Posts

एक महत्वाचं कौतूक

एक महत्वाचं कौतूक . गेले अडीच ते तीन महीने निवडणूकीची धांदल आपण पाहिली. एक्क्याण्णव कोटी मतदार, पाचशे बेचाळीस जागा, वीस हजाराच्या जवळपास उमेदवार, सात फेऱ्‍या आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही... . भारतात लोकशाही टिकवणं सोप्पं नाही. इथे दर तीन लोकांमागे एक जण द्वाड आहे, एक जण उपद्व्यापी आहे. एक जण दिडशहाणा आहे. भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. राज्याराज्यात लोकल गावगुंड आहेत. भाषा, प्रथा, परंपरा वेगवेगळ्या आहेत. आणि त्यातही मे चं कडक ऊन. भरीस भर म्हणजे कंट्रोल न ठेवता येणारं सोशल मिडीया. . तरीही भारतीय लोकशाहीचा प्रचंड विजय झाला... पक्षाचा विचार बाजूला ठेवा. लोकशाहीने सतरावी लोकसभा देशाला दिलीय.... आचारसंहीता पाळून. पवित्रपणे, प्रामाणिकपणे...! . तीन महिन्याच्या प्रचारात प्रचंड धुराळा उडाला. इव्हीएमवर आरोप झाले. एकमेकांवर चिखलफेक झाली, हाणामाऱ्‍या झाल्या, पण शेवटी सगळ्या गोष्टी नियंत्रणाखाली होत्या... मोदीँपासून राहुलपर्यँत सगळ्यांवर या यंत्रणेची घट्ट पकड होती... ती यंत्रणा म्हणजे "भारतीय निवडणूक आयोग"... आज मोदी किँवा राहूल जिँकले नाही, तर भक्कमपणे हा लोकन्नाथाचा रथ ओढून संसदे

कामगार-नवरा दिन

शॉपीँगला गेल्यावर बॅग्ज उचलणं, डिमार्टला गेल्यावर ट्रॉली ढकलणं, वरचे डब्बे काढून देणं, कितीही दमलेलं असा - "चला" म्हणल्यावर कुठलंही कारण न देता गाडीवर ड्रायव्हर होवून बसणं, आपण कोण, काय करतात याच्याशी देणंघेणं न ठेवता गिरणीत दळण आणायला जाणं, रात्री एकटीला किचन मध्ये जायची भिती वाटते म्हणून पाणी आणायला जाणं, घरात पाल दिसली तर हुसकावणं, तिचा फोन चार्जिँगला लावणं, बटाटे सोलणं, घरी असतांना तिच्या माहेरचा किँवा मैत्रीणीचा फोन आला आणि सापडत नसेल तर सापडवून हातात नेवून देणं, ईथून ते - तिचा आयटीआर भरणं, तिच्या शाळेचं अकाऊंटस् बघणं, माझ्या ऑफीसच्या स्टाफ आधी तिच्या शाळेच्या स्टाफला बोनस वगैरे वाटणं, त्यांच्या सॅलरीजचं मॅनेजमेँट करणं, तिच्या डिप्लोमा कोर्सचं सबमिशन तयार करुन देणं etc. etc. etc... . भर म्हणून, दर शनिवारी न चुकता निशा मोँजोलीकाच्या रेसिपी व्हिडीयो ऐकाव्या लागतात. टळत नाही ते ! . "नवरा हा अलिखीत कामगार असतो"... त्यामुळे आजचा दिवस कामगार दिनासह नवरा दिन म्हणूनही साजरा व्हावा...! . कामगार-नवरा दिनाच्या शुभेच्छा. - तेजस कुळकर्णी (टि.के. टेक्नॉलॉजी प्रा.ली., अं

Vote India Vote

मतदान करा "च" !  लोकसभेची निवडणूक रोज रोज येत नाही. १०० वर्ष जगलो तर आपल्या उभ्या आयुष्यात जास्तीत जास्त १६ - १७ लोकसभा येतात. त्यात मतदानाला जाणं - मतदानाची प्रक्रीया करणं - परत येणं, यात अर्धा ते पाऊण तास, खुप झालं तर १ तास जातो. दर ५ वर्षातला हा १ तास आपण देशाचा पंतप्रधान असतो, राजा असतो. पुढच्या पाच वर्षासाठी देशाचं धोरण आपण ठरवत असतो. अनेक योजना, महत्वाचे कायदे पास करत असतो. देशाचा विकास करत असतो. म्हणजे पुर्ण आयुष्यात जास्तित जास्त फक्त १७ तास आपल्याला ही संधी मिळते. उद्याचा दिवस तसाच... राजा असण्याचा. पंतप्रधान असण्याचा. मतदान करा !  हक्क आहे आपला, तो मिळवा. पुढच्या पाच वर्षात देश जी काही प्रगती करेल तिचे आपण बरोबरीचे शिल्पकार असू, जबाबदार असू...! त्यामूळे मतदान करा.... कराच !  उद्याचा दिवस पंतप्रधान व्हा !  राजा व्हा ! - तेजस कुळकर्णी  ... मतदानाची आजची पूर्वतयारी : .. १. आपलं मतदान कुठल्या केंद्रावर आहे याची खात्री करा. यासाठी https:://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App वर मार्गदर्शन मिळेल. त्यावरून आपला यादी भाग

जे होतं ते चांगल्यासाठीच होतं !

''जे होतं ते चांगल्यासाठीच होतं -" गेल्या सात महिन्यांपूर्वी माझ्या कंपनीसाठी यूएसएचा एक मोठा चेन प्रोजेक्ट आम्ही मिळवला. ज्याचं एकुण कॉस्ट माझ्या कंपनीच्या अॅन्यूअल टर्नओव्हरच्या दहापट आहे... त्यात आम्ही पाच कंपनीज् आहोत, आणि माझ्याकडे तिसऱ्या स्टेपचं काम होणार. म्हणजे दुसऱ्या स्टेपचं काम झालं की ती कंपनी माझ्याकडे देणार, मी त्यात माझं काम करुन चौथ्या स्टेपच्या कंपनीकडे पाठवणार... जे काम मी करणार ते त्या प्रोजेक्टचा ४० टक्के भाग आहे...! .. माझ्या कंपनीला प्रोजेक्ट मिळाला, अॅग्रीमेंट झालं, एडवान्स मिळालं आणि आम्ही प्लानिंग केलं... त्या प्रोजेक्टसाठी एक मोठी सिस्टिम उभारणं, मशीन्स घेणं, तितकाच मोठा स्टाफ घेणं, आणि माझं आत्ताचं वर्कप्लेस त्यासाठी कमी पडणार म्हणून मोठं वर्कप्लेस घेणं आवश्यक होतं. त्यामूळे ऑफीसच्या जवळच मी नवं वर्कप्लेस बघितलं... मोठी सिस्टीम उभारण्यासाठी पुरेसा पैसा उभा करणंही गरजेचं होतं... म्हणून मी काही शेअर्स, इतर प्रोजेक्टचं च्या पेमेंटमधून आणि बिजनेस लोन करता अप्लाय केलं. .. १५ नोव्हेंबर २०१८ ला पहिलं असाईनमेंट येणार असं अपेक्षित होतं. त्य

BJP

Image
भाजपाचा आज ३८ वा वर्धापनदिन. .. ६ एप्रिल १९८० रोजी हिंदुराष्ट्र, राष्ट्रवाद, आर्थिक उदात्तीकरण आणि मानवता या विचारधारेवर भाजपाची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त, हिंदुत्वाचा पाया आणि राष्ट्रभक्त उजव्या विचारसरणीचे ऋषीतूल्य नेते हे भाजपाचे आधारस्तंभ आहेत. केवळ ३ जागांपासून सुरुवात झालेला भाजपा आज देशातला सर्वसत्ताधीश पक्ष आहे. भाजपा जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन आहे. .. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधानजवाहरलाल नेहरू ह्यांच्या कडून पाकिस्तानचे होणारे लांगुलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनस्ंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरूण नेत्यांनी जनसंघाची सुत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या ल

Budget 2019

*HIGHLIGHTS OF BUDGET 2019* *#budget2019* *Tax* 1. Within 2 years, Tax assessment will be done electronically 2. IT returns processing in just 24 hours 3. Minimum 14% revenue of GST to states by Central Govt. 4. Custom duty has abolished from 36 Capital Goods 5. Recommendations to GST council for reducing GST rates for home buyers 6. *Full Tax rebate upto 5 lakh annual income after all deductions.* 7. Standard deduction has increase from 40000 to 50000 8. Exempt on tax on second self-occupied house 9. Ceiling Limit of TDS u/s 194A has increased from 10000 to 40000 10. Ceiling Limit of TDS u/s 194I has increased from 180000 to 240000 11. Capital tax Benefit u/s 54 has increased from investment in one residential house to two residential houses. 12. Benefit u/s 80IB has increased to one more year i.e. 2020 13. Benefit has given to unsold inventory has increased to one year to two years. *Other Areas* 14. State share has incr

गुरुचरीत्र पारायण

Image
अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि

Brahman Reservation (ब्राह्मण आरक्षण)

ब्राह्मण आरक्षण... #ब्राह्मण_आरक्षण .. पहिला मुद्दा : आरक्षण इतकं सहज मागितल्याने आणि इतकं लगेच मिळत नाही... सरकार स्तर ते कोर्ट असं लढावं लागतं... त्यातही व्यापक स्तरावर लढा उभारावा लागतो... माणूस ते माणूस प्रत्येकजण त्यात सहभागी व्हावा लागतो... बरंच मोठं प्रकरण आहे... आत्ता मागणी केली, अखंड आणि प्रभावीपणे लढलं तर माझ्यासारख्या पंचवीस ते तीस दरम्यान असणाऱ्‍या मुलांच्या मुलांच्या मुलांना आरक्षण मिळू शकतं... आणि प्रत्यक्ष्य फायदा त्यांच्या मुलांना...!!  . आरक्षणाची गरज आहे कां ? - आरक्षणाची नाही पण आर्थिक आधाराची आणि सामाजिक सुरक्षेची गरज ग्राउंड लेव्हलवर खरंच आहे. (ग्राउंड लेव्हल : शहरी मध्यमवर्गीय आणि त्याखालील स्तर, ग्रामीण भागातील ब्राह्मण, शेतकरी) शिक्षणासाठी फि देणं बऱ्‍याच लोकांना परवडत नाही हे एकदम सत्य आहे... आणि त्यामूळे नोकरी व्यवसायात ब्राह्मण मुलं कमी पडतात. पिढी दर पिढी कुटूंबचं कुटूंबे गरीबीत राहतात.  . आरक्षणाचा विचार केला तर जो समाज मागासवर्गीय आहे त्या समाजाला आर्थिक, सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देतात. मराठा आरक्षणादरम्यान दिसलं तसं स

Bank, Me and PMO

एटीएमच्या सात हजाराचं प्रकरण फायनली सुटलं... . मागच्या एका पोस्टमध्ये म्हणालो तसं - एटीएममधून सात हजार काढायला गेलो आणि निघाले नाही, पण बॅँकेच्या खात्यातून डेबिट झाले... मग मी बॅँकेकडे तक्रार वगैरे केली पण त्यात यश मिळालं नाही... हा मुद्दा... अब आगे... . दरम्यान बॅँकेने "प्रिऑर्बीटरी व्हेरीफीकेशन प्रोसेस रिजेक्टेड" असा निर्णय दिला. रिव्हेरीफीकेशन प्रोसेस करायची असेल तर ५९८ रुपये भरा असं सांगितलं... माझे पैसे बॅँकेच्या चुकीनं गेले ते गेले, ते मिळवायच्या प्रयत्न करण्यासाठी मला परत सहाशेचा फटका बसणार होता. त्यावर "मी एक रुपयाही देणार नाही" असं उत्तर पाठवलं...! . नंतर, इथल्या सल्ल्यानूसार मी "बॅँक लोकपाल" कडे तक्रार केली... सगळं प्रकरण व्यवस्थित मांडलं... पण फार चांगला किँवा कुठलाही रिप्लाय मिळाला नाही. त्यांची डेडलाईन संपली... मग ग्राहक मंचाकडे मी रितसर तक्रार केली...  . ग्राहक मंचाकडून बॅँकेकडे पाठपूरावा केला गेला... बॅँकेच्या एथोरिटीने "प्रिऑर्बिटरी व्हेरीफीकेशन रिजेक्टेट" अश्या रिप्लायने केस डिसमिसची मागणी केली... आणि ती केस

दिवाळीची प्रार्थना... देवा...

Image
देवा, माझ्या गरजा भागतील इतका पैसा मला दे, पण तो देतांना मी ऐतखाऊ होणार नाही हे नक्की बघ... मला मिळालेला पै न पै हा फक्त माझ्या प्रामाणिक कष्टाचाच असू दे... मला ते कष्ट करण्याची शक्ती आणि संधी दे... देवा, खूप पैसा मिळाला तरी, मी उतणार नाही, मातणार नाही ही सुबुद्धी दे, गरजवंतावर हुकूमत चालवण्याची आणि कमी पैसा असणाऱ्यांना तुच्छ लेखण्याची दुर्बुद्धी मला होवू देऊ नको... देवा, पैसा मिळवणं हे परमकर्तव्य असूनही, केवळ तो मिळवण्यासाठी मी कुटूंबापासून दूर जाईल, माझी कर्तव्य विसरेन - केवळ पैश्यांमागेच पळेन अशी धारणा माझी होवू देऊ नको - लक्ष्मी चंचल असते ही भावना माझ्यात सदैव जागृत ठेव... देवा, पैशांअभावी माझं कुठे अडणार नाही, आणि पैशांमूळे मी कुणाला नडणार नाही - इतकंच तू दे, पण पैशांमूळे माझ्यातला माणूस संपणार नाही - मी माणसाचा मशिन होणार नाही याची पदोपदी जाणीव करुन देत जा... देवा, गरजेपूरता पैसा तू देशीलच, पण मी येतांनाही रिकाम्या हाती आलो, जातांनाही रिकाम्या हातानेच जाईन - हे मला कधीही विसरू देऊ नको... देवा, मला श्रीमंत कर, पण, माझ्या हातून चार लोकांची पोटं

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved