Posts

Showing posts from 2020

पुन्हा नव्याने सुरुवात करूयात का ?

जुलै पासून एकही ब्लॉग लिहिलेला नाही, फेसबुक-ट्विटर पूर्णपणे बंद आहे, सोशल मिडिया सोडा - कॉल सुद्धा घेणं बंद आहे... मेसेजचा बॉक्स रोज तीन-चारदा खणखणतो... काळजीने विचारणारे मेसेजेस येतात...  याचं कारण कुठलंही सिरीयस नाहीय... ना मला कोरोना झाला... ना अजून काही... मी ठणठणीट आहे... कोरोनाच्या स्पाईक मध्ये सुद्धा काही काळजी घेऊन सेफ राहिलोय... ! कारण असंय :  माझं एक वर्षाचं  लेकरू एक मिनिटही शांत बसत नाही, आणि मला कामाव्यतिरिक्त असलेला सगळा वेळ फक्त त्याला द्यावा लागतोय...  त्याच्या समोर फोन किंवा पीसी उघडला तरी तो त्याच्या बोर्ड वर पायाने दणादण आपटतो... आणि या गोष्टीची मला धास्ती बसलीय... लॉकडाऊनमुळे ऑफिसला जाऊन काम करू असंही शक्य नाहीय...!  कोरोनाने अख्खं वर्ष खाल्ल्यानंतर आलेली मरगळ सुद्धा बराच प्रभाव टाकणारी ठरली. ती  मरगळ झटकून कुठेतरी नव्याने सगळं सुरु करायचंय... पूर्वपदावर आणायचंय, आणि म्हणूनच १६ जानेवारी २०२१ पासून नवी सुरुवात करतो. बाकी काळजी नसावी....!   - तेजस ! 

SayNoToLockdown

(राजकीय मताचा चष्मा उतरवूनच वाचा...) मार्च ते जून लॉकडाऊन केल्यानंतर, उद्योगधंद्याचं श्राद्ध घालून आणि सगळं विस्कळीत होवूनही जर जुलैमध्ये परत लॉकडाऊन लावावं लागत असेल तर तर ते मोदींपासून, उद्धव ठाकरेसकट आपल्या शहराच्या महापौरापर्यंत सगळ्यांचं अपयश आहे...! ... मोदी, ठाकरे येतात - भाषण देतात - जातात, रिकव्हरी प्लान, बाहेर पडण्याचा रोडमॅप कुणाकडेही दिसत नाहीय... पंधरा पंधरा दिवसाची स्किपींग सुरु आहे एवढंच दिसतं. प्रामाणिक विचार केला तर केंद्र असो वा राज्य, पहिला पेशंट सापडल्यापासून अक्षम्य चूका झाल्यात..एअरपोर्ट स्क्रिनींग कमी पडलं, धोका ओळखण्यात चुक झाली, लॉकडाऊन लावतांना मिसमॅनेजमेंट झालं...! राज्यातल्या तिघाडी सरकारचा प्रश्नच नाही... तिथे एक से एक नग भरलेय... स्थानिक प्रशासन हौस म्हणून लॉकडाऊन लावतं, त्यावर कुणाचा कंट्रोल नाही... जिल्हाधिकारी-पोलीस राजे झालेय... गोंधळ गोंधळ गोंधळ घातला जातोय. ... बेशुद्ध पडलेले उद्योगधंदे बघितल्यानंतर इमॅजनरी मधुन जेव्हा फॅक्टवर येतो तेव्हा कळतं...! उद्योग परत सुरु करायचे तर रिस्टार्ट करण्यासाठी किती धडपडा असेल आणि त्यातही किती आधिकारी, मंत

गुरुपोर्णीमा २०२०

Image
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!  ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ

नापास सरकार... हतबल दरबार

जे पाच लाॅकडाऊन मध्ये साध्य झालं नाही ते सहाव्या लाॅकडाऊन मध्ये होईल ही महाराष्ट्र शासनाची अपेक्षा व्यर्थ आहे. काहीतरी रणनितीमधे (strategy), दृष्टीकोनामधे (approach), गृहितकांमध्ये (premise / assumptions) बदल केल्याशिवाय आणि व्यवहारी (practical) परंतु सृजनशील विचार (creative thinking) केल्याशिवाय गत्यंतर नाही.  सरसकट “लाॅकडाऊन” टाळला पाहिजे. शासनकलेमध्ये (statecraft) सूक्ष्मनियोजनाची (micro-planning) एक पध्दत आहे. ती अवलंबवून स्थानिक परिस्थितीचा नेमका अंदाज घेऊन नियोजन केलं पाहिजे. अंमलबजावणीचे अधिकार विकेंद्रीत केले पाहिजेत.   साथीच्या रोगाचा प्रतिकार कसा करायचा ह्यासाठी साथरोग नियंत्रणाची जी नियमपुस्तिका (rule-book) आहे त्यात स्वयंसेवी संस्था, वस्ती पातळीवरील नेते, प्रभाव असलेल्या व्यक्ती आणि स्थानिक भाषेत संदेश (efrective local communication) देणं महत्वाचं असतं.. ते इथे काहीही झालं नाही.  “लाॅकडाऊन” चे दोन प्रमुख उद्देश असतात. १) संसर्ग रोखणे; आणि २) शासनपातळीवर क्षमता (तपासणी, मागोवा, उपचार) वाढवणे. दोन्हीमध्ये महाराष्ट्र शासन पहिल्या पाच “लाॅकडाऊन” मध्ये अपयशी ठरलं आ

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड

Sushant...

चार पैसे कमी मिळाले चालतील, ग्लॅमर नसलं तरी चालेल, फार यशही मिळालं नाही तरी चालेल... पण आयुष्य समाधानी आणि शांत असावं...! पुर्ण असावं ...! ... आयुष्यात कुठल्याही टप्प्यावरुन परत फिरता येईल असा एक बेसकॅम्प असावा... कुठेही जाणवलं की शक्ती संपलीय, बिनधास्त परत फिरुन नव्याने सुरुवात करावी... जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपलं आयुष्य आपलं असतं...! ... पैसा आणि ग्लॅमर आपली काळी बाजू सोबत घेवून येतो... मुंबईच्या लाईम लाईटमध्ये एक म्हण आहे - "बम्बई जमनी चाहीये...!..." ती जमली तो टिकला - नाही तो हरवला...! प्रसिद्धी - हवा आणि पैसा डोक्यात जायला नको... टिकवता यायला हवं,  जरी गेलं तरी स्विकारण्याची तयारी हवी...! ... सुशांत सिंह राजपूत इथेच हरवला... बम्बई जमलीच नाही...  बेसकॅम्प नसेल कदाचित...! म्हणून आत्महत्या हा शेवटचा पर्याय स्विकारला... कारण हजार मिळतील, पण रिजल्ट एकच : चांगला अभिनेता गेला ... एमएसडीची स्टोरी याच्यामूळे जबरा झालेली... अजरामर म्हणा ...! पुढेही तगडे हिटस् दिले असते, पण तो कोसळण्याचा काळा क्षण सांभाळू शकला नाही ! ... प

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन - द बिगेस्ट ड्रामा (साभार : सोर्स - अज्ञात )

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन - द बिगेस्ट ड्रामा काही दिवसांपूर्वी ट्रम्प तात्या यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी भारताला धमकी दिली आणि भारताने घाबरून लगेच औषध सप्लाय केले अशा बातम्या आल्या होत्या. खरेतर तात्यांनी धमकी दिलीच नव्हती, पूर्ण प्रेस कॉन्फरन्स न पाहता फक्त तेवढी क्लिप पाहील्याने आपल्याकडे लगेच त्यांनी धमकी दिल्याचा आणि त्या धमकीमुळे 56 इंची छाती फाटल्याचा उद्धार झाला होता. आपल्याकडे मूर्ख बनवायला पूर्ण व्हिडिओतून कट केलेला एक तुकडा दाखविणे पुरते. म्हणून ट्रम्पची धमकी असो की आलू बनाने की मशीन, या व्हिडीओजद्वारे दुसऱ्याला मूर्ख समजणारांना हेच कळत नाही की मूर्ख ते स्वतःच बनले आहेत. असो, तर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा भारत हा सर्वात मोठा सप्लायर असल्याने कोविड-19साठी (त्याला करोना म्हणू तेच बरे वाटते) भारत हा जगाचा आधारस्तंभ ठरला. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे अतिशय स्वस्त औषध आहे, त्यामुळे ते जर करोनावर प्रभावी ठरले तर सगळ्या जगासाठी ते एक वरदान ठरणार होते.  पण जे जगासाठी वरदान ठरते ते अनेक फार्मसी कंपन्यांसाठी शाप ठरू शकते. कारण जर समजा हायड्रोक्सीक्लोरोक्वीन करोनासाठी

Shriyan and Songs

Image
माझ्या लेकराला दोन-तीन दिवसापासून twinkle twinkle little star गाण्याचा नाद लागलाय... त्याआधी कुठलंसं हिंदी गाणं होतं... बहुतेक "आपकी आँखोमे कुछ..." होतं..., त्याआधी किलबील... त्याच्यासमोर प्ले झालं आणि आवडलं... तिथून पारायणं सुरु होतात - जोपर्यंत दुसरं आवडत नाही तोपर्यंत... ... गर्भसंस्काराच्या काळात आम्ही त्याला प्रकृतीप्रमाणे - वेळा सांभाळून राग ऐकवायचो - कधी मी गायचो कधी त्याचा मामा, - किंवा रोजचा रियाजही समोर बसवून व्हायचा. त्यामूळे बहुतेक त्याचं गाणं उपजत आलंय, आणि जर तेच राग जर ऐकवले तर त्याचं एक्स्प्रेशन जबरदस्त असतं...  ... गाण्याचंही असंच - तेच तेच गाणं लूप मध्ये प्ले करावं लागतं, संपलं की एकीकडे याचा ठणाणा सुरु होतो... परत प्ले करा... दिवसभर जेव्हाही हुक्की येईल तेव्हा हा खेळ सुरु होतो, त्यात दुसरं गाणं लागलेलं चालत नाही, बंद केलेलं तर नाहीच नाही.. मध्ये मध्ये कुणी बोललेलं चालत नाही, तो ऐकतांना आपणही कंपनी दिलीच पाहीजे - तसे एक्स्प्रेशन्स दिलेच पाहीजे... जो कुणी या गाण्याच्या कार्यक्रमात त्याच्या हातात सापडला त्याची तासभर तरी सुटका होत ना

TK Prosperity Private Limited

Image
२९ मे २०२०... २०१५ शेवटापर्यंत एका मराठी न्यूज चॅनेलमध्ये टाईमपास करत होतो... दुसरीकडे पुण्यात MCA सुरु होतं...! मास्टर्स पुर्ण झालं आणि मी माझ्या मूळ ट्रॅकवर आलो... म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड !... छोटे छोटे प्रोजेक्ट घेणं सुरु होतं... कॉलेजमध्ये कॅम्पस होत होते... फ्लो विथ् फ्लो सारखं सगळे देतात तसं इंटरव्ह्यू सेशन्सही सुरु होते... ... मनात आयुष्यासाठी विशलिस्ट असते - भविष्यात उद्योग उभा करायचाय असं माझ्या विशलिस्ट मध्ये होतं - फेसबुकवर Quotations मध्ये "चांगल्या पगाराची नोकरी करणारा होण्यापेक्षा, चांगल्या पगाराची नोकरी देणारा होईल" हे वाक्य खुप आधीपासून आहे...  MCA होतांना ती इच्छा प्रखर होत होती, आणि त्या इच्छेला त्या दरम्यान हवा मिळाली -  इच्छा म्हणजे एक गोल सेट झालं...! हवा मिळण्याची स्टोरी भन्नाट आहे...  एक मराठी सिनेमा आहे : वन रुम किचन. भरत जाधवचा... त्यात भरत जाधव एका मिलमध्ये काम करतो... चाळीत राहतो... एकदा तो आणि त्याची बायको बायकोच्या मैत्रिणीला भेटायला जातात ... मोठ्ठी सोसायटी, जबरदस्त फ्लॅट... तिथे त्या मैत्रिणीचा नवरा राजेश श्रृंगारपूरे त

Business Motivation Speakers are...

बिजनेस मॉडल, स्ट्रॅटेजीज्, Constitution या गोष्टी कधीच कॉपी करु नये - फुकटचे सल्ले वापरून तर नाहीच नाही. कारण प्रत्येक व्यवसाय, तो चालवणाऱ्याला माणसाचं गोल, स्वभाव, अडथळे, आयडीयाज् वेगवेगळ्या असतात... सणक वेगळी असते... मी तर म्हणतो लोगो, टॅगलाईन, प्रोफाईल्स आणि घटना ही पुर्णपणे स्वतःच्या हाताने लिहावी.... थोडे एक्स्ट्रा लागतील - पण काम म्हणजे काम होईल ! तर आणि तरच कुठल्याही संकटात आपला व्यवसाय टिकवून ठेवण्याचं बळ मिळतं... आपण किती पाण्यात आहे, आणि स्टाफ पाण्यात उतरतोय की कपडे सांभाळतोय, वेळप्रसंगी हातातली अदृष्य दोरी ओढून स्टाफला पाण्यात ओढण्याची आपल्यात धमक आहे की नाही हे सगळं कळतं...! जन्माला घालतो तोच संकटात रक्षण करतो... आपण व्यवसाय उभा केलाय तर तो आपल्यालाच मजबूत करावा लागतो... ... हजारो रुपये घेवून मोटीवेशनल लेक्चर्स ठोकणाऱ्यांच्या नादी लागू नका... ढिगानं रोज जन्माला येतात - जातात... कुठलातरी नितीवाला गेले दहा दिवस फोन करून मागे लागला होता, "व्यवसायिकांसाठी कोरोनानंतरच्या संधी आणि आव्हानं" यावर ऑनलाईन ट्रेनिंग घ्या म्हणून... फि : ३९९९९ फक्त ! प

Police : Are they devils?

पोलीसांनी स्वयंसेवक म्हणून काही पोरं पांढऱ्‍या टिशर्टमध्ये उभी केलीय... त्या पोरांची पोलीसांच्या वर ताण आहे... आत्ता साठ-पासष्ठीतला एक माणूस स्कूटीवरुन जात होता, गाडीवर किराणा सामान. या टोळभैरवांनी अडवलं...  - कुठे निघालास ? त्यांच्या वडीलांच्या वयाच्या माणसाला अरे-तुरे करत विचारलं... त्यांनी किराणा सामान दाखवलं... तोपर्यँत चौघं घोळका करुन उभे राहीले. टोळक्याने लायसन्स मागितलं, लायसन्स घरी विसरल्याचं ऐकताच एकाने चारचौघात त्याची शिव्यांसह अक्कल काढली, एकाने पाठीत काठी घातली, एकाने काठीने गाडीवरची पिशवी उडवून लावली... साखर, तांदूळ सगळं अस्ताव्यस्त झालं... एक पावती फाडायला उभा... त्या टोळक्याच्या चार क्षणांच्या आनंदासाठी एका क्षणात त्या माणसाच्या आठवड्याच्या बजेटची माती झाली... ! . लॉकडाऊनच्या पहील्या टप्प्यात सामाजिक संवेदनशीलतेच्या जाणीवेतून, उन्हातान्हात उभे राहतात, हायरिस्क फ्रंटला सिक्यूरिटी देतात म्हणून मी पोलीसांना पाण्याच्या बॉटल्स, फूड पॅकेटस्, विटॅमीन सी टॅबलेटस वगैरे दिलेले... पण नंतर त्यांच्या असंवेदनशील वागणूकीचे एक एक किस्से समोर आले तर त्यांच्य

Thought of Cities

दहा-दहा लाखाची अवाढव्य महानगरं नाही - ना हजाराचं एकदमच छोटं खेडं... एक लाख लोकांच्या लहान शहरात राहणारा माणूस आज एकदम सुखी आहे. त्याला ना महानगराची धावपळ, ना खेड्याची गैरसोय - जे जेवढं हवं तेवढं, वेळेवर - व्यवस्थित मिळतं ... सामुहीक संकटाची झळ सुद्धा कमी पोहचते ! - ओव्हरऑल मज्जानू शहरी लाईफ !  पोटार्थी लोकांची स्वार्थी गर्दी म्हणजे महानगर, ही लहान शहरं म्हणजे सुखवस्तू कुटूंब म्हणता येईल. महानगरातली लोकं एरव्ही त्याला डाऊनक्लास म्हणत असू, पण आज तीच माणसं आपली किव करताय...!

Open For Business

Image
#OpenForBusiness ... Background : कोरोनाची चाहूल लागताच १३ मार्चलाच आम्ही मुंबई आणि पुणे दोन्ही ऑफीसला वर्क फ्रॉम होमचं नोटीफीकेशन काढलं, दोन दिवसात सगळी सिस्टीम उभारली... आणि १५ नंतर १९ पर्यंतच्या काळात मुंबई-मुंबई उपनगर-ठाणे-पुणे बाहेरच्या असणाऱ्या स्टाफला फॉर सेफसाईड गावाकडे पाठवलं... दरम्यान २२ पासून ट्रेन्स, बस, डोमेस्टिक फ्लाय सगळं बंद झालं... लॉकडाऊन लागलं... आम्ही १३ पासूनच तयारी केल्याने आमची सेफसाईड स्टेप योग्य ठरली... अपेक्षित होतं की फार झालं तर १५ एप्रिल पर्यंत सगळं आवरलं जाणार... आणि महिनाभराचा बॅकलॉग पुढे दिड महिन्यांत सहज भरून येईल... ! पण परिस्थिती हाताबाहेर गेली... मुंबई - पुण्यात कहर झाला... त्यामुळे आता सगळं इतक्यात सुरु होईल असं वाटत नाही... (Off the record : किमान ३१ जुलै पर्यंत सगळं  सुरळीत होईल असं वाटत नाहीय... त्यानंतरही उभं राहतांना दिवाळी उजाडेल...) वर्क फ्रॉम होम मूळे प्रॉडक्टीविटी निम्म्यावर येते, पेमेंट टर्मस् ९० दिवस - त्यामूळे हे पेमेंटही जुलैत मिळेल... आणि सध्या प्रत्येक कंपनी कठीण काळातून जात असल्याने आधीच्या इनव्हॉईस क्लियर होत नाहीय...

Meanwhile...

Meanwhile... ... १. बाळ झाल्यानंतर तेजूला आणि बाळाला तिच्या माहेरून घरी परत आणायची तयारी होत होती, तेव्हा फेब्रुवारी एन्डला ती गमतीत बोललेली "मी आता मे शिवाय येणार नाही"... बहूतेक कोणतातरी पक्षी सुमडीत तथास्तू बोलला आणि अडकली... सॉलीड खोड मोडली गेली... आता अर्धा जूनही तिथे काढावा लागतो की काय असं झालंय... ! ... २. यूएसएची अति क्रेझ होती... तिथले प्रोजेक्टस् घेण्यासाठी - जाण्यासाठी जीव तोडायचो... यूएसए भिनलं होतं... तेच ते डोक्यात... २०१९ जानेवारीत एक प्रोजेक्ट मिळाला, २०१९ डि सेंबरपासूनच जाण्याची तयारी सुरू केली - २०२० मे मध्ये जायचं ठरलं... पुर्ण तयारी झाली आणि कोरोनाने यूएसची काशी केलीय... आता धास्ती बसलीय... जायची इच्छा आणि क्रेझ संपली... कुणी फुकटही नेलं तरी किमान तीन वर्ष जायची हिंमत होणार नाही... ... ३. १६-१७ ला मुंबईहून पुतणीला भेटण्यासाठी धुळ्याला आलो, २२ ला लॉकडाऊन लागलं... वाचलो... तिथे एकटा असतो तर "हाल"चा लाईफटाईम अनुभव मिळाला असता... मला चहा येतो फक्त, तो पण धड बनत नाही... बाकी कामाची बोंब... जे होतं चांगल्यासाठी होतं...! ... ४. फार डोकं उठलं तर दवंडी

Maharashtra Police's Shameful Behavior

एबीपी वर व्हिज्युअल्स दाखवतायेत औरंगाबाद, ठाणे वगैरेचे... साध्या वेषातले पोलीस जो दिसेल त्याला काठीने मारताय... कुणी लेडीज असेल, भाजी घेवून जाणारा माणूस, वयस्कर माणूस कुणालाही सोडत नाहीयेत... एक ४०७ मालवाहू गाडी होती, ज्यात कुठलंतरी आवश्यक सामान असेल... चालू गाडीची काच एका पोलीसाने काठीने फोडली... तो गाडीवाला जखमी होवू शकतो... कशाचीच पर्वा नाही... ... जो खरा टवाळखोर असेल तो ठीक, पण जो माणूस Genuine असेल, भाजी-दुध-किराणा-औषधं घेवून जाणारा असेल, पुणे-मुंबईत जे एकटे राहणारे अडकले ते काही सामान घ्यायला जाणारे असतील, ज्यांना ताप-सर्दी सोडून इतर आजारासाठी हॉस्पिटलला जावं लागणार असेल, एखाद्या माणसाचे जवळचे वृद्ध नातेवाईक आजारी असतील, काहीही इमरजन्सी असू शकते त्यासाठी बाहेर पडणं अत्यावश्यक असेल, त्यांना अडवण्यासारखं काय आहे ? आणि अडवलं तरी कारण ऐकून फक्त पॉवर आहे म्हणून काठीने मारायचं ? ... मूळात मुमंनी पोलीसांना प्रॉपर गाईडलाईन्स दिलेल्या नाहीत. संचारबंदी-जमावबंदी यात ते स्वतः कन्फ्यूज्ड वाटतात, लोकं गोंधळलेली आहेत... आजारापेक्षा या तुघलकी गोंधळानेच उत आणलाय... ... कोरोना जाईल, सगळं ठीक होईल

Lockdown Advice

लॉक डाऊनचा पहिला दिवस आहे... त्यात रविवार ! पुढे किमान १० ते १५ दिवस असेच काढायचे हे डोक्यात ठेवा - घरातल्या हिटलर समोर एखादा इकडचा तिकडचा शब्द सुटणार नाही याची काळजी घ्या, चुकूनही - अगदी चु-कू-न-ही कुठलाही पंगा घेवू नका... घाबरून घाबरून रहा...! सतर्क रहा !... ... त्यावर पुढचा लॉकडावून काळ सुसह्य राहणार की असह्य होणार हे ठरणार आहे...! ... एखादं प्रकरण अंगाशी आलं तर ते सोडवायला सरकार येणार नाही...! ... अजून सुसह्य करण्याची ट्रिक सांगू ? घरातलं एखादं काम हाताशी घ्या, आणि आपली कीव येईपर्यंत तेच तेच काम करा... उदा. जाळं काढा, भांडी घासा... थोडंच करायचं - पण स्लो मोशन मध्ये करायचं, दाखवून दाखवून करायचं...! खुप केलं असं वाटायला हवं ...! दोन-अडीच तास त्यात इन्व्हेस्ट करायचे... कीव येईपर्यंत...! या दोन तासांच्या इन्वेस्टमेंटवर पुढचे पंधरा दिवस राजा सारखं राहता येईल ! .. (काय केलं याचे फोटो टाकू नका, आपलं सुसह्य करण्याच्या नादात दुसऱ्याचं असह्य करू नका ! .... आणि... . . थँक यू वगैरे म्हणायची गरज नाही... खुश रहो !...) ... - तेजस कुळकर्णी

#MaharashtraNeedsDevendra

# MaharashtraNeedsDevendra ... देवेंद्रजी मुख्यमंत्री असतांना कुठल्याही संकटात स्वतःच्या जबाबदारीने, स्वतः वॉर रुम मध्ये बसून परिस्थिती हाताळत... आणि दुसरीकडे आत्ताचे मुख्यमंत्री हुजरेगिरी करणाऱ्या पत्रकार, कार्यकर्त्यांची खुषमस्करी गर्दी घेवून गर्दी करू नका सांगताय... ! ... देवेंद्रजी सीएम असतांनाही अनेक अस्मानी संकटं आली, पण कधी भिती वाटली नाही... कारण त्यांची डिसिजन मेकींग पॉवर... आणि त्याच निर्णयावर ठाम राहण्याची धडाडी... कोरोना सारख्या गंभीर संकटात देवेंद्रजींनी योग्य निर्णय घेतले असते... तिघाडी सरकारमध्ये जिथे मंत्र्यामंत्र्यात ताळमेळ नाही, गोंधळ घालतंय - तिथे देवेंद्रजींनी एकहाती यंत्रणा सांभाळली असती. ... रुग्ण-संशयित पळून जाताय, त्यांना धीर नाहीय, लोकांमध्ये भिती आहे, व्यवहार ठप्प होताय त्या परिस्थितीत देवेंद्रजींनी धीर दिला असता, पण रुग्ण वाढू नये यासाठी जनतेला विश्वासात घेवून लोकल सेवा बंद कठोर पावलं उचलली असती... गावी जाणाऱ्यांसाठी बसेस, मदतीसाठी जागोजागी बूथ आणि योगी सरकारने जशी मदत केली तशी मदतही देवेंद्रजींच्या सरकारने केली असती. ... आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजि

खाSSरे

#गोड_गोष्टी ... तेजू आणि माझं लेकरु तिच्या माहेरी सेलूला आहे... ते पुढच्या महिन्यात येतील... त्याला मी पंधरा - वीस दिवसांत भेटायला जातो... आणि कधी कधी माझे मम्मी पप्पा सुद्धा सोबत असतात...  लेकराला माझ्या पप्पांचा आवाज, स्पर्श खूप कळतो...  आणि कितीही रडत असला तरीही पप्पांनी त्याला एकदा हाक मारली की गप्प बसतो... हसतो...! रडत असला तर पप्पा त्याला "का रे बाळा ... का रडतोय ?'' हे म्हणतात... त्याला ते "का रे बाळा" एकदम ओळखीचं झालंय...! पप्पा बोलले की तो हाताने ये ये करतो..! ... आज लस देवून आणलेली तर एकदम गाढ झोपला होता - तेजूच्या कॉलनीत खारे शेंगदाणे वगैरे विकणारी गाडी आली, तो माणूस "खाsssरे" म्हणत ओरडत होता... ते "खाsssरे" गाढ झोपलेल्या लेकराच्या कानावर आलं... त्याला ते "का रे - का रे" ऐकू आलं, आणि वाटलं पप्पा आले... लेकरु खुश होवून हसायला लागलं... हाताने ये ये सुरु केलं ... तो आवाज जसा जसा कमी होत गेला तसं त्याला कळलं आणि चेहऱ्यावरचं हसू सुद्धा कमी झालं... आवाज बंद झाला आणि लेकराने जोरदार भोंगा पसरला... ...

कोरोना : जागतिक संकट (साभार)

कोरोना विषाणू : मानवजातीवर सुटलेले ब्रम्हास्त्र.              सूर्यापासून फेकल्या गेलेल्या वायूच्या धगधगत्या गोळ्यातुन पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ४८० कोटी वर्षांपूर्वी झाली.  सुमारे ३८५ कोटी वर्षांपूर्वी पहिले सजीव, म्हणजे अतिसूक्ष्मजीव  अवतरले. नंतर तीन साडेतीनशे कोटी वर्षे पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचे राज्य होते. आपल्या कल्पनेतही न बसणारे, पृथ्वीवरील तापमान व वातावरणाचे टोकाचे बदल व  प्रतिकूलता त्यांनी पचवली. पृथ्वीवरील सजीव जैविक वस्तुमानाचा विचार केला तर त्यापैकी साधारण ८०% भाग हा सूक्ष्मजीवांचा आहे. दिसणाऱ्या सजीवांच्या २० कोटी व सूक्ष्मजीवांच्या सुमारे ४० कोटी प्रजाती, शंभर वर्षांपूर्वी होत्या.  'विषाणू' हा माणसासाठी हानिकारक अतिसूक्ष्मजीव, अनुकूल स्थिती व पोषण उपलब्ध असल्यास, एका दिवसात २८०००० अब्ज जीव वाढवतो. आपण लोकसंख्या वाढली वाढली म्हणून ओरडा करतो. पण पृथ्वीवर  माणसांची संख्या वाढून वाढून किती झाली, तर सुमारे ७५० कोटी. आता समजुन जा, सूक्ष्मजीवांच्या संख्येचा व क्षमतेचा विचार केला तर आपण त्यांच्या खिजगणतीतही नाही. भले आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ व शक्तीवान मानत असू! ७

Corona Go... Go Corona...

माझ्या काही सवयी आत्ता कोरोनाला माझ्यापासून दुर ठेवण्यात कामी येतील असं दिसतंय... काही गोष्टी वजन कमी करणं, सुटलेलं पोट कमी करणं, गाण्याच्या परिक्षांच्या भितीने आवाज ठिकाणावर ठेवणं यासाठी केल्या. आणि काही गोष्टी ऑरा, जोतिष्य वगैरे सल्ले घेवून सुरु केल्या ज्या करणं आता सवयींचा भाग आहे... त्याचे रिजल्टस मी चेक केले नाहीत, पण फायदा नक्कीच झालाय...  (कुठलंही नुकसान झालं नाही...) एकप्रकारे स्वतःसाठी प्रोटेक्शन तयार झालंय... तुम्ही वापरुन बघा... झाला तर फायदाच होईल. नुकसान होणार नाही. ... कोरोनाची भिती ५० टक्के तरी टळेल... ... १. भिमसेनी कापूरचा वापर : कुणीतरी सल्ला दिला, भिमसेनी कापूर रोज घरी आणि ऑफिसमध्ये जाळला की नकारात्मकता निघून जाते... वातावरण शुद्ध होतं... बायकोने लगेच अंमजबजावणी केली... एक किलो भिमसेनी कापूर आणला, प्लास्टिकच्या डब्यात भरला, आणि रोज संध्याकाळी एक तुकडा जाळणं सुरु केलं...! याचा आकार कापरासारखा स्क्वेअर किंवा गोल वगैरे नसतो... शेपलेस असतो. साधा कापूर बहूतेक सातशे-आठशे किलो मिळतो, तर हा दोन हजार रुपये किलो... ! एकदम स्ट्राँग... डब्बा उघडला की त्याचा वास पुर्ण घ

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved