Ujhma Pakistan Affair

उझमा नावाची भारतीय स्त्री सिंगापूर थायलंड फिलीपीन्सला मलेशियात फिरायला गेली. तिथे, ताहीर या पाकीस्तानी माणसाला भेटली. मैत्री झाली, प्रेमात पडली, तिथून एक आठवडा ती त्याच्याबरोबर पाकिस्तानला गेली. तिथे त्याच्याशी लग्न लावलं, आणि अंगावर आलं तसं आरडाओरडा सुरु केला... .. उज्मा म्हणाली की अशा फसवून आणलेल्या कितीतरी विविध देशातील स्त्रिया तिथे होत्या...एकाच माणसाच्या अनेक बायका... सुषमा स्वराज यांच्या मुळे आज ती सहीसलामत परत भारतात आली.. तिच्या येण्याचा सोहळा होतोय... ती किती निरागस आहे, किती भोगलं वगैरे सुरु आहे... ति वाघा बॉर्डरवर नमस्कार करते, सुषमा स्वराज यांना नमस्कार करते हे सारखं सारखं दाखवताय... पण तथ्य आहे ? .. आधी खङ्ङ्यात उडी मारायची आणि नंतर बाहेर काढण्यासाठी बोंबलायचं - मंत्रालयाने कामधंदे सोडून अश्या मुर्ख लोकांना वाचवायचं - इतकंच ? मूळात घरी एक नवरा असतांना, पाच वर्षांची मुलगी असतांना परदेशात परपुरुषाबरोबर संबंध ठेवायचे, लग्न करायचं - झेपलं नाही की बोंबलायचं ! .. पाकिस्तानने तिचे सगळे आरोप पुराव्यासह फेटाळले आहेत... - फसवून लग्न केलं - पाकिस्तानी कचेरीत रितसर निकाह...