Posts

Showing posts from 2016

मोदीजींच्या भाषणातले मुद्दे !

मोदीजींच्या भाषणातले मुद्दे ! दि. ३१ डिसेंबर २०१६ : सायं १९ : ३० ते २० : १४  ... १. देश शुद्धी यज्ञाकडे जातोय. २. लोकांना वाईट काळ सहन करावा लागत होता. पण वाईटावर विजय मिळवण्यासाठी देश लढला ! प्रत्येक भारतीय चांगल्यासाठी प्रयत्नशील आहे. इतिहासात पहिल्यांदाच जनता आणि सरकार एकत्र आहेत. ३. लवकरात लवकर बँक सामान्य स्थितीत येण्यासाठी प्रयत्न करणार.  ४. १०००-५०० च्या नोटा काळ्याबाजारात, parallel economy मध्ये जास्त होत्या. ज्यामुळे महागाई वाढली. ते संतुलन ठेवण्यासाठी हा निर्णय. भारताच्या समकक्ष अर्थव्यवस्थेत सुद्धा इतका पैसा नाही. ५. मोदींकडून नागरीकांचं भरभरुन कौतुक. जर शास्त्रीजी, जे पी असते तर त्यांचे भरभरून आशिर्वाद मिळाले असते. ६. फक्त २४ लाख लोकं १o लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे हे प्रामाणिकपणे स्विकारतात. पण चतुराईने भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचे रस्ते बंद. ७. बँक कर्मचाऱ्यांचं, पोस्ट ऑफीसच्या लोकांचं कौतूक. पण त्यातही काळाबाजार करणाऱ्यांना सोडणार नाही. बँकांना आवाहन. गरीब कल्याण वर्षात गरीब आणि मध्यमवर्गासाठी धोरणं आखा.  ८. योजना १ : प्र. आ. यो. अंतर्गत मध्यमवर्गासा

सजल नयन नीत धार बरसती

अजित कडकडे समोर गात असावे... त्या मैफीलीत त्यांना "सजल नयन नीत धार" ची फर्माईश करावी... त्यांनी ती स्विकारावी आणि, षडज् लाऊन, आलाप घेत - मखमली आवाजात "सजsल नयनs नीsतs धाssर बरसती..." सुरु करावं... ... ऐकणाऱ्याचे कान - गाणाऱ्याचा गळा तृप्त व्हावा... त्यांना वन्समोअर द्यावा... आणि "वीणेचे स्वर अबोल झाले..." पासून पुन्हा त्या स्वर्गात रममाण व्हावं... ... ही इच्छा पूर्ण होण्यासाठी सात जन्माची पुण्य हवी... :-) :-) #इच्छा #ख्वाब वगैरे

Yeshu Christ

Image
येशूचा जन्म ही त्याकाळातली अतिशय महत्वाची घटना होती. आपला कृष्ण जसा ‘माणूस’ म्हणून ‘आपला’ वाटतो, तसाच येशूही त्याच्या आयुष्यातल्या मानवी दु:खांमुळे ‘आपला’ वाटतो.. एकाचा जन्म कारावासात झाला, दुसऱ्याचा गोठ्यात.. दोघांच्या जीवावर राज्यकर्ते उठलेले.. दोघांनी मनुष्य समाजाला वागणुकीचे आदर्श घालून दिले. फक्त कृष्णाच्या आयुष्यात जे भरजरी रंग होते, ते येशूच्या आयुष्यात नव्हते.. तरीही, ‘प्रत्येकाला आपला क्रूस आपणच वाहून न्यायचा असतो,’ हा त्याने दिलेला मोठ्ठा धडा..! येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी सगळं जगच रानटीपणाच्या आधीन होतं. मग ते कुणीही असोत. तोच हिंस्त्र रानटीपणा येशूच्या वाट्यालाही भरपूर आला. कदाचित त्यामुळेच त्याच्यातली करुणा अधिक लखलखीतपणे झळाळून उठली. येशूची धर्मस्थापना आणि त्याच्या प्रसार, प्रचाराशी मला काही घेणं नाही. तसंही ख्रिस्ती धर्मासाठी येशूपेक्षा जास्त काम त्याच्यानंतर आणि त्याच्या हयातीतही त्याच्या शिष्यांनीच जास्त केलंय. मला येशू ख्रिस्ताबद्दल जे प्रेम, माया आहे, ती ‘माणूस’ म्हणून आहे.  आज त्याचा वाढदिवस..!! त्याने ज्या करुणेचा कायम पुरस्कार केला, त्या करुणेचा स्पर्श प्रत

कट्टर हिँदूत्वईद किँवा नाताळ

ख्रीसमास, सेंटाक्लॉस या गोष्टीतून मिळणारी मज्जा महत्वाची... ते म्यूजिक, केक्स्, चॉकलेट्स, डान्स हे सगळं करण्यासाठी कुठल्याही धर्माचं, पंथाचं बंधन नाही... ... प्रत्येकच गोष्टीला विरोध नै रे भो... गुढीपाडव्याला डोक्याला फेटा बांधून श्रीखंड खाऊन ऐटीत मिरवणूकीत चालावं, तिथे अभिमान मिरवावा... तर ख्रीसमासला मस्तपैकी सेंटाची टोपी घालून केक खात  डान्स करावा... कधी कधी हाजीअलीला जाऊन समुद्राचे तुषार झेलत शांतता मिळवावी... गुरुद्वारात मिळणारा शिरा दुसरीकडे कुठे मिळेल ? आपल्याला मिळणारा आनंद महत्वाचा... श्रद्धा-अंधश्रद्धा सब झूठ... सगळे करतात म्हणून विरोध नकोच ! ... ते कुठे आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतात ? बरं - तुमच्या ओळखीत "ते" किती ? तुम्ही त्यांना दिवाळीला फराळाला तरी बोलावतात ? ... ख्रीश्चन मित्रांकडे जाऊन आज फूल टू मज्जा करणार... दिवसभर ! केक हादडणार, डान्स करणार, अगदी चर्चमध्ये जाऊन कॅन्डल पण लावणार...! आज तर एका सात आठ वर्षांच्या छोट्या मैत्रीणीने चार चार वेळा फोन करुन बोलावलंय... तिने ख्रिसमास ट्री वगैरे सजवलाय... भैया - सेंटाक्लॉस बनके आना, गिफ्टस् ला

सांताक्लाॅज

Image
सांताक्लाॅज  !! ख्रिसमसच्या दिवसांत एक काल्पनिक पात्र सर्वांच्या नजरेसमोर येते आणि ते म्हणजे सांताक्लाॅज होय ! लाल गोंडा असलेली टोपी , हिमासारखी शुभ्र दाढी , घेर वाढलेले पोट , पाठीवर बक्षिसांनी भरलेली झोळी व लाल रंगाचा अंगरखा घातलेले हे आजोबा लहान मुलांमध्ये तुफानी लोकप्रिय आहेत . ते आठ रेनडिअरने ओढलेल्या गाडीवर बसून येतात , मुलांनी दिलेल्या यादीप्रमाणे बक्षिसांचे वाटप करतात व कुणाला कानोकान खबर न देता गुपचूप अंधारात गडप होतात असा सर्व बच्चाकंपनीत समज आहे . जगभरातून कितीतरी लाखो करोडो पत्रे डिसेंबर महिन्यात  सांताबाबांसाठी त्यांच्या फिनलंड येथील घरच्या पत्त्यावर पाठवली जातात व लहान मुले मोठ्या आशेने रात्री आपल्या थैल्या , पिशव्या,  साॅक्स खुंटिला अडकवून सांताबाबांच्या येण्याची वाट पाहत झोपी जातात . . सांताक्लाॅज ची कल्पना कशी ऊदयास आली , ह्याची एक कथा सांगितली जाते . एकदा एका गरीब माणसाला आपल्या तीन मुलींच्या लग्नासाठी पैशाची अत्यंत चणचण भासली होती . वेळेवर पैसे मिळाले नसते तर कदाचित त्याच्या तीनही मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या गेल्या असत्या. त्या वेळी निकोलस नावाच्या एका सज्जन मा

व्यवसायतल्या गोड नात्यातला अजून एक सुंदर अनुभव...

व्यवसायतल्या गोड नात्यातला अजून एक सुंदर अनुभव... ... मी व्यवसायात जवळपास प्रत्येक व्यक्तीशी व्यवसायापल्याड नातं जोडतो. त्याचे गोड अनुभव येतात. आजची गोष्ट... ... एका प्रोजेक्टच्या पेमेंटचा चेक देण्यासाठी काल क्लायंटचा फोन आला... इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर.. . क्लायंट - मि. कुलकर्णी... कितना पेमेंट है आपका ? और चेक कब का करु ? मी - सर, Thirty Two Thousand आपका बिल अमाऊंट है, और ड्यू 10th January का है... क्लायंट - हमारा तो ऑलमोस्ट काम हो गया है... तो 10th January तक वेट क्यो ? . काम पूर्ण झाल्याशिवाय आणि ठरलेल्या स्लॅबशिवाय पैसे घ्यायचे नाही हे तत्व मी पाळतो... पारदर्शकता टिकवण्यासाठी... आणि सगळं सुरळीत राहतं... त्यामुळे १० जानेवारीच्या आधी पेमेंट नको हे फिक्स होतं... हे या वर्षातलं शेवटचं पेमेंट...! .. मी - सर, ऐसा करो ना, 16th January का बनाओ... नये साल ही बोहनी आपके हाथ से... क्लायंट - (हसत...) क्यो ? आपका नया साल १५ दिन बाद आता है ! मी - जी हॉं... मेरा बर्थडे है उस दिन... और कंपनी की फर्स्ट एनिवर्सरी... उस दिन पेमेंट मिलेगा तो पहला दिनही बढिया होगा... क्लायंट... :

"लग्न कधी करतोएस?"

"लग्न कधी करतोएस?" एक शाळकरी मित्र अनपेक्षित ठिकाणी भेटला आणि hi-hello झाल्याझाल्या त्याने पहिला प्रश्न हाच विचारला. काय करतोएस, कुठल्या क्षेत्रात करिअर घडवत आहेस, पुढे काय प्लॅन्स आहेत...हे काहीच नाही. सर्वप्रथम "लग्न कधी?!" हा प्रश्न. तेव्हापासून हा प्रसंग डोक्यात घट्ट बसलाय. २४-२५ वर्ष वयाच्या भारतीय/मराठी मुलामुलींमधे "लग्न" हा विषय प्रायोरिटीचा असू नये, असं अर्थातच नाही - पण "टॉप" प्रायोरिटी करिअर, आपली पॅशन, भविष्य...ह्यालाच असायला हवं. मुद्दा पैश्याचा नसून कर्तृत्वाचा आहे. ऐन उमेदीच्या काळात चहूकडे उभ्या असलेल्या संधी हुडकून काढण्यात सर्वाधिक ऊर्जा खर्च व्हायला हवी. आपली आवड-छंद-पॅशन ओळखण्यावर आणि त्यातील कौशल्य प्राप्त करण्यावर आपण भर द्यायला हवा. जे करतोय - बोलतोय, लिहितोय - ज्याची सर्वाधिक चर्चा करतोय - त्यातून सतत स्वतःत value addition व्हायला हवी. आणि हे, खरंतर, आपोआप व्हायला हवं. पण तसं घडताना दिसत नाही. "भारत हा तरुणांचा देश आहे" हे भारताचं बलस्थान नाही. जो पर्यंत तरुणांच्या priorities योग्य नसतील, तो पर्यंत अज

लाईव्ह लतादिदी

इतक्यातच, लोकल टिव्हीवर लतादिदींचा जुना लाईव्ह परफॉर्मन्स दाखवत होते... सर्फ करता करता लतादिदी कभी खुशी कभी गमचा आलाप घेतांना दिसल्या.... हात तिथेच थांबले... धडधड वाढली... . समोर हजारो लोक... पिन ड्रॉप सायलेंस... मागे दिडशेचा वाद्यवृंद-कोरस अग्रभागी लतादिदी... आणि त्यांच्या उपमा देऊ शकत नाही अश्या गळ्यातून वाहणारं गाणं... ... ते पाच मिनिट... लतामय... पुर्णपणे...  कभी खुशी कभी गम गाणं... मी सोफ्यावरुन उतरुन जमीनीवर बसलो... त्यांचा एक एक स्वर अक्षरशः अनूभवत होतो... ... लतादिदींचा आवाज ऐकला तरी त्यांच्या भेटीतले ते साडेअठरा मिनिट समोर उभे राहतात... ते साठेअठरा मिनिट मी पुन्हा पुन्हा जगतो... क्षण न क्षण... ... मी भान हरवलेला... त्या ठिकाणी जाऊन पोहचलो...  गाणं संपलं... त्याच क्षणी ताडकन उठून उभा... हात जोडलेले... डोळे भरलेले... .. लता मंगेशकर प्रत्यक्ष्य ऐकणं साधं काम नाही, टिव्हीवर बघून हे होतं... प्रत्यक्ष्य ऐकतांना स्वर्ग असेल... काही लोकं जादू करतात... - तेजस कुळकर्णी

तुमच्याकडे जर ५००० पेक्षा जास्त किमतीच्या जुन्या नोटा आहेत तर तुम्ही आज रोजी काळाबाजारी आहात...

३० डिसेंबर पर्यंत जुन्या नोटा बदलण्याची मुदत दिलेली, आता सरकारने त्यासाठीपण गोबोगा मारलीय... आता ५००० रु पेक्षा जास्त रक्कम असेल तर कारण द्या, नंतर दोन बँक ऑफीसर्स ठरवणार ते योग्य की नाही... नंतर पुढची प्रोसेस..! म्हणजे जर तुम्ही दोन महिने गर्दी नको - कमी होण्याची वाट बघत होतात, आणि निवांतपणे सरकारवर विश्वास ठेऊन असाल - अगर आप वो लेव्हलके भक्त हो... तर तुम्ही समजून घ्या, तुमची मार्रीगेलीय... ... तुमच्याकडे जर ५००० पेक्षा जास्त किमतीच्या जुन्या नोटा आहेत तर तुम्ही आज रोजी काळाबाजारी आहात... अभिनंदन ! मनःपूर्वक अभिनंदन ! . आपलीच म्याव आपलंच दुध... आपलाच बांबू... आपलीच... ... नोटीफिकेशन झेला : https://m.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=10784&Mode=0 !..........................................! (काल्पनिक प्रसंग) नांव : तेजस विनोद कुळकर्णी अकां. नं : xxxxxxxx बँक : xxxxx बँक रक्कम : १२००० विवरण : १००० x १०, ५०० x ४ .... (स्थळ : बँक) हं... बोला - कुठून आणले पैसे ? मी : चेक मिळाला ना, याच बँकेत डिपॉजिट झाला... नंतर कॅश केला... ८ नोव्हेंबरलाच... पासबूक पण

२००० च्या नोटेतली चीप

Image
गेल्या महिन्यात चलनात आलेल्या दोन हजारच्या नोटेमध्ये ‘चीप’ बसवण्यात आली असून, पाताळात ती पुरून ठेवली तरी तिचा माग काढणे शक्य होईल, अशा वावडय़ा समाजमाध्यमांतून उठल्या. मग रिझव्‍‌र्ह बॅँकेने नोटेमध्ये असे काही नसल्याचा खुलासाही केला. गेल्या काही दिवसांत सरकार दोन हजार रुपयांच्या जेवढय़ा नोटा बाजारात आणत आहे, त्यातील बऱ्याच नोटा साठवणुकीमुळे बाजारातून गायब होत आहेत. त्या नोटा छापे घालून पकडण्याचे आणि जप्त करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे.  त्यामुळे  अशा सूक्ष्म ‘चीप’ची चर्चा पुन्हा सुरू झाली. या पाश्र्वभूमीवर या छापेसत्रामागची आधुनिक व तांत्रिक बाजू विशद करणारा हा लेख... . ८ नोव्हेंबर रोजी सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. या निर्णयाचे स्वागत काही लोकांनी केले तर विरोधकांनी त्याचा निषेध केला. दोन हजारची नवीन नोट बाजारात आणणार असल्याची घोषणा रिझव्‍‌र्ह बँकेने आधीच केली होती. तेव्हा काही तरी वेगळे घडणार आहे याची पुसटशी शंका अर्थतज्ज्ञांना, पत्रकारांना आली होती आणि तसे घडलेही. मात्र आता आलेल्या अनुभवानुसार सरकार दोन हजार रुपयांच्या जेवढय़ा नोटा बाजारात आणत आहे त्य

काका - काकू - दारु आणि सात मजले...

सन्डे मॉर्निंग शेजारचे साठवर्षीय काका लंगडत लंगडत चालत होते... इतक्यातच भेटले पार्किंगमध्ये ! काका तसे धडपडे, कुठे ना कुठे धडपडत असतात, लंगडत दिसले तर आता कुठली मोहिम फत्ते करुन आले हे विचारणं क्रमप्राप्त झालंच... . - काय काका... सकाळी सकाळी कुठे निघाली स्वारी ? आणि पायाला काय झालं ? काका - मार्केटमध्ये जातोय रे ! खरेदी वगैरे करायला रविवारची.. - ठीकाय, पण पायाला काय झालं ? काका - काही नाही, दुखतोय थोडा... - कश्यामुळे ? . इतक्यात काकू अवतरल्या... काकूंच्या एकुण अवतारावरून भडकलेल्या स्पष्ट दिसत होता, त्यामुळे काकांच्या पायामागे नक्कीच काहीतरी दडलंय हे पक्कं होतं... त्या नेमकं "कश्यामूळे" या प्रश्नावर आलेल्या ! काका निघणार, तोच ... काकू - ओ ओ मी सांगते ना, कश्यामूळे ते... तुमचे पराक्रम... थांबा... . इथे सन्डे मॉर्निंगचा धमाकेदार एपीसोड मिळणार - अस्मादिक खूश ! . काका - अगं कश्याला... राहू दे ना ! काकू - असं कसं... ? पराक्रम आहे हा...  गप्प बसा... सांगते मी... काका एवढंस तोंड घेऊन बाजूला... काकू सुरु... . बघ, काल रात्री एक वाजता तुझे काका पिऊन घरी आले, बरं पित

Hopeless

- राजकीय पक्षांना जुन्या नोटा जमा करण्यावर कुठलाच टॅक्स नाही... - ८ नोव्हें आधीचा हिशोब विचारला जाणार नाही . मत १ : आणि लोकहो... अश्या प्रकारे सरकारने २००० करता रांगेत उभ्या सगळ्या लोकांना मागून बांबू दिला... ... मत २ : जेटली : वाह्यात आणि होपलेस अर्थमंत्री... या माणसाला अर्थखातं सांभाळता येत नाहीय... न झेपणारं, अकलेबाहेरचं काम मिळालंय ! - त्याला नाही तर तुला सांभाळता येईल कां रे तेजा ... ? असा प्रश्न कुणी विचारला तर उत्तर... - हो ! मला सांभाळता येईल, आणि जेटलीपेक्षा खूप चांगलं !... बोला, करतात कां मला अर्थमंत्री ? आत्ता तयार आहे ! ... मत ३ : लोकं कुणाचेच नसतात... आणि हुष्षार असतात... आपण लंब्यालंब्या सोडून लोकांना चिऊताई बनवतोय असं वाटत असेल, तर उलटं समजायचं ! बहूमत दिलं, तर आपण वाटेल तसं वागू, परत पाच वर्षांनी  येऊ... तर राहू द्या भाऊ... जेटली याच इलेक्शनला ९०००० मतांनी नापास झालाय ! २०१९ ला विचारतीलच लोकं..."क्यो भाई... कैसे हो ?" वेग्रे ! ... मत ४ : सरकारमध्ये सुरेश प्रभू, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, जनरल व्हि. के. यांच्यासारखे हुषार, तज्ञ आणि

संधिकालीन

दिवेलागणीला घरात जळणार्‍या गाईच्या शेणीच्या वासाने, गावात गेल्याचं असं भन्नाट फिलिंग येतं, ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही आणि सुमंदारमालेतील  ग्रेसच्या या ओळी तेव्हा सभोवताली गुंजारव करायला लागतात......... तिथे पर्वताच्या कपारीत जाया घराला निघे पाखरू एकटे दिठीच्या कळीची तुला वीण येताच प्राणार्त लावण्य माझे फुटे.... आपला, (संधिकालीन)

Fact

Image
This was a Common poster in hotels in 1900 in the USA. Electricity was just an unknown new facility and it's correct usage was to be taught. Just like Digital transaction for most today. Anything new .. takes time to become standard :)

Share Market

शेअरबाजारात आपला कोअर पोर्टफोलिओ तयार करावा. त्याला खरं ट्रेडिंग म्हणता येईल. असे रोजंदारीसारखं डे ट्रेडिंग करून लक्षाधीशांचे भिक्षाधीश झालेले अनेक आहेत. मार्केटमध्ये पैसे कमवायचे तर संयम हवा. उजलतपसंद लोकांची ही कामं नव्हेत. ठराविक उत्तम दहा, बारा,पंधरा कंपन्या निवडाव्या. फक्त त्याच कंपन्यांचे शेअर्स घ्यावेत. भाराभर फालतू शेअर्सना मिठी मारून बसू नये. कंपन्या निवडतांना त्यांचा नीट अभ्यास करावा. बाजारात ज्याला प्रचंड मागणी आहे, ज्या फंडामेन्टली स्ट्रॉंग आहेत, जिथे ग्रोथ आहे, अशा वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्या निवडाव्या. एकाच सेक्टरमध्ये सर्व गुंतवणूक करू नये. Don't put all your eggs in one basket....  हे शेअरबाजार गुंतवणुकीचे बेसिक सूत्र आहे. शेअरबाजारात उतरण्यापूर्वी, टेक्निकल ऍनॅलिसिस स्वत: शिकून घ्यावा. काय घ्यायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. कधी घ्यायचं ते ही कळलं पाहिजे. कधी विकून बाहेर पडायचं ते ही कळलं पाहीजे. टिव्हीवर कुणाचं तरी काहीतरी ऐकून कधी काही घ्यायला जाऊ नये. आपल्याकडे च्युतियांची कमी नाही. माझ्यामते फार्मा, बॅंकिंग, रिफायनरीज, इंजिनियरिंग, पॉवर अशा सेक्टरम

अहिराणी प्रांताचा इतिहास

अहिराणी भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे. हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेत. अहिराणी आता काही खान्देश वासींना आवडत नाही. आणि या भाषेला तर आता मृत भाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे. म्हणून या आपल्या अहिराणी मातेला वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा . मंडळी, अहिराणी भाषा म्हणजे श्री कृष्णदेवांचा आशिर्वाद आहे. महाभारतात खान्देशावर एक कथा आहे. श्री कृष्णदेव आणि जरासंध यांच्यात चौदा वेळा युद्ध झाले. तेरा वेळा श्री कृष्णदेवांचा विजय झाला. चौदाव्या युद्धात मात्र जरासंधाला विजय मिळाल्यावर जीव वाचवण्यासाठी देव मथूरेहूण द्वाराकेला पळाले, म्हणून त्यांस रणछोडदास असे म्हणतात. हे रणछोडदास द्वारकेकडे जात असतांना रस्त्यात खांडव वन लागले. इथे त्यांनी काही वर्षे मुक्काम केला. ते पशूपालांचा राजा असल्यामुळे त्यांच्या सोबत असंख्य मेढपाळ व गोपाळांचा समूह होता. खांडव वनात चारा पाणी भरपूर होते. मैलोनमैल जमीन होती. या ठिकाणी हे पशुपाल खुपच रमले. या पशूपालांना अहिर म्हणत. आणि त्यांची बोलण्

Somnath Chaterjee and Sumitra Mahajan

Image
सोमनाथ चॅटर्जी यांच्या नंतर सुमित्रा महाजन या लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून शोभतात... ! खंबीर, सक्षम आणि अभ्यासू ! . कितीही गंभीर, कठीण प्रसंगी या दोघांनी आपला संयम ढळू दिला नाहीय.. निःपक्ष, तटस्थपणे सभागृहाचं गाडं हाकललं, प्रसंगी खंबीर - प्रसंगी खेळकर भूमिका घेऊन सदस्यांना झोडपलं तसंच शाबासकी सुद्धा दिली / देतात... सभागृहाचं कामकाज चालण्यावर दोघांचा भर आहे... ! . यांचं कामकाज बघायला छान वाटतं... ! अशी माणसं लाखात एक होतात ! चॅटर्जी जरी सक्रीय राजकारणातून निवृत्त झालेले असले तरी लोकसभेच्या इतिहासावर त्यांचं नांव टॉप वर आहे, सुमित्राजी त्यांच्याच उंचीवर ! . मी या दोघांचा जिवश्च कंठश्च, डायहार्ट, मनापासून फॅन आहे... इतकंच !

Music Therapy

संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच गाणं गात असतो. समोर समे वर आल्यावर एक जरी मान डॊलली की तो भरून पावतो. गाणं म्हणण्याचा रियाज तर हवाच पण गाणं ऐकण्याचा ही रियाज हवा, नाही तर शास्त्रीय संगीतात काहीच रस वाटणार नाही. एकदा एका  कार्यक्रमाच्या वेळी आरती अंकलीकर म्हणाल्या होत्या, ”पट्टीच्या गवयाला कुठलाही नाद चालतो, मग तो पंख्याचा लयबद्ध नाद जरी असला, तरीही त्या नादावर गाणं आपोआप गुणगुणले जातं.” हीच गोष्ट पुढे नेत भाऊ मराठे यांनी सूत्र संचालन करतांना पंडित भॊमसेन जोशींचा एक  बडॊद्याचा अनुभव सांगितला... रात्रीची वेळ, भीमसेन जोशी टांग्यात बसून जात होते. टांग्याच्या घोड्यांच्या टापांचा, चाकांचा- लयबद्ध आवाज, आणि निःशब्द शांतता. पंडितजींनी स्वतःच्या नकळत  पूरियाधनाश्री  गुणगुणणे सुरु केले. रात्रीची निवांत वेळ, टांग्याच्या घोड्य़ांच्या टापाचा लयबद्ध आवाज, आणि पंडीतजींचा सूर... तेवढ्यात काहीतरी झालं आणि टांगा थांबला.   लय थांबली, आणि त्या बरोब

"संघ संस्कार"

काल संध्याकाळची गोष्ट... धायरी तथा पुण्यातले सगळे ऑटोवाले सामुहीक कामचुकार आहेत... आणि याचा याची देही अनुभव घेत नऱ्हे रोडवरुन वेताळ चौक मार्गे मुंबईच्या गाड्या उभ्या राहतात त्या विश्वास हॉटेल स्टॉप पर्यंत चालणं सुरु केलं... हातात जड बॅग, आणि निघण्यापूर्वी (ऑटो मिळेल या भ्रमात) डबल पोटभर हादडलेलं... त्यामुळे घामाघूम...!... ... वेताळ चौकातून पुढे आलो... तोच मागून एक स्विफ्ट कार आली... त्यात फ्रंट सिट वर दहा बारा वर्षांची एक लहान मुलगी बसलेली, तिचे पप्पा गाडी चालवत होते... गाडी थांबली... "दादा, कुठे जायचंय ? लिफ्ट हवी ?" त्या गोड मुलीनं, तितक्याच गोड आवाजात विचारलं... - जवळपास १ किमी, जड बॅग उचलून चालण्याचा नभविष्यती वाटणारा अनुभव घेत असतांना, चक्क स्वतःहून लिफ्ट... रेगिस्तानमे झील मिल जाऐ, टाईप वाटून गेलं... तरीही हावरटासारखं लगेच हो कसं म्हणणार ?... "नो नो.. इट्स ओके... थँक्स... मी जाईन..." त्यावर ड्राईव्ह करत असलेले काका... - "अरे, डोन्ट बी फॉर्मल... या, मी सोडतो... ! " जास्त आढेवेढे घेण्यात अर्थ नाही, हे समजून मी गाडीत जाऊन बसलो... "थँ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुदक्षिणा निधी

फेसबुकवर आणि अन्य समाजमाध्यमांत सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुदक्षिणा निधी याबाबत प्रश्न विचारणारी पुढील पोस्ट फिरत आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींना हा प्रश्न पडला असल्याने त्याचे उत्तर. धन्यवाद. (ता. क. - 'कशावरही विश्वास ठेवायचाच नाही' या वृत्तीच्या लोकांनी कमेंट वगैरे करून वेळ वाया घालवू नये) एक प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गुरुपौर्णिमेला संघध्वजासमोर गुरु दक्षिणा ठेवायची पद्धत आहे. दहा रूपयांपासून दहा लाखांपर्यत कितीही रक्कम रोख स्वरूपात गुरुदक्षिणा म्हणून ठेवली जाते. देशभर कोट्यवधी जमणार्या या रकमेची कधीही पावती दिली जात नाही. त्यावर संघाने कधी करही भरलेला नाही. मग हे धन काळे म्हणायचे की, धवल? या प्रश्नाचे उत्तर- संघाच्या गुरुदक्षिणेत जमा झालेली सर्व रक्कम शाखेच्या बँक खात्यात जमा केली जाते. सर्व खर्च त्याच निधीतून केले जातात. या सर्व खर्चाचा सर्व तपशील व्यवस्थित ठेवला जातो. बँक अकाऊंट स्टेटमेंट्स असतात. वेळोवेळी सर्व खर्चाचे ऑडिट होत असते. संघाच्या नित्य कामाच्या खर्चासाठी गुरुदक्षिणेव्यतिरिक्त अन्य कोणताही निधी घेतला जात नाही. मोठया कार्यक्रम ख

रागचर्चा

शास्त्रीय गायक / गायिका म्हणवून घेण्याचा नक्की निकष काय? शास्त्रीय संगीताच्या  मैफिलीत श्रोता नक्की काय ऐकायला जातो ! किंबहुना त्याने काय ऐकायला जाणे अपेक्षित आहे ? रागगायन / ख्यालगायन, टप्पा, ठुमरी, नाट्यसंगीत, कजरी ... ? म्हणजे बघा आपण जेवायला जातो तेव्हा भारतीय जेवणाच्या ताटात Main Course म्हणजेच पोळी, भाजी, आमटी, भात -  या गोष्टी भरपूर (पोटभर) आणि चविष्ट मिळणं, खाणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग जर उत्तम desert मिळालं तर चंगळच ! पण desert हा काही main course नाही आणि तो पोटभर खाता येत नाही आणि खायला आपण गेलेलोही नसतो. तेव्हा तो किती खाणार ? तसच हल्ली शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत होत. शास्त्रीय संगीत मैफल म्हंटल कि ख्यालगायन हा main course अपेक्षित आहे. त्यात रागमांडणी, रागशुद्धता, सूर, लय, रागोच्चार  अशा अनेक गोष्टींची अपेक्षा असते. पण हे सगळं ना सांभाळता एक उपचार म्हणून नाममात्र ख्याल गायचा. म्हणजे समोर डोळ्याला पोहे दिसतायेत म्हणून त्याला पोहे म्हणायचे इतकच. पोहे, मीठ, मिरच्या, कडीपत्ता, साखर सगळं आहे. पण त्याच प्रमाण धन्यवाद !! पण मग पोह्यानंतर दिलेलं सरबत फारच कमाल चविष्ट आह

पेन पुराण

Image
जे काम तीन रुपयांच्या यूज अॅन्ड थ्रो पेननं होतं, त्यासाठी तीस रुपये खर्च करुन नव्वद टक्के नुकसान सहज करण्याची माझी कधीच इच्छा नसते... अॅनेक्स टू कॉलेज, मी बिनधास्त होलसेल अडीच रुपये कॉस्ट पडणारे यूज अॅन्ड थ्रो चे च पेन वापरतो... काळं-निळं-लाल-हिरवं ! तीन रुपयात तिच बोँब पडते, जी तीनशेच्या पार्करनं पडणारे... तसं माझं मराठी-इंग्रजीचं अक्षर वगैरे बरंय...! आणि ते पेन हरवलं तर हळहळ फार फार दहा मिनिटांची ! थोडक्यात गोडी. . पण पॉईँट वेगळाय, पोष्टीचा मुद्दा हा आहे... एक पेन - साधारण दहा-बारा ते पंधरा दिवस जातं, कधीकधी जास्त... ते सेट झालं, की आपलं त्याच्याशी नकळत छोटसं नातं तयार होतं, सवय होते... सहजता येते. आणि शेवटाकडे येता येता, ते आपलं होतं... त्याचा उत्तरार्ध आला की आपल्याही नकळत त्याची जपणूक सुरु होते... पण कुठल्यातरी क्षणी ऐन महत्वाच्या वेळी ते संपतंच... त्याचा शेवटचा क्षण येतो.! . "गुडबाय बडी, थॅंक यू...." ! त्या पेननं कुठलीतरी महत्वाची डिल फायनल केलेली असते, परीक्षा दिलेली असते, कुणालातरी पत्र लिहीलेलं असतं... महत्वाचा मजकूर लिहीलेला असतो... बरंच काही असतं... त्या आठवण

Childhood

बालपणाचं म्हणाल तर "शरीराने वाढला, अक्कल कधी वाढणार ?"... "तेजा, बालीशपणा कमी कर... बायको येईल वर्षभरात"... "लहान आहेस कां ?"... वगैरे डायलॉग्स् आमच्या घरात दररोज सुरू असतात... ... माझ्या फेवरेट प्लेलिस्टमध्ये ससा तो ससा, किलबिल किलबिल, अग्गोबाई ढग्गोबाई, ट्वीकल ट्वींकल, चॉकलेटचा बंगला वगैरे टॉपवर आहे... दिवसभरात एकदा तरी ते वाजतंच !... मोबाईलची रिंगटोनही "ससा तो ससा" आहे... (मला ओळखणारे यावरुन शंभर गोष्टी ऐकवतात...) . आजी मला अजूनही बोक्या म्हणते... कुणी ससा... अगदी चारचौघात जरी बोलले तरी मी मज्जेत रिस्पॉन्स करतो ! . टिव्ही लावला की छोटा भीमचा एक एपिसोड बघतोच ! बोर्नव्हिटा पितो... .... अजून बरंच काही... .. यावरून खूप लेक्चर ऐकावं लागतं, पण जे मनाला वाटतं, तेच करावं - तेच करतो... इतरांसाठी तो बालीशपणा असेल, पण I am very honest with myself... स्वतःशी औपचारीक, Artificial, mature वागून तीर मारायचा नाहीय... जे आवडतं ते आवडतं... maturity and myself याचा समन्वय साधतांना myself झाकोळलं जाणार नाही हेच बघायचं... हा मूळ स्वभाव न दाबता ख

Madhujal

मधुजाल दोन मोठ्या नोटा बंद करून खेळ सुरू झाला. बदलून देतांना त्यांच्या समप्रमाणात नवीन चलन आले. १.सर्व खाती पॅनकार्ड, आधारने जोडली आहेत अन् डिपाॅझिट फक्त अडीच लाख रोज भरता येतील. म्हणजे पन्नास दिवसात फार तर फार सव्वा कोट रूपये भरता येतील (ते ही कोणतीही चौकशी न झाल्यास, नशीबावर हवाला) आली का पंचाईत? २. कदाचित् काही दिवसात बँका रोख भरणा बंद करतील कारण कर्जाचे अन् ठेवींचे प्रमाण व्यस्त होत जाईल अन् मग सरकार 'मुद्रा योजने'त का कर्जवाटप केले नाही? ह्याचे कारण मागणार! मुद्राची प्रकरणे निकालात न काढता ती कुजवली बँकांनी. आली का पंचाईत? ३. कॅश कोणीही व्यवहारात स्विकारत नाहीये. त्या नोटा बदलून घ्याव्या लागतील, घोषणापत्र भरून. आली का पंचाईत? ४. एखाद्या चालू खात्यासमोर 'हातची रोकड' पाहता त्यालाही भरण्याची बंधने आहेत. ती कोणी व्यावसायिकाच्या वतीने भरली तर व्यावसायिकाला 'रोख हाती ठेवून व्याज का भरत होतात?' सारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. आली का पंचाईत? ५. ज्या पतसंस्था ठेवी घेत जातायेत त्या जर कचाट्यात सापडल्या तर तोंड दाबून बुक्क्याचा मार. कोण सांगेल माझा

गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाटानं...

= गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाटानं... = निर्णय योग्य - स्वागतार्ह - नो डाऊट ! पण - खरं सांगतो.. घाई झाली, दैनंदिन व्यवहार बारगळल्याने व्यावसायिक, वैयक्तीक नुकसान झालं... पैसा असूनही ठाणठाण झाली... नोटांसाठी जवळपास पूर्ण दिवस गेला... ज्याचा काळा पैसा या उक्तीशी काडीचाही संबंध नाही तो माणूस मात्र नाहक पैशाने आणि वेळेने भरडला जातोय, हाल होताय हे ही तितकंच खरंय ! . दैनंदिन व्यवहाराला पैसा लागतो त्यामुळे करन्सी नोट रिप्लेस करणं तितकंच महत्वाचं आहे... नंतर करता येईल या कॅटॅगिरीत नाहीय हा कार्यक्रम ! लगेच व्हायलाच हवं असं आहे ! . निर्णय स्वागतार्ह आहे, त्यासाठी हाल सोसणंही क्रमप्राप्त आहेच... पण एका मर्यादेबाहेर नको... ! प्रत्येक गोष्टीला दुसरी नकारात्मक बाजू असतेच, आणि ती खुल्या दिलाने मान्य करायलाच हवी... सरकारच्या या निर्णयाला सुद्धा तशी दुसरी बाजू आहे... टक्केवारीने नोटा विकल्या जाताय, अडाणी-अशिक्षित ठगवले जाताय, सामान्य लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत, खाद्यपदार्थ - पेट्रोल सारख्या गोष्टींचा तुटवडा आलाय, बाहेरगावी असणाऱ्या लोकांचे खूप हाल होताय-होणारेत ! जन

:-D Alert

काळा पैसावाले लै तित्तरबित्तर झालेत. आणि सरकार त्यांच्या मागे हात धुवून लागलंय पाचशे-हजार च्या नोटा वापरून बुक केलेली एयर तिकिटे नाॅन रिफंडेबल असणार रोखीने रेल्वे बुकींग करताना सीलिंग लावलेलं आहे. पॅनकार्ड न घेता रोखीने सोने विकले तर सोनारांवर कारवाई ! शिवाय आत्ता लगोलग आयकरविभागाच्या एकाच वेळेस अनेक ठिकाणी अनेक शहरात धाडी सुरू आहेत !

USA

हिलरी हरली याचे मला दु:ख झाले नाही. त्याची कारणे दोन............. एक म्हणजे मला ट्रम्प जिंकायलाच हवा होता. त्याची जागतिक दहशतवादाविरूद्धची भूमिका कुणाला टोकाची वाटेल पण तीच वास्तव आहे. आणि तो मुळात येडझवा असल्यामुळे, त्याच्यात ती मांडण्याचे धाडस आहे. अंमलबजावणी हा पुढचा भाग. दुसरी गोष्ट म्हणजे, हिलरी ही काही कोणी साध्वी नाही. सध्याची तिच्यावर शेकणारी प्रकरणं पाहता, हिलरी मला महा आतल्या गाठीची वाटली. तिचा नवराही तसाच. भोसडीचा भारतात आला होता. पण नंतर पाकिस्तानची मदत त्याने कमी केली नाही ती नाहीच. त्यापेक्षा मोदींची कार्यपद्धती मानणारा, तसेच दहशतवादाला रंग आणि धर्म नसतो हे म्हणणार्‍यांना, जागतिक दहशतवादाचा रंग हिरवा आहे आणि धर्म इस्लाम आहे, हे वास्तव ठणकावून सांगणारा ट्रम्प त्याच्या वेडझवेपणासकट मला जवळचा वाटतो. - धोंडोपंत आपटे (साभार)

Indian Currency

Image
काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयांच्या चलनी नोटा बंद होणार आहेत. त्यामुळे ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारीच देशाला उद्देशून केलेल्या भाषणात हा निर्णय जाहीर केला. काळा पैसा आणि चलनी नोटांमधील अफरातफरी रोखण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चलनातून नोटा अचानक हद्दपार करण्यात आल्यानंतर आपल्या जवळील नोटांचे काय होणार? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू शकतो. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून हद्दपार झाल्या असल्या तरी नागरिकांना आपल्याकडील नोटा बदलून घेता येणे शक्य आहे. जुन्या नोटांच्या बदल्यात बॅंक आणि पोस्ट कार्यालयातून नव्या नोटा मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना पुरावा देण्याची आवश्यकता आहे. . – १० नोव्हेबर ते ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बँक आणि पोस्ट कार्यालयात जमा कराव्या लागणार आहेत. हा कालावधी एकूण ५० दिवसांचा आहे. – नागरिकांना नोटा जमा करताना ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आळखपत्रासाठी आधार कार्ड, मतदार कार्ड

बरं_झालं_पुलं_तुम्ही_लवकर_गेलात

Image
पु.लं.तुम्ही तुमच्या साहित्यात देवांपासुन संतांपर्यंत..नेत्यांपासुन शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांवर कोपरखळ्या,निखळ विनोद केलेत. पण तुम्ही आज असे काही विनोद केले असते तर आम्ही ते सहन केले नसते!कारण आता आमच्या चित्तवृत्ती इतक्या अस्थिर,उतावीळ झाल्या आहेत..आम्ही आमच्या आर्दशांबद्दल,जातींबद्दल इतके पजेसिव्ह झालो आहोत की आम्ही तुमच्या नर्म विनोदाला न समजता आमच्या धार्मीक.. जातीय भावना दुखावल्यामुळे आम्ही तुमचे पुतळे जाळले असते. सोशियल साइट्सवर ''पु.ल.देशपांडे हेटर्स'' पेजेस तयार केले असते. बरं झालं तुम्ही आधीच गेलात.. तुम्हाला आज संगीत नाटकांवर प्रेम करणारे रावसाहेब भेटले नसते की इतिहास जगणारे हरीतात्या, चप्पल झिजेस्तोवर शिक्षण सेवा देणारे चितळे मास्तर भेटले नसतेच. कारण ती जमात आता कालबाह्य; नव्हे नामशेष झाली आहेत. आणि समजा आजच्या काळातल्या नारायणावर वा अंतु बर्व्यावर तुम्ही लिहीलं असतं तर तो म्हणला असता ''अरे आमच्यावर विनोद काय करतोस!!पहिले आमची रॉयल्टी दे''!! त्यामुळे बरंच झालं तुम्ही फार आधीच जन्मलात!आणि मुख्य म्हणजे आज तुमचे विनोद..शब्दातील मर्

Happy Diwali

Image
"पैसा" हा ९० टक्के प्रॉब्लेम्सवर एकमेव उपाय असतो... आणि प्रॅक्टीकली, पैसा हाच जवळपास सर्वच सुखांना कारक असतो... ! त्यामुळे योग्य मार्गाने येणाऱ्या प्रत्येक पैश्यांचं मनःपूर्वक, आनंदाने स्वागत करा...  ! . तुम्हाला आयुष्य सोयीस्कर होण्यासाठी, सुखं मिळण्यासाठी आवश्यक तितका, भरपूर पैसा प्राप्त होवो... व्यापारात वृद्धी होवो... कार्यक्षेत्रात वाढ होवो... ! . भरपूर पैसा येवू देत...! . एक दिवस डॉलरच्या तुलनेत आपला रुपया मोठ्ठा होईल, शेअर्स - सेन्सेक्स वाढता होईल ! :-) :-) लक्ष्मीपूजन - दिवाळीच्या लाखरुपयाच्या, भरभराटीच्या शुभेच्छा ! ...

Diwali...!! With humanity !! :-)

आमचे तसे खूप जूने ग्राहक काल दुकानात आलेले... तेव्हा पप्पा इथे नव्हते... काहींचा मामला उधारीवर असल्याने पप्पा इथे नसले तर आम्ही शक्यतोवर अश्यांना काही वेळानंतर पप्पा असतांनाच यायला सांगतो... कालची गोष्ट... . ते ग्राहक जुने असले तरी, पेमेंटच्या बाबतीत जरा जास्त जड आहेत हे माहित होतं... उधारीच्या बाबतीत आपल्या हातून काही आगाऊपणा नको, म्हणून काल दुपारी त्यांना - "पप्पा आले की या... मला इथलं माहित नाही" असं सांगून परत पाठवलं... त्यांचा मागचा ड्यू पण तगडाच... सो उगाच अंगावर घ्यायला नको ! पप्पा आल्यावर त्यांना सांगितलं... ! त्या ग्राहकाबद्दल एकुण अनूभव ठिक नसल्यानं पप्पांनी पण थोडं नाराजीच्या सूरातच ठरवलं - ड्यूज क्लेअर केले तरच बघू... खूप फिरावं लागतं त्यांच्यामागे... तो विषय तिथे संपला ! दुकान वाढवलं... . आज सकाळी सकाळी, पप्पांनी त्यांना स्वतःहून फोन केला... "केव्हाही येऊन घेऊन जा कपडे... जे हवे ते ! ... " आणि आम्हालाही सांगितलं की त्यांना जे हवं ते देऊन द्या.. मला वाटलं ते ड्यूज क्लीअर करत असतील, पण तसं तर काहीच बोलले नाही... मग ? - "मागचं क्लीअर करताय क

लक्ष्मणायन

Image
लक्ष्मणायण : : रामायण मुख्यत: रामांचा वनवास, पितृप्रेम, एकपत्नीव्रत सितेची पतीनिष्ठा, त्याग, कौसल्येचं पुत्रप्रेम आणि भरताचं बंधूप्रेम याभोवती गुंफलं गेलंय...!! पण केँद्रस्थानी राम असता लक्ष्मण आणि त्यांचं कुटूंब दुर्देवाने झाकोळलं गेलंय... किँबहूना त्यागाच्या दृष्टीनं त्यांचं कार्य रामांपेक्षाही मोठं आहे. १. लक्ष्मणांनी रामांबरोबर वनवास भोगला. त्यांची सेवा केली. तितकाच त्रास, दु:ख सहन केलं. (यादरम्यान लक्ष्मण तत्वत: एकटेच होते. रामांबरोबर सीता आणि लक्ष्मण होते.) २. कौसल्येप्रमाणे सुमित्रेनेही आपला पुत्र १४ वर्ष दूर ठेवला. परंतू त्या माऊलीचा त्याग कौसल्यांपुढे कां झाकोळला जावा ? ३. लक्ष्मणपत्नी उर्मिला ! एकमेकांपासून १४ वर्ष दूर राहणाऱ्‍या या दांपत्याच्या प्रेमाने विश्वासाचे एक उदाहरण निर्माण केले. एकपत्नीव्रत राम तसंच एकपत्नीव्रत लक्ष्मण का म्हणू नये ? उर्मिलेचा त्याग सीतांपुढे झाकोळला गेला. त्यांच्या वाट्याला न्याय आलाच नाही. ४. भरतांच्या बंधूप्रेमाचं उदाहरण दिलं जातं. पण त्याचवेळी शत्रुघ्नपण आपल्या सख्ख्या भावाच्या प्रेमापासून वंचित होते याचा साधा उल्लेखही नाही. (लक

Bhagawadgeeta भगवद्गीता

Image
=अनुभूती= साधारण दोन महिन्यांपूर्वी घरात श्रीमद्भगवद्गीतेचं मराठी अर्थासहीत असलेलं, गीताप्रेसचं पुस्तक सापडलं... श्रीमद्भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करुन शाळेत असतांना बक्षिस मिळालेलं आठवलं आणि अगदी सहज, पण घाईतच त्यातल्या बाराव्या अध्यायाचं रॅपिड रिडीँग सुरु केलं... संस्कृत उच्चार, लहानपणी पाठ केलेले - त्यामुळे अगदी परफेक्ट उच्चार होत नव्हते, पण बरंच आठवत असल्याने छान वाटत होतं... अर्थ वाचतांना इंट्रेस्टीँग वाटत होतं... यात काहीतरी आहे हे डोक्यात वाजलं - तेव्हा घाई होती, ते तिथेच ठेवलं... पण तेच डोक्यात सुरु झालं... यात काहीतरी नक्की आहे... . दुसऱ्‍या दिवशी रिकाम्या वेळेत पुन्हा ते पुस्तक घेतलं.... आणि बारावा अध्याय उघडला... एक एक श्लोक आणि त्याचा अर्थ मनात वाचणं सुरु केलं... इंट्रेस्टीँग... त्यातपण संस्कृत...! पण मनात उच्चार नीट होत नव्हते - फील येत नव्हता... तेव्हा आमच्या संस्कृतच्या वियन कॉलनी, देवपूर, धुळे स्थित ऐंशी वर्षीय जोशी मॅडम, त्यांचं घर, थंडी, सकाळी साडेपाचची वेळ, मॉर्टिनची कॉईल, आणि त्या अद्भूत वातावरणात त्यांनी दिलेला गुरुमंत्र जसाचं तसा आठवला... "तेजा, संस्क

OPINION

बागळेने अभ बर्तकांना चालू चर्चेतून हाकलून दिलं... ! . कुठल्याही घटनेवर आपलं काहीतरी मत असावं, त्यामुळे ते बनवण्यासाठी आम्ही (आदरार्थी मी) स्वतःची एकसदस्यीय समिती नेमली. त्याचा तोंडी अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. . वर्तकांनी आझाद मैदानांवर झालेल्या आंदोलनाबद्दल अतिशयोक्ती अलंकार वापरुन एक मोठ्ठी पुडी सोडली... जी जरा जास्त झाली... सनातनवर, हिंदूंवर पेटलेल्या वाळेला आयतीच नाडी हातात मिळाली... वाळेची गत आधीच म.. त्यात म प्यायला... त्यात विंचू चावला टाईप आहे... चॅनेलचा टिआरपी डोंबलाइतका पण नाही... भरीस भर त्या खवड्याला कुठल्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्याही मिळत नाहीत... त्यामुळे सदैव piles झाल्यासारखा चेहरा घेऊन फिरणाऱ्या नानाला वर्तकाच्या रुपाने आयतीच शिकार मिळाली... आणि तो बर्तकांवर फुल्ल चढून बसला... परीणामी : इज्जतीचा पंचनामा करुन बर्तक बाहेर पडले.. . बर्तक हा माणूस त्याहून भंपक... कुठे काय बोलावं याची जराही अक्कल नसलेला... कशाचंच गांभिर्य नसलेला.  दाभोळकरांच्या श्रद्धांजली सभेत या माणसाने दात काढले होते... मुद्दा भलेही योग्य असेल, पण प्रक्षोभक बोलून, दोन चार जास्तीच्या पुड्या सोडू

Sehwag

२०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर माझा अचानक क्रिकेट मधला रस संपला. म्हणजे याची देही याची डोळा वर्ल्ड कप जिंकलेला पाहायचा होता. ती इच्छा पूर्ण झाली आणि अचानक एक पोकळी निर्माण झाली. सगळे काही मिळाले असे म्हणून समाधी वगैरे घेणार्या लोकांसारखं झालं. मलाही कधीकधी हे विचित्र वाटायचं पण असं घडलं हे खरंच. दरम्यानच्या काळात माझे आवडते द्रविड, लक्ष्मण, कुंबळे रिटायर झाले. सचिन शंभरची म्याजीक फिगर गाठण्यासाठी चाचपडत होता. अगदी कपिलइतका नाही तरी हा काळ बराचसा केविलवाणा होता त्याच्यासाठी. सेहवागही तांदळातल्या खड्यासारखा बाजूला काढला गेला होता. तुफान फटकेबाजी करणारे फलंदाज नेहमीच लोकप्रिय होतात. माझी ओरिजिनल आवड द्रविड, लक्ष्मण, सचिन असली तरी सेहवाग वर्ज्य नव्हता. नव्हताच. बेदरकारपणाचा तो नुसता आव आणत नव्हता ( के श्रीकांत वगैरेसारखा) तो खरच तसा होता. १९५ वर असताना भोXXच्याने सिक्स मारून डबल सेन्चुरी काढली ती पण टेस्ट मध्ये. हे निव्वळ अशक्य माणूसच करू जाणे. समोर कोण बॉलर आहे याचा त्याला कधी फरक नाही पडला. २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये तो आणि सचिन,  अख्तरवर जे चढ चढ चढले होते ते अविस्मरणीय. सेह

Seth

Image
नवरात्र ते दिवाळी हा पूर्ण काळ मी आमच्या दुकानातच आहे... अॅज "सेssठ" ! यावेळी जरा जास्त लक्ष घातलंय ! ऑफीसमध्यल्या "सर" पेक्षा इथली "सेठ" वाली फिलींग जबरदस्त आहे. . इथे तऱ्हेतऱ्हेचे लोकं भेटतात... १ रुपया ते १ लाख वाले. रुमाल ते पैठणी घेणारे... पण प्रत्येकाला स्वभावनुरुप हाताळण्याची पद्धत वेगळी, तो माणूस रिकाम्या हाती परत जाऊ न देण्याची शर्थ, आवजो वेळी पुन्हा परत येण्याचा गोड बोलत निरोप देणं... आणि त्या माणसाला आपलेपणा जाणवून देण्याचा, जोडण्याचा प्रयत्न ! सगळं भन्नाट आहे ! मी तर शिकतोय, पण मज्जा येतेय... पप्पांना-आजोबांना हे करतांना नेहमी बघतो. पण वाटतं तितकं सोप्पं नाही ! . कार्पोरेटमधले sophisticated सर, यस, नो, शुअर, ओहss एटिकेट्स एकीकडे, तर दुकानातले सेठ, मालिक, येत चला... वगैरे दुसरीकडे....! दुकानात येतांना आपलं शिक्षण बाहेर काढून यायचं - पहिला धडा मिळालेला तो हाच ! जगणं खूप सुंदर आहे... फक्त क्लॉक्स मॅच व्हायला हवं ! अर्थात ज्या त्या वेळेवर ती गोष्ट व्हायला हवी - इतकंच ! . टिप : साड्या, पैठणी, रेडीमेडस्, गारमेन्टस्, हॅन्डलूम, गालीचे वगैरे

Why Burns Ravan ??

रावण दहन या प्रकाराचा आधीपासून मी निषेध करतो... बुराई पे अच्छाईकी जीत वगैरे गोष्टी ठिक, पण रावण जाळण्याचं लॉजिक मला अजुनही कळलं नाहीय... . रावण-राम हे पौराणिक पात्र आहेत. जे एका कथेच्या स्वरूपात आपल्यासमोर येतात... त्या कथेत शेवटी रामाने रावणाचा वध केला, रावणाने माफी मागितली, रामाने माफ केलं - विषय संपला ! पुन्हा पुन्हा दरवर्षी रावणाच्या नावाने शिमगा करायचा आधिकार कुणी दिलाय ? आपण त्या रावणाच्या समोर उभं राहणाच्या तरी लायकीचे आहोत कां ? की स्वतःला राम समजतो ? . पौराणिक कथांतून चांगलं ते घ्यायचं, बस ! रावण प्रचंड शक्तीशाली, बुद्धीमान, शिवभक्त व्यक्ती होते ! NoOne is 100% Pure !! ना रावण - ना राम ! शूर्पणखेचा बदला घेण्यासाठी रामायण घडलं होतं ! रामायणातून राम-लक्ष्मण-रावण -कुंभकर्ण-हनुमान यांच्यापासून घेण्यासारखं खूप आहे... दशानन तर अष्टग्रंथी होते !... मूळात "रामायण" हे राजकारण आहे - राम-रावण या दोन राजांमधील युद्ध ! एकाचा विजय झाला, एकाचा पराभव ! त्यामूळे रावणाचा असूर म्हणून प्रचार मुर्खपणा आहे ! . बुराई पर अच्छाई करायचं तर व्यसनी, बलात्कारी, नतद्रष्ट, वायफळ, देशद्रोह

Dasara

Image
दसरा आणि थाट भैरव ! . दसऱ्याची सकाळ - छान शब्द "प्रभाsत"... दसऱ्याची सकाळ चपखल प्रभाsत असते... एकाच मापात... फिक्स ! दसरा,  दिवाळी, रविवार, गणपती, १६ जानेवारी या सणांच्या सकाळ या त्या त्या दिवसाप्रमाणे सेम असतात, जसं दिवाळीची पहाट... रविवारची मॉर्निंग तशी दसरा = प्रभाsत... एकाच शब्दात सगळं येतं ! . मी रोजच लवकर उठतो, पण दसऱ्याला संचलनाची घाई असते... त्यात यावेळी नवीन गणवेश घालून संचलन असल्यानं उत्साह जरा दांडगा होता !... त्यामुळे लवकर करता करता अतिच लवकर, सकाळी ५ वाजता मी पूर्ण तयार झालो... त्यामुळे साधारण तासभर वेळ होता हातात, मग प्रभाsत सुरेल करायची ठरली... हि एक दसऱ्याची माझी स्वतःसाठी केलेली प्रथा ... ! पेटी काढली, थंडी, पहाट आणि धुकं... त्यामुळे प्रभाsतचं "परभात" मनात वाजू लागलं... थाट भैरव... राग कलिंगडा... बंदीश : अब होने लगी परभात सखी... याचा अंतरा खूप छान आहे. "अरुण किरण सखी पूरब प्रकाशत... विजयादशमीची सकाळ, अंगावर संघाचा गणवेश आणि तब्येतीचा चंचल प्रकृतीचा कलिंगडा ! पूर्ण प्रभाsतचं वर्णन आहे. मूड फ्रेश फ्रेश !... सुरांच्या सातव्या आसमानपर असणं...

बस - तिलंग

"बस" या अद्तभूत वाहनाचं मला आधीपासून विशेष कौतूक वाटतं. बनानेवालेने अपना पूरा दिमाग लगाके इसको बनाया टाईप... नो नाजूकपणा इज देअर ! सगळं असं भारदस्त ! आपलं अवाढव्य शरीर घेऊन, तीस-पन्नास प्रवाशांसह लांब लांब पल्ले रमत गमत पार करायचे.... याला म्हणतात वट्ट्ट्ट ! पीएमटी असो वा बेस्ट, सर्वकालीन यष्टी ते एसी स्लीपर कोच एअर सस्पेँशन बस... डौल एकसारखाच ! सिग्नलपाशी थांबलेल्या बस बघा, आपल्याच गुर्मित ! नाकासमोर चालणार... इकडे तिकडे बघणारही नाही. एखादा राजा आपला अवाढव्य थाट सांभळत चालतोय असा... . या बस समोरुन जातांना पार नजरेआड होईपर्यँत, "तिलंग" रागातली बंदीश माझ्या मनात वाजत राहते... अगदी सवयीनेच ! त्या बसेसचा मागचा भाग डूलत राहतो... इकडे स्थायी सुरु होते... "चलत चाल गोपी ग्वाल, गजगामिनी डुलत डुलत...." हा रागही खमाज थाटातला, चंचल प्रकृतीचा आणि गंधार-निषाद वादी-संवादी असलेला असल्याने म्हणतांना गोड तितकाच भारदस्त आणि तब्येतीचा ! . बस दिसते, ही बंदिश वाजते, भलमोठं खळखळून हसू येतं... मूड फ्रेश होतो... आणखी काय हवंय... !! ...

निशब्द

माझा व्यवसाय सुरु करुन एक वर्ष होतंय... लहान स्वरुप आहे... पण येणारे अनुभव तगडे ! आजचीच गोष्ट... . पुर्ण झालेल्या प्रोजेक्ट्सची डिलीवरी देण्यासाठी मोस्टली टिमसोबत मी स्वत: जातो... कारण एकतर ओळखी करुन घेणं, दुसरं म्हणजे सगळं स्वत:समोर होतं... धाकधूक राहत नाही. गेल्या महिन्यात मिळालेला एक प्रोजेक्ट हॅँडओवर करण्यासाठी मी क्लायंट कंपनीत गेलो... त्या कंपनीचा संसार जवळपास २०० कोटीँचा. मी ज्यासाठी गेलो त्याची प्रोजेक्ट वॅल्यू काही हजार फक्त... त्यांच्यासाठी म्हणावं तर शुल्लक ! झाड की पत्ती वगैरे... तो प्रोजेक्ट मला मिळणं, मी तो बनवणं, आणि आ करुन सगळं सक्सेसफूली डन करणं हे माझाच विश्वास बसण्यापलीकडे होतं... स्वप्नात असावं असं... . मी आणि माझी टिम तिथे गेलो... पाहूणचार आणि इन्स्टॉलेशनचं काम झालं... ऑल टेस्ट ओके आल्या... धाकधूक खत्म ! पेमेँटका समय आया ! तिथला कोऑर्डीनेटर बोलला, आप उपरके प्लोरपे चलके बॉससे मिलेँगे ? वहापेही चेक मिलेगा, उनको आपसे मिलना है ! . "बॉस ?" इथल्या ब्रॅँचचे हेड वगैरे असतील ! आपल्याला पैशाशी मतलब. (मनातला विचार ! ) - ठिक है ! चलीये. वरच्या मजल्यावर गेल

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved