Posts

असहीष्णू

Image
"असहीष्णू :: ये क्या होता है भाई ??" . कालच... ऑफीसच्या गेटवर उभ्या असलेल्या "उत्तर भारतीय" वॉचमनला निघता निघता Happy Diwali केलं... त्यानं मस्त हसून रिप्लाय केलं... त्यानंतर रस्त्यावर, चौकांत ओळखीचे ट्रॅफीक पोलीस भेटले. पाच मिनिटं थांबून प्रत्येकाशी बोललो, शक्य असेल तर सुट्टी घ्या आणि दिवाळी घरी करा असा न मागताच सल्ला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या...  "आमच्या नशीबी कसली रे सुट्टी... धुळ्याहून आलास की घरी ये फराळाला" असं आग्रहाचं निमंत्रणही घेतलं... पुण्याहून धुळ्याला आल्यावर सकाळी उतरतांना ट्रॅव्हल्सच्या ओळखीच्या ड्रायव्हर- आणि "ख्रिश्चन" मॅनेजरनं स्वत:हून Happy Diwali केलं... परत जातांना मिठाई घेऊन ये अशी मागणीही झाली. . आणि आत्ता इतक्यातच... गाडी सर्व्हिसीँगला नेली, ओळखीचाच मेकॅनिक... २३६ रुपयांचं बिल फाडतांना सवयीप्रमाणं "कितना दूँ रहमान ? दिवाली डिस्काउंट देके बिल बना..." म्हणत २०० त आवरलं... निघतांना तो आठवणीनं Happy Diwali tejaabhai बोलला... . "असहीष्णू" वातावरण झालंय नां ? मला तर नाही ब्ब्बॉ दिसलं कुठे... उलट, चाँद,

Year of Fadanavis Gov.

महाराष्ट्र सरकार आज वर्षपूर्ती साजरी करतंय... शिवसेनेच्या येड्याचाळ्यांना, टांगघाल स्वभावाला फूकटाचीही किँमत न देता योग्य रितीने राज्याची धुरा सांभाळणाऱ्‍या फडणवीसांच्या द्रष्टेपणाचं कौतूक वाटतं... . चांगल्या बाजू : (१) फडणवीसांची कार्यपद्धती : चाणक्यनितीचा पूरेपूर वापर करुन फडणवीस कार्य करताय. सर्वसमावेशक धोरण, जनतेचा मुख्यमंत्री आणि अभ्यासपूर्ण आखणी हा फडणवीसांचा पाया आहे. कामाशिवाय वायफळ बडबड नाही हे महत्वाचं. स्वत: लक्ष घालून प्रत्येक काम करताय. (२) विनोद तावडे आणि सुधीर  मुनगंटीवार : शिक्षणमंत्री तावडे आणि वनमंत्री मुनगंटीवार फडणवीसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताय. स्वच्छ चारीत्र्याचे मंत्री आणि कार्यक्षम ! (३) बाबासाहेब पुरंदरे : बाबासाहेब पुरंदरेँच्या महाराष्ट्र भूषणवरुन काही नतद्रष्ट्यांनी रान पेटवलं होतं. पण तावडे-फडणवीस जोडीने न भूतो न भविष्यती असा सोहळा करुन बंटी आणि ब्रिगेड्यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात घातल्या. (४) जलयुक्त शिवारासाठी फडणवीसांनी महाराष्ट्र पिँजून काढलाय. (५) डिजीटल वर्षाच्या दृष्टीने योग्य कार्य सुरु झाले आहे. (६) वर्षभराचा कारभार पारदर्शक आणि

Dasara 2015

Image
माझं सरस्वती आणि शस्रांचं पूजन... विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा...  . विजयादशमी हि मुख्यत्वे दुर्गेने म्हैशासूरावर मिळवलेल्या विजयानिमित्त साजरी केली जाते. नऊ रात्रींच्या घनघोर लढाईनंतर दहाव्या दिवशी अंबेने म्हैशासूरावर विजय मिळवला... नऊ दिवस युद्धामुळे एकाच जागी अडकलेल्या देवतांनी दहाव्या दिवशी सिमोल्लंघन केलं... नवरात्राच्या आरतीत आहे तसं  दशमीच्या दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो...  सिँहारुढपरी दारुण शस्त्रे अंबेत्वा घेऊनी हो... शुंभनीशूंभादी राक्षसा किती मारिसी रणी हो... अस्सं... . पांडवांनी याच दिवशी अज्ञातवासातून बाहेर पडून राजवस्त्रे परीधान केली, शमीच्या झाडावर लपवलेल्या शस्रांचं पूजन केलं... आणि तेव्हापासून शस्त्रपूजनाची प्रथा सुरु झाली... . या दोन महत्वाच्या प्रथा... म्हणूनच विजयादशमीला विजयादशमी म्हणतात... आणि शस्त्रपूजन करतात. . रामाने रावणाचा वध केला, पण रावण लंकेश्वर होता... राजा होता... कलाकार होता... रुद्रपूजक होता... त्याने सीताहरणाची चूक केली, पण क्रुरपणे व्याभिचार केला नाही, जबरदस्ती केली नाही... रावणाविषयी मला आदर आहे... . असो. विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा..

Sunday

रवीवारची दुपार... विकऐँड म्हणजे अस्सल शनीवार... त्यातही शनीवारची दुपार... उद्या सुट्टी असल्याची मस्त जाणीव आणि शांतता... त्यातही रवीवारी सकाळची वेळ एकदम भन्नाट... रवीवारची झिँग फार फार तर सकाळी १० पर्यँत टिकते... नंतर दिवस माध्यान्हाकडे कलायला लागला की आपसूकच उद्या पुन्हा मंडे आला यार... ची विचित्र फिलीँग... . डोळ्यावर अलगदशी झोप असते... टिव्हीवर झी टॉकीज छकूला किँवा सेट मॅक्सचा सूर्यवंशम सुरु असतो... मनात रिलॅक्सनेस पण त्यामुळेच नकळत बोजडपणा येतो. आज बरंच काही करायचं ठरवलेलं  असतं... स्पेशली, जेवायला बसतांना डोळ्यावरची अलगद झोड गडद होत असते. रवीवार किती फास्ट सरकतोय यार... इतर दिवस कस्सेही असुदेत, बदलूदेत आपला रवीवार मात्र अनादी काळापासून अभिजात, अस्साच आहे. . सकाळी आठची रंगोली त्यातली सोनाली बेँद्रे इस दिवाने लडके को म्हणत आठवते तसंच दुपारी चार वाजता हमखास सह्याद्रीच आठवणार... ते पण लक्ष्मीकांत बेर्डेच. मग पंधरा एक वर्षांपूर्वीचे संडे फ्लॅशबॅक होणार... रवीवार दुपारच्या चहाला सुद्धा संडे टेस्ट असते... . दिवसाचा उत्तरार्ध सुरु होतो... कंटाळलेला, बोअर, अवजड... उद्या सकाळी "मंडे

Unfortunate Fact

आमचे जवळचे नातेवाईक असलेले एक आजोबा परवा देवाघरी गेले. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित आणि वेलसेटल्ड प्रकारातली. लग्न ते पोरांची मुंज वगैरे सगळे कार्यक्रम आटोपलेले... पण पोरांच्या विचित्र स्वभावामूळे त्या आजोबांचा मुक्काम गेल्या दोन वर्षाँपासून वृद्धाश्रमात होता... आणि ३ तारखेला त्यांनी तिथेच आवरलं !! वृद्धाश्रम मॅनेजमेँटनं त्यांच्या मुलांना आणि इमरजन्सी कॉन्टॅक्ट म्हणून आम्हालाही कळवलं.... . अंत्ययात्रा तशी नाहीच... चार पाच फोन केल्यानंतर दोघांपैकी एक मुलगा आला... "मरेपर्यँत  म्हाताऱ्‍याचं तोँडही बघणार नाही" अशी प्रतिज्ञा असल्यानं दुसऱ्‍यानं बहिष्कार घातला...! तासाभरातच सगळं आटोपलं... पण नंतर ऑफीस स्टाफ आणि नातेवाईँकासमोर "पितृऋण" फेडण्यासाठी म्हणून दोघांनी लाख रुपयांचं श्राद्ध घालायचं ठरवलंय... १३-१४ तारखेला श्राद्धसोहळ्यानिमित्त शाही भोजन वगैरे ठेवलंय... ज्याचं श्राद्ध आहे तो माणूस मात्र एकटाच, उपाशीपोटीच तडफडून मेला . आईबापाला जिवंतपणी पाणीही न पाजणारे पितृपक्षात त्यांच्यानावे शंभर लोकांना जेवण घालतात... तो माणूस उपाशी तडफडतच जातो.... मेल्यानंतरचं खाणं वगैरे सग

Hindi and Parties

एकीकडे :  देशातील आरक्षणाच्या पुर्नविचाराची गरज आहे... असं अभ्यासपूर्ण मत परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नोँदवले... तसेच इतिहासातील अनेक व्यक्तीँच्या, घटनांच्या पून:अभ्यासाची गरज असल्याचे सांगितले. हिँदूत्वावादी संघटनेचे शिरोमणी भारताच्या वर्तमानाची घडी निट बसवण्यासाठी धडपड करताय. . विश्व हिँदू परीषदेचे प्रविणजी तोगडीया हिँदूंचा प्रपंच, रोजगार सुलभ आणि अद्ययावत करुन, हिँदूशक्तीचे एकत्रीकरण करत हिँदूंना शिक्षित, समृद्ध आणि राजकीय-सामाजिक दृष्ट्या सक्षम करताय. हिँदूचे भव िष्य संरक्षीत करताय. . तर दुसरीकडे सनातनचे प.पू. ज.बा.आठवले... सदरा कुर्ता घ्या, समष्टी करा, साधना करा, लहरी दिसल्या, वयाआधीच प्रौढ व्हा वगैरे सात्विक बफाऱ्‍या देऊन स्वत:ला कृष्णावतारी म्हणत हिँदूंना बाबा आझमच्या जमान्यात नेताय... . संघ आणि विहिँप जीव तोडून जी धडपड करतात ; ती सनातनच्या येड्याचाळ्यांमूळे अर्धी पाण्यात जाते. संघ आणि विहिँपच्या "राजकीय परीपूर्ण सत्ता" या केँद्रबिँदूचा विचार आत्ता काळानुरुप आहे. तिथे हे बिनडोक सनातनवाले हिँदूंच्या तरुण बळाला मुर्खासारखं निळ्या लहरी-काळ्या लहरीँच्या मागे

Mahalakshmi

Image
आज आम्हा देशस्थांकडे महालक्ष्मी असतात, तर कोकणस्थांकडे गौरी. "थोडक्यात गोडी" या उक्तीप्रमाणे कोकणस्थांकडे खड्यांच्या गौरीँची पूजा करतात. नारळाच्या पदार्थांचा नैवेद्य आणि १२ वाजेपर्यँत जेवण... साधेपणात सुंदरता.  . आम्हा देशस्थांच्या महालक्ष्म्यांचा थाट मात्र राजेशाही. "लक्ष्मीला शोभावा असाच..." ! उंची साड्या, मुखवटे, दागिने, अत्तरं आणि समोर फळं, मिठाई... आज भलेही जेवायला दुपारचे तीन वाजतील पण, पंचपक्वान्नाचा थाट असतो... पुरणपोळी, सोळा भाज्या, कोशिँबीरी, पुरणाचे दिवे... उद्या व िसर्जनाच्या दिवशी खीर-कान्होले. तीन दिवस सजावट, खाण्यापिण्याचा थाट. . कोकणस्थ असो वा देशस्थ... गौरी आणि महालक्ष्मी यांच्या पाहुणचारात कुणीच कमी पडत नाही. अतिथी देवो भवः ही उक्ती दोघांकडून पूरेपूर पाळली जाते... आणि गौरी/महालक्ष्मी देशस्थ+कोकणस्थ असा तृप्तीचा माहेरवास भोगून आनंदातच विष्णूलोकात परत जातात... . Bdw... येताय ना जेवायला ??  :D  देशस्थांचा पाहूणचार करु आज...!

Gannapati 2015

Image
तुम्ही काही म्हणा, पण गणपतीच्या दिवसांचा बेस ज्याला म्हणता येईल अशी (पार्वतीच्या बाळा आधीची) चीक मोत्याची माळ होती तीस तोळ्याची, प्रथम तुला वंदीतो, गणराज रंगी नाचतो, गजानना श्री गणराया... ही चार गाणी ऐकल्याशिवाय गणपती आल्यासारखेच वाटत नाहीत. हि चारही गाणी शांत प्रकृतीची, भक्तीरसप्रधान आणि नितांतसुंदर... अवीट गोडीची... बनानेवालेने सबसे खुबसूरत यही आखिरी चीज बनाई... वगैरे. . त्यापैकी चीक मोत्याची माळ माझं ऑल टाईम फेवरेट... चार पाच वर्षाँपूर्वी आम्ही चौघांनी कॉलेजच्या गणेशोत्सव  कार्यक्रमात समुहगीत गायलेलं. वन्समोअर आणि अनेक बक्षिसं मिळालेली. त्याचा रियाज करतांना आणि गातांना या गाण्यानं झिँग चढवली होती. आणि बऱ्‍याsssssच बाकीच्या भारी भारी गोष्टीसुद्धा या गाण्यादरम्यान झालेल्या... अगदी आजपण माझ्या कुठल्याही सांगीतिक मैफीलीत प्रथम तुला वंदीतो नंतर हे गाणं नं २ वर असतंच... . आत्ता डिजे विद थर्डक्लास धांगडधीँगा... गणेशोत्सवाचं सांगितीक पावित्र्य संपल्यात जमा आहे... . बाप्पा... तुझ्या आठवणीच्या कप्प्यातली ती जुनी गाणी आणि जुना गणेशोत्सव तेवढा येतांना आठवणीने घेऊन ये...! . bdw आमचा बाप्पा आल

Ashatai Bhosale

Image
आशाताई आणि लतादीदी या दोन नक्षत्रांनी साठ ते नव्वदच्या दशकातील अनेक गाणी अजरामर केलीयेत... लतादीदीँनी शांत प्रकृतीच्या गाण्यांना साज दिला, तर आशाताईँनी आपल्या सहज वळणाऱ्‍या, गोड आवाजाने शांत प्रकृतीच्या गाण्यांपासून डिस्कोच्या मेलोडीज् पर्यँत गाण्यांमध्ये प्राण ओतला... आशाताईँनी स्वरबद्ध केलेलं प्रत्येक गाणं कालातित झालं... तेव्हापासून आत्तापर्यँत प्रत्येकाच्या ओठांवर रुळलंय. अर्थात त्यांना गाण्यात आणि आयुष्यातही पंचमदांच्या संगीताची तेवढीच भक्कम साथ मिळाली. . गाण्यासाठी आशा  भोसले नसून आशा भोसलेँसाठी गाणं झालं. चूरा लिया है, आगे भी जाने ना तू, झूमका गिरा रे, आओ हूजूर तुमको, दम मारो दम, दिल ने जिसे अपना कहा सारखी शेकडो हिँदी गाणी... एकाच या जन्मी जणू, मी मज हरपूर, अरे खोप्यामंदी खोपा, उठी श्रीरामा, उष:काल होता होता, किती सांगू मी सांगू कुणाला सारखी अनेक मराठी गाणी आशाताईँच्या स्वरस्पर्शाने एव्हरग्रीन झालीय. . पुण्यात एका कार्यक्रमावेळी आशाताई आलेल्या. त्यावेळी धडपडत-गर्दीतून वाट काढत काही क्षणांसाठीच त्यांच्या पायावर डोकं ठेवलं... आणि त्यांच्या हातांचा स्पर्श पाठीवर होताच माझ्या अंग

Gurupornima 2015

तीन-चार वर्षाँपूर्वी कुठल्याश्या कारणानं भांडणात रागाच्या सर्वोच्च स्ट्रोकला शेजारच्या काकूंना काहीतरी भलतं बोलून बसलो... आणि पुढच्याच क्षणी सगळ्यांसमोर मम्मानं मला एक सणसणीत कानाखाली ओढली... त्यानंतर पुन्हा कितीही राग आला तरी कंट्रोल करायला शिकलोय...!! . काही कारणानं एका कस्टमरचा प्रॉडक्ट देण्यासाठी उशीर होत होता... ते इतकं फायद्याचं नाही म्हणून मी चालढकल आणि टाळाटाळ करत होतो... साधारण महिन्यानं त्याचं काम झाल्याचं कळालं... माझ्या आजोबांनी माझ्या नकळत स्वत: लक्ष घालून ते काम  पूर्ण करुन दिलं... मला माझी लाज वाटली. आणि आजोबांना सॉरी म्हणून, त्यानंतर कुठलंही काम वेळेतच पूर्ण करण्याची स्वत:ला सवय लावली...!! . अंधाराची मला खूप भिती वाटायची... लाईट बंद झाले तरी त त फ फ व्हायचं... एक दिवस पप्पांनी माझी एक महत्वाची वस्तू लपवली... इतर सगळे Options Lock केले... आणि ती वस्तू घेण्यासाठी करो या मरो प्रमाणे अंधाऱ्‍या खोलीत पाठवलं... त्या दिवशी पहिल्यांदाच घाबरत घाबरतच अंधारात उडी घेतली... And yes ! मी करु शकलो... भिती गायब !! पप्पांमूळे आत्मविश्वास आला... नंतर कधीच कुठलीच भिती राहिली नाही...!! .

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved