Posts

Showing posts from May, 2016

Mseb

आत्ताच, (वाचा आणि शिका) शेजारच्या प्लॉटवर आज स्लॅबचं काम सुरूय. तर पुढे आलेल्या पोर्चवर मशीन लावण्यासाठी त्यांना मेन डिपी वरुन गेलेली आमची सर्विस वायर नडत होती... कुलकर्णी आपकी ये वायर निकाले क्या ? (एमएसइबीला आम्ही अवघे चौदाशे मोजून रितसर काम केलेलं... सो काढायचा प्रश्नच नाही) - क्यो भाई ? प्रॉब्लेम क्या है ? नही निकालना... और निकालना है तो वैसा ऐफिडेविट स्टॅम्प पे लिख के दो... हम पूरा को - ऑपरेट करेंगे... . काम थांबलं... तसं एक एक पैतरे वापरणं त्यांनी सुरू केलं... साम - दाम वापरलं... पूर्वानुभवावरून दंड वापरणं शक्य नव्हतं (कारण भेद मी वापरतो.. मग जास्त दुखतं)... फायनली त्यांनी एक वेगळा बॉल टाकला.. . एक फुटकळ वायरमन बोलावला... खाकी चड्डीत. (त्याला एमएसइबी वाला बनवून आणला) तो आणि मी यांच्यात झालेली एक अख्खी ओव्हर. तो आला, एकदम तोऱ्यात... फुल्ल सरकारी फॉर्मात... पायातली चप्पल तशीच ठेवून हॉलमध्ये शिरला... च्यामारी.. "ओ.. हॅलो... ती चप्पल गेटबाहेर काढून या... चप्पल घालून घरात नाय यायचं..." पहिला बॉल बाऊंड्री के पार... मग फटक्यातच वर आला... तो - "हे असं च

HSC Result Maharashtra

आज बारावीचा रिजल्ट... हा निकाल महत्वाचा असला तरी आयुष्यापेक्षा नाही... त्यामुळे जर तुम्ही स्वतः विद्यार्थी असाल तर कमी गुणांनी खचू नका... खूप संधी असतात. दुसरा चान्स मिळतो, त्यामुळे आत्महत्या वगैरेचा विचार मनातही आणू नका... खचू नका. . तुम्ही जर पालक असाल तर, मुलाची इतरांशी तुलना करू नका. आणि कमी मार्क मिळाले म्हणून मारझोड, टोमणे, रडबोंबल, सुतकी चेहरा वगैरे ड्रामा करून मुलाला आणखी रडवू नका. . जो निकाल येईल तो आनंदाने स्विकारा. अपयश आलं तर हा धक्का पचवण्याची, बॅडपॅच स्विकारुन सावरण्याची हिंमत द्या. . यश मिळेलच... !

Tont

जे खरे सभ्य असतात... ते लोकं कुठेही समारंभाला जातांना एक तर घरून जेवण करून जातात, किंवा घरी येवून जेवण करतात... . इतरांच्या बाबतीत ते ताट घेऊन जेवणाच्या रांगेत कमीतकमी तीन वेळा उभे असतात... आणि जास्तीत जास्त हे त्यांच्या भूक आणि निर्लज्जपणावर अवलंबून असतं... :-P :-D . मिडीया चॅनेल वर प्रत्येक बाबतीत तोंड मारणारे उदा. बी कोळसे पाटील, कुमा .केत, चौधऱ्यांचा नाकर्ता विश्या, बग्ळा... जेवणाच्या रांगेत ताट घेवून उभे दिसतात.

Political Fact

इथले प्रादेशिक पक्ष (इंजिन, धबा, घड्याळ, लाल) किंवा ह्यो तो आर पी गट यांच्या तुलनेने राष्ट्रीय पक्ष - भाजपा आणि कॉंग्रेस यांची कार्यकर्ता फळी मजबूत आहे. . कारण या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते वैयक्तीक आयुष्यात वेलसेट असतात. अर्थात शिक्षण-उद्योगधंदा हा बेस पक्का करूनच ते राजकारणात उतरतात... आणि शांतपणे त्या विचारधारेवर चालतात. . इतर पक्षाचे कार्यकर्ते नेमके इथेच माती खातात, आणि अडगळीत पडतात.

Modi - Waghela And Courtesy

Image
नक्की थोडा वेळ काढुन वाचाच... 1990 ची घटना.. आसामहुन दोन मैञिणी रेल्वे भरती करिता गुजरातला निघाल्या. वाटेत एका स्टेशनवर गाडी बदलुन पुढील प्रवास त्यांना करायचा होता . ठरल्याप्रमाणे त्यांचा प्रवास सुरु झाला खरा पण पहिल्या प्रवासात काही मुलांनी त्यांची छेडछेाड केली त्यामुळे पुढील प्रवास तरी सुकर व्हावा म्हणुन देवाची प्रार्थना करतच त्या स्टेशनवर उतरल्या आणि धावत जाऊन रिझरवेशन चार्ट पाहु लागल्या. तो पाहुन त्या दोघींच डोकच चक्ररावल. कारण तो चार्ट त्यांची तिकिटे कन्फर्म नाहीत अस दाखवत होता व प्रवास तर राञीचा होत. न राहुन त्यांनी जवळच उभ्या असलेल्या TC ला जागा मिळुन देण्याची विनंती केली. TC नी देखील गाडी आली की पाहु अस म्हणुन त्यांची बोलवण केली. एकमेकींना धीर देत त्या गाडीची वाट पाहु लागल्या . शेवटी एकदाची गाडी आली तश्या दोघीजणी कश्याबश्या डब्यात चढल्या व एका सीटवर विसावल्या आणि समोर पाहता तो काय , समोर दोन तरुण बसले होते . मागच्या प्रवासातला अनुभवाची आठवण येऊ नाही म्हणल तरी सारखी येत होती . पण त्या सिटवर बसण्या शिवाय दुसरा पर्याय ही नव्हता . कारण डब्यात कुठेच जागा नव्हती.

Elections Poll

Image
नवरा मेला तरी हरकत नाही, सवत रंडकी झाली पाहिजे - पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू . आसाम मध्ये भाजपाला यश,  यासाठी हिंमत लागते...! . (बाकी, विचौ, कुके, निवा वगैरे मंडळी जीव सोडताय निकाल बघून... मरतील किंवा त्यांचं मानसिक संतूलन तरी बिघडेल.. वेड लागेल... दगडं मारत फिरतील... आवरा कुणीतरी त्यांना...)

भारतीय अभिजात संगीताचा रियाज़

-वर्षा ह्ळबे आयुष्यात काहीही आत्मसात करायचं म्हंटलं की त्या गोष्टीची सवय करणं, त्याचे पूर्णपणे आकलन करणं, आणि त्याचा सतत सराव केल्यानेच ती गोष्ट आपण काबूत आणू शकतो; तिच्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. त्यात एखादी संगीतासारखी ललित कला असली तर त्यात अजूनच मेहनत आली हे उघडच आहे! ती काही पाककृती नव्हे की दिलेले पदार्थ, दिलेल्या प्रमाणात घातले की हमखास, शंभर टक्के ती पाककृती उत्कृष्ठच होणार! कुठलीही ललित कला ही पंचीन्द्रीयांच्या स्पंदनांमधून जन्माला येते आणि कलाकाराच्या प्रतिभेतून आणि मेहेनतीतून प्रगल्भ होते. संगीताचे पण असेच आहे. एखादा कलाकार जन्माला येतो हे खरं; किंव्हा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे ही तितकचं खरं, पण त्याला रियाज़ाची जोड नसल्यास ती प्रतिभाही काळाच्या ओघात नाश होऊ शकते. संगीत, आणि खास करून भारतीय अभिजात संगीत, हे ईश्वरी मानलं गेलं आहे पण कुठलही संगीत मनाला आनंद देतं आणि रोजच्या रहाटगाडग्यापासून लांब न्हेतं. भौतिकतेच्या पलीकडेही काहीतरी आहे ह्याची जाणीव करून देतं. त्यामुळे ही ललित कला जरी कधीच परिपूर्ण किंव्हा पूर्णपणे निर्दोष होऊ शकत नाही, तरीही तिची साधना करताना ती बरोबर क

Madhuri Dixit : Pahla Pahla Pyar Hain

Image
माधुरी दिक्षीत आजही त्यांच्या करोडो समवयस्कांचं पहला पहला प्यार आहेत. आणि याची सुरुवात हम आपके है कौन नंतरच झाली असावी... कारण आजही हम आपके मधल्या "पहला पहला प्यार है" गाण्यातल्या त्यांच्या अदा बघून भले भले घायाळ होतात, त्यांच्या टिव्हीवरच्या त्या नजरेलाही नजर भिडवू शकत नाहीत. uuimaaa सोबत... त्या पूर्ण सेगमेँटमधला त्यांचा अॅपिअरन्स लाजबाब आहे. . दिग्दर्शक सूरज बडजात्याने तो सेगमेँट जीव ओतून अप्रतीम घडवलाय. निशा आणि प्रेमच्या प्रेमाची गोड सुरुवात होते. मूकेपणे मंद प्रकाशात दोघांच्या स्पर्शाने, नजरेने ते प्रेम फुलत जातं. त्यातला त्यांचा साधा आणि लाईट मेकअप, कर्ल हेअर्स, बोलके डोळे, साजेसं कॉस्ट्यूम आणि घायाळ करणाऱ्‍या नजरा सौँदर्याला चार चाँद लावतात. अप्रतिम सौँदर्य, अवखळ तारुण्य आणि बॅकग्राऊंडला बालसुब्रमण्यमच्या आवाजातला अंतरा "उसकी नजर, पलको कि चिलमनसे मुझे देखती...." - माधुरी दिक्षीत याच क्षणी सुपरस्टार होते, आणि तिच्यावर करोडो जीव कुर्बान होतात... . आमच्या आधीची एक अख्खी पिढी खुलवणाऱ्‍या, त्यांचं पहिलं प्रेम असणाऱ्‍या, लाखोँच्या मनात राहणाऱ्‍या या अभिने

Mi Marathi

"हलो इजीट मि. कुलकर्नी?" "येस, स्पिकींग. मे आय नो युवर नेम प्लिज्?"(अमराठी जनतेकरता खास वेगळा आवाज). "सर धिसीज रिचा जोगलेकर फ्राॅम #$% कंपनी? "जोगळेकर?" "या सर" मग पुढे व्यावसायिक चर्चा सुरू झाली... मी त्या कंपनीशी बरेचदा संबंधीत असल्याने नवखे काही नव्हते. नवखे होते तिचे ते तिचे आपले नाव 'जोगलेकर' सांगणे.. माझा मराठी बाणा जरासा उभरता झाला. चित्पावनी युवतीला 'ळ' ऐवजी 'ल' म्हणायला लागावं? काय दिवस पाहावा लागतोय? हेदवीचे जोगळेकर त्यांच्या हयातभर 'ळ' म्हणायला ठणकावून गेले असतील. त्यांच्या घरी हे असले डेव्हीएशन? चर्चा संपली.. मी माहिती हळूहळू काढू म्हटलं.. "मिस् जोगळेकर व्हेयर आर यू फ्राॅम?" "सर बेसिकली आयाम फ्राॅम ग्वालियार बट स्टडिड इन् डेली." (गोविंदपंत बुंदेल्यांनंतर इतके दूरचे बहुतेक ह्यांचेच मराठी  कुटुंब.बाकी इंग्रजीत दिल्ली चे स्पेलिंग देहली असेच ना? डेली काय किस्सा आहे? ) "सो यू कुड नाॅट लर्न मराठी?" (डायरेक वर्मावर बोट) "माला मराठी येत कुलकर्नी सर बट आय

साध्वी प्रज्ञावरचा मोक्का हटवला.

साध्वी प्रज्ञासिंग यांना न्याय मिळाला... तो मिळणारच होता... पण, कर्नल पुरोहीतांचं काय होईल ? . आणि साध्वीजींना आणि कर्नलजींना क्रूरपणे मरणयातना देणाऱ्या, त्यांची आठ वर्ष काळी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळेल ? हेमंत करकरेंबद्दल काय मत आहे ?... इतरांचं काय ? भगवा दहशतवाद हा शब्द जन्माला घालणारे नालायक कुठे फेडतील पापं ? बंटीगाझाला कधी किडे पडतील ? तत्कालिन गृहमंत्री आणि तोंडाला येईल ते बरळलेले सुशीलकुमार शिंदे माफी मागतील ? . न्याय होतोच... आणि तो व्हायलाच हवा... निर्दोषांना त्रास झाला, पण भट्टीतून आल्याने सोन्याला खरी झळाळी मिळाली...! आणि दोषी आता सडतील... सडतीलच !

सहजीवन

लग्नानंतर वीस एक वर्षांचा कालखंड गेल्यानंतर उतरत्या काळात नवरा-बायको जवळपास एकमेकांसारखे दिसायला लागतात... एकमेकांसारखे बोलायला लागतात... अगदी अनोळखी माणूसही हे समजू शकतो.. सहजीवन खऱ्या अर्थाने एकरूप करतं... आणि ती एकरूपता मनाप्रमाणेच बाह्य रुपातही दिसून येते... . . असो.

Sadhwi Pradnya Sing

साध्वी प्रज्ञासिंग यांना न्याय मिळाला... तो मिळणारच होता... पण, कर्नल पुरोहीतांचं काय होईल ? . आणि साध्वीजींना आणि कर्नलजींना क्रूरपणे मरणयातना देणाऱ्या, त्यांची आठ वर्ष काळी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळेल ? हेमंत करकरेंबद्दल काय मत आहे ?... इतरांचं काय ? भगवा दहशतवाद हा शब्द जन्माला घालणारे नालायक कुठे फेडतील पापं ? बंटीगाझाला कधी किडे पडतील ? तत्कालिन गृहमंत्री आणि तोंडाला येईल ते बरळलेले सुशीलकुमार शिंदे माफी मागतील ? . न्याय होतोच... आणि तो व्हायलाच हवा... निर्दोषांना त्रास झाला, पण भट्टीतून आल्याने सोन्याला खरी झळाळी मिळाली...! आणि दोषी आता सडतील... सडतीलच !

Kiss

सकाळचा किस्सा. मी गाडी बाहेर काढत होतो, गेट समोरच बसमध्ये स्कूल गोईंग मुले बसलेली होती, बहुदा कुठल्यातरी ट्रिप साठी निघाली होती. त्यांना निरोप द्यायला बऱ्याच जणांचे वडील किंवा आई किंवा दोघेही आलेली होती. मला गाडी काढता येत नव्हती म्हणून  त्यांची बस गेली कि, आपली गाडी निघेल, म्हणून मी तिथेच थांबून होतो. सगळी मुले टाटा पप्पा, बाय बाय मम्मी करत होती. माझ्या बाजूच्या खिडकीत एक छोटा मुलगा बसला होता. तिसरी किंवा चवथीचा असेल. प्रचंड उत्साहात होता... बाय बाय सेरेमनी दरम्यानच तो छोटा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला....`` टाटा पप्पा, मम्मीला पण बाय सांगा, आणि मम्मीला एक पप्पी पण द्या''.......... बाप एकदम कावरा बावरा झाला. इकडे तिकडे बघू लागला, पण सगळे जन आप-आपल्या पिल्लाना निरोप देत असल्याने कुणाचे त्या मुलाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते, मी मात्र डोम कावळ्यासारखा बरोबर त्यांच्या मागेच थांबलेला होतो. मी हसत त्या व्यक्तीच्या पाठीवर थाप मारली आणि म्हटले.... चिरंजीवांची आज्ञा ऐकली न?.... पटकन घरी जाऊन पूर्ण करून टाका, काय?...... बावरलेला बाप खदखदून हसला, आणि मी म्हटले चला... आजचा दिवस मस्त ज

UPSC

अन्सार शेख नावाच्या कोणी व्यक्तीने म्हणे "शुभम" नावाने भाड्याने जागा घेतली होती. आता, UPSC परीक्षेत यशस्वी झाल्यावर, त्याने आपले खरे नाव जाहीर केलेय. . अन्सार शेखने आपले खरे नाव लपवले नसते, तर काय झाले असते ? त्याला जागा मिळायला थोडा त्रास झाला असता , त्याला मुस्लीम बहुल वस्तीत जागा बघायला लागली असती, जी कदाचित त्याच्या दृष्टीने थोडी गैरसोयीची झाली असती , कदाचित त्याला नाईलाजाने एखाद्या लॉजवर राहावे लागले असते, ?? ह्यातली कुठलीही गोष्ट , ज्याला "आकाश कोसळणे" म्हणतात, तशी नव्हती ? . मुळात ज्याला UPSC परीक्षांची तयारी करायचीय, तो माणूस, बहुधा दिवसाचा बराचसा वेळ, दहा बारा तास सुद्धा, एखाद्या Library तच घालवतो, घालवावा लागतो. त्यामुळे मुळात हा "जागेचा प्रश्न" ओढूनताणून मोठा केल्यासारखा वाटतो. . खरा प्रश्न हा आहे, कि जी व्यक्ती, थोडीशी गैरसोय टाळण्यासाठी चक्क खोटे नाव लावणे, (तोतयेगिरी, Impersonation) ह्या "पर्याया"चा जाणीवपूर्वक, स्वेच्छेने स्वीकार करते, ती एक सनदी अधिकारी म्हणून काम करण्यास कितपत योग्य ?? . इथे त्याच्या मुस्लीम असण्याचा का

BJP : Tejas Kulkarni's Fukat Salla

सचिन तेंडूलकर १२ वी नापास झाला होता... तरीही क्रिकेटमध्ये त्याने रेकॉर्ड सेट केलेत... . मोदी ७७ मध्ये नापास झाले, याचं कारण होतं इंदिरा गांधीच्या काळात त्यांना आणि अनेक स्वयंसेवकांना भूमीगत व्हावं लागलं होतं. त्यामुळे ते नापास झाले म्हणून ढ आहेत असं नाही. लोकांनी त्यांना २८२ जागा त्यांची डिग्री बघून नाही, पेडीग्री बघून दिल्या. . खोटी डीग्री दाखवून प्रधानमंत्री होतील इतकं कच्चं लिंबू काम मोदी नक्कीच करणार नाही. तो माणूस भल्याभल्यांना पोहचवून उरलाय... अमित शहा, गडकरी, नायडू, जेटली, अडवाणीजींना मोदी अजून व्यवस्थित कळले नाहीत, तिथे बाकीच्यांनी त्यांना खिंडीत गाठल्याचा आव आणणं म्हणजे एकतर रात्रीची उतरली नसणे, किंवा भावनांचा व्यवस्थित निचरा न होणे असू शकतं... . भाजपाने केजरीवालला महत्व देणं म्हणजे गल्लीत भूंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला किस करणं झालं... आता भाजपाच्या ज्या नेत्याकडे हल्ली काम नाहीय त्यांनी केजरीवालच्या मागे लागायला हवं. आयआयटी ची डिग्री कुठे मिळाली, कधी मिळाली, १२ वीला किती होते, कट ऑफ किती होता वगैरे... गाडलेले म्हडे उकरा...

मी आणि आई... तुझ्या उपकारा जगी तोड नाही...

Image

मुस्लीम

मुस्लीम धर्मीयांचे एकूण रागरंग कसेही असले तरी, त्यांची धार्मिक कट्टरता, धार्मिक मुद्यांवरची एकी आणि धर्मावरची एकनिष्ठता हे त्यांच्यातले गुणच त्यांना प्रत्येक आघाडीवर टिकवून ठेवतात... जे कौतूकास्पदच आहेत. . हिँदू धर्मात सगळं काही आहे, श्रद्धा-कर्मकांड... पण आपल्यात एकी नाही. आपलेच आपल्या मुळावर उठतात... कुऱ्‍हाडीचे दांडे गोतास काळ सारखं. तृप्ती देसाई, विद्या बाळ किँवा वागळे-केतकरची पिलावळ... यांचंच प्रतिक आहेत. . तृप्ती देसाई हाजीअलीच्या दर्ग्यात या जन्मात घुसू शकत नाही, तिला या जन्मानंतर पुढचा जन्म पुरुषाचा घ्यावा लागेल. जो फिक्स आहे. कन्हैया मुस्लीमांविषयी बोलू शकत नाही, एकही मशिद रस्त्यासाठी तोडली जात नाही... सिँहस्थाला विरोध करणारे हज अनुदानाला गप्प बसतात. . कारण तो धर्म त्यातले लोक एकत्र विरोधात उभे राहतात. तृप्तीच्या काळ्या तोँडाला काळं फासायची किमान तोँडावर धमकी तरी देतात... तिच्या समोर शेकडोनं कडं करुन उभे राहतात, आणि तृप्तीला हात हलवत परत जावं लागतं... मान गये भाई... कोल्हापूरात तिला दोघं चौँघांनी बमकावलं... हिँमत दाखवली, पण आपण सगळे शेकड्यानं त्या दोघं चौघांच्या माग

=कार्यकर्ता, फॅन, समर्थक वगैरे=

आत्ता एका कॉलेजमेट मित्राचा फोन आला... चार वर्षांनंतर "तेजा, कुठेस ? एक मदत हवीय... महत्वाचं बोलायचंय..." - हा मित्र नेतेगिरीची कम पुढारकीची - कम पेप्रात "यांनी परीश्रम घेतले मध्ये नांव" कम दादा तुम्हीच वाली खाज प्रचंड असलेला... त्यामुळे येऊ घातलेल्या एका सोहळ्यासाठी देणगी मागणे असा भयंकर कार्यक्रम असावा असं समजून ऑफीसमध्ये नको, एखाद्या रेस्ट्रांत भेटू असा दुहेरी कार्यक्रम ठरला... मला भूक लागलेली हे (च) या मागचं पहिलं कारण... - भेट झाली आधी पोटोबा... मँगो केक, समोसा, डोसा असं पोटभर चोपलं... आणि स्लाईस पिता पिता... "बोल... काय म्हणतोस ?" देणगी वगैरे मागणार असेल तर टाळण्याचं कारण शोधत असतांनाच मित्रानं चारचौघात सायलेंट भोकाड पसरलं.. हातातली बॉटल तशीच ठेवावी लागली... अरे अरे गप... नीट सांग काय झालं... - जॉब नाहीय, चणचण आहे खूप... तू काही मदत करु शकतोय ? - कां ? बीई पूर्ण केलंस की नाही ? - नाही झालं... ते कां नाही झालं याचं कारण ऐकून त्याची किव, राग, अर्रर वगैरे मिक्स फिलींग आल्या... "आत्मघातकी माणसा... आधी सांगत होतो तर धमकी दिलीस, भला

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved