Modi - Waghela And Courtesy

नक्की थोडा वेळ काढुन वाचाच...
1990 ची घटना..
आसामहुन दोन मैञिणी रेल्वे भरती करिता गुजरातला निघाल्या. वाटेत
एका स्टेशनवर गाडी बदलुन पुढील प्रवास त्यांना करायचा होता . ठरल्याप्रमाणे त्यांचा प्रवास
सुरु झाला खरा पण पहिल्या प्रवासात काही मुलांनी त्यांची छेडछेाड केली त्यामुळे पुढील
प्रवास तरी सुकर व्हावा म्हणुन देवाची प्रार्थना करतच त्या स्टेशनवर
उतरल्या आणि धावत जाऊन रिझरवेशन चार्ट पाहु लागल्या.
तो पाहुन त्या दोघींच डोकच चक्ररावल.
कारण तो चार्ट त्यांची तिकिटे कन्फर्म नाहीत अस दाखवत होता व प्रवास तर राञीचा होत.
न राहुन त्यांनी जवळच उभ्या असलेल्या TC ला जागा मिळुन
देण्याची विनंती केली. TC नी देखील
गाडी आली की पाहु अस म्हणुन त्यांची बोलवण केली.
एकमेकींना धीर देत त्या गाडीची वाट पाहु लागल्या .
शेवटी एकदाची गाडी आली तश्या दोघीजणी कश्याबश्या डब्यात
चढल्या व एका सीटवर विसावल्या आणि समोर पाहता तो काय , समोर दोन तरुण बसले होते .
मागच्या प्रवासातला अनुभवाची आठवण येऊ नाही म्हणल तरी सारखी येत होती . पण त्या सिटवर
बसण्या शिवाय दुसरा पर्याय ही नव्हता .
कारण डब्यात कुठेच जागा नव्हती.
गाडी सुरु झाली तशी त्या दोघींची नजर मगाचा TC कुठे दिसतो का म्हणुन ईकडे तिकडे फिरु लागली.
काही वेळान गर्दीतुन वाट काढत तो TC त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला की गाडीत कुठेच
जागा नाही .
हे ऐकुन तर त्यांची पाचावरच धारण
बसली . कारण तो रेल्वे प्रवास राञीचा होता.
गाडीने आता हळुहळु वेग पकडला. जस जशी राञ जवळ येऊ लागली तशी त्या दोन मैञिणींच्या मनात
भिती काळी होऊ लागली .
पण समोर बसलेले तरुण त्यांची ती भितीची अवस्था एकदम बारकाईन टीपत होते .
जशी राञ झाली तसे त्या तरुणांनी आपले बर्थ रिकामे केले आणि त्या दोन तरुणींना नाही म्हणत असतानाही देऊन रेल्वेत चक्क खाली झोपले .
मागील अनुभवामुळे भितभितच त्या दोघीजणी झोपी गेल्या.
गुजरातकी चाय म्हणत चहावाल्यान गुजरात आल्याची वर्दी दिली तश्या त्या दोन तरुणी ताडकन
उठल्या व त्या तरुणाना राञी केलेल्या सहकार्यबदल धन्यवाद म्हणु लागल्या.
तसा त्यांच्यातील एक तरुण
म्हणला, " बेहेनजी गुजरात मै मदत लगे तो जरुर
बताना " ...आता त्या दोघींच त्या तरुणां विषयीच मत नक्कीच बदल होत.
न राहुन त्या तरुणीन आपल्या जवळच्या वही मध्ये त्याना त्यांचा नाव व पत्ता लिहियला सांगितला . त्यांनी वहीत नाव व पत्ता लिहिला आणि हमारा स्टेशन आया म्हणत स्टेशनवर उतरुन गर्दित ते तरुण नाहीशेही झाले .
त्या तरुणीन त्या दोन तरुणांची डायरीत लिहिलेली नाव
वाचली , तर नाव होती नरेंद्र मोदी व शंकरसिंग वाघेला...
... सदर अनुभव ज्यांना आला त्या लेखिका आता General Manager of the centre for railway information system Indian railway New Delhi येथे कार्यरत आहेत व हा लेख The Hindu ह्या इंग्रजी पेपर मध्ये पान नं 1 वर A train journey and two names to
remember ह्या नावाने दिनांक १ जुन २०१४
रोजी छापुन आला आहे ... !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved