली नाही तो तिची जात शोधू लागला... आधी ५००-७०० सर्च आता २९००० वर गेलंय ! . ज्याला तिची जात जाणून घ्यायचीय, शोधू द्या ना... असंही सगळं जातीवरच चालतं... काहींचं उघडपणे, काहींचं लपत-छपत. जातीत इंटरेस्ट सगळ्यांना असतो... आपलं ते पोर - त्याचं कार्ट असतंच ! पण या गोष्टींना उगाच वाढवून तिच्या यशाला झाकोळता कामा नये इतकंच ! . माझ्या आडनावावरूनच कळतं म्हणून मला अनूभव नाही, पण " तुह्या धर्म कोंचा ?" विचारुन ओळख करणारे इथे पण आहेत... हि कीड वरवरची नाही, आतमध्ये रुजलीय !..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved