Posts

Showing posts from April, 2016

Adarsh Implosion

Image
३१ मजली आदर्शची बिल्डींग पाडायला छिन्नी हातोडा घेऊन चार वर्ष ठाक ठूक करत बसणार नाही, धक्काही देणार नाही...  किंवा ती एकाच बाजूला पडेल तर  बेंबीच्या देठापासून "आssssssss" ओरडत लेफ्ट टू राईट... राईट टू लेफ्ट पळायची सुध्दा वेळ येणार नाही... काळजी करू नका... . अश्या मोठ्या बिल्डींग पाडण्यासाठी Building Implosion method वापरतात. ज्यात ती इमारत काही क्षणातच मधोमध कोसळते. विषिष्ठ पद्धतीने अंतर्गत आणि बाह्य भागावर दबाव टाकतात. या पध्दतीत त्या इमारतीवरची गुरुत्वाकर्षण धरून ठेवण्याची शक्ती (क्रिटीकल सपोर्ट) कमी होतो, आणि ती इमारत स्वतःचं वजन धरू शकत नाही. चक्कर आलेला माणूस किंवा पत्याचा बंगला कोसळावा अशी ती इमारत बरोबर मध्यभागी कोसळते. ज्यामुळे आजुबाजूच्या इतर भागांना लहान धक्के बसण्याव्यतिरीक्त आणि धुळ सहन करण्याशिवाय इतर काहीच नुकसान होत नाही. . या प्रक्रीयेत इमारतीत तळापासून छोटे स्फोट घडवुन आणतात. आणि फक्त इमारती पाडायचे कामं करणारे Building Implosion Expert ची अख्खी टिम त्याठिकाणी असते. . भ्रष्टाचाराचा आदर्श असलेली बिल्डिंग पडणार. त्यात निघणारं प्रचंड स्टिल, वायरींग, प्लंब

Congo India

Image
ईस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज अथक प्रयत्नांनंतर सातवा आणि या सिरीजचा शेवटचा नेव्हीगेशन उपग्रह, IRNSS-1G हा PSLV XL C33 या रॉकेटद्वारे आकाशात प्रक्षेपित केला... १ जुलै २०१३ ते आज दरम्यात सात उपग्रह ३६००० किमी ऑर्बीटल उंचीवर प्रस्थापित केले गेले.. यापैकी तीन जीईओ आणि चार जीएसओ ऑर्बीटमध्ये आहेत. ज्यामुळे भारताकडे आता स्वत:चे ग्लोनस आणि जीपीएस साधन निर्माण झाले आहे... भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे साधन खूप महत्वाचे आहे. भारतीय विज्ञान इतिहासातला एक महत्वाचा क्षण झाला... . यापूर्वी भारताला अमेरीकेवर अवलंबून रहावं लागत होतं. त्यामुळे "अब हमारे रास्ते हम खुद तय करेँगे" असे सूचक गौरवोद्गार पंतांनी काढले... . इस्रोचे शास्त्रज्ञ एकापेक्षा एक रत्न आहेत...! या मोहीमेसाठी एपीजेकलामांचाही पाठपुरावा होता... तत्कालीन पंतांनीही बरंच लक्ष घातलं होतं... सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं...! अभिमान बाळगावा अशी माणसं आहेत ही... :-):-) - तेजस कुळकर्णी

सैराट

Image
=सैराट= मंजुळे भौ नी फॅन्ड्री काढला... "उच्चवर्णीय शिस्टीम" च्या विरोधात जब्या ने फिरकावलेला दगड म्हणून तो बकवास सिनेमा थोडा चाललापण... पण त्यात त्याला इतकी अक्कल नाही, शाळेत जाणाऱ्या मुलीवर - (मग ती मराठा असो, ब्राह्मण असो किंवा सो कॉल्ड जब्याच्या भाऊबंदकीतली असो) कुठल्याही मुलाने (तो पण जब्या असो किंवा मराठा, बाह्मण असो ) लाईन मारली, छेड काढली तर त्याला विरोधच होणार... पोरांना फटकेच पडणार... . जब्या ऐवजी त्या मुलीवर तिच्याच जातीतल्या मुलानं लाईन मारली असती तरी त्याचा शेवट हा शोकांतिकाच असता... लहान वयात लग्न लाऊन द्यायला, लफडी करायला परवानगी द्यायला त्या मुलीचे किंवा त्या मुलाचेही पालक वेडे नाहीत... . लहान वयात, शालेय वयात होणारं पाहिलं प्रेम हा खुप हळवा विषय आहे. "शाळा" मध्ये जसा छान हाताळला, त्या मानाने सैराट, फॅन्ड्री थिल्लर वाटतात. बालवयात होणाऱ्या प्रेमाला जातीय रंग दिला तर आपण मोठा तीर मारलाय असं मंजूळेंना वाटत असेल, पण मराठी प्रेक्षक सुज्ञ आहेत. इथे शाहरूखखानला पडल्या, सैराट  पडेलच ! . शाळेत जाणाऱ्या मुलीच्या सैन्डलवर फुलं ठेवणं, भर वर्गात छि

Business

आज एका मोठ्या कंपनीचा एका प्रोजेक्टसाठी कॉल होता... मी गेलो. माझ्या कंपनीचं वय ७ महिने १० दिवस... माझं वय २३ वर्ष ४ महिने ९ दिवस... . त्यांनी Description समोर ठेवलं, - चांगलंय... बजेट समोर ठेवलं, - बरं ! पुढे ? Conditions ची रेकॉर्ड सुरु केली... एकापेक्षा एक कंडीशन... (माझ्या कंपनीच्या "बाल"वयाचा फायदा घेताय तर...) च्यामारी - मला अक्कल नाहीय, मला प्रोजेक्ट देऊन माझ्या सात पिढ्यांवर उपकार करताय किंवा मी भीक मागत गेलोय असं काहीसं रुड त्यांचं बोलणं होतं... त्याआधी तीन तास फुल्ल वेटींग करून डोकं फिरलेलं... सगळं ऐकलं, - आय रिड इट, बट आय एम नॉट इंट्रेस्टेड... - पहिला धक्का दिला... (तोंडावरच...) व्हाय ? यू मिन... आपको ये नही चाहीये ?... - hmm.. आय वोंट... अरे सर, यहाँपे कनेक्ट करने लोग मिन्नते करते है... आप सामने से रिजेक्ट कर रहे हो... - यस. Because आय एम ओनर ऑफ कंपनी, अॅन्ड आय एम हिअर फॉर द बिजनेस डील.. मै यहाँ पे जॉब माँगने के लिऐ नाही आया... अॅज यू ट्रिटेड... . त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं, बॅग उचलली, रस्ता पकडला... नंतर दोनदा कॉल आले... I a

Kanya

तुला सांगतो कुलकर्ण्या, पुण्यात भलेभले येऊन आपली खिल्ली उडवून घेतात... प्रकांड पंडीतांच्या चड्ड्या बालगंधर्वतल्या भेदक नजरा पाहून ओल्या होतात... कुलकर्ण्या, तिथे हा कन्हैया का कान्या आमचं शष्प पण नाही रे... त्याला इथे त्याचं मत मांडायला नाही, तर त्याची लायकी तपासण्यासाठी बोलावलं होतं... जोपर्यँत पुणे तुमची लायकी ठरवत नाही, तोपर्यँत तुम्ही कुणाच्या गणतीत नसतात... . हा कान्या मेला अगदीच थिल्लर... काय त्याची ती गावंढळ भाषा... मेल्याला स्वत:ची चड्डी बदलता येत नाही, पंतांना काय सल्ले देतो... तो म्हणे पंतांना विकायला निघाला होता ? च्यामारी, अरे तुझा पगार किती, बोलतो किती ? पंतांनी आणि नानांनी ठरवलं तर तुला किलोने मंडईत विकतील... मी सांगतो कुलकर्ण्या, हा कान्या यां फुरोगाम्यांसाठी एका रात्रीचा फक्त, वापरुन घेतील, हौस फिटली की सोडून देतील लेकाचे... त्यांच्यात मेला तो जित्या नालायक रे... तोच आग लावतो, त्यालाच खाज असते जास्त... आणि कान्या नाय टिकणार या लोकांसमोर, लिहून घे... ते पोरगं वर्षभरात गावाकडे शेतीच करेल... बघच तू ! ते सोड, मला सांग... त्याचही म्हणे, मागे कुठल्यातरी म्हातारी सोबत लफ

गुढ - २

मेलेली माणसं स्वप्नात येण्याचा विषय या ठीकाणी सुरूय... त्यावर मी माझे सत्य अनुभव सांगतोय. या अनुभवांना मी दैवी देणगी समजतो. . (१) माझी आजी गेली त्या रात्रीचा हा अनुभव : १९९९ मी सहा वर्षांचा होतो. त्यामुळे इतकं स्पष्ट आठवत नाही. पण एकुण घटना, ते वाक्य माझ्या मनावर कोरली गेलीय. मी तेव्हा सुट्टीत मुंबईत होतो. आजी धुळ्यात. दिवसभरात रुटीननंतर मला रात्री गाढ झोप लागली. आणि माझी आजी अचानक स्वप्नात आली. ती रडत होती. "मी जातेय हा तेजस... मी देवाकडे जातेय... तू खूप मोठा हो... दादांना (माझे आजोबा) आणि माझ्या जयाला (माझे पप्पा) सांभाळ." आणि आजीने मला जवळ घेतलं... खुप रडली... आणि गेली... हे स्वप्न इथे संपलं. मी खडबडून उठलो, आणि आईला जसंच्या तसं सांगितलं... - असं काहीच नसतं रे, झोप शांत. असं म्हणून आईने मला झोपवलं. पण अर्ध्या तासात घरुन खरंच आजी गेल्याचा फोन आला. विशेष म्हणजे ती ज्या साडीत मला स्वप्नात दिसली तीच साडी तिच्या मृत शरीरावर होती. - ती मला भेटून गेली. . (२) अहमदनगरला असलेली माझी समवयस्क आतेबहिण तीन वर्षांपूर्वी २२ नोव्हेंबरला अचानक गेली. नंतर १५ दिवसातच तीचे वडी

गुढ - २

मेलेली माणसं स्वप्नात येण्याचा विषय या ठीकाणी सुरूय... त्यावर मी माझे सत्य अनुभव सांगतोय. या अनुभवांना मी दैवी देणगी समजतो. . (१) माझी आजी गेली त्या रात्रीचा हा अनुभव : १९९९ मी सहा वर्षांचा होतो. त्यामुळे इतकं स्पष्ट आठवत नाही. पण एकुण घटना, ते वाक्य माझ्या मनावर कोरली गेलीय. मी तेव्हा सुट्टीत मुंबईत होतो. आजी धुळ्यात. दिवसभरात रुटीननंतर मला रात्री गाढ झोप लागली. आणि माझी आजी अचानक स्वप्नात आली. ती रडत होती. "मी जातेय हा तेजस... मी देवाकडे जातेय... तू खूप मोठा हो... दादांना (माझे आजोबा) आणि माझ्या जयाला (माझे पप्पा) सांभाळ." आणि आजीने मला जवळ घेतलं... खुप रडली... आणि गेली... हे स्वप्न इथे संपलं. मी खडबडून उठलो, आणि आईला जसंच्या तसं सांगितलं... - असं काहीच नसतं रे, झोप शांत. असं म्हणून आईने मला झोपवलं. पण अर्ध्या तासात घरुन खरंच आजी गेल्याचा फोन आला. विशेष म्हणजे ती ज्या साडीत मला स्वप्नात दिसली तीच साडी तिच्या मृत शरीरावर होती. - ती मला भेटून गेली. . (२) अहमदनगरला असलेली माझी समवयस्क आतेबहिण तीन वर्षांपूर्वी २२ नोव्हेंबरला अचानक गेली. नंतर १५ दिवसातच तीचे वडी

Hanuman Jayanti

Image
विश्वासानं डोकं ठेवता येईल असा खांदा मिळवणं खूप महत्वाचं असतं... मग तो माणसाचा असो, वा देवाचा... या चिमुरडीने जगातल्या सगळ्यात सेफ आणि वार्म खांद्यावर डोकं ठेवलंय... . निस्वार्थ आणि नित्सिम भक्ती, आदर, परफेक्शन आणि शक्ती, यांचं प्रतिक असलेला... विश्वातला पहिला सुपरहिरो, शक्तीमॅन... हनुमान... तो चिरंजीव आहे... आज शक्तीचा जन्म झाला. . आपल्यात हनुमानाच्या शक्तीचाच अंश आहे... प्रामाणिकपणा आणि कर्मभक्ती यांचा संगम साधला की आपल्यातला तो अंश जिवंत होईल. . कारण, तो चिरंजीव आहे. "किती आले, किती गेले संपले भरारा... तुझ्या परी नामाचा रे अजुनी दरारा..." . Photo Curt. : Manjushadidi Joglekar

Poverty

आत्ताच ऐँशी वर्षाँच्या एक आजी कॉलनीतल्या महावीर मंदीराकडे काहीतरी खायला मिळेल या अपेक्षेने भर उन्हात सात आठ वेळा फिरुन गेल्या... त्या बालविधवा असल्यानं पुढे मागे कुणीच नाही. त्यामुळे एकट्या राहतात, पैसा नाही... आणि त्यात भूक... या वयात काम तरी काय करणार... त्यांना बोलावलं, खायला दिलं, काही पैसे दिले तर भरुन आल्यानं आज्जी रडायला लागली... दोन दिवसांनंतर आज खातेय रे, हे ऐकून काळजात चर्र्र झालं. . आपण त्यांना खायला देणं हे आज शक्य आहे - ते पण समोर आले तरच... पण इतर वेळी काय ? या आज्जी सारख्या इतरांचं काय ? भूक खूप वाईट असते... कुणालाही भूकेमूळे तळमळतांना बघणं भयंकर असतं. . एकवेळ यांच्या भौतीक गरजा नाही पूर्ण करता आल्या तर चालेल, पण गरज वाटली तर स्वत: उपाशी राहून त्यांच्या पोटात काहीतरी ढकलणं, त्यांची भूक शमवणं हेच आपलं कर्तव्य असतं. . सकाळी उठल्यापासून दिवसभर अखंड खादाडी करुन, चार-पाच बॉटस्ल कोल्ड्रीँक ढोसून पण रात्री दिड दिड वाजता उठून खाणारा मी, अश्या लोकांसमोर अपराधी वाटतो... . पण समोर अशी हजारो उपाशी माणसं दिसत असून आपण त्यांचं पोट भरु शकत नाही ही हतबलता सगळ्यांत वाईट असते.

Karve

Image
कुठल्याही देवाला, धर्माला शिव्या न घालता, आपल्याच नावे तथ्य नसलेल्या ओव्या न रचता, सत्यशोधच्या नावाखाली सापडलेल्याच गोष्टी पुन्हा शोधल्याच्या पुड्या न सोडता, आपल्यालाच सगळी अक्कल आहे, बाकीचे मुर्ख आहेत असं न बरळता, आपलंच कल्याण ज्यांनी केलं त्यांना कृतघ्नपणे शिव्या न घालता, आणि आपल्या अडचणीँचा बाऊ न करताही निस्वार्थ वृत्तीने मृदू स्वभावाने सभ्य भाषेत सर्वधर्मीय स्त्री शिक्षण, विधवा विवाह, अनाथसेवा, गरीब-स्त्री-अनाथांचे कल्याण करणे शक्य आहे, हे सप्रमाण सिद्ध करणाऱ्‍या, त्याच मार्गावर जगणाऱ्‍या "खऱ्‍या महात्म्याच्या", भारतरत्न महर्षी डॉ. धोँडो केशव कर्वे यांचा आज जन्मदिन. . ज्यांचं कार्य त्यांच्यानंतर आजही कुठलाच गाजावाजा न करता, कुठल्याही जातीधर्माला शिव्या न काढता, सभ्य आणि सुसंस्कृतपणे योग्य मार्गावर सुरु आहे. . या "महात्म्याचा" सहवास एकशेचार वर्षे होता..!! . (कर्वे - रानडे - टिळक - सावरकर - चाफेकर - आपटेँचाही महाराष्ट्र)

Ram Navmi

Image
राम नाम मे जादू ऐसा, राम नाम मन भाऐँ रे... मनकी अयोध्या तब तक सुनी, जब तक राम ना आये रे... . अयोध्येत श्रीरामचं भव्य मंदीर उभं रहावं, आणि याच जन्मात ते याची देही याची डोळा बघण्याचं भाग्य मिळावं... प्रभू श्रीरामा... इतकीच इच्छा पुर्ण कर... तू बोलाव, जीव हातावर घेऊन तुझ्यासाठी येऊ. अयोध्येत रामाचं मंदीर आहे, आपल्याला एक एक वीट जोडून ते भव्य करायचंय. . मंदिर के लिऐ संग्राम हूवा, हिँदूओने किया संघर्ष बडा... प्रभू राम की सेवा मे सेवक लिऐ जान हथेली पर है खडा... . धन्य ही जागा, जिथे साक्षात प्रभूंनी जन्म घेतला. याच जागेवर त्यांची पावलं बागडली. त्यांच्या अस्तित्वाने हि भूमी पावन झाली.. प्रत्येक हिँदूने आयुष्यात एकदातरी अयोध्येतल्या या स्वर्गीय जागेवर जावून तिथली पवित्र माती मस्तकावर लावायला हवी. आपली ललाटरेषा प्रयाग काशी बनतील... . पतीत पावना श्रीरघुनाथा एकदाच ये जाता जाता... पाहीन पुजीन ठेवीन माथा... तोच स्वर्ग मज तिथेच येईल पुरे पणा जीवना... . संकटात असाल तेव्हा रामरक्षा म्हणा. राम-लक्ष्मण-हनुमान खंबीरपणे आपल्यासोबत उभे राहतील. आपल्यासाठी धावून येतील... . कारण आपण रामर

Gudhhipadva

Image
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले तो हा दिवस... एका अर्थाने आपला हॅप्पीवाला बर्थडे... कारण आपली खरी उत्पत्ती त्याचदिवशी झाली होती, नंतर फक्त अवस्था बदलत गेल्या.. . हा दिवस साजरा करण्यासाठी "ब्रह्मध्वज" म्हणजेच गुढी उभारली जाते... ब्रह्मध्वज हे हिंदू धर्मात मांगल्याचे प्रतिक आहे... प्रत्येक शुभप्रसंगी घरावर ध्वज असावा... कारण हे घराच्या सौभाग्याचं लेणं आहे . घरावरचा ब्रह्मध्वज अनिष्ट गोष्टींपासून आपले रक्षण करतो... . रामचंद्रांनी अयोध्येत परत येण्यासाठी हाच दिवस निवडला होता.... . आज गुढी सोबत भगवा ध्वज घरावर लावा. आणि सदैव राहू द्या. त्याची बह्मध्वजरुपात पुजा करा... ब्रम्हध्वज नमस्तेSस्तु सर्वाभिष्ट फलप्रद| प्राप्तेSस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ॥

गुढ 1

गुढ अनुभव हा प्रकार माझ्याबाबतीत अनेकदा घडतो, आणि घडून गेल्यानंतर आपण काहीतरी विचित्र प्रकार अनुभवल्याची जाणीव होते. यामुळे जिवावरचे अपघातही सहन केले आहेत तर अनेकदा तापात फणफणलोय. काही गुढ अनुभव, काही कथा याठीकाणी सांगणार आहे. #गुढ या टॅगखाली... . धुळ्यात जुने धुळे भागात साधारण तीन वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. मी त्याच दिवशी पुण्याहून घरी गेलेलो. रात्रभर प्रवास, थोडी कणकण यामुळे दिवसभर झोपलेलोच होतो. ती पावसाळ्यातली संध्याकाळ होती... नुकताच पाऊस पडून गेलेला. लाईट गेलेले, त्यामुळे अंधार होता. पुन्हा पाऊस पडेल आणि बाहेर पडू शकणार नाही, शिवाय दिवसभर झोपून कंटाळा आलेला. म्हणून मी ब्रेड, दुध वगैरे घेण्यासाठी जवळच्या चौकात पायीच गेलो... येतांना परत रिप रिप पाऊस सुरू झाला... अंधार आणि दोन चार डोकी सोडली तर तशी शांतताच होती... पाऊस सुरू व्हायच्या आत घरी पोहचू अश्या वेगात असतांना मागून ओळखीचा आवाज आला... "तेजा... अरे थांब...." अनुजाचा ओळखीचा आवाज होता... अनुजा : माझ्या मित्राची बहीण... तिने हाक मारली तर थांबणं भागच होतं. मी हातातली दुधाची बॅग आणि सामान तसंच सांभाळत रस्त

IIT Fees

आयआयटी IIT मध्ये SC, ST आणि अपंगांकडून कडून फि आकारली जाणार नाही. आणि इतरांसाठी वार्षिक फी ९० हजारांवरून २ लाख केली...! . दळभद्री राजकारण, दळभद्री सरकार नालायकांनो, आमची ही पिढी आणि येणाऱ्या अनेक पिढ्या तुम्हाला शिव्या शाप घालतील. अनारक्षित/ओपन जातीतल्या मुलांच्या करीयरची वाट लावताय, पण या आरक्षणाच्या लफड्यामुळे जेव्हा भारतातून खरे बुद्धीवादी परदेशात जातील, तिथल्या विकासात सन्मानाने योगदान देतील तेव्हा तुम्ही आरक्षण आरक्षण खेळत पडलेली व्यवस्था घेऊन तोंड बघत बसाल... . या गलीच्छ व्यवस्थेचा शाप आहे. . स्मृती इराणी ही बाई अशिक्षितच आहे. ज्यांनी निवडून दिलं त्यांचीच ठासून माxयचं काम सुरूय... rather जर कुणीच मिळत नसेल तर आपलं भलं चिंतणाऱ्याला "ठोकायचं" हा मोदी सरकारचा छंद आहे. असो. टिकलात तर २०१९ ला याच मत मागायला... २ लाखाचं पॅकेज फुकटात चिटकवतो x वर...

Funda For Happy Life

काल दिवसभर एक प्रयोग केला. ठरवूनच ! आणि त्याचा फायदा झालाय, अनपेक्षित अनूभव आले. . कोट्यावधी जीवांशी स्पर्धा करून मी जन्माला आलो. आणि त्यानंतर हे साठ सत्तर वर्षांचं आयुष्य मिळालंय. जे आता जगतोय. यामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा, त्या एकूण आयुष्यातल्या क्षणांपैकी एक आहे. ज्यावर पूर्ण हक्क माझा आहे. मी येणारा प्रत्येक क्षण अनुभवायचं ठरवलं. मला त्यातून माझ्यासाठी त्यावेळचा सर्वोच्च आनंद काय मिळेल ते आणि तेवढंच मनापासून केलं. दोन गोष्टी केल्या येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं स्वागत केलं... आणि मला स्वतःला, मला काय वाटतंय याला प्रायोरिटी दिली. अगदी महत्वाचं काम टाळून झोपावसं वाटलं तर बिनधास्त झोपलो. . काय झालं ? १. संध्याकाळपर्यंत कुणाशीच वाद झाले नाही. २. सगळी ठरवलेली कामं विनातक्रार "पूर्ण" झाली. ३. दिवसभर फ्रेश वाटलं. ४. माझ्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी समजल्या. ५. इतर कुणाबद्दलची उठाठेव पडली नाही. त्यामुळे वाईट वाटणं, त्रासांचं देणं घेणं वगैरे भानगडी नव्हत्या. ६. अनेक गुंतागुंतीचे प्रॉब्लेम्स खूप सहज सुटलेत. उत्तरं सहज सापडली. कालचा दिवस खरंच जगलोय असं वाटलं... पहिल्

दिव्या भारती

Image
आत्महत्या करून मेलेल्या अभिनेत्रींचा रिपोर्ट पाहतांना दिव्या भारती नामक स्वर्गीय सौंदर्य समोर आलं. आणि २३ वर्षांपूर्वी याच काळ्या दिवशी ते गुढरित्या संपल्याचं योगायोगाने आत्ताच समजलं. दिवस संपता संपता का होईना, पण तिच्या अस्मानी सौंदर्याची आणि  तिच्या अल्पावधीतल्या यशाची आठवण काढून श्रध्दांजली वाहिल्याशिवाय तिला ओलांडून पुढे जाता येणार नाही. . ५ एप्रिल १९९३ च्या रात्री पावणेबाराच्या सुमारास प्रचंड सौंदर्य, गोड गळा, लोभस निरागसता लाभलेल्या या अप्सरेनं वर्सोवातल्या घरी पाचव्या मजल्यावरुन झोकून देत जीवन संपवलं. . दिव्या ओमप्रकाश भारती... १९८८ ते १९९३ या पाच वर्षात तिनं यशाचं शिखर गाठलं. शाहरुख खान सोबतच्या "ऐसी दिवानगी" गाण्याने तिला त्यावेळी तरुणांच्या दिल की धडकन बनवलं. ती गेल्यावर "रंग" आणि ''शतरंज" हे तिचे दोन सिनेमे रिलीज झाले. अवघ्या पाच वर्षात तिनं पंचवीस हिट सिनेमे दिले. तिच्या अवखळपणा, मादक अदांवर अवघं बॉलीवूड कुर्बान होतं. ती आली, तिनं जिंकलं आणि चटका लावून निघून गेली. . दिव्या भारती गेल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांना वेड लागलं, अन

तृप्ती देसाई

Image
= तृप्ती देसाई = महिलांना शनी मंदीराच्या चौथऱ्यावर चढून दर्शन घेवू द्या, त्र्यंबकेश्वरात गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्या अश्या साध्या अजेंडयावर या बाईनं अख्खं राजकारण, समाजकारण ढवळून काढलंय. मुद्दा चूक की बरोबर हा विषय बाजूला, पण एकाच मुद्यावर राजकीय, सामाजिक, न्यायालयीन लढा देत लोकांना विचार करायला भाग पाडलंय. वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी तृप्ती देसाईंनी लढा उभारला. शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वरला मार खाऊन पण, त्या परत तिथे गेल्याच. तृप्ती देसाई मराठी केजरीवाल बनू पाहताय. एक स्त्री म्हणून ही धडपड नक्कीच कौतूकास्पद आहे. . आधी त्या मला नास्तिक वाटायच्या. पण एका बाईट दरम्यान ऑफीसमध्ये स्वामी समर्थ, गणपती, लक्ष्मी दिसले आणि त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. त्यांचा लढा जातीय नसून पूर्णपणे स्त्री - पुरुष समानतेचा आहे याबद्दल. स्थानीक प्रथा मोडायचा प्रयत्न चुकीचा आहे, पण मुद्दा पटल्याशिवाय संपत नाही. . तृप्ती देसाईंचा भूतकाळ, राजकीय पिंड काहीही असू देत, त्यांच्यातला धीटपणा नक्कीच कौतूकास्पद आहे. बाकी स्थानीक प्रथा मोडण्याच्या नादात त्या मार खाताय हे मात्र आवश्यक आहे. समर्थनाविषयी दूम

Trupti Desai Issue

तृप्ती देसाई आणि महिलांच्या मंदिर प्रवेश प्रकरणात तृप्ती देसाईंची बाजू बरोबर वाटते... महिलांना समान हक्क असायलाच हवा. न्यायालयाचं मत योग्य वाटतं, स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारणं, पूजेचा आधिकार नाकारणं हे चूकच आहे. पण मग हाच "समान हक्क" हाजीअलीला वापरायला हवा... मग होईल Equal Equal... . bdw, यावर्षी ज्यांना एमजेएमसी करायचंय त्यांनी हे तृप्ती देसाई प्रकरण घोटून घोटून पाठ करून ठेवा... रानडेला अॅडमीशन हवी तर कराच !!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved