Posts

Ujhma Pakistan Affair

Image
उझमा नावाची भारतीय स्त्री सिंगापूर थायलंड फिलीपीन्सला मलेशियात फिरायला गेली. तिथे, ताहीर या पाकीस्तानी माणसाला भेटली. मैत्री झाली, प्रेमात पडली, तिथून एक आठवडा ती त्याच्याबरोबर पाकिस्तानला गेली. तिथे त्याच्याशी लग्न लावलं, आणि अंगावर आलं तसं आरडाओरडा सुरु केला... .. उज्मा म्हणाली की अशा फसवून आणलेल्या कितीतरी विविध देशातील स्त्रिया तिथे होत्या...एकाच माणसाच्या अनेक बायका... सुषमा स्वराज यांच्या मुळे आज ती सहीसलामत परत भारतात आली.. तिच्या येण्याचा सोहळा होतोय... ती किती निरागस आहे, किती भोगलं वगैरे सुरु आहे... ति वाघा बॉर्डरवर नमस्कार करते, सुषमा स्वराज यांना नमस्कार करते हे सारखं सारखं दाखवताय... पण तथ्य आहे ? .. आधी खङ्ङ्यात उडी मारायची आणि नंतर बाहेर काढण्यासाठी बोंबलायचं - मंत्रालयाने कामधंदे सोडून अश्या मुर्ख लोकांना वाचवायचं - इतकंच ? मूळात घरी एक नवरा असतांना, पाच वर्षांची मुलगी असतांना परदेशात परपुरुषाबरोबर संबंध ठेवायचे, लग्न करायचं - झेपलं नाही की बोंबलायचं ! .. पाकिस्तानने तिचे सगळे आरोप पुराव्यासह फेटाळले आहेत... - फसवून लग्न केलं - पाकिस्तानी कचेरीत रितसर निकाह

Strong Fadanvis

Image
काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि फेसबुकवर पोस्ट्स चा अक्षरशः पाऊस पडला! त्यात शुभचिंतकही होते आणि हितशत्रू सुद्धा! आपली नीच मनोवृत्ती दाखवून देणारे काही महाभागही होते यात. अपघात नक्की कसा झाला, जबाबदार कोण वगैरे वगैरे चर्चाही घडल्या. . पण या सगळ्यात इतर कुठेही ऐकायला, वाचायला न मिळालेली एक interesting माहिती काल एका वाहिनीवर एव्हीएशन तज्ञ विक्रांत चांदवडकर यांच्याकडून ऐकायला मिळाली. . हा अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टरमधील इतर सर्वजणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्याच्या रिपोर्टनुसार मुख्यमंत्री सोडून इतर पाचही जणांचे bp high झाले होते. फक्त मुख्यमंत्र्यांचे bp त्या परिस्थितीत सुद्धा नॉर्मल होते! . अपघातामधून मुख्यमंत्री सुखरूप राहिले ही तर आनंदाची गोष्ट होतीच. पण जेव्हा एखादा अपघात किंवा अशीच एखादी घटना घडते, तेव्हा शारीरिक दुखापत जरी झाली नाही तरी मनाला मात्र धक्का पोहोचत असतो. हा अपघात प्रत्यक्ष बघणाऱ्यांनादेखील निश्चित धक्का बसला असेल. साधा रागाचा पारा जरी चढला तरी रक्तदाब वाढतो. मनावर होणाऱ्या चांगल्या वाईट आघातांचा परिणाम हा रक्त

छोट्या गोष्टी..... भुताच्या

Image
नवरा बायकोचा खून करतो. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गाढ झोपेत असतो. चार दिवस उलटल्यानंतरही मूल आई कुठे आहे विचारत नाही. बापाच्या हृदयात चर्र होतं. बाप- तुला काही विचारायचं का? मुलगा- आई सतत तुमच्यामागे का उभी असते? =========== मध्यरात्री जाग आली. १२ वाजून ७ मिनिटं झाली होती. तिने तिची लांब नखं माझ्या छातीत घुसवली होती. दुसर्य़ा हाताने ती माझं तोंड दाबत होती. मी खाडकन् जागा झालो. स्वप्न होतं ते. जीव भांड्यात पडला. घड्याळात पाह्यलं. १२ वाजून ६ मिनिटं झाली होती. बाथरूमचा दरवाजा मधोमध फाटला होता. ============= मुलगा: बाबा आपल्या घरात भुत आहे. वडिल: भुत वगैरे काही नसते, कोणी सांगितले तुला हे सगळे. मुलगा: आपल्या घरातील मोलकरीण सांगत होती. वडिल: चल सामान बांधायला घे आपल्या घरात भुत आहे. मुलगा: पण तुम्हीच म्हणाले भुत नसते. वडिल: हो बेटा पण आपल्या घरात मोलकरीण पण नाही. ============= बायकोने रात्री उठवलं. कोणीतरी घरात शिरलंय हे सांगताना ती पांढरीफटक पडली होती. दोन वर्षांपूर्वी रात्री एका दरोडेखोराने तिचा खून केला होता. ============= काचेवर टकटक झाली आणि मी जागा झालो. मला

Indian Tendency

Image
नव्या कोर्‍या रेल्वेगाडीतील चोरीला गेलेले हेडफोन्स आणि एकूणच भ्रष्ट झालेला आपला समाजपुरूष . सार्वजनिक संपत्तीचा आदर ठेवण्याची आपल्याकडे पद्धत नाही. त्यामुळे नव्या कोर्‍या गाडीतल्या एलसीडी स्क्रिन्सची मोडतोड झाली, हेडफोन चोरीला गेले याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हेडफोन सुटे होते, म्हणून चोरीला गेले. एलसीडी स्क्रिन नव्हते म्हणून जागेवर राहिले. लोकांकडे अलीकडे आपापले फोन वगैरे असतात. ट्रेनमध्ये एलसीडी स्क्रिनचा उद्योग कोणी सांगितला होता असा प्रश्न आता विचारला जाईल. पूर्वी सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये फूलन देवीला दुरूनच निर्वस्त्र दाखवले तेव्हा लोकांना दया येण्याऐवजी त्यांनी शिट्ट्या वाजवल्या होत्या. मस्तपैकी शिव्या हासडल्या होत्या. असे प्रकार नेहमीच होऊ लागले म्हणून ज्यांना शक्य होते त्या लोकांनी महागाची तिकिटे काढून मल्टिप्लेक्समध्ये जाणे पसंत केले. आता मल्टीप्लेक्समध्येही शांत राहून सिनेमा पाहिला जात नाही. चांगले मॅनर्स आहेत अशी समजुत असलेल्या लोकांच्या सवयी बिघडल्या आणि त्याचबरोबर आजवर मागास असलेल्या समाजातील लोकांकडेही आता पैसा खुळखुळु लागलेला आहे. पैसा तर आहे, परंतु सार्वजनिक ठि

परिकथा

Image
आपलं लग्न व्हावं, लग्नात आपण खूप नटाव .. असं स्वप्न ललिता बन्सीने पाहिलं होतं... पण वयाच्या 20व्या वर्षी  Acid attack झाल्यावर तिची सगळी स्वप्न भंगली...अचानक राहुल कुमार याने चुकून डायल केलेला नंबर आणि तिथून गप्पांना झालेली सुरुवात... आणि ललिताला न पाहता राहुल कुमारने घातलेली लग्नाची मागणी ... सगळी कहाणी स्वप्नवत आहे... विश्वास बसत नाही... पण या दोघांना भेटल्यावर जाणवलं... असंही होऊ शकत...ललितावर acid  हल्ला झालाय... ती इतर मुलींसारखी नाही किंबहुना सुंदर या व्याख्येत पण बसणारी नाही... आणि हे माहीत असताना पण राहुलने लग्न केलं...त्याच्या प्रेमाला सलाम!! ललिताला सजताना,  हसताना पाहून जाणवलं... आयुष्य खरंच सुंदर आहे... अनेक लग्नात महागड्या साड्या, दागिने घातलेल्या नववधू पाहिल्या... पण ललिता सर्वार्थाने आजपर्यंत मी पाहिलेली सगळ्यात सुंदर नववधू आहे.. तिचं हसणं,आनंद सगळं सगळं मनापासून वाटलं... तिच्या सुखाला कोणाची नजर लागू नये.... ज्या राहुलने तिला आहे तसं स्वीकरल... त्याच जरा जास्त कौतुक ... Arrange marriage च्या बाजारात इतक्या वर्षात आलेले अनुभव आणि नकार आज सगळे एका फटक्यात  आठवले ... आणि

Indian Sanitary Napkin

Image
एका पुरुषाने बनवले उपयुक्त आणि स्वस्त देशी सॅनिटरी नॅपकिन्स _____________________________ या सॅनिटरी नॅपकिन्सची किंमत आहे फक्त १० रुपये! १० रु. ६ सॅनिटरी नॅपकिन्स. चला यावर अधिक जाणून घेऊया... मासिक पाळीबद्दल भारतात चारचौघात चर्चा करणे निषिद्ध मानले जाते. परंतु उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने अतिशय स्वस्तात मासिक पाळीमध्ये वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती केलेली असून त्यामुळे लाखो गरीब ग्रामीण महिलांना रोजगारदेखील मिळालेला आहे. ही व्यक्ती आहे, #शास्त्रज्ञ - #महेशखंडेलवाल! खंडेलवाल उत्तर प्रदेशातील बी. चंद्रकला या महिला आयएएस अधिकाऱ्याला भेटले असता, चंद्रकला यांनी ग्रामीण महिलांची अडचण त्यांना बोलून दाखवली, पण एक भारतीय पुरुष असल्याने असेल किंवा अजून काही, त्यांना मासिक पाळी या प्रकाराबद्दल खूपच कमी माहिती होती. त्यांनी या विषयावर भरपूर वाचलं, वेगवेगळे प्रयोग केले, आणि या अवलियाने एक नवीन डिझाईन बाजारात आणलं. सॅनिटरी नॅपकिन्सचा बाजार बहुराष्ट्रीय कंपन्यांनी काबीज केलेला आहे. हे सॅनिटरी नॅपकिन्स अतिशय महाग आणि पर्यावरणाला अपायकारक असतात, इतर जैविक कचऱ्याप्रमाणे नष्टदेख

Birthday Of Papa

Image
मास्टर्स पूर्ण झाल्यावर जॉब न करता मी व्यवसाय करायचं ठरवलं... निर्णय तसा रिस्की होता, परत पुणे सोडून मुंबईत जायचं ! खूप टेंशन यायचं, धडधड व्हायचं - व्यवसाय स्थिरसावर होईपर्यंत प्रचंड आर्थिक टणटण होणार हे ही नक्की होतं... व्यवसायाची बॉर्न टू रन ही फेज काढणं तसं भयंकर असतं - प्रचंड कोंडी होते... ती भयंकर फेज माझ्या नशीबातही आली... ते ही वयाच्या पंचविशीत ! ... पण पप्पा म्हणाले...  "तू कर - मी आहे सोबत... ! " माझ्या नकळतच पप्पांनी माझी ती फेज सांभाळून घेतली... आर्थिक - भावनिक आणि मानसिकही...! एका शब्दानेही जाणवू दिलं नाही...! सगळंच सहज मान्य केलं ... ... आता माझं गाडं ट्रॅकवर आलंय (टचवूड).. काल पप्पांच्या डोळ्यात ते समाधान दिसलं... "माझ्या तेजाने त्याची कंपनी उभी केली"... त्यांनी हे बोलल्यावर टचकन पाणी आलं माझ्या डोळ्यात... सार्थक झालं... ... माझ्यासाठी देव इथेच सुरु होतो, इथेच संपतो... प्रत्यक्षातला ! ... माझ्या कातडीचे जोडे करून घातले तरी हे ऋण फिटणार नाही ... फिटायलाही नको ! Happy Birthday पप्पा !

Rima Lagoo

Image
मराठी असूनही हिंदीत भक्कम पाय रोवलेल्या थोड्या लोकांपैकी एक रिमा लागू होत्या... त्यांच्या जाण्यानं ते स्थान रितं झालंय... ! .. देखण्या, चेहऱ्यावरचा प्रचंड आत्मविश्वास यामूळे गर्भश्रीमंत स्त्रीची भूमिका केवळ त्यांच्यासाठीच आहेत की काय असं वाटायचं... हम आपके है कौन, हम साथ साथ है, मैने प्यार किया या तीन चित्रपटात त्यांच्या अॅपिअरन्सनी चार चाँद लावले... ! कयामतसे कयामत तक, दिलवाले, प्रेमग्रंथ, जुडवा, आंटी नं १, कुछ कुछ होता है, वास्तव, जिस देस मे गंगा रहता है अश्या शेकडो हिट चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या - जगवल्या ...  . पडद्यावरचा त्यांचा वावर कधी मिश्कील, समजूतदार तर कधी गंभीर, हळवा असायचा... जितका दमदार अभिनय तितकाच गोड आवाज... त्या सहज बोलायच्या... त्या पात्राशी एकरूप व्हायच्या... गर्भश्रीमंत स्त्रीच्या वागण्यातला आत्मविश्वास, अभिमान जितका सहज साकारायच्या - कनवाळू आई मध्ये पण तितकाच जीव ओतायच्या... मिश्किल, कॉमेडी भूमिकांनाही त्यांनी पुरेपूर न्याय दिला... ... हिंदीत जम बसला तरी मराठीतही त्यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या... सिंहासन मधल्या राजकारणी, बिनधास्त मधल्या उद्योजक, आई

3 Years Of Modi Government

■ #मोदी_सरकारची_3_वर्षे मोदी सरकारला आज 3 वर्षे पूर्ण झाली. काही गोष्टी मला दिसतायत काही दिसत नाहीत. पण मी समाधानी आहे कारण गेल्या तीन वर्षात - > मला रेल्वेत, बेकरीत, हॉटेलात बॉम्ब फुटताना दिसत नाहीयेत.पुण्यात-मुंबईत-हैदराबाद-बंगलोरमध्ये मला अतिरेकी घुसलेले दिसत नाहीत. मला आतंकवादी लोक गोळ्या घालून मारलेले दिसत आहेत. मला सीमेपालिकडे घुसून मारण्याची कारवाई केलेली दिसतेय. मला हे करताना लांगुलचालन सोडून थेट अप्रोच बाळगलेला दिसतोय. मला आतन्कवाद्यांवर घेतली जाणारी उघड भूमिका दिसतेय. > मला हजारो लाखो कोटींचे घोटाळे उघडकीस आलेले दिसत नाहीयेत. आरोप-प्रत्यारोप आपल्या जागी पण कोर्टात चार्जशीट दाखल झाली असा एकही भ्रष्टाचाराचा घोटाळा मला दिसत नाहीये. आधी मला दर दोन महिन्यातून एकदा भ्रष्टाचाराची ब्रेकिंग न्यूज दिसत असे, आताही क्वचित दिसते पण ती देखील ह्या सरकारची नव्हे. > मला रस्ते-हायवे डोळ्यासमोर पूर्ण होताना दिसत आहेत. 2004-2014 काळात क्वचित कुठेतरी रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम दिसे, मुंबई-हैदराबाद हा हायवे गेल्या तीन वर्षात सोलापूर-हैदराबाद ह्या दरम्यान पूर्ण ट्रान्सफॉर्म झालेला मल

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved