Posts

गुरुचरीत्र पारायण

Image
अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि

Brahman Reservation (ब्राह्मण आरक्षण)

ब्राह्मण आरक्षण... #ब्राह्मण_आरक्षण .. पहिला मुद्दा : आरक्षण इतकं सहज मागितल्याने आणि इतकं लगेच मिळत नाही... सरकार स्तर ते कोर्ट असं लढावं लागतं... त्यातही व्यापक स्तरावर लढा उभारावा लागतो... माणूस ते माणूस प्रत्येकजण त्यात सहभागी व्हावा लागतो... बरंच मोठं प्रकरण आहे... आत्ता मागणी केली, अखंड आणि प्रभावीपणे लढलं तर माझ्यासारख्या पंचवीस ते तीस दरम्यान असणाऱ्‍या मुलांच्या मुलांच्या मुलांना आरक्षण मिळू शकतं... आणि प्रत्यक्ष्य फायदा त्यांच्या मुलांना...!!  . आरक्षणाची गरज आहे कां ? - आरक्षणाची नाही पण आर्थिक आधाराची आणि सामाजिक सुरक्षेची गरज ग्राउंड लेव्हलवर खरंच आहे. (ग्राउंड लेव्हल : शहरी मध्यमवर्गीय आणि त्याखालील स्तर, ग्रामीण भागातील ब्राह्मण, शेतकरी) शिक्षणासाठी फि देणं बऱ्‍याच लोकांना परवडत नाही हे एकदम सत्य आहे... आणि त्यामूळे नोकरी व्यवसायात ब्राह्मण मुलं कमी पडतात. पिढी दर पिढी कुटूंबचं कुटूंबे गरीबीत राहतात.  . आरक्षणाचा विचार केला तर जो समाज मागासवर्गीय आहे त्या समाजाला आर्थिक, सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देतात. मराठा आरक्षणादरम्यान दिसलं तसं स

Bank, Me and PMO

एटीएमच्या सात हजाराचं प्रकरण फायनली सुटलं... . मागच्या एका पोस्टमध्ये म्हणालो तसं - एटीएममधून सात हजार काढायला गेलो आणि निघाले नाही, पण बॅँकेच्या खात्यातून डेबिट झाले... मग मी बॅँकेकडे तक्रार वगैरे केली पण त्यात यश मिळालं नाही... हा मुद्दा... अब आगे... . दरम्यान बॅँकेने "प्रिऑर्बीटरी व्हेरीफीकेशन प्रोसेस रिजेक्टेड" असा निर्णय दिला. रिव्हेरीफीकेशन प्रोसेस करायची असेल तर ५९८ रुपये भरा असं सांगितलं... माझे पैसे बॅँकेच्या चुकीनं गेले ते गेले, ते मिळवायच्या प्रयत्न करण्यासाठी मला परत सहाशेचा फटका बसणार होता. त्यावर "मी एक रुपयाही देणार नाही" असं उत्तर पाठवलं...! . नंतर, इथल्या सल्ल्यानूसार मी "बॅँक लोकपाल" कडे तक्रार केली... सगळं प्रकरण व्यवस्थित मांडलं... पण फार चांगला किँवा कुठलाही रिप्लाय मिळाला नाही. त्यांची डेडलाईन संपली... मग ग्राहक मंचाकडे मी रितसर तक्रार केली...  . ग्राहक मंचाकडून बॅँकेकडे पाठपूरावा केला गेला... बॅँकेच्या एथोरिटीने "प्रिऑर्बिटरी व्हेरीफीकेशन रिजेक्टेट" अश्या रिप्लायने केस डिसमिसची मागणी केली... आणि ती केस

दिवाळीची प्रार्थना... देवा...

Image
देवा, माझ्या गरजा भागतील इतका पैसा मला दे, पण तो देतांना मी ऐतखाऊ होणार नाही हे नक्की बघ... मला मिळालेला पै न पै हा फक्त माझ्या प्रामाणिक कष्टाचाच असू दे... मला ते कष्ट करण्याची शक्ती आणि संधी दे... देवा, खूप पैसा मिळाला तरी, मी उतणार नाही, मातणार नाही ही सुबुद्धी दे, गरजवंतावर हुकूमत चालवण्याची आणि कमी पैसा असणाऱ्यांना तुच्छ लेखण्याची दुर्बुद्धी मला होवू देऊ नको... देवा, पैसा मिळवणं हे परमकर्तव्य असूनही, केवळ तो मिळवण्यासाठी मी कुटूंबापासून दूर जाईल, माझी कर्तव्य विसरेन - केवळ पैश्यांमागेच पळेन अशी धारणा माझी होवू देऊ नको - लक्ष्मी चंचल असते ही भावना माझ्यात सदैव जागृत ठेव... देवा, पैशांअभावी माझं कुठे अडणार नाही, आणि पैशांमूळे मी कुणाला नडणार नाही - इतकंच तू दे, पण पैशांमूळे माझ्यातला माणूस संपणार नाही - मी माणसाचा मशिन होणार नाही याची पदोपदी जाणीव करुन देत जा... देवा, गरजेपूरता पैसा तू देशीलच, पण मी येतांनाही रिकाम्या हाती आलो, जातांनाही रिकाम्या हातानेच जाईन - हे मला कधीही विसरू देऊ नको... देवा, मला श्रीमंत कर, पण, माझ्या हातून चार लोकांची पोटं

चढ-उतार आणि डिल

माझा एक मित्र, पुण्यातल्या घराजवळ रहायचा, मूळ जळगावचा... एमबीए झालेला. २०१६ च्या सुरुवातीला आम्ही सोबतच स्वतंत्रपणे व्यवसाय सुरु केले. त्याने पुण्यात  अकाऊंटस् फर्म सुरु केली, एक सीए सोबत घेवून आरओसी, अकाऊंटस्, म्यूचूअल फंड सल्ला, पॅन कार्ड वगैरे कामं करायचा... नारायण पेठेत एक छोटंसं ऑफीस घेवून व्यवसाय थाटला. दरम्यान मी मुंबईत स्थायीक झाल्यामूळे आणि फार क्षदोस्ती वगैरे नसल्याने हाय-हॅलो शिवाय फार संपर्क उरला नाही...  .. एका कामासाठी पुण्यात आलो आणि अकाउंटस् बद्दलच एक काम असल्यानं मी त्याला फोन केला. काल भेटला...! सुरुवातीला बघितलं तर हा तोच का यावर विश्वास बसला नाही, कारण आधी हत्तीसारखा असणारा आता कुपोषित गाय झाला होता... "अरे काय ? तब्येत वगैरे बिघडली कां ? असा काय झालास ?, कसं सुरुय ? आणि त्याने हॉटेलमध्येच भाड भाड रडायला सुरुवात केली...! मागच्या दिड वर्षातलं अख्खं कर्मकांड ऐकवलं...  .. झालं असं -  व्यवसाय ऐन भरात असतांना एकेदिवशी त्याचा अपघात झाला... त्यात दोन महिने गेले, आणि आपसूक परीणाम व्यवसायावर झाला. दुखण्यातून सावरला, पण आर्थिक घडी बसवता त्याची तारांबळ उडत ग

सांगेन गोष्टी युक्तीच्या दोन...

झालं असं,  माझं क्ष नावाच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या मुंबईतल्या शाखेतलं करंट खातं आहे... १७ ऑगस्टला पुण्यातल्या य नावाच्या बँकेच्या एटीएममधून मी सात हजार रुपये काढायला गेलो... प्रोसेस केली पण कळालं की एटीएम टेक्नीकली मेलेलं  होतं... त्यामूळे पैसे निघाले नाहीत, पण बाहेर आल्यावर सात हजार बँकेतून वजा झाल्याचा मेसेज आला. प्रथेप्रमाणे तासाभरात कस्टमर केअरला फोन करुन तक्रार दिली... प्रकरण मार्गी लावलं... एक आठवड्यात पैसे परत मिळतील हे सांगितलं गेलं... तक्रार क्रमांक मिळाला.. आठवडा उलटला... पैसे मिळाले नाहीत.  परत फोन केला...  - बँकेच्या होम ब्रांचमध्ये तक्रार द्या... तिथे व्हेरीफीकेशन वगैरे करुन पैसे परत मिळतील... - ठिक !  .. सविस्तर अर्ज लिहीला... त्यावर तक्रार क्रमांक लिहीला,  बँकेचा फॉर्म जोडला आणि दिला...  त्याची ओसी हातात घेतली.... दि. २७ ऑगस्ट २०१८... नियमाप्रमाणे १२ दिवसाच्या आत ! .. नंतर दोन तीनदा चकरा मारल्या. "प्रोसेस सुरु आहे"...! रिमाईंडर पाठवलंय वगैरे वगैरे.. एक महिना उलटला... .. परवा मी सपत्नीक तिथे गेलो... सोबत रिमांइडर अर्ज घेतला

खुनी गणपती Khuni Ganapati

Image
"खुनी गणपती" ... नांव वाचून आश्चर्य वाटलं नं ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे... ! फोटोत दिसतंय ते खुनी गणपतीची - खुनी मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा...!  . १८९५ मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक १००० वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी विरोध झाला... त्याचं रुपांतर हाणामारीत झालं आणि ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, जखमी झाले... आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वकतले तथा खून पडनात"... या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नांव प्रचलीत झालं...! त्यावेळी ५ दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता... .. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून २२८ रुपये दोन्ही गटांना दिले जातात. आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली. .. दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन

शिक्षक दिन

= शिक्षक दिन = ... रफूचक्कर ... अकरावी - बारावीला धुळ्यात असतांना अकरावीचं कॉलेज वगैरे सुरु झाल्यानंतर शोधमोहिम सुरु झाली क्लाससाठी... धुळ्यात भरमसाठ क्लासेस आहेत, एक-एका क्लासमध्ये शंभर स्टुडंटस् एका बॅचला, परत पीसीएमबी वेगवेगळा क्लास - असा पसारा वाढवण्यापेक्षा लहान क्लास, एकाच ठिकाणी सगळे विषय मिळावे ही इच्छा पुर्ण झाली, आणि प्रा. दि. अ. नावाचा माणूस सापडला... धुळ्यात इंदीरा गार्डन पासून थोडं पुढे गेल्यावर प्रमोद नगरच्या अलीकडे एका घराच्या आऊटहाऊसमध्ये ते क्लास घ्यायचे...! .. अॅडमिशन - ओळख वगैरे सोपस्कार पार पडले, आणि क्लास सुरु झाला... साडेचार फूटी वामनमूर्ती, सावळा वर्ण, चेहऱ्यावर हलकंसं हसू, तोंडात सिगारेट आणि खाली लूना... हा माणूस शिक्षक म्हणून जबरदस्त आहे हे पहिल्या तीन-चार दिवसातच समजलं... गणित आणि फिजीक्सवर त्यांची कमांड वर्ल्डक्लास होती... आयआयटी एंट्रन्स क्लासेसला शिकवणारा माणूस अकरावी-बारावीला शिकवतोय - गणित-फिजीक्सचा बेस त्यांनी असा केला, नंतर त्याशिवाय जगणं कठीण वाटू लागलं... Trigonometry खेळणं वाटायचं... दरम्यान मी, गणेश, मनोज, निखील आणि एक ज्यु. राज ठाकरे, बाक

अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpeyi

Image
दि. २८ मे १९९६, संसदेत एक ऐतिहासिक क्षण साजरा होणार होता... संसदेच्या आजपर्यंतच्या इतिहासातली एक महत्वपूर्व घटना घडणार होती... सभापती होते पी. ए. संगम्मा. अनेक पक्षांचा टेकू घेऊन निर्माण झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला बहूमत सिद्ध करायचं होतं, ऐनवेळी धोका झाला - आणि बहूमत नसल्याचे जाणून वाजपेयींनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला... पण तत्पूर्वी त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केलेल्या काँग्रेस सरकारची संसदेतच पुराव्यासकट न भूतो न भविष्यती अशी पिसं काढून "मै यहाँसे सिधा राष्ट्रपती महोदयके पास अपना इस्तिफा सौंपने जा रहा हूँ".... म्हणत निघाले देखील ! कॉंग्रेस सरकारला तेव्हा बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, पुढची आठ वर्ष ते त्यातून सावरले नाहीत ... केवळ तेरा दिवसांचं वाजपेयी सरकार पडलं - सुर्यास्त वाटला - पण प्रत्यक्ष्यात ते ढग होते, ते हटले आणि भाजपाचा लख्खं प्रकाश पडला... या रथाचे सारथी होते अटल बिहारी वाजपेयीजी... ! .. १९९८-१९९९ तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा होतो... थोडीफार समज आली, तेव्हा हा देश आहे, यासाठी कुणी एक पंतप्रधान असतात, ज्यांचे फोटो

श्यामच्या आईचं आज काय करायचं...

Image
*श्यामच्या आईचं आज काय  करायचं.......?*                         _यशोदा सदाशिव साने_  _मृत्यू २ नोव्हेंबर १९१७_  *श्यामची आई* नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.    कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.              गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बापट यांनी गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की *कशी होती हो गुरुजीची आई?* तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाल

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved