Posts

अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpeyi

Image
दि. २८ मे १९९६, संसदेत एक ऐतिहासिक क्षण साजरा होणार होता... संसदेच्या आजपर्यंतच्या इतिहासातली एक महत्वपूर्व घटना घडणार होती... सभापती होते पी. ए. संगम्मा. अनेक पक्षांचा टेकू घेऊन निर्माण झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला बहूमत सिद्ध करायचं होतं, ऐनवेळी धोका झाला - आणि बहूमत नसल्याचे जाणून वाजपेयींनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला... पण तत्पूर्वी त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केलेल्या काँग्रेस सरकारची संसदेतच पुराव्यासकट न भूतो न भविष्यती अशी पिसं काढून "मै यहाँसे सिधा राष्ट्रपती महोदयके पास अपना इस्तिफा सौंपने जा रहा हूँ".... म्हणत निघाले देखील ! कॉंग्रेस सरकारला तेव्हा बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, पुढची आठ वर्ष ते त्यातून सावरले नाहीत ... केवळ तेरा दिवसांचं वाजपेयी सरकार पडलं - सुर्यास्त वाटला - पण प्रत्यक्ष्यात ते ढग होते, ते हटले आणि भाजपाचा लख्खं प्रकाश पडला... या रथाचे सारथी होते अटल बिहारी वाजपेयीजी... ! .. १९९८-१९९९ तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा होतो... थोडीफार समज आली, तेव्हा हा देश आहे, यासाठी कुणी एक पंतप्रधान असतात, ज्यांचे फोटो

श्यामच्या आईचं आज काय करायचं...

Image
*श्यामच्या आईचं आज काय  करायचं.......?*                         _यशोदा सदाशिव साने_  _मृत्यू २ नोव्हेंबर १९१७_  *श्यामची आई* नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.    कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.              गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बापट यांनी गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की *कशी होती हो गुरुजीची आई?* तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाल

दिलीप प्रभावळकर : 75th Birthday

Image
ज्या माणसांशिवाय मराठी चित्रपटसृष्टी अपूर्ण आहे, ज्यांना पडद्यावर बघितलं तरी घरातलं माणूस भेटल्याची जाणीव होते ते दिलीप प्रभावळकर... जन्माला येतांनाच ते आपल्याभोवती प्रभावळ घेऊन आले... मराठी चित्रपटसृष्टीतले बिग बॉस... बघताक्षणी आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर बायडिफॉल्ट व्हावा अश्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा, प्रभावळकरांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस... ! .. साडेपाच - सहा फुट उंची, गौरवर्ण आणि चेहऱ्यावर असलेला अभिजात आत्मविश्वास... या रुपासह प्रभावळकर चित्रपटसृष्टीत अवतरले... एखाद्याच्या बाबतीत निसर्ग भरभरुन देतो - प्रभावळकरांच्या डोक्यावरचं टक्कलही त्यांच्या व्यक्तीमत्वाला चार चाँद लावणारं, साजेसं आहे... ! शुद्ध मराठी, कणखर आवाज, न आणि ण, श आणि ष, ट आणि ञ यांतील फरकासह असणारी आणि विरामचिन्हांचा आदर करणारी सुस्पष्ट शब्दफेक, भारदस्त देखणं रुप या बळावर प्रभावळकर मराठी अभिनयातले सुपरस्टार झाले.. .. चि. वि. जोशी लिखीत चिमणराव गुंड्याभाऊ मध्ये प्रभावळकरांनी बाळ कर्वे यांच्यासह कोकणस्थ भट चिमणराव साकारले... सत्तरच्या दशकातील मराठी मध्यमवर्गीय माणूस आणि मित्रासमवेत असणारी त्यांची जुग

Fact behind Poladpur Accident

Image
मुंबई: पोलादपूर बस दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या बचावलेले कोकण कृषी विद्यापीठाचे अधीक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी अपघाताचा थरार एबीपी माझावर सांगितला. या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी मीच आहे. अपघात झाला, बस कोसळली त्यावेळी तिथे कोणीही नव्हती. त्यामुळे माध्यमांमधून जे काही अॅनिमेशन किंवा प्रत्यक्षदर्शी म्हणून दाखवलं जात आहे, ते सगळं झूठ आहे. लोकांच्या भावनांशी खेळू नका, वाट्टेल ते दाखवू नका, वाट्टेल ते बोलू नका, असा संताप प्रकाश सावंत देसाई यांनी व्यक्त केला. प्रकाश सावंत देसाई यांनी याबाबत सातत्याने मराठीतील एका वृत्तवाहिनीचे नाव घेतलं. त्या वृत्तवाहिनीने जे घडलं नाही ते दाखवलं. मी उडी मारली, मला दोरी टाकून वर घेण्यात आलं असं सांगितलं जात होतं. पण प्रसिद्धीसाठी ती वाहिनी काहीही दाखवत होती. आमच्या भावनांशी खेळत होती, त्यामुळे प्रचंड चीड, राग येत होता, असं प्रकाश सावंत देसाई म्हणाले. आसपास कोणी नव्हताच, तर ड्रायव्हर मागे बघत होता हे तुम्हाला कसं कळलं? मी प्रत्यक्षदर्शी आहे, मी जे सांगतोय तेच खरं आहे. मातीतून गाडी घसरली ते थेट खाली कोसळली, असं प्रकाश सावंत देसाईंनी सांगितलं.

"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !...

Image
"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !... ... दि. २० एप्रिल २०१८ - कसं वागावं, कुणाकडे बघू नये, कसं रहावं, काय केल्याने भलं होईल, काय न केल्याने तुझ्यामागे भिती राहणार नाही ... या प्रश्नांचं उत्तर -  "खाली मुंडी घालून गपगूमान ऐकावं त्यातच भलं असतं" या जागतिक मंत्राचा अनुग्रह मिळाला - आणि याच दिवशी आयुष्यात नव्या गुरूंचं पदार्पण झालं... सौ. तेजस्विनी तेजस कुळकर्णी ... ... "तेजसराव सांभाळा"... हे पाठवणीच्या वेळी सासूबाई म्हणाल्या होत्या.... त्यात तेजसराव आणि सांभाळा मध्ये साइलेंट "तुम्हाला स्वतःला" हे होतं, याची फोड सासरेबुवांनी हल्लीच केली... आपल्या माणसाची आपल्याला गॅरंटी असते (पक्षी : त्यांची मुलगी) -  म्हणून तुम्हाला सावध केलं..." - आपल्याला लाभलेली गुरु जबरदस्त आहे याची खात्री पटली ....! ... आई, पप्पा, आजोबा, शाळेतले शिक्षक, स्वतःचे अनुभव या सगळ्यांसह नवी गुरु लाभली आहे... "अहो, ऐक ना" म्हणाली की सरळ खुर्चीवर बसायचं आणि मिळणारं ज्ञान घ्यायचं इतकं सरळ सरळ शिक्षण सुरु आहे !  Jokes apar

Rajiv Gandhi vs Rahul Gandhi

मला किती ही काँग्रेस नको असली तरीही पप्पू का जाना जरुरी है  Sarang Darshane ह्यांच्या  ब्लॉगवरील लेख आहे... राजीव आणि राहुल…. इंदिरा गांधी यांची हत्या ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी झाली, तेव्हा २० ऑगस्ट १९४४ रोजी जन्मलेले राजीव गांधी बरोबर ४० वर्षांचे होते. मातेच्या दुर्दैवी हत्येनंतर काही तासांतच राजीव यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पुढे राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी धानू या मानवी बाँबच्या साह्याने तामिळी वाघांनी हत्या केली, तेव्हा राहुल तुलनेने खूप लहान होते. १९ जून १९७० रोजी जन्मलेले राहुल आणखी काही दिवसांनी आपला एकविसावा वाढदिवस साजरा करणार होते. राजीव यांची हत्या झाली तेव्हा ते अवघे ४६ वर्षांचे होते आणि त्यांची राजकीय कारकीर्द उणीपुरी दशकभराची होती. राहुल गांधी हे आज ४८ वर्षांचे आहेत आणि यातला गेला चार वर्षांचा नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा काळ सोडला तर त्याआधीची सलग दहा वर्षे संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता होती. दहाही वर्षे डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान होते. इंदिरा गांधी जानेवारी १९८० मध्ये पुन्हा सत्तेवर आल्या. २३ जून १९८० रोजी राजकारणात असणारे धाकटे पुत्र सं

सुमित्रा महाजन : लोकसभा अध्यक्ष... संयममूर्ती

Image
सुमित्रा महाजन : लोकसभा अध्यक्ष... संयममूर्ती...! .. कुठलंही अधिवेशन हे लोकसभा - राज्यसभा सभापतींच्या समोर घडतं... राज्यसभेचे पिठासीन सभापती हे मा. उपराष्ट्रपती असतात, तर लोकसभेचे सभापती हे निवडून आलेल्या सदस्यांतून निवडतात... ! .. १६ व्या लोकसभेच्या सर्वोच्च पदावर एक महनीय व्यक्ती आहेत... सुमित्रा महाजन... माहेरच्या सुमित्रा साठ्ये... वय वर्ष ७५  ... ! सद्यस्थितीत भारतातील एकमेव महिला ज्यांनी सर्वात जास्त काळ लोकसभेत पद भूषवलं... १९८९ पासून आजपर्यंत त्या लोकसभेत आहेत... .. ही म्हणावं तर सगळ्यांत संवेदनशील, धगधगती लोकसभा.. सरकार ते विपक्ष सगळेच अतंरगी... पण या सदस्यांना फक्त नजरेच्याच धाकात ठेवण्याचं कसब त्या अनूभवातूनच असावं... वर्गात शिकवणाऱ्या बाई समोर आल्यानंतर सगळी पोरं जशी गप्प बसतात तसाच धाक सगळ्या सदस्यांना महाजनांचा वाटतो... .. आज तर खरा कस लागण्याचा दिवस, त्यातही सदस्यांना ओरडून शांत करणं - रा.गा.ला कडक शब्दांत समज देणं - अनावश्यक मुद्दे खोडून काढणं - निःपक्षपणे, तटस्थपणे सगळं सांभाळणं - हसत खेळत, मर्यादा सांभाळून सभागृह चालवणं - आणि न थकता, न कंटाळता बस

Lesson

एखादी गोष्ट घडली, दुर्देवानं हरलो - काहीतरी गमावलं - त्रास झाला - किंवा धडपडलो ... तर नुकसान झालं असं समजू नका - त्यातून आपण लाखमोलाची गोष्ट कमावलेली असते... ... "धडा"... ! .. तो कसा घ्यायचा हे फक्त व्यक्तीसापेक्ष असतं !

CCTV

घरी बायको असतांना सीसीटीव्हीची गरज पडत नाही - जागरुक रहावंच लागतं ... ती दोन कप चहा पितांना, ओला टॉवेल चुकून बेडवर ठेवला तर, थोडाफार पसारा झाला तर, कप फुटल्यावर, सोफ्यावरच कव्हर विस्कटलं तर - फुस्स्स करुन नारद मुनी प्रकट होतात तसं कुठूनही प्रकट होते... आणि, ..... .... ... .. . पुढचा अर्धा पाऊण तास फैलावर घेते - ... त्यामुळे मी हल्ली घाबरून घाबरून राहतो... ! ..

Opportunity only knocks once : Business Lesson

माझी कंपनी टिके टेक्नॉलॉजी मध्ये एक प्रोजेक्ट २०१६ च्या शेवटी आम्ही दोघांनी सुरु केला... तेव्हा कंपनी सुरु करुन अवघं एक वर्ष झालेलं, तितकासा अनुभव नाही, छोटासा प्रोजेक्ट मिळाला तरी आकाश ठेंगणं व्हायचं... आणि त्यात तो प्रोजेक्ट म्हणजे तेव्हाच्या मानानं उंच उडी म्हणावा तसा... तेव्हा संपूर्ण कंपनीची टिम साईज होती ६ ... ! माझा एक मित्र ती कन्सेप्ट घेऊन आलेला... कन्सेप्ट आवडली... मिटींग झाली, माझे ६०- त्याचे ४० मध्ये ठरलं.. मी, तो मित्र आणि डेव्हलपमेंटचे दोघं अश्या चौघांच्या टिमनं त्या प्रोजेक्टवर काम करणं सुरु केलं ...! ... स्वतःचा कुठलाही लाँग टर्म प्रोजेक्ट किंवा प्रॉडक्शन म्हणा हवं तर (दुसऱ्यांचे प्रोजेक्टस् घेऊन त्यावर काम करणं नाही, हे स्वतःचं...) सुरु झाल्यानंतर किमान ६-८ महिने प्रॉफीट दूर, अडकवलेल्या कॅपिटलचं तोंड दिसत नाही... प्रॉफीट वगैरे निघत किमान वर्ष जातं... लाँग टर्म प्रोजेक्ट मूळातच लाँग टर्म असल्याने त्याचं यश-अपयश कळायला किमान एखादं वर्ष लागणार हे गृहीत असतं - एखादं बाळ जन्माला घातल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याने शर्ट-पॅन्ट घालून ऑफीसला जावं आणि पैसे कमवावे हे जितकं अशक्य

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved